शरदोत्सव !
१. वसंतोत्सव
२.ग्रीष्मोत्सव
३.वर्षा
परतीचा पाऊस आपली पावले जोरदार आपटत निघाला असतो.बरेचदा समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याने वादळ धडकून नासधूस होत राहते. पावसाने पूर्ण रजा घेतल्यावर आल्हाददायी थंड हवा वाहू लागते.चिखल नाहीसा होऊन जमिनी पायी फिरण्यासाठी योग्य आहेत.नितळ शांतता रमू लागते.शेवंती,झेंडूच्या फुलांनी मोहक चादर सृष्टीला नेसविली असते.नवरात्रीच्या उत्सवात या फुलांनी आणि इतर फुलांनी एक उर्जेची उपासना अधोरेखित होत राहते.