Skip to main content

समाज

"रुद्रावतारी" न्यायाधीश

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 13/06/2025 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, चर्चेसाठी एक रोचक विषय आहे. न्यायाधीशांना अक्कल शिकवणारे, अधिक्षेप करणारे वकील असंख्य असतात. पण वकीलांना सूतासारखे सरळ करणारे न्यायाधीश पण विरळाच... मला न्यायालयीन कामकाजाच्या क्लिपा बघायचा छंद लागला आहे. त्यात हे एक न्यायाधीश महाशय सापडले. ते कायम अशा रूद्रावतारातच कोर्टरूममध्ये दिसतात. त्यांच्या पुढील मुलाखतीत ते म्हणतात, कोर्टात दाव्यांचा महास्फोट झाला आहे. हे एक प्रकारे चांगलेच आहे. कोर्टातल्या दाव्यांची संख्या आणखी वाढायला हवी.

अहमदाबाद क्रॅश - बोईंग ७८७ ड्रीमलायनर - भंगलेलं स्वप्न.

लेखक गवि यांनी गुरुवार, 12/06/2025 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं. इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा. कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते. ड्रीम लायनर हे विमान (मॉडेल) तुलनेत नवीन आहे. त्यात अनेक आधुनिक सुविधा, विशेषतः हाय फाय म्हणता येतील अशा आहेत. वरवरचे उदाहरण म्हणजे खिडक्या बंद करण्याचे झाकण न वापरता बटण फिरवून काच काळी करत नेणे आणि गडद करणे.

सलाम वेंकी...उत्तम हिंदी चित्रपट

लेखक नपा यांनी शनिवार, 07/06/2025 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला हा - काजोल, विशाल जेठवा यांच्यासह आमिर खान ची छोटी भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच 'चॅनेल सर्फिंग' करताना दिसला. एवढ्या सशक्त अभिनेत्यांचा हा कोणता सिनेमा आपण पाहीला नाही, या विचाराने सर्फिंग थांबले. जसजसं कथानक पुढे सरकायला लागलं, तसतसं न पाहिलेल्या भागाचा अंदाज येऊ लागला आणि चित्रपटात गुंतत गेलो - याचे श्रेय नक्कीच दिग्दर्शक रेवती (दक्षिणात्य अभिनेत्री), पटकथा लेखक समीर अरोरा व कौसर मुनीर या त्रयीना जातं. हा चित्रपट श्रीकांत मूर्थी यांच्या The Last Hurrah या पुस्तकांवर आधारित आहे.

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 06/06/2025 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

वकीलाना टाटा-बायबाय

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 02/06/2025 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
ए० आय० ने अनेक क्षेत्रात धूमाकूळ घालत आपले पाय रोवले आहेत. ए० आय० मुळे आता वकीलांना लवकरच "टाटा-बायबाय" करायची वेळ आली आहे. असे झाले तर कायद्याच्या लढाया लढण्यासाठी उर्मट आणि स्वत:च्याच अशीलांचे रक्त पिणार्‍या, तसेच फसवणार्‍या वकीलांना मोठी जरब बसेल अशी चिन्हे आहेत. अर्थात अडाणी लोकांना ही जमात फसवत राहीलच... https://youtu.be/WoqcSIcdx-Y?si=FURG5R1kytIfSUeB

पुस्तकं..

लेखक आजी यांनी सोमवार, 26/05/2025 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेच पुस्तकाला पवित्र मानतो. समग्र जगाचं ज्ञान देणारी खिडकी मानतो. "न हि ज्ञानेनसदृशं पवित्रं इह विद्यते", म्हणजे ज्ञानाइतकं पवित्र या जगात दुसरं काही नाही. असं वचन आहे. हे ज्ञान आपल्याला पुस्तकं देतात. जेव्हा माणसाला छपाईचं तंत्र अवगत नव्हतं तेव्हा मौखिक परंपरेने ज्ञान मिळवले जात होते. आपले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपनिषदे,ही मौखिक परंपरेने चालत आलेली आहेत. नंतर त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली. या ग्रंथांचे लेखक अज्ञात आहेत, म्हणून त्यांना अपौरुषेय असं म्हटलं जातं.

प्रा. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली

लेखक कपिलमुनी यांनी मंगळवार, 20/05/2025 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय खगोलशास्त्र आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्र यांचे दिग्गज प्रा. जयंत नारळीकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ भारतीय विज्ञानच नाही तर जागतिक विज्ञानसमाजानेही एक महान विचारवंत, संशोधक आणि समाजसुधारक गमावला.

आव्वाज आव्वाज..

लेखक आजी यांनी मंगळवार, 13/05/2025 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या सोसायटीत सगळे बंगलेच आहेत. आपापली घरं फक्त कामवाल्यांसाठी उघडून आणि त्या कामं करून गेल्यावर ती पुन्हा बंद करून सगळ्या गृहिणी टीव्हीवर, आणि आताशा ओटीटीवर सिनेमे किंवा हिंदी भाषेतल्या कौटुंबिक मालिका बघत बसतात. पण त्या अधुनमधून बंगल्याबाहेरही पडतात. भिशी,किटी पार्टी, हळदीकुंकू,बारशी, वाढदिवस,भजन, सत्यनारायणाची पूजा, इत्यादी त्या थाटामाटात आणि एकत्र येऊन साजरे करतात. यात थोडा बदल म्हणून मी त्यांना घरपोच लायब्ररी चालू करणे, रीडर्स क्लब, साहित्य कट्टा, चांगल्या वक्त्यांची भाषणे, चांगल्या गायकांच्या गाण्याचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम सुचवून पाहिले पण त्याला शून्य प्रतिसाद मिळाला.