ती गच्चीवरची झाडं.
आता हे नाव वाचून तुम्हाला वाटत असेल ह्यात काय नवीन आहे, काय विशेष आहे ? तर विशेष अस काही नाही, साधी झाडंच आहेत ती. पण मला जरा वेगळी वाटली, कशी ? ते सांगावास वाटलं, म्हणून हा तोकडा का होईना प्रयत्न.
आता हे नाव वाचून तुम्हाला वाटत असेल ह्यात काय नवीन आहे, काय विशेष आहे ? तर विशेष अस काही नाही, साधी झाडंच आहेत ती. पण मला जरा वेगळी वाटली, कशी ? ते सांगावास वाटलं, म्हणून हा तोकडा का होईना प्रयत्न.
खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता.
पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे.
श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व.
आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा?
किती वाजता करायचा?
खायला-प्यायला काय आणायचे?
इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच.
तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो.
(तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)
कापडाच्या दुकानात
एक कापड आवडलं
पण घेतलं नाही
दुकानदाराला सांगितलं
धागा छान आहे
रंग उत्तम आहे
नक्षीही सुरेख आहे
फक्त 'टेक्श्चर' चांगलं नाही
नंतर विचार केला, तेंव्हा
काही माणसं डोळ्यासमोर तरळली;
त्यांचही असंच आहे....
आय टी मध्ये राजीनामा देणे, या क्रियेला पेपर टाकणे असे म्हणतात, त्यावर हि कविता.
साल्याने पेपर टाकलाय...................
तो रोज ऑफिसला येतो
वेळेत येतो; वेळेत जातो
नऊ तास भरले नाहीत; तर चिंता करतो
कमी भरले तास; तर नंतर भरून काढतो
साहेबाने काम दिले; तर नाश्त्याला पण जात नाही
साहेब जागेवर असताना; जागचा उठत नाही
कितीपण महत्वाचे काम असो; साहेब गायब झाल्याशिवाय हा जागचा हालत नाही
साहेब खुर्चीत यायच्या आत, जागेवर यायची सवय काही जात नाही
आमचे जहाज संध्याकाळी गोव्याच्या आसपास पोहोचले. अर्थात हे फक्त आम्हाला जी पी एस आणि दीप स्तंभांवरून कळत होते. पावसाळी वातावरणामुळे समुद्रकिनारा दिसत नव्हताच. पण गोव्याच्या आसपास पोहोचल्यावर तेथील तट रक्षक दलाच्या मुख्यालयात संपर्क केला असता पुढचे दोन दिवस गोवा ते कारवार अशी गस्त घालण्याचे आदेश मिळाले. म्हणजे सरळ दक्षिणेकडे कूच करायच्या ऐवजी तिथेच खेटे मारत राहायचे होते.
एका सामान्य माणसाची आत्मकविता-
सांगा असतो का कधी मी माझा?
----------------------
नाही नसतोच कधी मी माझा!
नाही नसतोच कधी मी माझा!
असतो मी शिक्षकांचा,
असतो जेव्हा शाळेमध्ये!
असतो मी सवंगडी अन भावंडांचा,
खेळतो जेव्हा अंगणामध्ये!
असतो मी बाॅसचा,
असतो जेव्हा आॅफिसमध्ये!
असतो मी कस्टमरचा,
असतो जेव्हा व्यवसायामध्ये!
असतो मी बायको मुलांचा,
असतो जेव्हा घरामध्ये!
असतो मी आई वडीलांचा,
असतो जेव्हा घरामध्ये!
असतो मी मित्रांचा,
बसतो जेव्हा त्यांचेमध्ये!
http://www.misalpav.com/node/29468 भाग दोन...http://www.misalpav.com/node/29344...भाग एक
चिपळूणला गांधरेश्वर नावाच शंकराच देउळ आहे.मूळ शहरापासून जरा बाजूलाच आहे.वाशिष्ठी नदीकिनारी हे वसलय.माझ एक आवडत देउळ.खर तर देउळ साधास आणि छान आहे.पण त्याभोवतीचा परिसर जास्त रम्य आहे.
(कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांची माफी मागून)
खचाखच भरलेली बस स्टॉपवर उभी राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, पावलांवर झेलून घे बुटांचे मार
इवलसं दुःख पिउन टाक
बघ माझी आठवण येते का?
रिक्षाने उडणारा धुळीचा लोट अंगावर घे,
पदर सांभाळ, हात दाखव
इतक करुनही तो नाहीच थांबला तर चालत जा, स्टेशनवर ये
तिथे गर्दी उसळलेली असेलच, फलाटावर पाय रोवून उभी रहा
सारी गर्दी सरकेल एकाच डब्यात, बघ माझी आठवण येते का?
आकाशवाणीच्या वृत्तकक्षात मी छान रमले होते. विद्यार्थी कधीतरी शंका विचारायला यायचे, शुभेच्छापत्रांसाठी कॉपी रायटिंगही सुरू होतं. घरात बहिणीच्या लग्नाची धामधूम सुरू होती. घरातलं पहिलं कार्य. सगळेच उत्साहात होते. ठरल्याप्रमाणे सगळं छान पार पडलं आणि ती आपल्या नव्या घरी रूळली. आमच्या घरी आम्ही अवघे पाच जण. आई-बाबा आणि आम्ही तीन भावंडं. त्यामुळे ताई लग्न करून गेल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस तिचं नसणं खूप प्रकर्षाने जाणवत राहिलं. घरात आम्हा भावंडांमध्ये कॉलेजमध्ये जाणारी ताई पहिली. त्यातून ती कॉलेजच्या तिसऱ्या वर्षापासून अर्धवेळ नोकरी करायची. तिच्याकडे तिच्या रोजच्या अनुभवांचा खजिना असायचा.