कल्लोळ..!!
कधी काळजाला समेचा दिलासा..
मुखी शब्द, नि:शब्द.. उगा पोळलेला!
तसे बंध कुठले-कधी जाणिवेला
ओठां-मनाचा पुन्हा मेळ झाला!
नको तेच कडवे मनी आळविले!
हृदया ’कळा’या तरी वेळ गेला..
असे काय होते उरी प्राक्तनाच्या..
अवधान चुकले, पुन्हा घोळ झाला..!
अरे, राघवा, हे पुन्हा तेच झाले..
मनी.. भावनांनी.. कल्लोळ केला..!!
राघव