आज काय घडले... चैत्र व. ५ मत्स्येंद्रनाथांची समाधि !

शके ११३२ च्या सुमारास चैत्र व.५ रोजी आदिनाथ सांप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येंद्रनाथ यांनी सातारा जिल्ह्यांत मत्स्येंद्रगड येथे समाधि घेतली!

शके ११३२ च्या सुमारास चैत्र व.५ रोजी आदिनाथ सांप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येंद्रनाथ यांनी सातारा जिल्ह्यांत मत्स्येंद्रगड येथे समाधि घेतली!

शके १२२९ च्या चैत्र व. ४ रोजी महाराष्ट्रांतील देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यांस मलिक काफूरनें कैद करून दिल्लीला नेले.
मस्त पाऊस पडतोय,विचार येतो मनात की हे धुंद वातावरण एन्जॉय करावं, अनेक पर्याय आहेत की समोर, छानशी गझल ऐकत वाईनचे घोट घेत बसावं की अपूर्ण राहिलेल्या पुस्तकात गुडूप होऊन जावं, मैत्रीणीशी चॅट करत मनसोक्त वेळ घालवावा की एखादा गरमागरम पदार्थ चाखत जिव्हेला तृप्त करावं ?? यातलं काही करून मानवरची मरगळ जाईल अस वाटत नाही, आयुष्यात एका क्षणी एकही पुस्तक जवळच वाटत नाही की एखाद्या गोष्टीचा मनसोक्त आस्वाद घेऊन मन रमेल असंही वाटत नाही.सगळा रंगमंच सजलेला असताना आतली अस्वस्थता स्टेजवर पाय ठेऊच देईना.या मन नावाच्या अवयवाच काही कळत नाही,भवताल मस्त धुंद तर हे आपलं अस्वस्थ ,काय हवं असत मनाला??
ज्या प्रश्नांना नसते उत्तर
तेच मला खुणविती निरंतर
अज्ञेयाच्या पल्याडून कुणी
म्हणते,"यातून सुटका नाही"
तीन मितींची अभेद्य कारा
तिचे दार किलकिले उघडुनी
बघती प्रतिभावान थोडके
तेही म्हणती,"सुटका नाही"
तुंदिलतनु तुपकट ध्येयांची
हाक ऐकुनी डळमळते मन
उनाड भटकी पायवाट मग
खेचून म्हणते,"सुटका नाही"
काही वर्षांपूर्वी मी या कथेवर आधारित एक शशक लिहिली होती. त्याच संपूर्ण कथेचं हे भाषांतर.
मूळ कथा : The Mirror by Catulle Mendes
***
आरसा
त्या देशात मुळी आरसेच नव्हते. किती शोधले, तरी अगदी औषधाला सुद्धा सापडले नसते.
राणीची आज्ञाच होती ना, "तोडून टाका ते आरसे. फोडून अगदी बारीक चुरा करून टाका. कोणाच्या घरात एक एवढासा तुकडा जरी सापडला तर याद राखा. घरातल्या सगळ्यांना हाल हाल करून मारून टाकीन." यापुढे कोणाची काय बिशाद, आरसे बाळगायची!
कसली ही विचित्र आज्ञा!
विदेशी कथा परिचयमाला भाग १ इथे
...
आमच्या गुर्जींची क्वीता वाचून आमच्याही मलात तरंग उठले
(मल-आशय !)
मलाशयाच्या उदरामध्ये, गूढ कहाणि वसते आहे.
नाकात तुमच्या काही का ही?, का म्हणता आत दरवळते आहे.
खोल तळाशी मोठा पापलेट, वा अथवा चिकन चा तुकडा.
मलसारक हे चूर्ण त्यावरी, का? एरंडेल हा - जुनाच झगडा!
असे मलाशय अशी ठिकाणे, गूढ मनाचे रूपक असती.
केवळ चित्र तसे पाहता, नाक दाबूनी दूर धावती.
अर्थ तसा सहजी अन् सोपा, कोडे सगळे सांगून जातो.
सोसू कळ थोडी म्हणता, अवचित प्रोग्राम होऊन जातो.
जलाशयाच्या उदरामध्ये, गूढ कहाणि वसते आहे.
मनात माझ्या काही का ही?, म्हणता आतच बसते आहे.
सारखं छातीत दुखतंय
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.
जुन्या चहाला पुन्हा नव्याने उकळी आणू,
दात नसू दे, चणे खायला कवळी आणू!
अंदर नंगे बाहर चंगे सगळे येथे
ज्ञान पाजण्या कफनी थोडी ढगळी आणू!
ढंग, लहेजा, भाषा आपली आतषबाजी,
माळ लवंगी, बॉम्ब लक्षुमी-सुतळी आणू!
दुनियेला या कसले सोने लागुन गेले?
आपण आपली बाळ बाहुली (बेबी डॉलही) पितळी आणू!
गूण लागला नाही तरिही वाण लागु दे
ढवळ्या-पवळ्यासाठी ढवळी-पवळी आणू !
कृष्ण व्हायचे आहे पण वाजेना पावा,
दह्या-दुधा-लोण्याला शोधुन गवळी आणू !
~मनमेघ