मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"रुद्रावतारी" न्यायाधीश

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मंडळी, चर्चेसाठी एक रोचक विषय आहे. न्यायाधीशांना अक्कल शिकवणारे, अधिक्षेप करणारे वकील असंख्य असतात. पण वकीलांना सूतासारखे सरळ करणारे न्यायाधीश पण विरळाच... मला न्यायालयीन कामकाजाच्या क्लिपा बघायचा छंद लागला आहे. त्यात हे एक न्यायाधीश महाशय सापडले. ते कायम अशा रूद्रावतारातच कोर्टरूममध्ये दिसतात. त्यांच्या पुढील मुलाखतीत ते म्हणतात, कोर्टात दाव्यांचा महास्फोट झाला आहे. हे एक प्रकारे चांगलेच आहे. कोर्टातल्या दाव्यांची संख्या आणखी वाढायला हवी.

अहमदाबाद क्रॅश - बोईंग ७८७ ड्रीमलायनर - भंगलेलं स्वप्न.

गवि ·

गवि गुरुवार, 06/12/2025 - 16:32
क्रॅश होतानाच्या शेवटच्या क्षणांचा जो व्हिडिओ सर्वत्र दिसतोय (AI वाला नाही किंवा जुना फेक नाही असे गृहीत धरून) त्यात कोणतीही आग किंवा मिसिंग पार्ट दिसत नाही. फ्लॅप्स, जे टेक ऑफच्या वेळी डिप्लॉय केले जातात तेही झालेले दिसत नाहीत. आणखी एक लिहायचं राहून गेलं की ड्रीमलायनरचा हा पहिलाच "हल लॉस" - पूर्ण विमान नष्ट होण्याचा अपघात.

गवि गुरुवार, 06/12/2025 - 16:47
महत्वाचे निरीक्षण. त्याची संगती पुढे लागेलच. विमान साधारण सहाशे फूट उंचीवर पोचून मग खाली आलं आहे. व्हिडिओ ओरिजनल असेल तर या स्टेजला लँडिंग गियर (चाके असेम्ब्ली) वर आणि फ्लॅप्स खाली, असे दिसले पाहिजे. इथे उलट दिसते आहे. फ्लॅप्स वर आणि चाके खाली.

In reply to by गवि

कंजूस गुरुवार, 06/12/2025 - 19:31
विमानाला वर नेण्यासाठी जी अधिक इंधन देणारी दांडी सरकतात ती काही वेळाने परत फिरून लॉक व्हावी असा काही घातपात केला असेल का? म्हणजे विमान उतरण्याच्या वेळी वेग कमी होऊन चाके उघडतात असं काही झालं असेल. या कार्यावळीत इतर काही इलेक्ट्रॉनिक सिस्टम घुसेल असं वाटतं नाही. समजा वैमानिकाच्या लक्षात आलं की हवे तेवढे इंधन पुरवले जात नाही तर तो काय करेल? आहे त्या उंचीलाच विमान ठेवून वळवून उतरेल आणि त्यासाठी चाके परत उघडून तयार ठेवेल.

In reply to by कंजूस

गवि गुरुवार, 06/12/2025 - 22:14
विमानाला वर नेण्यासाठी जी अधिक इंधन देणारी दांडी सरकतात ती काही वेळाने परत फिरून लॉक व्हावी असा काही घातपात केला असेल का?
नाही. तसे करता येणे फारच कठीण. जवळपास अशक्य. आणि इंधन बंद झालेले नाही.

In reply to by गवि

सौंदाळा गुरुवार, 06/12/2025 - 19:36
कोणता व्हिडिओ नक्की? तुम्ही केलेल्या वर्णनावरुन तो नेपाळ मधे झालेल्या अपघाताचा व्हिडिओ असावा असे वाटत आहे. तो व्हिडिओ सध्या फिरत आहे. विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी पण होते अशी बातमी पाहिली. अत्यंत दु:खद घटना. सर्व मृतांना श्रध्दांजली आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि गुरुवार, 06/12/2025 - 22:12
नाही. नेपाळ वाला नाही. हा आजचाच आहे. मुख्य वर्तमानपत्रे आणि मिडियात आलाय. इथे टाकता येत नाहीये.

कंजूस गुरुवार, 06/12/2025 - 18:52
दुःखद घटना. >>>इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात.>> नेमकं. सुखसोयीच्या इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवू नयेत किंवा त्यांचे पॅनेल बोर्ड केबिनमध्ये नसावेत. बोइंगवाले यात शोध घेतीलच. मागच्या काही महिन्यांत बोईंगचे स्पेस स्टेशन शटल अडकले होते याची आठवण झाली.

आनंद गुरुवार, 06/12/2025 - 19:30
फ्लाइट रडार २४ चेक केले असता टेक ऑफ च्या वेळी वेग कमी होता१२० किलो नॉट्स असावा. शेवटचा डाटा हा १७४ किलो नॉट्स आणि हाइट ६२५ फुट आहे.

In reply to by आनंद

गवि Fri, 06/13/2025 - 11:40
६२५ म्हणजे समुद्र सपाटीपासून असते. त्यातून विमानतळाची १७४ वजा करा. जमिनीपासून तितकी. इंजिन बंद नसल्याचा पुरावा.

मारवा गुरुवार, 06/12/2025 - 19:55
मानवी चुकीच्या कारणाने असे झाले तर अधिकच वाईट वाटते. म्हणजे जे टाळणे हातात आहे मानवाच्या ते किमान टाळले पाहिजे.

गवि गुरुवार, 06/12/2025 - 22:17
विमानाचे वजन सर्वाधिक अलाउड टेक ऑफ वेट पेक्षा जास्त असेल आणि हवा अत्यंत गरम म्हणजे विरळ असेल तर टेक ऑफ घ्यायला बराच अंतर आणि वेळ लागू शकतो. (औरंगाबाद क्रॅश). त्यामुळे वर चढत जाण्याचा दर देखील खूप मंदावू शकतो. पण इथे विमान खाली खाली येताना दिसत आहे. त्यामुळे ही कारणमीमांसा तूर्त रद्द करावी लागेल.

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 06/12/2025 - 22:18
विमानाचे उड्डाण झाल्यापासून काही सेकंदात ते कोसळले. उड्डाणापासून कोसळेपर्यंतचा सगळा प्रवास अहमदाबाद विमानतळावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात टिपला गेला आहे. तो https://youtube.com/shorts/DEjkiah6_JY?si=CJTq6VCB2TwOARFX वर बघता येईल. न्यूज चॅनेलवर अधिक स्पष्ट व्हिडिओ दाखवत होते. तो युट्यूबवर मिळाला नाही. त्या विमानाच्या मागेच दुसरे इंडिगोचे विमान उड्डाण करणार होते. ते रनवेवर जात असतानाच मागे (इंडिगोच्या विमानाच्या वैमानिकासाठी पुढे) काळ्या धुराचे लोट दिसायला लागले. ते बघून त्याला केवढा धक्का बसला असेल. तसेच ध्यानीमनी नसताना अचानक अवाढव्य विमान अंगावर येताना समजा त्या मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलमधील कोणी बघितले असेल तर त्या व्यक्तीच्या काळजाचे पाणी पाणी झाले असेल :(

स्वधर्म गुरुवार, 06/12/2025 - 22:29
अपघातातील लोकांच्या कुटुंबियांना सावरण्याचे बळ मिळो. या अपघातामुळे एअर ईंडीयाला मोठा तोटा तर होणारच आहे. जगभरातील लोकांना भारताच्या हवाई क्षेत्राविषयी आत्तापर्यंत विश्वास वाटत आला आहे. तो अबाधित रहावा व या अपघातामागे सुरक्षा व्यवस्था व देखभाल व्यवस्था यातील ढिसाळपणा समोर येऊ नये ही अपेक्षा. बोईंगचे समभाग प्रिमार्केट ८% तर एअर ईंडियाचे ४% कोसळले.

कंजूस Fri, 06/13/2025 - 06:52
Ac बंद होते. याच विमानातून एका प्रवाशाने दिल्ली ते अहमदाबाद प्रवास केला होता. त्यात सर्व एसी बंद होते तसेच टीवीसुद्धा. ती खरड त्याने x वर टाकली आहे. तर यावर झटपट दुरुस्ती करून लंडनला पाठवले. त्या दुरुस्तीचा परिणाम असावा. सगळी वीज खेचली गेली असावी आणि .....

कर्नलतपस्वी Fri, 06/13/2025 - 09:10
हिच प्रार्थना. विमान कोसळणे हे बघणेच इतके भयंकर असते की त्याचा मनावर खोलवर परिणाम होतो. इंडिगो पायलट आणी प्रवासी यांच्या मानसिक स्थितीची कल्पनाच करवत नाही. एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य कर्मचारी संपावर होते. अत्यावश्यक सेवा सुचारू चालण्यासाठी सैन्याला बोलावले होते. मी के ई एम मधे कार्यरत होतो. अपघातानंतर सर्व प्रवाश्यांच्या मृतदेहाचे अवशेष याच हाॅस्पिटल मधे आणले होते. अतिशय विदारक परिस्थीती होती. दुसरा अपघात जोधपूर मधे असताना प्रत्यक्ष बघीतला. विमानाला आग लागली, फ्युएल टॅक सारखी वस्तू खालून जाणार्या टि व्ही एस फिफ्टीवर कोसळली. वाहन आणी वाहन चालकाचा कोळसा झाला. आजही ते दृश्य आठवले की काटा येतो. वैमानिक पण दगावला. ओळखू येत नव्हता.

In reply to by कर्नलतपस्वी

आग्या१९९० Sat, 06/14/2025 - 23:47
एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. जुहू बीचवरून? कनिष्क विमान खलिस्तान अतिरेक्यांनी बाँबस्फोट करून १९८५ ला उडवले , आणि ते अटलांटिक महासागरात कोसळले होते.

कर्नलतपस्वी Fri, 06/13/2025 - 09:11
हिच प्रार्थना. विमान कोसळणे हे बघणेच इतके भयंकर असते की त्याचा मनावर खोलवर परिणाम होतो. इंडिगो पायलट आणी प्रवासी यांच्या मानसिक स्थितीची कल्पनाच करवत नाही. एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य कर्मचारी संपावर होते. अत्यावश्यक सेवा सुचारू चालण्यासाठी सैन्याला बोलावले होते. मी के ई एम मधे कार्यरत होतो. अपघातानंतर सर्व प्रवाश्यांच्या मृतदेहाचे अवशेष याच हाॅस्पिटल मधे आणले होते. अतिशय विदारक परिस्थीती होती. दुसरा अपघात जोधपूर मधे असताना प्रत्यक्ष बघीतला. विमानाला आग लागली, फ्युएल टॅक सारखी वस्तू खालून जाणार्या टि व्ही एस फिफ्टीवर कोसळली. वाहन आणी वाहन चालकाचा कोळसा झाला. आजही ते दृश्य आठवले की काटा येतो. वैमानिक पण दगावला. ओळखू येत नव्हता.

अतिशय र्‍हदयद्रावक घटना. कालपासून जे जे व्हीडीयो पाहण्यात आले ते पाहुन अधिकच दु;खच केवळ. आयुष्याचा कोणताच प्रवास सुरक्षित नाही. घटना घडणार होती म्हणून घडली म्हणून सोडून देताही येईल पण तांत्रिक गोष्टींनी जी जीवीत हानी झाली ती कधीही भरुन निघणार नाही. आपण घटना यंव घडली आणि त्यंव घडली म्हणून उद्या कदाचित काही निष्कर्ष काढूही, त्यात सुधारणाही होईल पण अपघात थांबतील याची शास्वती अजिबातच वाटत नाही. विमान उडतंय आणि काही क्षणात हळुहळु खाली येत शेपटीच्या बाजूने इमारतीला धडकते. आपण काही यातले जाणकार नाही, पण ज्या बातम्या येताहेत त्यात दोन्हीही इंजीन्स अचानक बंद पडली अशी स्थिती झाली. "मे डे" हा जीवघेणा शब्द बाहेर पडला तितकाच बाकी सर्वत्र शांतता. वस्तीगृहातील शिकाऊ डॉक्टरर्सना आपलाही जीव नाहक गमवावा लागला. दूरचं उडान आहे म्हणून टँक भरलेले असेल आणि कदाचित त्याच्या स्फोटामुले इतकी जिवीत हानी झाली. भविष्यात इंधनविरहित इतक्या ताकदीच्या वीजेच्या ताकदीवर किंवा इंधन टाकी इतकी मजबूत की ती आदळली, स्फोट झाला तरी ती फूटू नये इतका काही बंदोबस्त झाल्याशिवाय अशा अपघातात होणारी जिवीत हानी कमी होणार नाही, हा विचार फारच तकलादू असू शकेल पण अशा अपघातातील हानी कमी करण्याचा विचार भविष्यात होऊ शकेल असे वाटते. विमान अपघातातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 10:24
बरीच अधिकची माहिती मिळते आहे. टेकऑफचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. टेक ऑफ व्यवस्थित झाला होता. तोपर्यंत इंजिन्स व्यवस्थित चालू होती. नंतर लगेच इंजिनची पॉवर नाहीशी झाली असे म्हणावे तरी देखील एकदम दोन्ही इंजिने बंद पडणे हे या विमानाच्या बाबतीत केवळ तात्विक दृष्ट्याच शक्य आहे. प्रत्यक्षात ती शक्यता नगण्य. आणि एक इंजिन पूर्ण बंद पडले तरी उरलेल्या एका इंजिनावर विमान हवेत वर चढून योग्य उंची प्राप्त करून पुन्हा गोल फिरत लँड करू शकते. पायलटला ते ट्रेनिंग दिलेले असते. आणि एक इंजिनावर पूर्ण प्रवास देखील करता येईल अशीच रचना असते. पक्षी आदळून किंवा अडकून दोन्ही इंजिने पूर्ण बंद होणे हे देखील फार दुर्मिळ. आणि तसे असते तर थोडा तरी धूर, काजळी, कदाचित आगीचा बारीकसा तरी लोळ असे दिसायला हवे. तसे काही दिसत नाही. पक्षीही बऱ्याच संख्येने आणि मोठाले असतील तरच दोन्ही इंजिने एकावेळी भरून जातील. पण पक्षीही दिसत नाहीत टेकऑफच्या वेळी. दोन प्रकार असतात. लॉस ऑफ पॉवर आणि लॉस ऑफ लिफ्ट. पॉवर पूर्णपणे उपलब्ध असूनही लिफ्ट नाहीशी होऊ शकते. यासाठी दोन तीन शक्यता आहेत. त्यातलीच एक बाहेर येईल असे वाटते. थोडे नंतर सवडीने यावर लिहीन.

In reply to by गवि

प्रत्यक्षात ती शक्यता नगण्य.
आपण या विषयातले जाणकार आहात त्यामुळे आपण जी शक्यता नगण्य म्हणत आहात तीच शक्यता अधिक आहे. आम्ही जाणकार नाही पण साधं लॉजीक असं आहे की, विमान उडालं आहे, आणि हळुहळु खाली येतंय याचा अर्थ त्याची पॉवर कमी झाली आहे. एक इंजीन चालू असतं तर, कदाचित वळण घेवून लँडींगला आलं असतं म्हणजे एकही इंजीन चालू नाही. एकही चालू नाही म्हणजे दोन्हीही बंद पडले उडण्याची क्षमता गमावली आहे. आपल्या यंत्र तंत्राच्या भाषेत लॉस ऑफ पॉवर हतबल ही स्थिती त्यामुळे जे तांत्रिक फेल्युअर झालं ते मशीनचं. एकदा उडून ही स्थिती यावी हे जे जरा तर्कापलिकडे जातंय. उडतंय म्हणजे पॉवर सुरु होतं आणि हळुहळु खाली येतंय म्हणजे अचानक पॉवर लॉस हतबल स्थिती, हा यांत्रिक बिघाड सापडला पाहिजे. दुसरं यात पायलटचा दोष दिसत नाही. विमान वर उडते राहावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले असावे. आता लँडींग झालं तर धोका तितकाच होता म्हणून त्याचं प्राधान्य विमान वर उडवायला असणार पण दुर्दैवाने विमान उंच झेप घेऊ शकले नाही. आज उद्या विमान कंपन्यावर येणारं बालट, कंपन्यांचं नुकसान होऊ नये म्हणून पायलटवर खापर फोडतात काय इतकंच पाहणे बाकी आहे. एक्सपर्ट लोकांनी तर्क पटणारा केला पाहिजे. इतकी माफक अपेक्षा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 11:35
पण साधं लॉजीक असं आहे की, विमान उडालं आहे, आणि हळुहळु खाली येतंय याचा अर्थ त्याची पॉवर कमी झाली आहे. एक इंजीन चालू असतं तर, कदाचित वळण घेवून लँडींगला आलं असतं म्हणजे एकही इंजीन चालू नाही.
बरं झालं तुम्ही हा मुद्दा मांडलात. मी वर म्हटलंच आहे की लॉस ऑफ पॉवर आणि लॉस ऑफ लिफ्ट असे दोन वेगळे भाग आहेत. फुल पॉवर इंजिन चालू असतानाही लॉस ऑफ लिफ्ट होतो आणि विमान अगदी असेच खाली येते. यासाठी आपल्याला विमान कसे उडते याबद्दल माहिती घ्यायला हवी. तुमची शेवटची काही वाक्ये मला हे सर्व लिहिण्यापासून परावृत्त करत आहेत पण इतर सर्व (खवचट नसलेल्या) मिपाकरांच्या माहितीसाठी कदाचित हे उपयुक्त ठरेल म्हणून लिहीत आहे. विमानाच्या पंखावर जी लिफ्ट (उचल) उत्पन्न होते त्यासाठी पंखाच्या वरून आणि खालून वेगवेगळ्या वेगाने आणि दाबाने वाहणारी हवा कारणीभूत असते. दाबात असा फरक निर्माण व्हावा अशी पंखांची रचना आणि आकार असतो (aerofoil). आता असे पहा, की पंखाचा हवेच्या प्रवाहाशी एक कोन असतो. आणि तो वेगवेगळ्या वेळी बदलतो. टेक ऑफ घेताना आणि वर चढताना तो जास्त असतो. त्याला अँगल ऑफ अटॅक म्हणतात. तो जसा वाढत जातो तसा एका मर्यादेनंतर हवेचा अवरोध वाढायला लागतो. आणि लिफ्ट निर्माण करणारे प्रवाह बिघडू लागतात. अशा वेळी विमानाला वर वर जाणे अधिक अवघड होऊ लागते. मग पॉवर वाढवून ही स्थिती काहीशी नियंत्रणात आणता येते. पण.. फुल पॉवर असताना देखील अँगल ऑफ अटॅकची मर्यादा ओलांडली जाऊ लागली की विमानाच्या पंखावरची लिफ्ट नाहीशी होते. एक लक्षात घ्या की विमानाचे इंजिन कारच्या इंजिनासारखे चाकांना संचालित करत नसून ते हवेला मागे आणि पर्यायाने विमानाला पुढे ढकलत असते. मात्र "लिफ्ट" उत्पन्न करण्याचे कार्य इंजिन करत नसून विशिष्ट वेगाने आणि विशिष्ट कोनात पुढे सरकणारे पंख करत असतात. त्यांचा अँगल ऑफ अटॅक मर्यादा ओलांडून गेला की इंजिने पूर्ण ताकदीने फुरफुर करत राहतील, हवा मागे फेकतील, पण लिफ्ट उत्पन्न होऊ शकणार नाही. या स्थितीला स्टॉल असे म्हणतात. अहमदाबाद विमानाच्या बाबतीत टेक ऑफ पूर्ण वेगाने आणि व्यवस्थित झालेला आहे. इंजिन बंद किंवा कमी पॉवरने चालत असताना हे होणेच अशक्य आहे. हवेत उचलले गेल्यावर ज्या पद्धतीने विमान खाली येत आहे (pancaking) त्यावरून हेच दिसते की लॉस ऑफ लिफ्ट आहे. लॉस ऑफ पॉवरमुळेही लॉस ऑफ लिफ्ट होऊ शकते, तेही एक वैध कारण आहे. पण या बाबतीत दोन्ही इंजिने एकदम बंद पडावीत आणि तीही टेक ऑफ ठीकठाक झालेला असताना त्यानंतर लगेच, हे अशक्य आहे. आता नेमके झाले काय असावे हे नीट मांडायला वेळ लागेल. प्रयत्न करतो एका ब्रेकनंतर. यात लँडिंग गियर खालीच असणे हा मुख्य क्लू आहे. आणि फ्लॅप्स खाली नसणे हाही. इंजिन बंद पडो, लिफ्ट जावो, आग लागो किंवा अन्य काही कारणाने विमान कोसळू लागो, यातील प्रत्येक केसमध्ये लँडिंग गियर विमानाच्या पोटातच असायला हवेत. पहिल्या सहा ते दहा सेकंदांत ते पोटात घेतले जातात आणि वस्तीत क्रॅश होणार म्हणून चाके पुन्हा बाहेर काढणे असे होत नसते. ती आतच ठेवली जातात. हे लिहायला स्फूर्ती दिल्याबद्दल धन्यवाद. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आपला आदर आहेच. बाकी स्वभाव म्हणाल तर मनुष्य म्हटला की बरे वाईट गुण आलेच. असो. गंभीर धाग्यावर अवांतर टाळतो.

In reply to by गवि

गवि Fri, 06/13/2025 - 11:45
क्रॅश निश्चित झाल्यामुळे (मे डे शब्द वापरला गेला) बिचाऱ्या पायलट्सनी मरताना देखील प्रोसेस फॉलो करून इंजिने आयडल केली असणार. लँडिंग गियर वर का घेतला नाही माहीत नाही. पण जमिनीवर नुकसान कमीतकमी व्हावे यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींत: इंधन कमी करणे (जे करणे शक्य नव्हते, वेळ नव्हता) वेग किमान ठेवणे : हे दिसते आहे. पंख जमिनीला समांतर लेव्हलमधे ठेवणे. हेही केलेले आहे. लँडिंग गियर राहून गेला असावा किंवा तेवढ्या वेळात रिट्रॅक्ट होऊ शकला नसावा.

In reply to by गवि

पण जमिनीवर नुकसान कमीतकमी व्हावे यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींत:
मला स्वतःला ही शक्यता फार कमी वाटते की जमीनीवर लँडींग करावे वगैरे. पहिलं प्राधान्य झेप घेणे इतर प्राधान्याचा विचार फार कमी वेळा येत असावा. यावरुन आठवण झाली. लॉस ऑफ पॉवर आणि जमीनीवर लँडींगचा हा व्हीडीयो आपण पाहिलाच असेल असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

मारवा Sat, 06/14/2025 - 06:56
इंधन कमी करणे (जे करणे शक्य नव्हते, वेळ नव्हता) समजा वेळ असता तर अशा परिस्थितीत इंधन कमी कोणत्या मार्गाने केले जात असते ? म्हणजे काय technique वापरली जात असते ? कृपया खुलासा करावा ? प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यात असताना काही माणसे जे असामान्य धैर्य आणि हानी टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात ही गोष्टच मला नेहमी भावूक करते.

In reply to by मारवा

गवि Sat, 06/14/2025 - 08:04
समजा वेळ असता तर अशा परिस्थितीत इंधन कमी कोणत्या मार्गाने केले जात असते ? म्हणजे काय technique वापरली जात असते ?
मुख्यतः मोकळ्या भूभागावर किंवा पाण्यावर जाऊन गोल फिरत राहून इंधन जाळून संपवणे. लँडिंग वेट अचिव्ह करण्यासाठी. किंवा क्रॅश लँडिंगमध्ये हानी कमी करण्यासाठी.

In reply to by गवि

अहमदाबाद विमानाच्या बाबतीत टेक ऑफ पूर्ण वेगाने आणि व्यवस्थित झालेला आहे.
इथपर्यंत आपली मतं बरोबर वाटत आहेत.
इंजिन बंद किंवा कमी पॉवरने चालत असताना हे होणेच अशक्य आहे.
मुद्दा हाच आहे की, विमानाने टेक ऑफ पूर्ण वेगाने व्यवस्थित केलेला आहे, मग असे काय घडले की ते खाली खाली येत गेले. लॉस ऑफ लिफ्ट असो की लॉस ऑफ पॉवर असो, हे जे अचानक कसं घडलंय तेच अपघाताचे कारण की अन्य काही, तेच महत्वाचं आहे. तपशीलवार निबंधाबद्दल आभारी आहे. लिहिते राहा. वाचतोय. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 12:00
हे जे अचानक कसं घडलंय तेच अपघाताचे कारण की अन्य काही, तेच महत्वाचं आहे.
या स्टेजला सर्वच गोष्टी अंदाज या कॅटेगरीत येतात. पण काही अंदाज सहज नाकारता येतात, इंजिन बिघाड किंवा तांत्रिक बिघाड हा या बाबतीत सकृत्दर्शनी शक्य दिसत नाही. १. फ्लॅप्स वर २. लँडिंग गियर खालती. ३. स्टॉल सदृश अटीट्युड (विमानाचे ओरिएंटेशन म्हणा) ४. यशस्वी टेक ऑफ ५. उड्डाणाच्या आधी फ्लॅप्स खाली करणे विसरावे हे विमान होऊ देणेच अशक्य अशी यंत्रणा (ड्रीमलाइनरची) ६. मोठ्या संख्येने पक्ष्यांचा अभाव (दोन्ही इंजिने तातडीने बंद पडण्याइतके मोठे पक्षी थव्याने असणे आवश्यक) ७. धूर, काजळी, आगीचा लोळ नसणे (पक्षी आत गेले की यातले काहीतरी होणार) ८. सर्वात महत्वाचे. टेक ऑफ घेताना सर्वात जास्त इंजिन पॉवर आणि लिफ्ट मिळण्यास सर्वाधिक अनुकूल स्थिती असते. त्यामुळे पंखाचा आकार काही प्रमाणात बदललेला नजरेला दिसतो. पुरेशी लिफ्ट मिळत असते तेव्हा पंखांची टोके वर वळतात. पंखात लवचिकता ठेवलेली असल्याने हे वाकणे स्पष्ट दिसते (स्नायू तटतटतात तसे). इथे लिफ्ट नसल्याचे दिसते आहे. पंख सरळ आणि पडके आहेत. या सर्व मुद्द्यांमुळे ठळक शक्यता हीच उरते की लिफ्ट कमी पडली. का? - उड्डाणाच्या नंतर लगेच फ्लॅप्स वर घेतले जाणे. - उड्डाणाच्या नंतर लगेच चाके वर घेतली जाणे. या दोन्हींमुळे विमानाची लिफ्ट पुरती निकामी लेव्हलला येऊ शकते. हे असे होण्यात कुठेतरी मानवी चूक वाटते. अंदाजच असला तरी तो सध्याच्या स्थितीत सर्वाधिक शक्यतावाला अंदाज आहे. पुढे तो चुकीचा ठरला तर करेक्शन करूच.

In reply to by गवि

आनंद Fri, 06/13/2025 - 14:39
मानवी चुक असण्याचीच शक्यता जास्ती आहे. लँडिंग गियर वर घेण्या ऐवजी फ्लॅप्स वर घेतले असावेत का? अस होन्याची शक्यता अनुभवी पायलट कढुन अशक्य आहे पण सांगता येत नाही.

In reply to by गवि

सहज आठवले. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणल्यावर त्याकाळी एक लॉजिकचा मुद्दा असा होता की मग पक्षी आपल्या घरट्यात कसे परत येतात? बाकी स्वभाव म्हणाल तर मनुष्य म्हटला की बरे वाईट गुण आलेच. याच्याशी सहमत आहे काही समविचारी विद्वान सहमती व्यक्त करताना देखील पुरेशी तुच्छता बाळगतात.त्याशिवाय त्यांना विद्वतेचा "फील" येत नाही. हे अनुभवल आहे

गवि Fri, 06/13/2025 - 10:29
आणखी एक. अमेरिकन बनावटीचे विमान असल्याने NTSB या चौकशीत सामील होणार. इतरही देशांच्या एजन्सीज येणार. विशेषतः ब्रिटिश. भारतीय लोकांच्या नंतर तिथले सर्वाधिक नागरिक प्रवाशांत होते

पॉवर होती पण लॉस ऑफ लिफ्ट.. एका अनुभवी वैमानिकाचा व्हिडियो पाहिला. सहवैमानिकाकडुन चूक झाली असावी असा त्याचा अंदाज आहे. 'गियर अप'च्या ऐवजी सहवैमानिकाने 'फ्लॅप रेझ' हॅंडल वापरले. युट्युबर 'कॅप्टन स्टीव'

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पायलट अनुभवी होते. कॅप्टन सुमित सभरवाल यांच्याकडे वृत्तपत्र बातम्यानुसार ८२०० तासांचा उड्डाणाचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. तर सहपायलट यांच्याकडे अकराशे तासांचा अनुभव होता. अवघ्या एका मिनिटात मे डे कॉल दिला पण त्या नंतर ते काहीही करु शकले नाहीत. ज्या काही शक्यता येत आहेत त्यात, विमानाचे लॅंडीग गिअर आत घेतले गेले नाही. टेक ऑफ झाल्यानंतर पहिल्या पाच मिनिटे झाली तरी, दहा पंधरा सेकंदाच्या आत हे गीअर आत घेतल्या जातात पण हे आत घेतले गेले नाही, आता ही मानवी चूक की यंत्रांची चूक आणि ते यामुळेच झाले की अन्य काही अजून काही कळायला मार्ग नाही. -दिलीप बिरुटे

कंजूस Fri, 06/13/2025 - 12:37
आपण चर्चा करत आहोत. एखादा मुद्दा पटला नाही तर खोडाला जात आहे. पण कुणी आपला मुद्दा मान्य न झाल्यास चिडण्याचे कारण नाही. माझा मुद्दा असा_ दिल्लीवरून येताना एसी बंदच होते. इकडे विमानाने टेकऑफ केल्यावर एसी लगेचच चालू केले गेले असतील तर बरीच पावर खेचली गेली असेल. ती पावर फ्लॅप्स वळवण्यासही लागत असेल. म्हणजे तिथे प्रेफरन्स प्राधान्य देण्याची काही व्यवस्था असेल तर ती बंद पडली असेल. एंजिने फुल पावर/इंधन मिळूनही फ्लॅप्स वळून हवा खाली ढकलली न गेल्याने उंची दाखवणारे दर्शक उंची वाढत जात आहे/ नाही यामध्ये ' जात नाही' हे दाखवू लागल्यावर वैमानिकाने मदतीचा भोंगा वाजवला असणार. विमान जमिनीवर उभे असताना फ्लॅप्स वळवण्यास फारशी शक्ती लागत नाही ( ते तपासले असणारच) पण विमान उचलताना मोठा हवेचा झोत खाली वळताना फ्लॅप्स बरीच वीज खेचतील. तर इकडे एसी बरेच तास बंद असल्याने आतील तापमान वाढलेले असणार व ते एकदम वीस अंशावर आणायला खूप वीज खाणार.

In reply to by कंजूस

पण कुणी आपला मुद्दा मान्य न झाल्यास चिडण्याचे कारण नाही.
+१ सहमत. काही लोकांना वाटतं आपण एक्सपर्ट आहोत ना मग आपलेच प्रतिसाद लोकांनी वाचत जावेत. आणि वाहवा..! छान म्हणत जावे. काळ बदलला आहे आधुनिक आणि अद्ययावत माहितीची नवनवीन साधने आलेली आहेत त्यामुळे विविध विषयांची आणि अद्ययावत माहिती कोणाकडेही असू शकते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 13:01
+१ सहमत. काही लोकांना वाटतं आपण एक्सपर्ट आहोत ना मग आपलेच प्रतिसाद लोकांनी वाचत जावेत. आणि वाहवा..! छान म्हणत जावे.
अगदी बरोबर. पण.. मुख्य उद्देश आणि उत्साह माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा आहे की पूर्ण परिश्रम एखाद्याला चूक ठरवण्यासाठी करायचे आहेत हे आधी ठरवून घेतल्यास ध्येय साध्य करणे सोपे होते. अर्थात हे तुम्हाला आम्ही काय सांगावे. जुने जाणते तुम्ही... :-) शुभेच्छा.

In reply to by कंजूस

गवि Fri, 06/13/2025 - 12:58
फ्लॅप्सचे कार्य तुम्ही म्हणताय तसे चालत नाही. विमान टॅक्सी आऊट होण्यापूर्वीच हे सर्व सेट आणि लॉक झालेले असते. फ्लाईट चालू असताना अर्थातच ऐनवेळी फ्लॅप्स वरखाली करता येतातच. पण टेक ऑफ झाल्यावर अचानक वीज कमी पडली (हे मेकॅनिकल कंट्रोल हायड्रॉलिक पद्धतीने चालतात पण तरीही तात्विक दृष्ट्या वीज कमी पडलीच) तर ती फ्लॅप्स वर घेण्यास अटकाव करेल. इथे फ्लॅप्स खाली न करता टेक ऑफ घडणे हे अशक्य आहे. ७८७ ड्रीमलायनर मध्ये अशा वेळी प्रचंड वॉर्निंग अलार्म वाजणे आणि सर्वात धोक्याची मास्टर वॉर्निंग वाजून कॉकपिटमध्ये ठणाणा आवाज आणि लाईट फ्लॅश येत राहतात. राहता राहिला टेक ऑफ नंतर फ्लॅप्स न चालण्याचा भाग (तुम्ही म्हणता तसे वीज खेचली गेल्याने.. तसे होत नसते, तरी पण..) तर अशा वेळी ऑलरेडी खाली असलेले फ्लॅप्स वर येण्यास अडचण होईल. पण फ्लॅप्स तर वर गेलेले दिसत आहेत. म्हणजे टेक ऑफ नंतर वेळेआधीच ते वर घेतले गेले असणे हीच एक शक्यता. शिवाय पॉझिटिव्ह रेट (वर जाण्याचा) ज्या क्षणी दिसतो त्या क्षणी चाके आत घेतली जातात. ती घेतली गेली नाहीत. कोणाला वाटेल की टेक ऑफ होताच विमान परत खाली (उतरायला) येत आहे म्हणून चाके आत घेतली नसतील. तर तसे नसते. चाके आत घ्यावीच लागतात. अवरोध टाळण्यासाठी. अगदी क्रॅश होत असला तरी चाके बाहेर ठेवायची नसतात. Pancaking हा शब्द मी वर वापरला आहे त्याची माहिती बघा. फरक इतकाच की इथे मूव्हमेंट pancaking ची होती फक्त लँडिंग गियर आत घेतलेला नव्हता.

In reply to by गवि

कंजूस Fri, 06/13/2025 - 13:04
ठीक आहे. कार्यप्रणाली जर अशी असेल तर मग दुसरे काही कारण असेल. फळ्यावरचे दर्शक काही वेगळीच धोकादायक सूचना देऊ लागल्याने मदतीचा भोंगा वाजवला असेल. पण कोणता दर्शक धोकादायक सूचना देतोय हे वाक्य वैमानिक बोलला ते ब्लॅक बॉक्सच सांगेल. आणि हेच बोइंग कंपनीला हवे असेल.

In reply to by कंजूस

गवि Fri, 06/13/2025 - 13:18
विमानाच्या सुरक्षित उड्डाणाच्या मध्ये अडथळा ठरेल अशी कोणतीही गोष्ट घडू न देण्याच्या दृष्टीनेच पूर्ण रचना असते. इतकी बेसिक साधी चूक सिस्टीम मधे राहून गेली तर अकरा वर्षे विना अपघात जात नाहीत.

चौथा कोनाडा Fri, 06/13/2025 - 14:13
खुपच दु:खद घटना ..... सगळे गेले ... किती दुर्दवी !!! लवकरात लवकर दोषांची उकल होऊन डिझाईन / प्रोसेस मध्ये तातडीने सुधारण व्हावी ,,, पुन्हा असले क्लेशदायक वृत्त ऐकण्याची वेळ न येवो !

काल विमान अपघात झाला तेव्हा इथे वाचलेले पुर्वीचे काही लेख आठवले होते. भयंकर अपघात. कालपासुन काहीच सुचत नाहिये विविध व्हिडिओ . टेक ऑफ पुर्वी काढलेले सेल्फी बघुन जीव तुटतोय.. एक साधा टर्ब्युलन्स जाणवला तरी जीव घशात येतो.. इथे विमान थेट खाली जाताना प्रवाशांचं काय झालं असेल या विचारनं थरकाप उडतोय.. मेडीकल कॉलेजच्या हॉस्टेल मधे जेवणाच्या ताटावर बसलेल्या डॉक्टरांचा तर काहीच संबंध नसताना त्यांना मृत्युला सामोरं जावं लागलं.. सुन्न झालंय डोकं कालपासुन. त्या मृताम्यांना शांती मिळो असं तरी कसं म्हणायचं ? सगळी स्वप्नं आणि जवळची मंडळी मागे सोडुन गेलेल्या जीवांना खरच शांती मिळेल ? ( या प्रसंगातही इथे वाद घालणारी लोकं कशाची बनली असतील ? वेळ काय आणि आपण कशावर वाद घालावा ? असो.. मानवीवृत्ती समजणं बुद्धीच्या पलिकडचे आहे )

अभ्या.. Fri, 06/13/2025 - 15:04
फारच वाईट. दोन आठवड्यापूर्वीच ३० मे ला असल्याच ७८७ ड्रीम्लायनरने (दिल्ली - झुरिक ए १५१) प्रवास केला तेंव्हा भीती नाही वाटली पण ही बातमी कळल्यावर जास्त भीती वाटली. अर्थात आमच्यावेळी ही एसी चालु नसणे, स्क्रीन्स आणि त्याचे कंट्रोल पॅनल्स काम करत नसणे ह्या समस्या होत्याच. एअर ईंडीयावाले इतर एअर लाईनपेक्षा दुप्पट लगेज घेऊ देतात हा मोह होता पण कदाचित हे सुध्दा कारण असु शकते दुर्घटनेला अशी शंका उगाच चाटून गेली.

In reply to by अभ्या..

गवि Fri, 06/13/2025 - 15:20
एअर लाईनपेक्षा दुप्पट लगेज घेऊ देतात हा मोह होता पण कदाचित हे सुध्दा कारण असु शकते
शक्यता अगदीच नाकारता आली नसती एरवी. उन्हाळी हवेचे प्रचंड उच्च तापमान आणि त्यामुळे विरळ झालेली हवा. लिफ्ट पुरेशी मिळायला अधिक लांब अंतर लागते. पण इथे टेक ऑफ योग्य जागी योग्य रित्या झाला आहे. वर चढत जाण्याचा दर केवळ कमी नसून ते खालीच येताना दिसत आहे. स्टॉल सदृश स्थितीही दिसून येत आहे. त्यामुळे परमिटेड लिमिटपेक्षा जास्त सामान घेऊन गरम वातावरणात उड्डाण हा औरंगाबाद क्रॅशच्या वेळचा सीन इथे नव्हता.

सौंदाळा Fri, 06/13/2025 - 15:30
एक्स वर एकाने लिहिलेली पोस्ट आता पाहिली त्याचा सारांश हा घातपात असावा. इंजिनल इंधन पुरवणारी यंत्रणा खराब केली असेल. त्यामुळे सुरुवातीला असलेल्या इंधनामुळे इंजीन व्यवस्थित चालू होऊन टेक ऑफ झाला पण नंतर पुरेसे इंधन न मिळाल्याने इंजिन बंद झाली. मला तरी ही शक्याता बाळबोध वाटली पण यावर आपले काही मत @ गवि

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि Fri, 06/13/2025 - 15:36
अगदीच दूरस्थ शक्यता. इतक्या लगेच नसता झाला अपघात. आणि घातपात करायचा झाला तर विमानाच्या सिस्टीम मधे "टायमर"वाला बिघाड करणे एखाद दुसऱ्या व्यक्तीला खूपच अवघड.

In reply to by अभ्या..

सौंदाळा Fri, 06/13/2025 - 16:32
अगदी अगदी त्याने हीच अनॉलॉजी पण पोस्ट मधे दिली आहे.

Bhakti Fri, 06/13/2025 - 16:53
गवि तुम्ही लॉस ऑफ लिफ्ट विषयी बरेच लिहिले,ते समजले ,बरे झाले.नाहीतर त्या X वरच्या मुलाच्या पोस्ट/व्हिडिओ मुळे मलाही लॉस ऑफ पॉवर च अपघाताच्या जवळ जाणारे कारण वाटतं होतं.खरे कारण समोर येईलच.

अकिलिज Fri, 06/13/2025 - 17:09
वाहिन्यांवरच्या बातम्यांच्या चित्रफिती पाहून किती भयानक झालंय हे कळतंय. नुसता काळा कोळसा दिसतोय सगळीकडे. एक निरीक्षण नोंदवतो. बर्‍यापैकी युरोपियन देशांमध्ये विमानतळ हे गावापासून बाहेर आणि विमानतळाच्या बाजूला लोकवस्ती नाही असे पाहण्यात आहे. भारतातच काय लोकांना विमानतळाजवळ मालमत्ता घ्यायचा चस्का आहे. धावपट्टीपुढे मोकळी जागा किंवा जंगल असते तर कदाचित इतका मोठा अपघात घडला नसता. थोड्या थोडक्या नुकसानीवर भागले असते अशी भाबडी आशा.

अकिलिज Fri, 06/13/2025 - 18:42
https://www.youtube.com/watch?v=z7EZkungFEE लॅण्डींग गेअर ऐवजी चूकून फ्लॅप वर झाल्याची शक्यता दिसतेय. अर्थात हे अनुमान आहे. गवि, पण अशी चुकी होऊ शकते ही शक्यता गॄहीत धरली गेली नाहीये कां ?

In reply to by अकिलिज

अनुभवी वैमानिकांना हाच संशय आहे. पण फ्लॅपवर झाल्यावर मुख्य वैमानिकाला कळले असणार.. की ४/५ सेकंदात सगळे बदलु शकते? ब्रेकऐवजी चुकुन अ‍ॅक्सिलरेटरवर पाय पडतो.. असे काहीसे आहे का?

सिद्धार्थ ४ Fri, 06/13/2025 - 19:38
Dear Colleagues, This is a very difficult moment. What occurred yesterday was inexplicable, and we are in shock and mourning. To lose a single person we know is a tragedy, but for so many deaths to occur at once is incomprehensible. This is one of the darkest days in the Tata Group’s history. Words are no consolation right now, but my thoughts are with the families and loved ones of the people who died and were injured in the crash. We are here for them. I want to say that, like you, we want to understand what happened. We don’t know right now, but we will. You know that in the past 24 hours, investigative teams from India, UK, and the US have arrived in Ahmedabad to investigate the crash. They have our full cooperation, and we will be completely transparent about the findings. We owe it to the families and loved ones, to our pilots and crew, and to you. The Tata Group takes its responsibility to society seriously, and that includes being open about what occurred yesterday. Right now, our very human instinct is to look for explanations that make sense of the calamity. There is plenty of speculation all around us. Some of it may be right, some of it may be wrong. I want to urge patience. We witnessed an enormous loss of life yesterday. Why this routine flight turned into a calamity is something trained investigators will help us understand when their work is complete. Once we have verified facts, we will be transparent in our communication about how this tragedy took place. As a Group trusted by so many, when we took over Air India, ensuring the safety of its passengers was our first and foremost priority. There was no compromising on it. None of this matters to the people who suffered devastating losses yesterday. At this time, we can only assure them of our full support. We will pull together as a Group and find ways to help them. We built this Group on trust and care. It is a difficult moment, but we will not retreat from our responsibilities, from doing what is right. We will carry this loss. We will not forget. Sincerely, Chandra

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 09:56
हे समजते ,पण कसे करतात, काय उपकरणे वापरतात. प्रत्येक उड्डाणा आगोदर हे अनिवार्य आहे का? का प्रवासी संख्या व त्यांचे सामान,केबीन क्रू व इतर सामान याचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जातो? गवी भाऊ यावर प्रकाश टाकू शकतील. लोड टेबल बनवताना या विषयाबद्दल थोडीफार माहीती कळाली होती,आता विसरलो.

प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी काढलेली छायाचित्रे, कुटूंबाच्या अपेक्षांसहित प्रवास करणारे प्रवासी, इच्छित स्थळी जाणारे, वाट पाहणारे प्रवासी, त्या सर्व बातम्या वर्णने वेदनादायक आहेत. विमान कोसळले तेथील डॉक्टर्स त्यांचे कुटुंबीय त्या सर्वांच्या भावनाही तितक्याच दु:ख पिळवटून टाकणा-या आहेत. कालच्या भीषण अपघातानंतरन सरकार बोईंग ड्रीमलायनर ७८७-८ ताफ्यांचे उड्डाण स्थगित करण्याचा विचार करीत आहे. इंजिनची ताकद कमी का झाली त्याचा शोध घेण्यात येत आहे. अपघातग्रस्त एअर इंडियांचे ड्रीमलायनर विमान अमेरिकेच्या बोईंग कंपनीने बनवलेले असल्यामुळे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार प्रतिष्ठीत तपास संस्था नॅशनल ट्रान्सपोर्ट्शन सेफ्टी बोर्ड तपासणी पथक पोहचले आहे. विमान उडण्यापूर्वी सर्व सीस्टीम तपासल्या जाते तरीही असे काहीच मिनिटात असे काय घडले त्याचा तपास ही संस्था करणार आहे. तपास यंत्रणेचे प्रमुख ग्रेग फिथ यांच्या मतानुसार टेकऑफचं कॉन्फिगर केले गेले असावे का ? विमान जड आणि वेग हळु असतांना विमान वर उचलण्यासाठी जी ताकद लागते ती पंखाचा भाग खाली करुन मिळवली जाते ती स्थिती योग्य असूनही का मिळाली नाही ? हायड्रॉलिक प्रणाली, लँडिग गियर यातली नेमकी काय समस्या होती याचा आणि इतरही अभ्यास ते करणार आहेत. पिच टीट्यूड अर्थात विमानाचा पुढील भाग वर जरी दिसत असला तरी विमान खाली खाली का येत गेले याचा अर्थ अपूरी ताकद मिळत गेल्यामुळे तसे घडले असावे असे निरिक्षण त्यांनी नोंदवले आहे. पायलट विमान वर उचलण्याचा प्रयत्न करत होता परंतु उंची गाठण्यासाठी ते कमी उंचावर येत गेले त्यामुळे ते वर उचलले गेले नाही. विमान उंच उडवणे आणि पुढे ढकलणे व्हीडीयो पाहता पूर्ण प्रयत्न केल्याचे दिसते असेही ते म्हणाले. अपघात घडला आता यापुढे असे अपघात घडू नयेत यासाठी काय बदल करता येतील ते अशा चुका शोधण्यातून व्हावेत. विमान प्रवास अधिक सुखाचा होत जावा याशिवाय अधिक अपेक्षा त्या करु शकतील. -दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/14/2025 - 10:36
समजा प्रत्येक प्रवासी ऐंशी किलो वजनाचा आहे असे धरू, आणि १५+७ किलो वजन नेत असेल तर २५० प्रवाशांचे वजन अंदाजे २५० गुणिले शंभर पंचवीस हजार किलो होईल. विमान धावपट्टीवर जाण्यापूर्वी एका वजन काट्यावरून गेल्यास विमानाचे वजन नोंद करता येईल.

In reply to by विजुभाऊ

कंजूस Sat, 06/14/2025 - 21:41
अगदी कमी धरले तरचा हिशोब घेतला.पण सर्वच प्रवासी पन्नास किलो एवढं नेतील तर खूपच होईल. आणि पूर्वी कधी विमानाचे पूर्ण वजन किती असे यांची नोंद तपासायला हवी. -------------------- 11A सीटवरचा प्रवासी बाहेर पडून दूर पळाला आणि वाचला . पण विमान एका पाच मजली इमारतीवर पडले तर कसे काय पळाला? ही 11A seat शेपटात असते काय? विमानाचे नाक वर होते आणि शेपूट खाली होते ते जमिनीला टेकले का? आता या सीटवर बसण्यासाठी प्राधान्य मागू लागले तर याचा नंबर १३ करतील बहुतेक. (परदेशांत १३ संख्या वर्ज्य असते).

तज्ञांच्या विश्लेषणानुसार- व्हिडियोत रॅट(रॅम एयर टर्बाईन) बाहेर आलेला दिसत आहे. दोन्ही ईन्जिन्स बंद पडल्यावरच हा रॅट बाहेर येतो असे म्हंटले जाते. दोन्ही इंजिन्स बंद का पडली? दोन्ही इंजिन्सना लागणारा इंधन पुरवठा बंद झाला. इंधन पुरवठा बंद का झाला? पटणारी एक थियरी-विमानात आधीपासुनच ईलेक्ट्रिकल समस्या असावी. विमान टेक-ऑफ घेण्याआधी ते तीन तास उन्हात होते(३८ डिग्री). विमान पूर्णपणे भरलेले होते(शक्यता आहे). Fuel Supply Controller कडुन इंधन पुरवठा थांबवण्याचा आदेश गेला. तो का गेला? उष्ण्ता, पूर्ण भरलेले विमान, टेक ऑफ झाल्या झाल्याच काही यंत्रणा 'रेसेट' झाल्या असाव्यात त्यामुळे Fuel Supply Controller कडुन इंधन पुरवठा थांबवला गेला. दोन्ही इंजिन्स बंद पडली मग रॅट बाहेर आला. https://en.wikipedia.org/wiki/Ram_air_turbine https://en.wikipedia.org/wiki/Ram_air_turbine

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गवि Sun, 06/15/2025 - 10:03
रॅम एअर टरबाईन डीप्लॉय झालेले व्हिडिओत स्पष्ट दिसत नाही. धूसर उभी दांडी हे नोज व्हील किंवा अन्य काही असू शकते. किंवा आर्टिफॅक्ट. ते खाली आले असे स्पष्ट दिसले किंवा ब्लॅक बॉक्समध्ये कळले तर पुढे बोलता येईल.

In reply to by गवि

"In the middle of the circle, you see kind of a protrusion on the belly of the aircraft... just underneath that you see a little grey dot... that little grey dot is the RAT.” A survivor in seat 11A, near an emergency exit, also reported hearing “a loud bang” and seeing lights flicker before the crash, consistent with RAT deployment https://www.cnbctv18.com/business/aviation/former-us-navy-pilot-now-points-to-engine-failure-in-air-india-boeing-787-crash-after-new-video-evidence-19621409.htm

गवि Sun, 06/15/2025 - 19:38
हो. रॅम एअर टरबाईन डीप्लॉय झाल्याचे अधिक स्पष्ट दिसणारा व्हिडिओ आता उपलब्ध आहे. गच्चीतून घेतलेल्या व्हिडिओची खराब कॉपी आतापर्यंत फिरत होती. त्याची मूळ प्रत आता बघायला मिळत असल्याने ते नक्कीच RAT असावे असे म्हणता येईल. शिवाय त्या क्लिपमध्ये आवाजही आहे. इतर क्लिप या क्लिपवरून पुन्हा रेकॉर्ड करण्यात आलेल्या असल्याने त्यात मूळ आवाज नव्हते. या नवीन मूळ क्लिप नुसार RAT चा "भ्रूम"सदृश आवाज ऐकू येतो आहे. हे रॅम एअर टरबाईन इंजिन फेल्युअर (सर्व इंजिने) किंवा इलेक्ट्रिक/ हायड्रॉलिक यंत्रणा बंद पडली की खाली येते. टेक ऑफ पर्यंत सर्व चांगले होते पण नंतर या तिन्हीपैकी एक यंत्रणा बंद पडली असे दिसते आहे. वर प्रा डॉ यांनी म्हटलेल्या तांत्रिक बिघडाच्या शक्यतेत यामुळे काहीशी भर पडली आहे. हे फेल्युअर कोणाच्या चुकीने झाले का हे ब्लॅक बॉक्समध्ये कळेलच.

सुबोध खरे Sun, 06/15/2025 - 23:51
आपण भारतीय लोक निवाडा देण्यात फार पुढे असतो(JUDGEMENTAL). एखाद्या विषयात आपल्याला ज्ञान आहे कि नाही, आपला त्या विषयाचा अभ्यास किती आहे, ज्ञान असले तरी आपल्याकडे पुरेशी माहीती आहे कि नाही हा विचार ना करता त्यावर आपले विशेष मत ठोकून द्यायचे. ऑपरेशन सिंदूर नि आता अहमदाबाद विमान अपघात यात हे प्रकर्षाने जाणवते आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये मोदींनी लष्कर जिंकत असताना एकदम शस्त्रसंधी कशी केली. कारण मुळात हिम्मत नाही पासून बिहारच्या निवडणुकांवर डोळा आहे पर्यंत आता विमानात काही तरी घातपात किंवा सायबर हल्ला पासून तुर्की कंपनीच्या कर्म चार्याने घातपात केल्या पर्यंत सर्व तर्हेची षडयंत्र असल्याची गृहीतके मोठ्या हिरीरीने पुढे आणली जात आहेत. अर्थात शेवटी एखाद्याचे असे ठोकून दिलेले गृहीतक बरोबर येईल आणि तो मोठ्या विजयी मुद्रेने तुम्हाला सांगेल कि बघा मी पहिल्यांदाच म्हणत होतो. मग आपण उंदीर मारण्याच्या खात्यात असलो तरी चालेल कि आपल्याला विमान मुळात उडते का आणि कसे याची सुतराम माहिती नसली तरी चालेल. हि शक्यता गृहीत धरून. गवि साहेब तुम्ही दुर्लक्ष करा आणि आपले विश्लेषण चालू ठेवा. कारण आपल्या विश्लषणातून आमच्या सारख्या या विषयात जुजबी माहिती असलेल्या अनेक लोकांना बरीच माहिती मिळू शकेल

In reply to by सुबोध खरे

>>>आमच्या सारख्या या विषयात जुजबी माहिती असलेल्या... डॉक्टर साहेब, हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे. हे म्हणजे एखाद्या श्रीमंत माणसाने आम्ही काय बॉ.. 'गरीब माणसं' अशा पद्धतीचं वाक्य वाटलं. चराचर सृष्टीचं ज्ञान असलेल्या माणसाने 'जुजबी' माहिती आहे असे म्हणने पटले नाही. आत्ता पर्यंत आपण जे जगाला सॉरी मिपाला जे ( दिव्य ) ज्ञान दिले आहे त्याला 'उपमा' नाही. 'अवघाची संसार सुखाचा करीन' हे आपलं ध्येय आहे. महाभारतातला संजय आणि आपण दिव्यदृष्टी असलेली माणसं नुसता कटाक्ष टाकला की सगळे गुंतागुंतीचे विषय क्षणात मोकळे होऊन जातात. आपणास जुजबी माहिती असते असे कृपया म्हणू नये, माझा मुड ऑफ़ होतो.. :( -दिलीप बिरुटे ( डॉ.खरे साहेबाचा फॅन ) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Tue, 06/17/2025 - 11:49
बिरुटे सर एखाद्या विषयात महारथ मिळवायची असेल तर त्यात किमान १० हजार तास घालवायला लागतात असे आम्हाला शिकवले आहे. मी दोन वर्षे विक्रांत या विमानवाहू जहाजावर मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात होतोय यानंतर साडे चार वर्षे गोव्यातील नौदलाच्या हंस या तळाशी संलग्न रुग्णालयात "डॉक्टर" म्हणून काम करत होतो असे असले तरी प्रत्यक्ष विमानाचं संरचना आणि त्याचे कार्य याची माहिती फार तर जुजबीच राहील नव्हे का? अर्वाचीन गद्य वाङ्मयाचा इतिहास किंवा कोसला कादंबरीतील सौंदर्य स्थळे यात पी एच डी केलं असतं तर मला संपूर्ण ज्ञान आलं असतं. मग ड्रीम लायनारच कशाला मी फ ३५, चँगडू J २०, चेंगडू J ३६, सुखोई ५७ यांच्या एव्हियॉनिक्स आणि ल्युनबर्गर लेन्स वर विशेष टिप्पणी करू शकलो असतो. पाहू या आपल्या सारखा कोणी गाईड मिळाला तर अशाच एखाद्या विषयात AI चा वापर करून दोन चार महिन्यात पी एच डी मिळवता येईल का असा विचार चालू आहे ?

'यु-ट्युब'स्थित पत्रकार/तज्ञ/आजी/माजी पायलट ज्या बोइंगवरील माहितीपटाचा हवाला देत आहेत तो माहितीपट नेटफ्लिक्सवर पाहिला. सुरक्षा आणि दर्जा ह्याबाबत बोइंग ९०च्या दशकापर्यंत अग्रगण्य होती. If it's Boeing, I'm not going. असे म्हंटले जायचे. २०००च्या दशकापासुन एयरबसच्या विमानांचा खप वाढला आणि स्पर्धेत टिकण्यासाठी बोइंगचे धोरण मग फक्त नफा आणि लवकरात लवकर विमानांची डिलिवरी हे झाले. कंपनीचे मुख्यालय एव्हरेटमधुन शिकागोला हलवण्यात आले.व्यवस्थापनात सैन्याचे माजी अधिकारी आले, वॉल स्ट्रीटवर लक्ष आणि फक्त नफा.. हे धोरण ठरले. मग बोइंग-७३७ मॅक्सचे दोन मोठे अपघात झाले आणि सगळी ७३७-मॅ़क्सच्या उड्डाणांवर जगभर बंदी आली. ७८७-ड्रीमलायनरचा गेल्या १४ वर्षातला पहिला अपघात. पण दोन्ही इंजिन्स एकाच्वेळी अकार्यरत कशी काय झाली? हे अजूनही कोडे आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, एयर इंंडियातील वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रसरकारने नेमलेली अशी सर्वांची मिळून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. समिती पुढील तीन महिने या घटनेचा तपास करुन अहवाल सादर करणार आहे. तीन महिन्यानंतर अपघाताची कारणे समजतील असे वाटते. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 06/18/2025 - 20:08
पण आता ताक फुंकून पित आहेत हे नैसर्गिक नव्हे का? अपघात विमानांच्या प्रणालीत काही चूक राहून गेली असेल त्यामुळे आहे कि वैमानिकाच्या चुकीमुळे आहे कि विमानाच्या नियतकालिक तपासणी आणि दुरुस्ती मध्ये आहे हे नक्की होईपर्यंत कोणताही धोका पत्करणे चूकच ठरेल. मोटार गाड्यांच्या ब्रेक किंवा इंजिन किंवा तत्सम गाड्यांमध्ये दोष आढळल्यास हजारो लाखो गाडयांना परत बोलावून ती प्रणाली बदलली जाते किंवा दुरुस्त केली जातेच. आपण वापरत असलेल्या मोबाईल मध्ये काही सॉफ्टवेअर मध्ये glich किंवा बग आल्यास सिक्युरिटी पॅच पाठवला जातोच कि.

गवि Wed, 06/18/2025 - 21:13
सध्या तरी, दोन्ही इंजिने एकाच वेळी बंद कशी झाली (तीही टेक ऑफ व्यवस्थित झालेला असताना), हा एकच मुख्य प्रश्न आहे. ब्लॅक बॉक्समधून बहुधा उत्तर मिळेल. म्हणजे बंद पडली होती की नाही हे तर मिळेलच, पण नेमके का ?, याबद्दल काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष क्लूज मिळतील.

कंजूस Wed, 06/18/2025 - 21:44
असं ऐकून आहे की.... कारच्या इंधन टाकीत साखर टाकली की चालू झालेली कार लगेच आचके देऊ लागते. म्हणजे काही घातपात झाला का आतल्या माणसांचे लक्ष नसताना .किंवा असं काही करताच येत नाही विमानाच्या इंधन टाकीत. सगळं बंदिस्त असते.

मार्गी गुरुवार, 06/19/2025 - 18:06
गविजींकडून आणखी अपडेटसच्या प्रतीक्षेत. हा धागा रोज वाचतोय.

स्वधर्म गुरुवार, 06/19/2025 - 21:03
आले होते. त्यात ए ए आय बी चा रिपोर्टचा हवाला देऊन असे सांगितले आहे की पायलटच्या सीटचा बोल्ट फेल झाल्यामुळे विमानाने टेक ऑफ घेताच त्याची खुर्ची मागे ओढली गेली व त्यामुळे थ्रस्ट लिव्हर पाहिजे त्याच्या ऊलट दिशेला म्हणजे मागे खेचली गेली. परिणामी थ्रस्ट गेला व विमान वर उडू शकले नाही. कोपायलटने ती लिव्हर पुढे करण्यासाठी ताकद लावली पण पायलटचे वजन व 'मेक्॑निकल फोर्स' मुळे काही होऊ शकले नाही. ए ए एफ बी एव्हिएशन अ‍ॅक्सीडेंट इन्व्हेस्टीगेशन ब्युरो इतर कुठेच असे काही वाचनात आले नाही, त्यामुळे कितपत विश्वासार्ह आहे ते माहित नाही.

गवि गुरुवार, 06/19/2025 - 22:04
एक इंजिन रनवे वरच अंशतः किंवा पूर्ण बंद झालं असावं. कारण लिफ्ट ऑफ (हवेत उचलले जाणे) यासाठी नेहमीपेक्षा अधिक अंतर लागले आहे. हे अंतर पूर्ण वजनासहित लागणाऱ्या अंतरापेक्षाही जास्त आहे. म्हणजे एकाच इंजिनावर टेक ऑफ झाला असावा. दुसरे इंजिन टेक ऑफ होताच बंद पडले आणि त्या उसळीच्या जडत्वावर विमान आणखी थोडे वर पोचून मग खाली आले. असे सध्या सर्वाधिक शक्य वाटू लागले आहे. दोन्ही इंजिने बंद पडल्यावर विमानाची चाके वर उचलणारी यंत्रणा देखील अर्थात बंद पडते. रॅम एअर टरबाईनमध्ये जेमतेम काही अत्यावश्यक उपकरणे आणि कंट्रोल चालू ठेवण्याइतकी पॉवर असते. चाके आत घेणे त्यात अंतर्भूत नसते.

In reply to by गवि

टेकऑफ़ला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला हे त्या अपघाताचे कारण नाही होऊ शकत असे वाटते. विमान धावपट्टीवर धावते उड़ते तेव्हा हवेचा दाब विमानाचे वजन आणि वर उडण्यासाठीची स्थिती याचं धावपट्टीवर धावण्याचं अचूक कॅल्क्यूलेशन असतं तेव्हाच ते वर उड़ते. विमान धावपट्टीवर धावले योग्य क्षणी ६२५ फूट उंचीवर पोहोचते आणि १७४ नॉट्सचा कमाल वेग गाठते, याचा अर्थ या क्षणापर्यन्त दोन्ही इंजिन्स काम करीत आहेत आणि आत्ता ते वेगाने खाली उतरण्यास सुरुवात सुरुवात करते, इथे दोन्हीही इंजिन्सन काम करीत नाहीत विमानाचं नाक वर आहे पण विमान झेप घेत नाही. विमानतळावरुन विमानाने टेक ऑफ केल्यानंतर ८ मिनिटा अगोदर सर्व अलबेल होते आणि नंतर विमान कोसळले. -दिलीप बिरूटे

गवि गुरुवार, 06/12/2025 - 16:32
क्रॅश होतानाच्या शेवटच्या क्षणांचा जो व्हिडिओ सर्वत्र दिसतोय (AI वाला नाही किंवा जुना फेक नाही असे गृहीत धरून) त्यात कोणतीही आग किंवा मिसिंग पार्ट दिसत नाही. फ्लॅप्स, जे टेक ऑफच्या वेळी डिप्लॉय केले जातात तेही झालेले दिसत नाहीत. आणखी एक लिहायचं राहून गेलं की ड्रीमलायनरचा हा पहिलाच "हल लॉस" - पूर्ण विमान नष्ट होण्याचा अपघात.

गवि गुरुवार, 06/12/2025 - 16:47
महत्वाचे निरीक्षण. त्याची संगती पुढे लागेलच. विमान साधारण सहाशे फूट उंचीवर पोचून मग खाली आलं आहे. व्हिडिओ ओरिजनल असेल तर या स्टेजला लँडिंग गियर (चाके असेम्ब्ली) वर आणि फ्लॅप्स खाली, असे दिसले पाहिजे. इथे उलट दिसते आहे. फ्लॅप्स वर आणि चाके खाली.

In reply to by गवि

कंजूस गुरुवार, 06/12/2025 - 19:31
विमानाला वर नेण्यासाठी जी अधिक इंधन देणारी दांडी सरकतात ती काही वेळाने परत फिरून लॉक व्हावी असा काही घातपात केला असेल का? म्हणजे विमान उतरण्याच्या वेळी वेग कमी होऊन चाके उघडतात असं काही झालं असेल. या कार्यावळीत इतर काही इलेक्ट्रॉनिक सिस्टम घुसेल असं वाटतं नाही. समजा वैमानिकाच्या लक्षात आलं की हवे तेवढे इंधन पुरवले जात नाही तर तो काय करेल? आहे त्या उंचीलाच विमान ठेवून वळवून उतरेल आणि त्यासाठी चाके परत उघडून तयार ठेवेल.

In reply to by कंजूस

गवि गुरुवार, 06/12/2025 - 22:14
विमानाला वर नेण्यासाठी जी अधिक इंधन देणारी दांडी सरकतात ती काही वेळाने परत फिरून लॉक व्हावी असा काही घातपात केला असेल का?
नाही. तसे करता येणे फारच कठीण. जवळपास अशक्य. आणि इंधन बंद झालेले नाही.

In reply to by गवि

सौंदाळा गुरुवार, 06/12/2025 - 19:36
कोणता व्हिडिओ नक्की? तुम्ही केलेल्या वर्णनावरुन तो नेपाळ मधे झालेल्या अपघाताचा व्हिडिओ असावा असे वाटत आहे. तो व्हिडिओ सध्या फिरत आहे. विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी पण होते अशी बातमी पाहिली. अत्यंत दु:खद घटना. सर्व मृतांना श्रध्दांजली आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि गुरुवार, 06/12/2025 - 22:12
नाही. नेपाळ वाला नाही. हा आजचाच आहे. मुख्य वर्तमानपत्रे आणि मिडियात आलाय. इथे टाकता येत नाहीये.

कंजूस गुरुवार, 06/12/2025 - 18:52
दुःखद घटना. >>>इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात.>> नेमकं. सुखसोयीच्या इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवू नयेत किंवा त्यांचे पॅनेल बोर्ड केबिनमध्ये नसावेत. बोइंगवाले यात शोध घेतीलच. मागच्या काही महिन्यांत बोईंगचे स्पेस स्टेशन शटल अडकले होते याची आठवण झाली.

आनंद गुरुवार, 06/12/2025 - 19:30
फ्लाइट रडार २४ चेक केले असता टेक ऑफ च्या वेळी वेग कमी होता१२० किलो नॉट्स असावा. शेवटचा डाटा हा १७४ किलो नॉट्स आणि हाइट ६२५ फुट आहे.

In reply to by आनंद

गवि Fri, 06/13/2025 - 11:40
६२५ म्हणजे समुद्र सपाटीपासून असते. त्यातून विमानतळाची १७४ वजा करा. जमिनीपासून तितकी. इंजिन बंद नसल्याचा पुरावा.

मारवा गुरुवार, 06/12/2025 - 19:55
मानवी चुकीच्या कारणाने असे झाले तर अधिकच वाईट वाटते. म्हणजे जे टाळणे हातात आहे मानवाच्या ते किमान टाळले पाहिजे.

गवि गुरुवार, 06/12/2025 - 22:17
विमानाचे वजन सर्वाधिक अलाउड टेक ऑफ वेट पेक्षा जास्त असेल आणि हवा अत्यंत गरम म्हणजे विरळ असेल तर टेक ऑफ घ्यायला बराच अंतर आणि वेळ लागू शकतो. (औरंगाबाद क्रॅश). त्यामुळे वर चढत जाण्याचा दर देखील खूप मंदावू शकतो. पण इथे विमान खाली खाली येताना दिसत आहे. त्यामुळे ही कारणमीमांसा तूर्त रद्द करावी लागेल.

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 06/12/2025 - 22:18
विमानाचे उड्डाण झाल्यापासून काही सेकंदात ते कोसळले. उड्डाणापासून कोसळेपर्यंतचा सगळा प्रवास अहमदाबाद विमानतळावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात टिपला गेला आहे. तो https://youtube.com/shorts/DEjkiah6_JY?si=CJTq6VCB2TwOARFX वर बघता येईल. न्यूज चॅनेलवर अधिक स्पष्ट व्हिडिओ दाखवत होते. तो युट्यूबवर मिळाला नाही. त्या विमानाच्या मागेच दुसरे इंडिगोचे विमान उड्डाण करणार होते. ते रनवेवर जात असतानाच मागे (इंडिगोच्या विमानाच्या वैमानिकासाठी पुढे) काळ्या धुराचे लोट दिसायला लागले. ते बघून त्याला केवढा धक्का बसला असेल. तसेच ध्यानीमनी नसताना अचानक अवाढव्य विमान अंगावर येताना समजा त्या मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलमधील कोणी बघितले असेल तर त्या व्यक्तीच्या काळजाचे पाणी पाणी झाले असेल :(

स्वधर्म गुरुवार, 06/12/2025 - 22:29
अपघातातील लोकांच्या कुटुंबियांना सावरण्याचे बळ मिळो. या अपघातामुळे एअर ईंडीयाला मोठा तोटा तर होणारच आहे. जगभरातील लोकांना भारताच्या हवाई क्षेत्राविषयी आत्तापर्यंत विश्वास वाटत आला आहे. तो अबाधित रहावा व या अपघातामागे सुरक्षा व्यवस्था व देखभाल व्यवस्था यातील ढिसाळपणा समोर येऊ नये ही अपेक्षा. बोईंगचे समभाग प्रिमार्केट ८% तर एअर ईंडियाचे ४% कोसळले.

कंजूस Fri, 06/13/2025 - 06:52
Ac बंद होते. याच विमानातून एका प्रवाशाने दिल्ली ते अहमदाबाद प्रवास केला होता. त्यात सर्व एसी बंद होते तसेच टीवीसुद्धा. ती खरड त्याने x वर टाकली आहे. तर यावर झटपट दुरुस्ती करून लंडनला पाठवले. त्या दुरुस्तीचा परिणाम असावा. सगळी वीज खेचली गेली असावी आणि .....

कर्नलतपस्वी Fri, 06/13/2025 - 09:10
हिच प्रार्थना. विमान कोसळणे हे बघणेच इतके भयंकर असते की त्याचा मनावर खोलवर परिणाम होतो. इंडिगो पायलट आणी प्रवासी यांच्या मानसिक स्थितीची कल्पनाच करवत नाही. एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य कर्मचारी संपावर होते. अत्यावश्यक सेवा सुचारू चालण्यासाठी सैन्याला बोलावले होते. मी के ई एम मधे कार्यरत होतो. अपघातानंतर सर्व प्रवाश्यांच्या मृतदेहाचे अवशेष याच हाॅस्पिटल मधे आणले होते. अतिशय विदारक परिस्थीती होती. दुसरा अपघात जोधपूर मधे असताना प्रत्यक्ष बघीतला. विमानाला आग लागली, फ्युएल टॅक सारखी वस्तू खालून जाणार्या टि व्ही एस फिफ्टीवर कोसळली. वाहन आणी वाहन चालकाचा कोळसा झाला. आजही ते दृश्य आठवले की काटा येतो. वैमानिक पण दगावला. ओळखू येत नव्हता.

In reply to by कर्नलतपस्वी

आग्या१९९० Sat, 06/14/2025 - 23:47
एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. जुहू बीचवरून? कनिष्क विमान खलिस्तान अतिरेक्यांनी बाँबस्फोट करून १९८५ ला उडवले , आणि ते अटलांटिक महासागरात कोसळले होते.

कर्नलतपस्वी Fri, 06/13/2025 - 09:11
हिच प्रार्थना. विमान कोसळणे हे बघणेच इतके भयंकर असते की त्याचा मनावर खोलवर परिणाम होतो. इंडिगो पायलट आणी प्रवासी यांच्या मानसिक स्थितीची कल्पनाच करवत नाही. एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य कर्मचारी संपावर होते. अत्यावश्यक सेवा सुचारू चालण्यासाठी सैन्याला बोलावले होते. मी के ई एम मधे कार्यरत होतो. अपघातानंतर सर्व प्रवाश्यांच्या मृतदेहाचे अवशेष याच हाॅस्पिटल मधे आणले होते. अतिशय विदारक परिस्थीती होती. दुसरा अपघात जोधपूर मधे असताना प्रत्यक्ष बघीतला. विमानाला आग लागली, फ्युएल टॅक सारखी वस्तू खालून जाणार्या टि व्ही एस फिफ्टीवर कोसळली. वाहन आणी वाहन चालकाचा कोळसा झाला. आजही ते दृश्य आठवले की काटा येतो. वैमानिक पण दगावला. ओळखू येत नव्हता.

अतिशय र्‍हदयद्रावक घटना. कालपासून जे जे व्हीडीयो पाहण्यात आले ते पाहुन अधिकच दु;खच केवळ. आयुष्याचा कोणताच प्रवास सुरक्षित नाही. घटना घडणार होती म्हणून घडली म्हणून सोडून देताही येईल पण तांत्रिक गोष्टींनी जी जीवीत हानी झाली ती कधीही भरुन निघणार नाही. आपण घटना यंव घडली आणि त्यंव घडली म्हणून उद्या कदाचित काही निष्कर्ष काढूही, त्यात सुधारणाही होईल पण अपघात थांबतील याची शास्वती अजिबातच वाटत नाही. विमान उडतंय आणि काही क्षणात हळुहळु खाली येत शेपटीच्या बाजूने इमारतीला धडकते. आपण काही यातले जाणकार नाही, पण ज्या बातम्या येताहेत त्यात दोन्हीही इंजीन्स अचानक बंद पडली अशी स्थिती झाली. "मे डे" हा जीवघेणा शब्द बाहेर पडला तितकाच बाकी सर्वत्र शांतता. वस्तीगृहातील शिकाऊ डॉक्टरर्सना आपलाही जीव नाहक गमवावा लागला. दूरचं उडान आहे म्हणून टँक भरलेले असेल आणि कदाचित त्याच्या स्फोटामुले इतकी जिवीत हानी झाली. भविष्यात इंधनविरहित इतक्या ताकदीच्या वीजेच्या ताकदीवर किंवा इंधन टाकी इतकी मजबूत की ती आदळली, स्फोट झाला तरी ती फूटू नये इतका काही बंदोबस्त झाल्याशिवाय अशा अपघातात होणारी जिवीत हानी कमी होणार नाही, हा विचार फारच तकलादू असू शकेल पण अशा अपघातातील हानी कमी करण्याचा विचार भविष्यात होऊ शकेल असे वाटते. विमान अपघातातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 10:24
बरीच अधिकची माहिती मिळते आहे. टेकऑफचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. टेक ऑफ व्यवस्थित झाला होता. तोपर्यंत इंजिन्स व्यवस्थित चालू होती. नंतर लगेच इंजिनची पॉवर नाहीशी झाली असे म्हणावे तरी देखील एकदम दोन्ही इंजिने बंद पडणे हे या विमानाच्या बाबतीत केवळ तात्विक दृष्ट्याच शक्य आहे. प्रत्यक्षात ती शक्यता नगण्य. आणि एक इंजिन पूर्ण बंद पडले तरी उरलेल्या एका इंजिनावर विमान हवेत वर चढून योग्य उंची प्राप्त करून पुन्हा गोल फिरत लँड करू शकते. पायलटला ते ट्रेनिंग दिलेले असते. आणि एक इंजिनावर पूर्ण प्रवास देखील करता येईल अशीच रचना असते. पक्षी आदळून किंवा अडकून दोन्ही इंजिने पूर्ण बंद होणे हे देखील फार दुर्मिळ. आणि तसे असते तर थोडा तरी धूर, काजळी, कदाचित आगीचा बारीकसा तरी लोळ असे दिसायला हवे. तसे काही दिसत नाही. पक्षीही बऱ्याच संख्येने आणि मोठाले असतील तरच दोन्ही इंजिने एकावेळी भरून जातील. पण पक्षीही दिसत नाहीत टेकऑफच्या वेळी. दोन प्रकार असतात. लॉस ऑफ पॉवर आणि लॉस ऑफ लिफ्ट. पॉवर पूर्णपणे उपलब्ध असूनही लिफ्ट नाहीशी होऊ शकते. यासाठी दोन तीन शक्यता आहेत. त्यातलीच एक बाहेर येईल असे वाटते. थोडे नंतर सवडीने यावर लिहीन.

In reply to by गवि

प्रत्यक्षात ती शक्यता नगण्य.
आपण या विषयातले जाणकार आहात त्यामुळे आपण जी शक्यता नगण्य म्हणत आहात तीच शक्यता अधिक आहे. आम्ही जाणकार नाही पण साधं लॉजीक असं आहे की, विमान उडालं आहे, आणि हळुहळु खाली येतंय याचा अर्थ त्याची पॉवर कमी झाली आहे. एक इंजीन चालू असतं तर, कदाचित वळण घेवून लँडींगला आलं असतं म्हणजे एकही इंजीन चालू नाही. एकही चालू नाही म्हणजे दोन्हीही बंद पडले उडण्याची क्षमता गमावली आहे. आपल्या यंत्र तंत्राच्या भाषेत लॉस ऑफ पॉवर हतबल ही स्थिती त्यामुळे जे तांत्रिक फेल्युअर झालं ते मशीनचं. एकदा उडून ही स्थिती यावी हे जे जरा तर्कापलिकडे जातंय. उडतंय म्हणजे पॉवर सुरु होतं आणि हळुहळु खाली येतंय म्हणजे अचानक पॉवर लॉस हतबल स्थिती, हा यांत्रिक बिघाड सापडला पाहिजे. दुसरं यात पायलटचा दोष दिसत नाही. विमान वर उडते राहावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले असावे. आता लँडींग झालं तर धोका तितकाच होता म्हणून त्याचं प्राधान्य विमान वर उडवायला असणार पण दुर्दैवाने विमान उंच झेप घेऊ शकले नाही. आज उद्या विमान कंपन्यावर येणारं बालट, कंपन्यांचं नुकसान होऊ नये म्हणून पायलटवर खापर फोडतात काय इतकंच पाहणे बाकी आहे. एक्सपर्ट लोकांनी तर्क पटणारा केला पाहिजे. इतकी माफक अपेक्षा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 11:35
पण साधं लॉजीक असं आहे की, विमान उडालं आहे, आणि हळुहळु खाली येतंय याचा अर्थ त्याची पॉवर कमी झाली आहे. एक इंजीन चालू असतं तर, कदाचित वळण घेवून लँडींगला आलं असतं म्हणजे एकही इंजीन चालू नाही.
बरं झालं तुम्ही हा मुद्दा मांडलात. मी वर म्हटलंच आहे की लॉस ऑफ पॉवर आणि लॉस ऑफ लिफ्ट असे दोन वेगळे भाग आहेत. फुल पॉवर इंजिन चालू असतानाही लॉस ऑफ लिफ्ट होतो आणि विमान अगदी असेच खाली येते. यासाठी आपल्याला विमान कसे उडते याबद्दल माहिती घ्यायला हवी. तुमची शेवटची काही वाक्ये मला हे सर्व लिहिण्यापासून परावृत्त करत आहेत पण इतर सर्व (खवचट नसलेल्या) मिपाकरांच्या माहितीसाठी कदाचित हे उपयुक्त ठरेल म्हणून लिहीत आहे. विमानाच्या पंखावर जी लिफ्ट (उचल) उत्पन्न होते त्यासाठी पंखाच्या वरून आणि खालून वेगवेगळ्या वेगाने आणि दाबाने वाहणारी हवा कारणीभूत असते. दाबात असा फरक निर्माण व्हावा अशी पंखांची रचना आणि आकार असतो (aerofoil). आता असे पहा, की पंखाचा हवेच्या प्रवाहाशी एक कोन असतो. आणि तो वेगवेगळ्या वेळी बदलतो. टेक ऑफ घेताना आणि वर चढताना तो जास्त असतो. त्याला अँगल ऑफ अटॅक म्हणतात. तो जसा वाढत जातो तसा एका मर्यादेनंतर हवेचा अवरोध वाढायला लागतो. आणि लिफ्ट निर्माण करणारे प्रवाह बिघडू लागतात. अशा वेळी विमानाला वर वर जाणे अधिक अवघड होऊ लागते. मग पॉवर वाढवून ही स्थिती काहीशी नियंत्रणात आणता येते. पण.. फुल पॉवर असताना देखील अँगल ऑफ अटॅकची मर्यादा ओलांडली जाऊ लागली की विमानाच्या पंखावरची लिफ्ट नाहीशी होते. एक लक्षात घ्या की विमानाचे इंजिन कारच्या इंजिनासारखे चाकांना संचालित करत नसून ते हवेला मागे आणि पर्यायाने विमानाला पुढे ढकलत असते. मात्र "लिफ्ट" उत्पन्न करण्याचे कार्य इंजिन करत नसून विशिष्ट वेगाने आणि विशिष्ट कोनात पुढे सरकणारे पंख करत असतात. त्यांचा अँगल ऑफ अटॅक मर्यादा ओलांडून गेला की इंजिने पूर्ण ताकदीने फुरफुर करत राहतील, हवा मागे फेकतील, पण लिफ्ट उत्पन्न होऊ शकणार नाही. या स्थितीला स्टॉल असे म्हणतात. अहमदाबाद विमानाच्या बाबतीत टेक ऑफ पूर्ण वेगाने आणि व्यवस्थित झालेला आहे. इंजिन बंद किंवा कमी पॉवरने चालत असताना हे होणेच अशक्य आहे. हवेत उचलले गेल्यावर ज्या पद्धतीने विमान खाली येत आहे (pancaking) त्यावरून हेच दिसते की लॉस ऑफ लिफ्ट आहे. लॉस ऑफ पॉवरमुळेही लॉस ऑफ लिफ्ट होऊ शकते, तेही एक वैध कारण आहे. पण या बाबतीत दोन्ही इंजिने एकदम बंद पडावीत आणि तीही टेक ऑफ ठीकठाक झालेला असताना त्यानंतर लगेच, हे अशक्य आहे. आता नेमके झाले काय असावे हे नीट मांडायला वेळ लागेल. प्रयत्न करतो एका ब्रेकनंतर. यात लँडिंग गियर खालीच असणे हा मुख्य क्लू आहे. आणि फ्लॅप्स खाली नसणे हाही. इंजिन बंद पडो, लिफ्ट जावो, आग लागो किंवा अन्य काही कारणाने विमान कोसळू लागो, यातील प्रत्येक केसमध्ये लँडिंग गियर विमानाच्या पोटातच असायला हवेत. पहिल्या सहा ते दहा सेकंदांत ते पोटात घेतले जातात आणि वस्तीत क्रॅश होणार म्हणून चाके पुन्हा बाहेर काढणे असे होत नसते. ती आतच ठेवली जातात. हे लिहायला स्फूर्ती दिल्याबद्दल धन्यवाद. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आपला आदर आहेच. बाकी स्वभाव म्हणाल तर मनुष्य म्हटला की बरे वाईट गुण आलेच. असो. गंभीर धाग्यावर अवांतर टाळतो.

In reply to by गवि

गवि Fri, 06/13/2025 - 11:45
क्रॅश निश्चित झाल्यामुळे (मे डे शब्द वापरला गेला) बिचाऱ्या पायलट्सनी मरताना देखील प्रोसेस फॉलो करून इंजिने आयडल केली असणार. लँडिंग गियर वर का घेतला नाही माहीत नाही. पण जमिनीवर नुकसान कमीतकमी व्हावे यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींत: इंधन कमी करणे (जे करणे शक्य नव्हते, वेळ नव्हता) वेग किमान ठेवणे : हे दिसते आहे. पंख जमिनीला समांतर लेव्हलमधे ठेवणे. हेही केलेले आहे. लँडिंग गियर राहून गेला असावा किंवा तेवढ्या वेळात रिट्रॅक्ट होऊ शकला नसावा.

In reply to by गवि

पण जमिनीवर नुकसान कमीतकमी व्हावे यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींत:
मला स्वतःला ही शक्यता फार कमी वाटते की जमीनीवर लँडींग करावे वगैरे. पहिलं प्राधान्य झेप घेणे इतर प्राधान्याचा विचार फार कमी वेळा येत असावा. यावरुन आठवण झाली. लॉस ऑफ पॉवर आणि जमीनीवर लँडींगचा हा व्हीडीयो आपण पाहिलाच असेल असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by गवि

मारवा Sat, 06/14/2025 - 06:56
इंधन कमी करणे (जे करणे शक्य नव्हते, वेळ नव्हता) समजा वेळ असता तर अशा परिस्थितीत इंधन कमी कोणत्या मार्गाने केले जात असते ? म्हणजे काय technique वापरली जात असते ? कृपया खुलासा करावा ? प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यात असताना काही माणसे जे असामान्य धैर्य आणि हानी टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात ही गोष्टच मला नेहमी भावूक करते.

In reply to by मारवा

गवि Sat, 06/14/2025 - 08:04
समजा वेळ असता तर अशा परिस्थितीत इंधन कमी कोणत्या मार्गाने केले जात असते ? म्हणजे काय technique वापरली जात असते ?
मुख्यतः मोकळ्या भूभागावर किंवा पाण्यावर जाऊन गोल फिरत राहून इंधन जाळून संपवणे. लँडिंग वेट अचिव्ह करण्यासाठी. किंवा क्रॅश लँडिंगमध्ये हानी कमी करण्यासाठी.

In reply to by गवि

अहमदाबाद विमानाच्या बाबतीत टेक ऑफ पूर्ण वेगाने आणि व्यवस्थित झालेला आहे.
इथपर्यंत आपली मतं बरोबर वाटत आहेत.
इंजिन बंद किंवा कमी पॉवरने चालत असताना हे होणेच अशक्य आहे.
मुद्दा हाच आहे की, विमानाने टेक ऑफ पूर्ण वेगाने व्यवस्थित केलेला आहे, मग असे काय घडले की ते खाली खाली येत गेले. लॉस ऑफ लिफ्ट असो की लॉस ऑफ पॉवर असो, हे जे अचानक कसं घडलंय तेच अपघाताचे कारण की अन्य काही, तेच महत्वाचं आहे. तपशीलवार निबंधाबद्दल आभारी आहे. लिहिते राहा. वाचतोय. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 12:00
हे जे अचानक कसं घडलंय तेच अपघाताचे कारण की अन्य काही, तेच महत्वाचं आहे.
या स्टेजला सर्वच गोष्टी अंदाज या कॅटेगरीत येतात. पण काही अंदाज सहज नाकारता येतात, इंजिन बिघाड किंवा तांत्रिक बिघाड हा या बाबतीत सकृत्दर्शनी शक्य दिसत नाही. १. फ्लॅप्स वर २. लँडिंग गियर खालती. ३. स्टॉल सदृश अटीट्युड (विमानाचे ओरिएंटेशन म्हणा) ४. यशस्वी टेक ऑफ ५. उड्डाणाच्या आधी फ्लॅप्स खाली करणे विसरावे हे विमान होऊ देणेच अशक्य अशी यंत्रणा (ड्रीमलाइनरची) ६. मोठ्या संख्येने पक्ष्यांचा अभाव (दोन्ही इंजिने तातडीने बंद पडण्याइतके मोठे पक्षी थव्याने असणे आवश्यक) ७. धूर, काजळी, आगीचा लोळ नसणे (पक्षी आत गेले की यातले काहीतरी होणार) ८. सर्वात महत्वाचे. टेक ऑफ घेताना सर्वात जास्त इंजिन पॉवर आणि लिफ्ट मिळण्यास सर्वाधिक अनुकूल स्थिती असते. त्यामुळे पंखाचा आकार काही प्रमाणात बदललेला नजरेला दिसतो. पुरेशी लिफ्ट मिळत असते तेव्हा पंखांची टोके वर वळतात. पंखात लवचिकता ठेवलेली असल्याने हे वाकणे स्पष्ट दिसते (स्नायू तटतटतात तसे). इथे लिफ्ट नसल्याचे दिसते आहे. पंख सरळ आणि पडके आहेत. या सर्व मुद्द्यांमुळे ठळक शक्यता हीच उरते की लिफ्ट कमी पडली. का? - उड्डाणाच्या नंतर लगेच फ्लॅप्स वर घेतले जाणे. - उड्डाणाच्या नंतर लगेच चाके वर घेतली जाणे. या दोन्हींमुळे विमानाची लिफ्ट पुरती निकामी लेव्हलला येऊ शकते. हे असे होण्यात कुठेतरी मानवी चूक वाटते. अंदाजच असला तरी तो सध्याच्या स्थितीत सर्वाधिक शक्यतावाला अंदाज आहे. पुढे तो चुकीचा ठरला तर करेक्शन करूच.

In reply to by गवि

आनंद Fri, 06/13/2025 - 14:39
मानवी चुक असण्याचीच शक्यता जास्ती आहे. लँडिंग गियर वर घेण्या ऐवजी फ्लॅप्स वर घेतले असावेत का? अस होन्याची शक्यता अनुभवी पायलट कढुन अशक्य आहे पण सांगता येत नाही.

In reply to by गवि

सहज आठवले. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणल्यावर त्याकाळी एक लॉजिकचा मुद्दा असा होता की मग पक्षी आपल्या घरट्यात कसे परत येतात? बाकी स्वभाव म्हणाल तर मनुष्य म्हटला की बरे वाईट गुण आलेच. याच्याशी सहमत आहे काही समविचारी विद्वान सहमती व्यक्त करताना देखील पुरेशी तुच्छता बाळगतात.त्याशिवाय त्यांना विद्वतेचा "फील" येत नाही. हे अनुभवल आहे

गवि Fri, 06/13/2025 - 10:29
आणखी एक. अमेरिकन बनावटीचे विमान असल्याने NTSB या चौकशीत सामील होणार. इतरही देशांच्या एजन्सीज येणार. विशेषतः ब्रिटिश. भारतीय लोकांच्या नंतर तिथले सर्वाधिक नागरिक प्रवाशांत होते

पॉवर होती पण लॉस ऑफ लिफ्ट.. एका अनुभवी वैमानिकाचा व्हिडियो पाहिला. सहवैमानिकाकडुन चूक झाली असावी असा त्याचा अंदाज आहे. 'गियर अप'च्या ऐवजी सहवैमानिकाने 'फ्लॅप रेझ' हॅंडल वापरले. युट्युबर 'कॅप्टन स्टीव'

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पायलट अनुभवी होते. कॅप्टन सुमित सभरवाल यांच्याकडे वृत्तपत्र बातम्यानुसार ८२०० तासांचा उड्डाणाचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. तर सहपायलट यांच्याकडे अकराशे तासांचा अनुभव होता. अवघ्या एका मिनिटात मे डे कॉल दिला पण त्या नंतर ते काहीही करु शकले नाहीत. ज्या काही शक्यता येत आहेत त्यात, विमानाचे लॅंडीग गिअर आत घेतले गेले नाही. टेक ऑफ झाल्यानंतर पहिल्या पाच मिनिटे झाली तरी, दहा पंधरा सेकंदाच्या आत हे गीअर आत घेतल्या जातात पण हे आत घेतले गेले नाही, आता ही मानवी चूक की यंत्रांची चूक आणि ते यामुळेच झाले की अन्य काही अजून काही कळायला मार्ग नाही. -दिलीप बिरुटे

कंजूस Fri, 06/13/2025 - 12:37
आपण चर्चा करत आहोत. एखादा मुद्दा पटला नाही तर खोडाला जात आहे. पण कुणी आपला मुद्दा मान्य न झाल्यास चिडण्याचे कारण नाही. माझा मुद्दा असा_ दिल्लीवरून येताना एसी बंदच होते. इकडे विमानाने टेकऑफ केल्यावर एसी लगेचच चालू केले गेले असतील तर बरीच पावर खेचली गेली असेल. ती पावर फ्लॅप्स वळवण्यासही लागत असेल. म्हणजे तिथे प्रेफरन्स प्राधान्य देण्याची काही व्यवस्था असेल तर ती बंद पडली असेल. एंजिने फुल पावर/इंधन मिळूनही फ्लॅप्स वळून हवा खाली ढकलली न गेल्याने उंची दाखवणारे दर्शक उंची वाढत जात आहे/ नाही यामध्ये ' जात नाही' हे दाखवू लागल्यावर वैमानिकाने मदतीचा भोंगा वाजवला असणार. विमान जमिनीवर उभे असताना फ्लॅप्स वळवण्यास फारशी शक्ती लागत नाही ( ते तपासले असणारच) पण विमान उचलताना मोठा हवेचा झोत खाली वळताना फ्लॅप्स बरीच वीज खेचतील. तर इकडे एसी बरेच तास बंद असल्याने आतील तापमान वाढलेले असणार व ते एकदम वीस अंशावर आणायला खूप वीज खाणार.

In reply to by कंजूस

पण कुणी आपला मुद्दा मान्य न झाल्यास चिडण्याचे कारण नाही.
+१ सहमत. काही लोकांना वाटतं आपण एक्सपर्ट आहोत ना मग आपलेच प्रतिसाद लोकांनी वाचत जावेत. आणि वाहवा..! छान म्हणत जावे. काळ बदलला आहे आधुनिक आणि अद्ययावत माहितीची नवनवीन साधने आलेली आहेत त्यामुळे विविध विषयांची आणि अद्ययावत माहिती कोणाकडेही असू शकते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Fri, 06/13/2025 - 13:01
+१ सहमत. काही लोकांना वाटतं आपण एक्सपर्ट आहोत ना मग आपलेच प्रतिसाद लोकांनी वाचत जावेत. आणि वाहवा..! छान म्हणत जावे.
अगदी बरोबर. पण.. मुख्य उद्देश आणि उत्साह माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा आहे की पूर्ण परिश्रम एखाद्याला चूक ठरवण्यासाठी करायचे आहेत हे आधी ठरवून घेतल्यास ध्येय साध्य करणे सोपे होते. अर्थात हे तुम्हाला आम्ही काय सांगावे. जुने जाणते तुम्ही... :-) शुभेच्छा.

In reply to by कंजूस

गवि Fri, 06/13/2025 - 12:58
फ्लॅप्सचे कार्य तुम्ही म्हणताय तसे चालत नाही. विमान टॅक्सी आऊट होण्यापूर्वीच हे सर्व सेट आणि लॉक झालेले असते. फ्लाईट चालू असताना अर्थातच ऐनवेळी फ्लॅप्स वरखाली करता येतातच. पण टेक ऑफ झाल्यावर अचानक वीज कमी पडली (हे मेकॅनिकल कंट्रोल हायड्रॉलिक पद्धतीने चालतात पण तरीही तात्विक दृष्ट्या वीज कमी पडलीच) तर ती फ्लॅप्स वर घेण्यास अटकाव करेल. इथे फ्लॅप्स खाली न करता टेक ऑफ घडणे हे अशक्य आहे. ७८७ ड्रीमलायनर मध्ये अशा वेळी प्रचंड वॉर्निंग अलार्म वाजणे आणि सर्वात धोक्याची मास्टर वॉर्निंग वाजून कॉकपिटमध्ये ठणाणा आवाज आणि लाईट फ्लॅश येत राहतात. राहता राहिला टेक ऑफ नंतर फ्लॅप्स न चालण्याचा भाग (तुम्ही म्हणता तसे वीज खेचली गेल्याने.. तसे होत नसते, तरी पण..) तर अशा वेळी ऑलरेडी खाली असलेले फ्लॅप्स वर येण्यास अडचण होईल. पण फ्लॅप्स तर वर गेलेले दिसत आहेत. म्हणजे टेक ऑफ नंतर वेळेआधीच ते वर घेतले गेले असणे हीच एक शक्यता. शिवाय पॉझिटिव्ह रेट (वर जाण्याचा) ज्या क्षणी दिसतो त्या क्षणी चाके आत घेतली जातात. ती घेतली गेली नाहीत. कोणाला वाटेल की टेक ऑफ होताच विमान परत खाली (उतरायला) येत आहे म्हणून चाके आत घेतली नसतील. तर तसे नसते. चाके आत घ्यावीच लागतात. अवरोध टाळण्यासाठी. अगदी क्रॅश होत असला तरी चाके बाहेर ठेवायची नसतात. Pancaking हा शब्द मी वर वापरला आहे त्याची माहिती बघा. फरक इतकाच की इथे मूव्हमेंट pancaking ची होती फक्त लँडिंग गियर आत घेतलेला नव्हता.

In reply to by गवि

कंजूस Fri, 06/13/2025 - 13:04
ठीक आहे. कार्यप्रणाली जर अशी असेल तर मग दुसरे काही कारण असेल. फळ्यावरचे दर्शक काही वेगळीच धोकादायक सूचना देऊ लागल्याने मदतीचा भोंगा वाजवला असेल. पण कोणता दर्शक धोकादायक सूचना देतोय हे वाक्य वैमानिक बोलला ते ब्लॅक बॉक्सच सांगेल. आणि हेच बोइंग कंपनीला हवे असेल.

In reply to by कंजूस

गवि Fri, 06/13/2025 - 13:18
विमानाच्या सुरक्षित उड्डाणाच्या मध्ये अडथळा ठरेल अशी कोणतीही गोष्ट घडू न देण्याच्या दृष्टीनेच पूर्ण रचना असते. इतकी बेसिक साधी चूक सिस्टीम मधे राहून गेली तर अकरा वर्षे विना अपघात जात नाहीत.

चौथा कोनाडा Fri, 06/13/2025 - 14:13
खुपच दु:खद घटना ..... सगळे गेले ... किती दुर्दवी !!! लवकरात लवकर दोषांची उकल होऊन डिझाईन / प्रोसेस मध्ये तातडीने सुधारण व्हावी ,,, पुन्हा असले क्लेशदायक वृत्त ऐकण्याची वेळ न येवो !

काल विमान अपघात झाला तेव्हा इथे वाचलेले पुर्वीचे काही लेख आठवले होते. भयंकर अपघात. कालपासुन काहीच सुचत नाहिये विविध व्हिडिओ . टेक ऑफ पुर्वी काढलेले सेल्फी बघुन जीव तुटतोय.. एक साधा टर्ब्युलन्स जाणवला तरी जीव घशात येतो.. इथे विमान थेट खाली जाताना प्रवाशांचं काय झालं असेल या विचारनं थरकाप उडतोय.. मेडीकल कॉलेजच्या हॉस्टेल मधे जेवणाच्या ताटावर बसलेल्या डॉक्टरांचा तर काहीच संबंध नसताना त्यांना मृत्युला सामोरं जावं लागलं.. सुन्न झालंय डोकं कालपासुन. त्या मृताम्यांना शांती मिळो असं तरी कसं म्हणायचं ? सगळी स्वप्नं आणि जवळची मंडळी मागे सोडुन गेलेल्या जीवांना खरच शांती मिळेल ? ( या प्रसंगातही इथे वाद घालणारी लोकं कशाची बनली असतील ? वेळ काय आणि आपण कशावर वाद घालावा ? असो.. मानवीवृत्ती समजणं बुद्धीच्या पलिकडचे आहे )

अभ्या.. Fri, 06/13/2025 - 15:04
फारच वाईट. दोन आठवड्यापूर्वीच ३० मे ला असल्याच ७८७ ड्रीम्लायनरने (दिल्ली - झुरिक ए १५१) प्रवास केला तेंव्हा भीती नाही वाटली पण ही बातमी कळल्यावर जास्त भीती वाटली. अर्थात आमच्यावेळी ही एसी चालु नसणे, स्क्रीन्स आणि त्याचे कंट्रोल पॅनल्स काम करत नसणे ह्या समस्या होत्याच. एअर ईंडीयावाले इतर एअर लाईनपेक्षा दुप्पट लगेज घेऊ देतात हा मोह होता पण कदाचित हे सुध्दा कारण असु शकते दुर्घटनेला अशी शंका उगाच चाटून गेली.

In reply to by अभ्या..

गवि Fri, 06/13/2025 - 15:20
एअर लाईनपेक्षा दुप्पट लगेज घेऊ देतात हा मोह होता पण कदाचित हे सुध्दा कारण असु शकते
शक्यता अगदीच नाकारता आली नसती एरवी. उन्हाळी हवेचे प्रचंड उच्च तापमान आणि त्यामुळे विरळ झालेली हवा. लिफ्ट पुरेशी मिळायला अधिक लांब अंतर लागते. पण इथे टेक ऑफ योग्य जागी योग्य रित्या झाला आहे. वर चढत जाण्याचा दर केवळ कमी नसून ते खालीच येताना दिसत आहे. स्टॉल सदृश स्थितीही दिसून येत आहे. त्यामुळे परमिटेड लिमिटपेक्षा जास्त सामान घेऊन गरम वातावरणात उड्डाण हा औरंगाबाद क्रॅशच्या वेळचा सीन इथे नव्हता.

सौंदाळा Fri, 06/13/2025 - 15:30
एक्स वर एकाने लिहिलेली पोस्ट आता पाहिली त्याचा सारांश हा घातपात असावा. इंजिनल इंधन पुरवणारी यंत्रणा खराब केली असेल. त्यामुळे सुरुवातीला असलेल्या इंधनामुळे इंजीन व्यवस्थित चालू होऊन टेक ऑफ झाला पण नंतर पुरेसे इंधन न मिळाल्याने इंजिन बंद झाली. मला तरी ही शक्याता बाळबोध वाटली पण यावर आपले काही मत @ गवि

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गवि Fri, 06/13/2025 - 15:36
अगदीच दूरस्थ शक्यता. इतक्या लगेच नसता झाला अपघात. आणि घातपात करायचा झाला तर विमानाच्या सिस्टीम मधे "टायमर"वाला बिघाड करणे एखाद दुसऱ्या व्यक्तीला खूपच अवघड.

In reply to by अभ्या..

सौंदाळा Fri, 06/13/2025 - 16:32
अगदी अगदी त्याने हीच अनॉलॉजी पण पोस्ट मधे दिली आहे.

Bhakti Fri, 06/13/2025 - 16:53
गवि तुम्ही लॉस ऑफ लिफ्ट विषयी बरेच लिहिले,ते समजले ,बरे झाले.नाहीतर त्या X वरच्या मुलाच्या पोस्ट/व्हिडिओ मुळे मलाही लॉस ऑफ पॉवर च अपघाताच्या जवळ जाणारे कारण वाटतं होतं.खरे कारण समोर येईलच.

अकिलिज Fri, 06/13/2025 - 17:09
वाहिन्यांवरच्या बातम्यांच्या चित्रफिती पाहून किती भयानक झालंय हे कळतंय. नुसता काळा कोळसा दिसतोय सगळीकडे. एक निरीक्षण नोंदवतो. बर्‍यापैकी युरोपियन देशांमध्ये विमानतळ हे गावापासून बाहेर आणि विमानतळाच्या बाजूला लोकवस्ती नाही असे पाहण्यात आहे. भारतातच काय लोकांना विमानतळाजवळ मालमत्ता घ्यायचा चस्का आहे. धावपट्टीपुढे मोकळी जागा किंवा जंगल असते तर कदाचित इतका मोठा अपघात घडला नसता. थोड्या थोडक्या नुकसानीवर भागले असते अशी भाबडी आशा.

अकिलिज Fri, 06/13/2025 - 18:42
https://www.youtube.com/watch?v=z7EZkungFEE लॅण्डींग गेअर ऐवजी चूकून फ्लॅप वर झाल्याची शक्यता दिसतेय. अर्थात हे अनुमान आहे. गवि, पण अशी चुकी होऊ शकते ही शक्यता गॄहीत धरली गेली नाहीये कां ?

In reply to by अकिलिज

अनुभवी वैमानिकांना हाच संशय आहे. पण फ्लॅपवर झाल्यावर मुख्य वैमानिकाला कळले असणार.. की ४/५ सेकंदात सगळे बदलु शकते? ब्रेकऐवजी चुकुन अ‍ॅक्सिलरेटरवर पाय पडतो.. असे काहीसे आहे का?

सिद्धार्थ ४ Fri, 06/13/2025 - 19:38
Dear Colleagues, This is a very difficult moment. What occurred yesterday was inexplicable, and we are in shock and mourning. To lose a single person we know is a tragedy, but for so many deaths to occur at once is incomprehensible. This is one of the darkest days in the Tata Group’s history. Words are no consolation right now, but my thoughts are with the families and loved ones of the people who died and were injured in the crash. We are here for them. I want to say that, like you, we want to understand what happened. We don’t know right now, but we will. You know that in the past 24 hours, investigative teams from India, UK, and the US have arrived in Ahmedabad to investigate the crash. They have our full cooperation, and we will be completely transparent about the findings. We owe it to the families and loved ones, to our pilots and crew, and to you. The Tata Group takes its responsibility to society seriously, and that includes being open about what occurred yesterday. Right now, our very human instinct is to look for explanations that make sense of the calamity. There is plenty of speculation all around us. Some of it may be right, some of it may be wrong. I want to urge patience. We witnessed an enormous loss of life yesterday. Why this routine flight turned into a calamity is something trained investigators will help us understand when their work is complete. Once we have verified facts, we will be transparent in our communication about how this tragedy took place. As a Group trusted by so many, when we took over Air India, ensuring the safety of its passengers was our first and foremost priority. There was no compromising on it. None of this matters to the people who suffered devastating losses yesterday. At this time, we can only assure them of our full support. We will pull together as a Group and find ways to help them. We built this Group on trust and care. It is a difficult moment, but we will not retreat from our responsibilities, from doing what is right. We will carry this loss. We will not forget. Sincerely, Chandra

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 09:56
हे समजते ,पण कसे करतात, काय उपकरणे वापरतात. प्रत्येक उड्डाणा आगोदर हे अनिवार्य आहे का? का प्रवासी संख्या व त्यांचे सामान,केबीन क्रू व इतर सामान याचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जातो? गवी भाऊ यावर प्रकाश टाकू शकतील. लोड टेबल बनवताना या विषयाबद्दल थोडीफार माहीती कळाली होती,आता विसरलो.

प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी काढलेली छायाचित्रे, कुटूंबाच्या अपेक्षांसहित प्रवास करणारे प्रवासी, इच्छित स्थळी जाणारे, वाट पाहणारे प्रवासी, त्या सर्व बातम्या वर्णने वेदनादायक आहेत. विमान कोसळले तेथील डॉक्टर्स त्यांचे कुटुंबीय त्या सर्वांच्या भावनाही तितक्याच दु:ख पिळवटून टाकणा-या आहेत. कालच्या भीषण अपघातानंतरन सरकार बोईंग ड्रीमलायनर ७८७-८ ताफ्यांचे उड्डाण स्थगित करण्याचा विचार करीत आहे. इंजिनची ताकद कमी का झाली त्याचा शोध घेण्यात येत आहे. अपघातग्रस्त एअर इंडियांचे ड्रीमलायनर विमान अमेरिकेच्या बोईंग कंपनीने बनवलेले असल्यामुळे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार प्रतिष्ठीत तपास संस्था नॅशनल ट्रान्सपोर्ट्शन सेफ्टी बोर्ड तपासणी पथक पोहचले आहे. विमान उडण्यापूर्वी सर्व सीस्टीम तपासल्या जाते तरीही असे काहीच मिनिटात असे काय घडले त्याचा तपास ही संस्था करणार आहे. तपास यंत्रणेचे प्रमुख ग्रेग फिथ यांच्या मतानुसार टेकऑफचं कॉन्फिगर केले गेले असावे का ? विमान जड आणि वेग हळु असतांना विमान वर उचलण्यासाठी जी ताकद लागते ती पंखाचा भाग खाली करुन मिळवली जाते ती स्थिती योग्य असूनही का मिळाली नाही ? हायड्रॉलिक प्रणाली, लँडिग गियर यातली नेमकी काय समस्या होती याचा आणि इतरही अभ्यास ते करणार आहेत. पिच टीट्यूड अर्थात विमानाचा पुढील भाग वर जरी दिसत असला तरी विमान खाली खाली का येत गेले याचा अर्थ अपूरी ताकद मिळत गेल्यामुळे तसे घडले असावे असे निरिक्षण त्यांनी नोंदवले आहे. पायलट विमान वर उचलण्याचा प्रयत्न करत होता परंतु उंची गाठण्यासाठी ते कमी उंचावर येत गेले त्यामुळे ते वर उचलले गेले नाही. विमान उंच उडवणे आणि पुढे ढकलणे व्हीडीयो पाहता पूर्ण प्रयत्न केल्याचे दिसते असेही ते म्हणाले. अपघात घडला आता यापुढे असे अपघात घडू नयेत यासाठी काय बदल करता येतील ते अशा चुका शोधण्यातून व्हावेत. विमान प्रवास अधिक सुखाचा होत जावा याशिवाय अधिक अपेक्षा त्या करु शकतील. -दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/14/2025 - 10:36
समजा प्रत्येक प्रवासी ऐंशी किलो वजनाचा आहे असे धरू, आणि १५+७ किलो वजन नेत असेल तर २५० प्रवाशांचे वजन अंदाजे २५० गुणिले शंभर पंचवीस हजार किलो होईल. विमान धावपट्टीवर जाण्यापूर्वी एका वजन काट्यावरून गेल्यास विमानाचे वजन नोंद करता येईल.

In reply to by विजुभाऊ

कंजूस Sat, 06/14/2025 - 21:41
अगदी कमी धरले तरचा हिशोब घेतला.पण सर्वच प्रवासी पन्नास किलो एवढं नेतील तर खूपच होईल. आणि पूर्वी कधी विमानाचे पूर्ण वजन किती असे यांची नोंद तपासायला हवी. -------------------- 11A सीटवरचा प्रवासी बाहेर पडून दूर पळाला आणि वाचला . पण विमान एका पाच मजली इमारतीवर पडले तर कसे काय पळाला? ही 11A seat शेपटात असते काय? विमानाचे नाक वर होते आणि शेपूट खाली होते ते जमिनीला टेकले का? आता या सीटवर बसण्यासाठी प्राधान्य मागू लागले तर याचा नंबर १३ करतील बहुतेक. (परदेशांत १३ संख्या वर्ज्य असते).

तज्ञांच्या विश्लेषणानुसार- व्हिडियोत रॅट(रॅम एयर टर्बाईन) बाहेर आलेला दिसत आहे. दोन्ही ईन्जिन्स बंद पडल्यावरच हा रॅट बाहेर येतो असे म्हंटले जाते. दोन्ही इंजिन्स बंद का पडली? दोन्ही इंजिन्सना लागणारा इंधन पुरवठा बंद झाला. इंधन पुरवठा बंद का झाला? पटणारी एक थियरी-विमानात आधीपासुनच ईलेक्ट्रिकल समस्या असावी. विमान टेक-ऑफ घेण्याआधी ते तीन तास उन्हात होते(३८ डिग्री). विमान पूर्णपणे भरलेले होते(शक्यता आहे). Fuel Supply Controller कडुन इंधन पुरवठा थांबवण्याचा आदेश गेला. तो का गेला? उष्ण्ता, पूर्ण भरलेले विमान, टेक ऑफ झाल्या झाल्याच काही यंत्रणा 'रेसेट' झाल्या असाव्यात त्यामुळे Fuel Supply Controller कडुन इंधन पुरवठा थांबवला गेला. दोन्ही इंजिन्स बंद पडली मग रॅट बाहेर आला. https://en.wikipedia.org/wiki/Ram_air_turbine https://en.wikipedia.org/wiki/Ram_air_turbine

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गवि Sun, 06/15/2025 - 10:03
रॅम एअर टरबाईन डीप्लॉय झालेले व्हिडिओत स्पष्ट दिसत नाही. धूसर उभी दांडी हे नोज व्हील किंवा अन्य काही असू शकते. किंवा आर्टिफॅक्ट. ते खाली आले असे स्पष्ट दिसले किंवा ब्लॅक बॉक्समध्ये कळले तर पुढे बोलता येईल.

In reply to by गवि

"In the middle of the circle, you see kind of a protrusion on the belly of the aircraft... just underneath that you see a little grey dot... that little grey dot is the RAT.” A survivor in seat 11A, near an emergency exit, also reported hearing “a loud bang” and seeing lights flicker before the crash, consistent with RAT deployment https://www.cnbctv18.com/business/aviation/former-us-navy-pilot-now-points-to-engine-failure-in-air-india-boeing-787-crash-after-new-video-evidence-19621409.htm

गवि Sun, 06/15/2025 - 19:38
हो. रॅम एअर टरबाईन डीप्लॉय झाल्याचे अधिक स्पष्ट दिसणारा व्हिडिओ आता उपलब्ध आहे. गच्चीतून घेतलेल्या व्हिडिओची खराब कॉपी आतापर्यंत फिरत होती. त्याची मूळ प्रत आता बघायला मिळत असल्याने ते नक्कीच RAT असावे असे म्हणता येईल. शिवाय त्या क्लिपमध्ये आवाजही आहे. इतर क्लिप या क्लिपवरून पुन्हा रेकॉर्ड करण्यात आलेल्या असल्याने त्यात मूळ आवाज नव्हते. या नवीन मूळ क्लिप नुसार RAT चा "भ्रूम"सदृश आवाज ऐकू येतो आहे. हे रॅम एअर टरबाईन इंजिन फेल्युअर (सर्व इंजिने) किंवा इलेक्ट्रिक/ हायड्रॉलिक यंत्रणा बंद पडली की खाली येते. टेक ऑफ पर्यंत सर्व चांगले होते पण नंतर या तिन्हीपैकी एक यंत्रणा बंद पडली असे दिसते आहे. वर प्रा डॉ यांनी म्हटलेल्या तांत्रिक बिघडाच्या शक्यतेत यामुळे काहीशी भर पडली आहे. हे फेल्युअर कोणाच्या चुकीने झाले का हे ब्लॅक बॉक्समध्ये कळेलच.

सुबोध खरे Sun, 06/15/2025 - 23:51
आपण भारतीय लोक निवाडा देण्यात फार पुढे असतो(JUDGEMENTAL). एखाद्या विषयात आपल्याला ज्ञान आहे कि नाही, आपला त्या विषयाचा अभ्यास किती आहे, ज्ञान असले तरी आपल्याकडे पुरेशी माहीती आहे कि नाही हा विचार ना करता त्यावर आपले विशेष मत ठोकून द्यायचे. ऑपरेशन सिंदूर नि आता अहमदाबाद विमान अपघात यात हे प्रकर्षाने जाणवते आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये मोदींनी लष्कर जिंकत असताना एकदम शस्त्रसंधी कशी केली. कारण मुळात हिम्मत नाही पासून बिहारच्या निवडणुकांवर डोळा आहे पर्यंत आता विमानात काही तरी घातपात किंवा सायबर हल्ला पासून तुर्की कंपनीच्या कर्म चार्याने घातपात केल्या पर्यंत सर्व तर्हेची षडयंत्र असल्याची गृहीतके मोठ्या हिरीरीने पुढे आणली जात आहेत. अर्थात शेवटी एखाद्याचे असे ठोकून दिलेले गृहीतक बरोबर येईल आणि तो मोठ्या विजयी मुद्रेने तुम्हाला सांगेल कि बघा मी पहिल्यांदाच म्हणत होतो. मग आपण उंदीर मारण्याच्या खात्यात असलो तरी चालेल कि आपल्याला विमान मुळात उडते का आणि कसे याची सुतराम माहिती नसली तरी चालेल. हि शक्यता गृहीत धरून. गवि साहेब तुम्ही दुर्लक्ष करा आणि आपले विश्लेषण चालू ठेवा. कारण आपल्या विश्लषणातून आमच्या सारख्या या विषयात जुजबी माहिती असलेल्या अनेक लोकांना बरीच माहिती मिळू शकेल

In reply to by सुबोध खरे

>>>आमच्या सारख्या या विषयात जुजबी माहिती असलेल्या... डॉक्टर साहेब, हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे. हे म्हणजे एखाद्या श्रीमंत माणसाने आम्ही काय बॉ.. 'गरीब माणसं' अशा पद्धतीचं वाक्य वाटलं. चराचर सृष्टीचं ज्ञान असलेल्या माणसाने 'जुजबी' माहिती आहे असे म्हणने पटले नाही. आत्ता पर्यंत आपण जे जगाला सॉरी मिपाला जे ( दिव्य ) ज्ञान दिले आहे त्याला 'उपमा' नाही. 'अवघाची संसार सुखाचा करीन' हे आपलं ध्येय आहे. महाभारतातला संजय आणि आपण दिव्यदृष्टी असलेली माणसं नुसता कटाक्ष टाकला की सगळे गुंतागुंतीचे विषय क्षणात मोकळे होऊन जातात. आपणास जुजबी माहिती असते असे कृपया म्हणू नये, माझा मुड ऑफ़ होतो.. :( -दिलीप बिरुटे ( डॉ.खरे साहेबाचा फॅन ) :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Tue, 06/17/2025 - 11:49
बिरुटे सर एखाद्या विषयात महारथ मिळवायची असेल तर त्यात किमान १० हजार तास घालवायला लागतात असे आम्हाला शिकवले आहे. मी दोन वर्षे विक्रांत या विमानवाहू जहाजावर मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात होतोय यानंतर साडे चार वर्षे गोव्यातील नौदलाच्या हंस या तळाशी संलग्न रुग्णालयात "डॉक्टर" म्हणून काम करत होतो असे असले तरी प्रत्यक्ष विमानाचं संरचना आणि त्याचे कार्य याची माहिती फार तर जुजबीच राहील नव्हे का? अर्वाचीन गद्य वाङ्मयाचा इतिहास किंवा कोसला कादंबरीतील सौंदर्य स्थळे यात पी एच डी केलं असतं तर मला संपूर्ण ज्ञान आलं असतं. मग ड्रीम लायनारच कशाला मी फ ३५, चँगडू J २०, चेंगडू J ३६, सुखोई ५७ यांच्या एव्हियॉनिक्स आणि ल्युनबर्गर लेन्स वर विशेष टिप्पणी करू शकलो असतो. पाहू या आपल्या सारखा कोणी गाईड मिळाला तर अशाच एखाद्या विषयात AI चा वापर करून दोन चार महिन्यात पी एच डी मिळवता येईल का असा विचार चालू आहे ?

'यु-ट्युब'स्थित पत्रकार/तज्ञ/आजी/माजी पायलट ज्या बोइंगवरील माहितीपटाचा हवाला देत आहेत तो माहितीपट नेटफ्लिक्सवर पाहिला. सुरक्षा आणि दर्जा ह्याबाबत बोइंग ९०च्या दशकापर्यंत अग्रगण्य होती. If it's Boeing, I'm not going. असे म्हंटले जायचे. २०००च्या दशकापासुन एयरबसच्या विमानांचा खप वाढला आणि स्पर्धेत टिकण्यासाठी बोइंगचे धोरण मग फक्त नफा आणि लवकरात लवकर विमानांची डिलिवरी हे झाले. कंपनीचे मुख्यालय एव्हरेटमधुन शिकागोला हलवण्यात आले.व्यवस्थापनात सैन्याचे माजी अधिकारी आले, वॉल स्ट्रीटवर लक्ष आणि फक्त नफा.. हे धोरण ठरले. मग बोइंग-७३७ मॅक्सचे दोन मोठे अपघात झाले आणि सगळी ७३७-मॅ़क्सच्या उड्डाणांवर जगभर बंदी आली. ७८७-ड्रीमलायनरचा गेल्या १४ वर्षातला पहिला अपघात. पण दोन्ही इंजिन्स एकाच्वेळी अकार्यरत कशी काय झाली? हे अजूनही कोडे आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, एयर इंंडियातील वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रसरकारने नेमलेली अशी सर्वांची मिळून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. समिती पुढील तीन महिने या घटनेचा तपास करुन अहवाल सादर करणार आहे. तीन महिन्यानंतर अपघाताची कारणे समजतील असे वाटते. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे Wed, 06/18/2025 - 20:08
पण आता ताक फुंकून पित आहेत हे नैसर्गिक नव्हे का? अपघात विमानांच्या प्रणालीत काही चूक राहून गेली असेल त्यामुळे आहे कि वैमानिकाच्या चुकीमुळे आहे कि विमानाच्या नियतकालिक तपासणी आणि दुरुस्ती मध्ये आहे हे नक्की होईपर्यंत कोणताही धोका पत्करणे चूकच ठरेल. मोटार गाड्यांच्या ब्रेक किंवा इंजिन किंवा तत्सम गाड्यांमध्ये दोष आढळल्यास हजारो लाखो गाडयांना परत बोलावून ती प्रणाली बदलली जाते किंवा दुरुस्त केली जातेच. आपण वापरत असलेल्या मोबाईल मध्ये काही सॉफ्टवेअर मध्ये glich किंवा बग आल्यास सिक्युरिटी पॅच पाठवला जातोच कि.

गवि Wed, 06/18/2025 - 21:13
सध्या तरी, दोन्ही इंजिने एकाच वेळी बंद कशी झाली (तीही टेक ऑफ व्यवस्थित झालेला असताना), हा एकच मुख्य प्रश्न आहे. ब्लॅक बॉक्समधून बहुधा उत्तर मिळेल. म्हणजे बंद पडली होती की नाही हे तर मिळेलच, पण नेमके का ?, याबद्दल काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष क्लूज मिळतील.

कंजूस Wed, 06/18/2025 - 21:44
असं ऐकून आहे की.... कारच्या इंधन टाकीत साखर टाकली की चालू झालेली कार लगेच आचके देऊ लागते. म्हणजे काही घातपात झाला का आतल्या माणसांचे लक्ष नसताना .किंवा असं काही करताच येत नाही विमानाच्या इंधन टाकीत. सगळं बंदिस्त असते.

मार्गी गुरुवार, 06/19/2025 - 18:06
गविजींकडून आणखी अपडेटसच्या प्रतीक्षेत. हा धागा रोज वाचतोय.

स्वधर्म गुरुवार, 06/19/2025 - 21:03
आले होते. त्यात ए ए आय बी चा रिपोर्टचा हवाला देऊन असे सांगितले आहे की पायलटच्या सीटचा बोल्ट फेल झाल्यामुळे विमानाने टेक ऑफ घेताच त्याची खुर्ची मागे ओढली गेली व त्यामुळे थ्रस्ट लिव्हर पाहिजे त्याच्या ऊलट दिशेला म्हणजे मागे खेचली गेली. परिणामी थ्रस्ट गेला व विमान वर उडू शकले नाही. कोपायलटने ती लिव्हर पुढे करण्यासाठी ताकद लावली पण पायलटचे वजन व 'मेक्॑निकल फोर्स' मुळे काही होऊ शकले नाही. ए ए एफ बी एव्हिएशन अ‍ॅक्सीडेंट इन्व्हेस्टीगेशन ब्युरो इतर कुठेच असे काही वाचनात आले नाही, त्यामुळे कितपत विश्वासार्ह आहे ते माहित नाही.

गवि गुरुवार, 06/19/2025 - 22:04
एक इंजिन रनवे वरच अंशतः किंवा पूर्ण बंद झालं असावं. कारण लिफ्ट ऑफ (हवेत उचलले जाणे) यासाठी नेहमीपेक्षा अधिक अंतर लागले आहे. हे अंतर पूर्ण वजनासहित लागणाऱ्या अंतरापेक्षाही जास्त आहे. म्हणजे एकाच इंजिनावर टेक ऑफ झाला असावा. दुसरे इंजिन टेक ऑफ होताच बंद पडले आणि त्या उसळीच्या जडत्वावर विमान आणखी थोडे वर पोचून मग खाली आले. असे सध्या सर्वाधिक शक्य वाटू लागले आहे. दोन्ही इंजिने बंद पडल्यावर विमानाची चाके वर उचलणारी यंत्रणा देखील अर्थात बंद पडते. रॅम एअर टरबाईनमध्ये जेमतेम काही अत्यावश्यक उपकरणे आणि कंट्रोल चालू ठेवण्याइतकी पॉवर असते. चाके आत घेणे त्यात अंतर्भूत नसते.

In reply to by गवि

टेकऑफ़ला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला हे त्या अपघाताचे कारण नाही होऊ शकत असे वाटते. विमान धावपट्टीवर धावते उड़ते तेव्हा हवेचा दाब विमानाचे वजन आणि वर उडण्यासाठीची स्थिती याचं धावपट्टीवर धावण्याचं अचूक कॅल्क्यूलेशन असतं तेव्हाच ते वर उड़ते. विमान धावपट्टीवर धावले योग्य क्षणी ६२५ फूट उंचीवर पोहोचते आणि १७४ नॉट्सचा कमाल वेग गाठते, याचा अर्थ या क्षणापर्यन्त दोन्ही इंजिन्स काम करीत आहेत आणि आत्ता ते वेगाने खाली उतरण्यास सुरुवात सुरुवात करते, इथे दोन्हीही इंजिन्सन काम करीत नाहीत विमानाचं नाक वर आहे पण विमान झेप घेत नाही. विमानतळावरुन विमानाने टेक ऑफ केल्यानंतर ८ मिनिटा अगोदर सर्व अलबेल होते आणि नंतर विमान कोसळले. -दिलीप बिरूटे
लेखनप्रकार
२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं. इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा. कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते. ड्रीम लायनर हे विमान (मॉडेल) तुलनेत नवीन आहे. त्यात अनेक आधुनिक सुविधा, विशेषतः हाय फाय म्हणता येतील अशा आहेत. वरवरचे उदाहरण म्हणजे खिडक्या बंद करण्याचे झाकण न वापरता बटण फिरवून काच काळी करत नेणे आणि गडद करणे.

सलाम वेंकी...उत्तम हिंदी चित्रपट

नपा ·

चौथा कोनाडा Wed, 06/11/2025 - 12:41
अ ति श य सुंदर चित्रपट ओळख ... बघणयादीत लिहुन ठेवला आहे. नक्की बघणार ! असाच एक वैद्यकिय पार्श्वभुमीवरचा चित्रपट "स्काय इज पिंक" हा सत्यकथे वर आधारित सुनेमा पहिला होता ... आवडला होता !

चौथा कोनाडा Wed, 06/11/2025 - 12:41
अ ति श य सुंदर चित्रपट ओळख ... बघणयादीत लिहुन ठेवला आहे. नक्की बघणार ! असाच एक वैद्यकिय पार्श्वभुमीवरचा चित्रपट "स्काय इज पिंक" हा सत्यकथे वर आधारित सुनेमा पहिला होता ... आवडला होता !
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिसेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला हा - काजोल, विशाल जेठवा यांच्यासह आमिर खान ची छोटी भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच 'चॅनेल सर्फिंग' करताना दिसला. एवढ्या सशक्त अभिनेत्यांचा हा कोणता सिनेमा आपण पाहीला नाही, या विचाराने सर्फिंग थांबले. जसजसं कथानक पुढे सरकायला लागलं, तसतसं न पाहिलेल्या भागाचा अंदाज येऊ लागला आणि चित्रपटात गुंतत गेलो - याचे श्रेय नक्कीच दिग्दर्शक रेवती (दक्षिणात्य अभिनेत्री), पटकथा लेखक समीर अरोरा व कौसर मुनीर या त्रयीना जातं. हा चित्रपट श्रीकांत मूर्थी यांच्या The Last Hurrah या पुस्तकांवर आधारित आहे.

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

माहितगार ·

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Sat, 06/07/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

कर्नलतपस्वी Sat, 06/07/2025 - 12:53
काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Sat, 06/07/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

कर्नलतपस्वी Sat, 06/07/2025 - 12:53
काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.
लेखनप्रकार
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

माझी ९५ वर्षीय क्रश - डेक्कन क्वीन

फारएन्ड ·

अनन्त्_यात्री Tue, 06/03/2025 - 09:30
*दख्खन राणी* *कवी - वसंत बापट* ~~~~~~~~~~~~~~ दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत सुंदर मानव तुंदिल अंगाचे गालिचे गुलाब शराबी रंगाचे ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी गोजिरवाणी लाजिरवाणी पोरटी घेऊन पोटाशी कुशीत दख्खन राणी ही चालली खुशीत निसर्ग नटला बाहेर थाटात पर्वत गर्वात ठाकले थाटात चालले गिरीश मस्तकांवरून आकाशगंगांचे नर्तन गायन झेलून त्यांचे नुपूर घुंगुर डोलती डौलात दुर्वांचे अंकुर मोत्यांची जाळी घालून भली रानाची चवेणी जाहली प्रफुल्ल दख्खन राणीला नव्हती दखल ड्यूकचे नाकड सरळ अजस्त्र राहिले उभे हे शतके सहस्त्र त्याच्याही पाषाण हृदया कळाली सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी नीला तो तलाव तांबूस खाडी ती पांढरा प्रपात हिरवी झाडी ती अवतीभवती इंद्राची धनुष्ये दख्खन राणीत मुर्दाड मनुष्ये दख्खन राणीच्या कुशीत पोटात बुडाली जाणीव चहाच्या घोटात किलवर चौकट इसपिक बदाम फेकीत फेकीत जिंकित छदाम नीरस पोकळ वादांचे मृदंग वाजती उगाच खमंग सवंग खोलून चंची पोपटपंची करीत बसले बुद्धीचे सागर दख्खन राणी ही ओलांडे डोंगर धावत्या बाजारी एकच बालक गवाक्षी घालून बसले मस्तक म्हणाले "आई गं, धबधबा केवढा पहा ना चवेणी, पहा हा केवडा ढगांच्या वाफेच्या धूसर फेसात डोंगर नहाती पहाना टेसात" म्हणाली आई "पूरे गं बाई, काय या बेबीची चालली कटकट" दख्खन राणीचा चालला फुंफाट दख्खन राणीच्या पोटात कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत मनाने खुरटी दिसाया मोठाली विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी बाहेर असू दे उन वा चांदणे संततधार वा धुक्याचे वेढणे ऐल ते पैल शंभर मैल एकच बोगदा मुंबई पुण्यात दख्खन राणी ही चालली वेगात ... दख्खन राणी ही चालली वेगात... !!

कंजूस Tue, 06/03/2025 - 11:20
आम्ही कधी डेक्कनने गेलो नव्हतो. पण धावणारी निळी पांढरी पाहिली आहे. तसेच ती पाहून लोक घड्याळात वेळ लावायचे म्हणे. बाहेरून चांगलीच दिसे. आता तो चमकदार रंग जाऊन भद्दा हिरवा रंग दिला आहे. म्हणजे बाहेरून बेकार. आतली ओळख ही प्रत्यक्ष जाऊन झाली नाही तरी मराठी विनोदी साहित्यातून झाली. "डेक्कनचे प्रवासी" अशा लेखातून आतील प्रवासी कसे असतात, आख्खी गाडीच खरेदी केल्यासारखे वागतात वगैरे. ९५ चे'सेलब्रेशन' मध्ये गाडी दाखविलीच नाहीये, बहुतेक मंथली पासहोल्डरचे प्रवासी मात्र दिसत आहेत.

खूप छान. राणीला ६५ वर्षे झाली तेव्हा मोठा कार्यक्रम झाला होता तो पाहिला होता. अनेक गाड्या कल्याण जंकशनला थांबायच्या पण डेक्कन क्वीन पुर्वी थांबायची नाही, ह्याचे काहीतरी कारण होते. गाडीतील खानपान सेवेचा डबा अगदी खास असायचा. ८७/८८ साली इंद्रायणी चालु झाली. दिसायला राणीसारखीच, वेळही तेवढाच घ्यायची. खाजगी बस कंपन्यांच्या सेवा आल्या आणि दक्खनच्या राणीचे आकर्षण हळूहळू कमी झाले.

सुबोध खरे Wed, 06/04/2025 - 11:46
WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे. लष्करात असताना विविध ठिकाणी जाण्यासाठी भरपूर फिरती होत असे त्यापैकी एकदा देवळाली (नाशिक) हून परत येताना कलकत्ता मेल च्या ए सी २ टियर ने येत होतो. इगतपुरीला लोको पायलट ची परवानगी घेऊन (लष्कराचे ओळखपत्र गळ्यात असल्याने अनेक वेळेस अशा इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे) इगतपुरी ते कसारा प्रवास या इंजिनात बसून झाला. इंजिनने केवळ ब्रेक सोडले तर गाडी ६० च्या वर वेग घेऊ लागते हे लोको पायलट ने दाखवले आणि म्हणून घाटात सहजासहजी वेगात नेली जात नाही. डेक्कन क्वीनच्या प्रथम वर्गाने प्रवास मी १९७२ साली केला होता. त्यानंतर चार पाच वेळेस हा प्रवास केला आहे सुरुवातीला प्रशस्त २ X २ सीटचा प्रथम वर्ग होता नांतर वातानुकूलित कुर्सीयान आले. डेक्कनक्वीन च्या उपाहारगृहात बसून गप्पा मारत प्रवास करणे हा एक अद्वितीय अनुभव आहे हे खरं. दुसऱ्या वर्गात सुद्धा २ X ३ अशी बसण्याची सोय होती ती जाऊन आता ३ X ३ झाल्यावर फारच अडचण होते. हि २ X ३ सोय डेक्कन क्वीन मध्ये इतर गाड्यांपेक्षा बराच जास्त काळ होती पण नंतर तिथे पण ३ X ३ आली. जास्त प्रवासी जातात परंतु सहाच्या सहा प्रवाशांना अडचण होते. मुलुंडला राहत असल्याने डेक्कन क्वीन ने जाणे गैरसोयीचे असल्याने आताशा जाणे होत नाही. पण ज्यांनी तिच्यातून प्रवास केला आहे त्या सगळ्यांच्या मनात या गाडीची खास जागा आहे हे खरं.

फारएन्ड Sun, 06/08/2025 - 00:41
धन्यवाद लोकहो! WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे >>> हे फार भारी आहे. या इंजिनाला एक वेगळाच भारदस्त लुक होता. https://www.irfca.org/gallery/Locos/Electric/wcm1_to_6/wcm5_pune_trip_shed_Apr03.jpg.html? तो २ बाय २ चा प्रशस्त पहिला वर्ग आठवतोय मलाही. मी एकदोनदा गेलो होतो. मुंबईला एकदा ट्रेनिंगला गेलो होतो तेव्हा परतताना मी या पहिल्या वर्गाने डेक्कनने येणार याचे मला त्या ट्रेनिंगइतकेच अप्रूप होते. डायनिंग कारमधे बसून खाण्याच्या अनुभवाबद्दलही सहमत.

मनो Mon, 06/09/2025 - 04:18
१९६६ सालची फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याने याच विषयावर केलेली ही क्लिप पहा, अनेक जुन्या गोष्टी दिसतील. Pure Gold. https://m.youtube.com/watch?v=3vcRKHJg8WI

प्रचेतस Wed, 06/11/2025 - 15:10
तुमची जशी डेक्कन क्वीन, तशी आमची सिंहगड एक्सप्रेस. पिंपरी चिंचवडला राहत असल्यामुळे डेक्कन क्वीनने जाणेयेणे कधीच जमले नाही. मात्र सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करण्याचे भाग्य खूपदा लाभले. त्यातही तेव्हा ती भारतातली पहिली डबलडेकर ट्रेन. फार मजा यायची त्या दोन मजली रेल्वेत.

अनन्त्_यात्री Tue, 06/03/2025 - 09:30
*दख्खन राणी* *कवी - वसंत बापट* ~~~~~~~~~~~~~~ दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत सुंदर मानव तुंदिल अंगाचे गालिचे गुलाब शराबी रंगाचे ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी गोजिरवाणी लाजिरवाणी पोरटी घेऊन पोटाशी कुशीत दख्खन राणी ही चालली खुशीत निसर्ग नटला बाहेर थाटात पर्वत गर्वात ठाकले थाटात चालले गिरीश मस्तकांवरून आकाशगंगांचे नर्तन गायन झेलून त्यांचे नुपूर घुंगुर डोलती डौलात दुर्वांचे अंकुर मोत्यांची जाळी घालून भली रानाची चवेणी जाहली प्रफुल्ल दख्खन राणीला नव्हती दखल ड्यूकचे नाकड सरळ अजस्त्र राहिले उभे हे शतके सहस्त्र त्याच्याही पाषाण हृदया कळाली सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी नीला तो तलाव तांबूस खाडी ती पांढरा प्रपात हिरवी झाडी ती अवतीभवती इंद्राची धनुष्ये दख्खन राणीत मुर्दाड मनुष्ये दख्खन राणीच्या कुशीत पोटात बुडाली जाणीव चहाच्या घोटात किलवर चौकट इसपिक बदाम फेकीत फेकीत जिंकित छदाम नीरस पोकळ वादांचे मृदंग वाजती उगाच खमंग सवंग खोलून चंची पोपटपंची करीत बसले बुद्धीचे सागर दख्खन राणी ही ओलांडे डोंगर धावत्या बाजारी एकच बालक गवाक्षी घालून बसले मस्तक म्हणाले "आई गं, धबधबा केवढा पहा ना चवेणी, पहा हा केवडा ढगांच्या वाफेच्या धूसर फेसात डोंगर नहाती पहाना टेसात" म्हणाली आई "पूरे गं बाई, काय या बेबीची चालली कटकट" दख्खन राणीचा चालला फुंफाट दख्खन राणीच्या पोटात कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत मनाने खुरटी दिसाया मोठाली विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी बाहेर असू दे उन वा चांदणे संततधार वा धुक्याचे वेढणे ऐल ते पैल शंभर मैल एकच बोगदा मुंबई पुण्यात दख्खन राणी ही चालली वेगात ... दख्खन राणी ही चालली वेगात... !!

कंजूस Tue, 06/03/2025 - 11:20
आम्ही कधी डेक्कनने गेलो नव्हतो. पण धावणारी निळी पांढरी पाहिली आहे. तसेच ती पाहून लोक घड्याळात वेळ लावायचे म्हणे. बाहेरून चांगलीच दिसे. आता तो चमकदार रंग जाऊन भद्दा हिरवा रंग दिला आहे. म्हणजे बाहेरून बेकार. आतली ओळख ही प्रत्यक्ष जाऊन झाली नाही तरी मराठी विनोदी साहित्यातून झाली. "डेक्कनचे प्रवासी" अशा लेखातून आतील प्रवासी कसे असतात, आख्खी गाडीच खरेदी केल्यासारखे वागतात वगैरे. ९५ चे'सेलब्रेशन' मध्ये गाडी दाखविलीच नाहीये, बहुतेक मंथली पासहोल्डरचे प्रवासी मात्र दिसत आहेत.

खूप छान. राणीला ६५ वर्षे झाली तेव्हा मोठा कार्यक्रम झाला होता तो पाहिला होता. अनेक गाड्या कल्याण जंकशनला थांबायच्या पण डेक्कन क्वीन पुर्वी थांबायची नाही, ह्याचे काहीतरी कारण होते. गाडीतील खानपान सेवेचा डबा अगदी खास असायचा. ८७/८८ साली इंद्रायणी चालु झाली. दिसायला राणीसारखीच, वेळही तेवढाच घ्यायची. खाजगी बस कंपन्यांच्या सेवा आल्या आणि दक्खनच्या राणीचे आकर्षण हळूहळू कमी झाले.

सुबोध खरे Wed, 06/04/2025 - 11:46
WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे. लष्करात असताना विविध ठिकाणी जाण्यासाठी भरपूर फिरती होत असे त्यापैकी एकदा देवळाली (नाशिक) हून परत येताना कलकत्ता मेल च्या ए सी २ टियर ने येत होतो. इगतपुरीला लोको पायलट ची परवानगी घेऊन (लष्कराचे ओळखपत्र गळ्यात असल्याने अनेक वेळेस अशा इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे) इगतपुरी ते कसारा प्रवास या इंजिनात बसून झाला. इंजिनने केवळ ब्रेक सोडले तर गाडी ६० च्या वर वेग घेऊ लागते हे लोको पायलट ने दाखवले आणि म्हणून घाटात सहजासहजी वेगात नेली जात नाही. डेक्कन क्वीनच्या प्रथम वर्गाने प्रवास मी १९७२ साली केला होता. त्यानंतर चार पाच वेळेस हा प्रवास केला आहे सुरुवातीला प्रशस्त २ X २ सीटचा प्रथम वर्ग होता नांतर वातानुकूलित कुर्सीयान आले. डेक्कनक्वीन च्या उपाहारगृहात बसून गप्पा मारत प्रवास करणे हा एक अद्वितीय अनुभव आहे हे खरं. दुसऱ्या वर्गात सुद्धा २ X ३ अशी बसण्याची सोय होती ती जाऊन आता ३ X ३ झाल्यावर फारच अडचण होते. हि २ X ३ सोय डेक्कन क्वीन मध्ये इतर गाड्यांपेक्षा बराच जास्त काळ होती पण नंतर तिथे पण ३ X ३ आली. जास्त प्रवासी जातात परंतु सहाच्या सहा प्रवाशांना अडचण होते. मुलुंडला राहत असल्याने डेक्कन क्वीन ने जाणे गैरसोयीचे असल्याने आताशा जाणे होत नाही. पण ज्यांनी तिच्यातून प्रवास केला आहे त्या सगळ्यांच्या मनात या गाडीची खास जागा आहे हे खरं.

फारएन्ड Sun, 06/08/2025 - 00:41
धन्यवाद लोकहो! WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे >>> हे फार भारी आहे. या इंजिनाला एक वेगळाच भारदस्त लुक होता. https://www.irfca.org/gallery/Locos/Electric/wcm1_to_6/wcm5_pune_trip_shed_Apr03.jpg.html? तो २ बाय २ चा प्रशस्त पहिला वर्ग आठवतोय मलाही. मी एकदोनदा गेलो होतो. मुंबईला एकदा ट्रेनिंगला गेलो होतो तेव्हा परतताना मी या पहिल्या वर्गाने डेक्कनने येणार याचे मला त्या ट्रेनिंगइतकेच अप्रूप होते. डायनिंग कारमधे बसून खाण्याच्या अनुभवाबद्दलही सहमत.

मनो Mon, 06/09/2025 - 04:18
१९६६ सालची फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याने याच विषयावर केलेली ही क्लिप पहा, अनेक जुन्या गोष्टी दिसतील. Pure Gold. https://m.youtube.com/watch?v=3vcRKHJg8WI

प्रचेतस Wed, 06/11/2025 - 15:10
तुमची जशी डेक्कन क्वीन, तशी आमची सिंहगड एक्सप्रेस. पिंपरी चिंचवडला राहत असल्यामुळे डेक्कन क्वीनने जाणेयेणे कधीच जमले नाही. मात्र सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करण्याचे भाग्य खूपदा लाभले. त्यातही तेव्हा ती भारतातली पहिली डबलडेकर ट्रेन. फार मजा यायची त्या दोन मजली रेल्वेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधीच क्लिअर करतो. ती ९५ वर्षांची आहे. मी नाही

😄

डेक्कन क्वीन

फारएन्ड ·

कर्नलतपस्वी Tue, 06/03/2025 - 08:20
गप्प राहून सुद्धा बरेच काही सांगून जातात. दख्खन च्या राणीच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजही राणी आपल्या चाहत्यांना, "कशासाठी पोटासाठी , खंडाळ्याच्या घाटासाठी" बोराटे वाट लागलीय. १९७४ मधे पहिला आगगाडीत बसलो होतो. ते ही याच गाडीत बसायचे भाग्य लाभले होते. तेव्हा बोलघाट एखाद्या षोडशवर्षीय अवखळ नवयुवती सारखा वाटला. अर्थात आम्ही सुद्धा ......

फारएन्ड Tue, 06/03/2025 - 08:41
हा लेख उडवता आला नाही. पण पूर्ण लेखही स्वतंत्र प्रकाशित केला आहे. https://www.misalpav.com/node/52965 कर्नलतपस्वी - धन्यवाद.

कर्नलतपस्वी Tue, 06/03/2025 - 08:20
गप्प राहून सुद्धा बरेच काही सांगून जातात. दख्खन च्या राणीच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजही राणी आपल्या चाहत्यांना, "कशासाठी पोटासाठी , खंडाळ्याच्या घाटासाठी" बोराटे वाट लागलीय. १९७४ मधे पहिला आगगाडीत बसलो होतो. ते ही याच गाडीत बसायचे भाग्य लाभले होते. तेव्हा बोलघाट एखाद्या षोडशवर्षीय अवखळ नवयुवती सारखा वाटला. अर्थात आम्ही सुद्धा ......

फारएन्ड Tue, 06/03/2025 - 08:41
हा लेख उडवता आला नाही. पण पूर्ण लेखही स्वतंत्र प्रकाशित केला आहे. https://www.misalpav.com/node/52965 कर्नलतपस्वी - धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
Deccan Queen

वकीलाना टाटा-बायबाय

युयुत्सु ·

Bhakti Mon, 06/02/2025 - 15:26
होय,कालच युवालचा ए.आय ची मुलाखत ऐकत होते.ए.आय ला सर्व नियम माहिती आहे.तुम्हाला केस लढवताना काही नियम आठवत नाही, त्याबाबत ए आय तुम्हाला हरवू शकेल.असा काहीसा तो मतितार्थ होता.

कंजूस Mon, 06/02/2025 - 15:53
नियम सर्वांना ठाऊक असतात पण नियमांच्या व्याख्येत गुन्हा कसा बसत नाही हे तक्रारदार आणि साक्षीदारांच्या उलट तपासणीत त्यांच्या उत्तरांतून कोर्टाला दाखवून देण्याचे काम आरोपीचे वकील करतात. मग संशयाचा फायदा मिळतो. हे काम एआइ करणार नाही.

In reply to by कंजूस

गवि Mon, 06/02/2025 - 18:11
असहमत. नेमका कोणता नियम / उपनियम/ कलम इथे वापरले तर आशिलाची अलगद आणि कमीतकमी वेळात सुटका होईल किंवा सर्वात वेगवान न्याय मिळेल हे अनेक वकिलांना माहीत नसू शकते. याचा अनुभव घेतला आहे. अनेक दशके अडकलेली केस नवीन वकिलाने एक वेगळेच कलम मांडून झटक्यात क्लोज करवल्याचे बघितले आहे. AI ला कमी मानण्यात अर्थ नाही. मनुष्य हवाच पण त्याला फक्त यंत्राला योग्य प्रश्न विचारता येणे इतकेच मुख्य स्किल पुढे आवश्यक म्हणून उरणार आहे.

In reply to by गवि

कंजूस Tue, 06/03/2025 - 05:48
दोन अर्जांचा विचार करू... १. भाडेकरूला दिलेली जागा घरमालकाने परत मिळवणे. २. सोसायट्यांमध्ये पार्किंगसंबंधी होणारे वाद. सभासदाने त्याचे पार्किंगसह फ्लॅट भाड्याने दिल्यावरही भाडेकरूस सोसायटी सभासद तसे करू देत नाहीत. याबाबत स्पष्ट कलमे असली तरीही कित्येक वर्षे खटले चालतात. क्रमांक (१) बद्दल काहीही कलमे लावून खटले दाखल करतात आणि त्यातल्या आरोपांचे खंडन/समर्थन यातच वेळ जातो. मान्य असलेली कलमे तोडली आहेत याबद्दल एकही मुद्दा नसतोच. यात एआइ काय घंटा मदत करणार?

In reply to by युयुत्सु

कंजूस Tue, 06/03/2025 - 06:06
याबाबत एक उदाहरण.... हल्ली उंच इमारतीत (५-८ मजली करुया) आगी लागतात तेव्हा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना जिन्याने वर जाण्यात अडचण येते कारण तिथे रहिवाशांनी चपला स्टँड किंवा इतर वस्तू ठेवलेल्या असतात. तर अशा घटना घडल्यावर काही सोसायटींनी असे सामान काढणे किंवा केलेले बांधकाम काढण्याच्या नोटिसा पाठवल्या. ( ही जागा सोसायटीची आहे हे कलम असतेच) .तर याला उत्तर देताना 'ही जागा सोसायटीची कशी नाही' यावर वकिली उत्तर नसतेच पण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला त्रास देण्यासाठी आणि आकसाने ही कारवाई केली आहे असा खटला लावतात. खटले चालतात ते आरोपांचे खंडन करण्यात . मूळ मुद्दा बाजूलाच राहिला...की जिने मोकळे करा. तर इथे एआइ काय घंटा मदत करणार? सामान तसेच राहाते आणि निकाल लागेपर्यंत काहीही होत नाही. सामान ठेवून जागा आवडणाऱ्याला हेच पाहिजे असते. २. एका सोसायटीत तळमजल्यावर एका डॉक्टरने नर्सिंग होम काढून इमारतीच्या आवारातील मोकळ्या जागेत गॅस सिलिंडर, कॉक्स इत्यादी सामान टाकले. सोसायटीने नोटिस दिली की विनापरवाना जागा वापरात आहात. यावर " ही जागा वापरल्याने सभासदांना काय अडचण आहे ते सांगा असा मुद्दा लावला. शिवाय हे आरोग्यसेवेचाच भाग आहे. तर अशा खटल्यात सोसायटीला एका कमिटी मेंबराला सुनावणीच्या वेळी पाठवावे लागते. खर्च आहेच. तर इथे एआइ येणार मदतीला धावून.

गवि Mon, 06/02/2025 - 18:12
@युयुत्सु याही पुढे जाऊन न्यायाधीशांच्या जागीच AI येईल, याबद्दल काय वाटते?

In reply to by गवि

युयुत्सु Mon, 06/02/2025 - 18:54
लोकअदालत प्रमाणे काही खटले ए०आय० न्यायाधीशाकडे पाठवले जाऊ शकतात. त्यामुळे न्यायालयांवरचा ताण वेगाने कमी होऊ शकतो. इशु फ्रेमिंगसाठी (आरोप निश्चिती साठी) पण ए० आय्०चा उपयोग होऊ शकतो

In reply to by युयुत्सु

कंजूस Tue, 06/03/2025 - 10:54
एकदा सह्याद्री चानेलवरती तीन निवृत्त न्यायाधिशांना बोलावून प्रश्न विचारले होते. हौ. सोसायटीचे विवक्षित खटले असतात ते बरेच वर्षे चालतात आणि बरेचसे एकाच टाइपचे असतात. त्यावर ते म्हणाले की जवळपासच्या वीस पंचवीस सोसायट्यांनी एकत्र येऊन प्रश्न सोडवावे म्हणजे काम सोपे होईल. न्यायालयापुढे अर्ज आला की तो दाखल करून घ्यावा लागतो व केस चालू राहते. इथे एआइ काम करत नसून वादी, प्रतिवादींनी परस्पर मार्ग काढायचा असतो.( पण अहंपणामुळे काम होत नाही. एआइ काय निकाल देऊ शकत नाही. सुचवू शकेल पण ऐकून घेण्याची तयारी हवी ना?)

In reply to by युयुत्सु

मिसळपाव Mon, 06/02/2025 - 20:08
याचं LLM कोण करेल? कोणी करावं? कोणी केलं तर तुम्ही/आम्ही ते विश्वासार्ह मानू? ए. आय. च्या ताब्यात संपूर्णपणे देण्यापेक्षा त्याचा एक साधन म्हणून वापर करणं जास्त योग्य होईल का? मूल काही हिंदू / मुस्लिम म्हणून जन्माला नाही येत. ते ज्या कुटुंबात/समाजात वाढतं ते कुटूंब / तो समाज त्याला हिंदू किंवा मुस्लिम करतात. तद्वतंच, कुठलंही ए.आय. टूल - चॅट जीपीटी / जेमिनी / ग्रॉक वगैरे कुठलंही - जगातली सग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ळी माहीती संदर्भासाठी वापरून नि:पक्षपणे नाही तयार होत. त्याला ओपनएआय / गूगल / एक्स तयार करतात. यातले धोके दिसताहेत. पण सोशल मिडीयातले, रिल्स मधले, न्यूज / अपडेट फीडमधले धोके पण माहीत असून त्याबद्दल काही केलं जात नाहीये. तसंच ईथे पण होईल. ए. आय. उत्तम साधन आहे हे नि:संशय. ते कोणा हाती आहे ते, कसं विकसित केलं जातंय ते चिंताजनक आहे. ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

स्वधर्म Mon, 06/02/2025 - 20:15
सध्या शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हटले जाते. त्याचे कारण म्हणजे वकील, न्यायालयातले कारकून, न्यायाधीश सगळेच ढिले आहेत. त्यामुळे अशिलांचा भयानक वेळ जातो शिवाय न्याय होत नाही. ए आय आले तर खूप चांगले होईल. मी सध्या एका ए आय प्रोजेक्टमधे काम करत आहे आणि अर्थ लावण्याच्या बाबतीत ए आय परिपूर्ण नाही, पण ८०% बरोबर आहे. माणसांचे अनेक संदर्भ शोधण्याचे काम अक्षरशः क्षणात होते.

ए.आय मुळे टाटा बायबाय करावा लागेल अशी अनेक क्षेत्रे आहेत- जवळपास सगळीच. कोणीतरी जात्यात आहे तर इतर सगळे सुपात आहेत. पण सगळे कधीनाकधी जात्यात ढकलले जाणारच आहेत. मग जसा वकिलांना टाटा-बायबाय असा लेख लिहिला तसे अमक्याला टाटा-बायबाय, तमक्याला टाटा-बायबाय असे लेख लिहिणार की काय? :)

कर्नलतपस्वी Tue, 06/03/2025 - 06:04
न्याय व्यवस्थेत ए आय आल्यास न्यायाधीशांना टावेल, टोपी, नारळ देता येईल का? कारकून ए आय ला विचारून न्याय निवाडा करू शकेल काय,? LLB (Lover of Last Bench) कृपया हलकेच घ्या. लेखक,कंटेट रायटर, कवी,चित्रकार हे सुद्धा मोडीत निघण्याच्या तयारीत आहेत. ( ए आय ला विचारले की तू काय काय करू शकतो तेव्हां तो म्हणाला अहं ब्रह्मास्मी)

युयुत्सु Tue, 06/03/2025 - 07:10
गुंतागुंत कमी असलेल्या खटल्यामध्येच ए० आय० न्यायाधीश होऊ शकेल. पण आपल्याकडे न्यायव्यवस्था सर्वात संथपणे स्वतःला सुधारते. त्यामुळे प्रगत राष्ट्रात ही कल्पना रूळेपर्यंत आपण स्वस्थ बसायला हरकत नाही. कदाचित तिथे रूळली तरी आपल्याकडे स्वीकारली जाईलच असे नाही. जे चालकरहित गाड्यांचे झाले तेच इथे भारतात पण होऊ शकते. पण अनेक छोटे देश ही कल्पना अमलात आणू शकतात. आपल्याकडे केसलॉचे डेटाबेस शोधता आले तरी खुप होईल

In reply to by युयुत्सु

रामचंद्र Tue, 06/03/2025 - 10:38
केसलॉचे डेटाबेस शोधता आले तरी> जिथं किरकोळ तांत्रिक स्वरूपाचंच काम असतं पण कर्मचारी वेळकाढूपणा करतात, चहापाणी म्हणत पैसे उकळतात अशी न्यायालयीन तसेच महसूल खात्यातील, नगरपालिका, इ. मधील बरीचशी जनतेशी संबंधित कामं एआयकडून सहज करवून घेता येतील. मात्र हे काम करणारा कर्मचारी लोकांची अडवणूक करण्याची शक्यता आहेच.

कंजूस Tue, 06/03/2025 - 11:03
संपत्तीचे वारसांत आणि संदिग्ध वारसांत ( यांना वारस म्हणायचे का नाही असे) वाटप कसे करणार? एआइ ते कसे करणार? तर अशा काही गोष्टी वाचून त्यावरून सुचवणार. उदाहरणार्थ - एका माणसाकडे आठ प्राणी (घोडे/ऊंट/गायी... वगैरे)होते. तो मेल्यावर त्यांच्या तीन मुलांत ते वाटायचे होते. मुलं भांडली पण वाटप ठरेना. एका महाजनाकडे गेले. त्याने त्यांच्याकडच्या एक प्राणी त्यात घालून प्रत्येकाला तीन प्राणी दिले आणि ते मुलांना पटले. मग तो म्हणाला आता माझा मोबदला म्हणून माझ्या एका प्राण्याची किंमत तिघांनी वाटून द्या. तसे केले. तर हे एआइ करेल. पण पटवून घ्यायची तयारी हवी ना?

कपिलमुनी Tue, 06/03/2025 - 12:34
ए आय ची क्षमता अफाट आहे . मध्यंतरी ऑस्ट्रेलियाच्या एका फर्मने शक्य ते सगळे खटले, निकाल डिजिटल करून क्रॉल करून घेतले ( त्यांचा मेटाडेटा ) तयार करून घेतला . आता त्यांचा ए आय जर त्यंचा वकील खटला लढवत असेल तर सग्ळे संदर्भ , रेफरन्स क्ष्णात हजर करतो . आपण केस अपलोड केलि तर मेरीट सांगतो ( जिंकायची शक्यता वगैरे) ..

माहितगार Tue, 06/03/2025 - 18:30
१) अगदी अलिकडेच माझा एक मित्र मल्टीलेव्हल मार्केटींगच्या प्रकाराला भुलला होता, मल्टीलेव्हल मार्केटीन्गच्या बाबतीत कायदे काय सांगतात असे विचारले तर एआय ने व्यवस्थीत माहिती दिली. पण प्रत्येक वेळी एआय अचुकतेने करू शकेल किन्वा एआय नरेटीव्ह बाधीत नसतात असे नव्हे त्यामुळे ते प्रत्यक्ष वकीली सल्ल्याची जागा अद्यापतरी घेऊ शकणार नाहीत. २) सर्वसाधारणपणे पे वॉल्सच्या मागेअ असणारा जुन्या लीगल केसेसची माहिती उपलब्ध करणारा सॉफ्टवेअर सपोर्ट गेली पाच दहावर्षे पासून वकीलांना उपलब्ध आहेच एआय मुळे कदाचीत केसच्या मांडणीचे उर्वरीत काम आणि प्रुफ रिडीग भाषिक दुरुस्त्याण्चे काम सोपे होईल. यातून वकीलांचे काम पूर्ण बंद झाले नाहीतरी त्यांना असीस्टन्ट लोकांची गरज कमी भासेल आणि ज्या वकीलांकडे असीस्टंट नव्हते इंग्रजी भाषेत अंशत कच्ची होते ते इन्ग्रजीत अस्खलीत असलेल्याना चान्गली स्पर्धा देऊ लागतील ३) वकीलानी सबमीट केलेल्या केस्स्टदीज क्रॉसचेक करणे दोन्ही बाजूची परस्पर विरोधी बाजूण्च्या मांडणीची तुलना उपलब्ध करुन देणे आणि निकाल नाही पण निकालाचा रिपिटीटीव्ह भाग लिहिण्यातला वेळ वाचवणे हि कामे ए आय करु शकेल

In reply to by माहितगार

मारवा Tue, 06/10/2025 - 14:46
अगदी अलिकडेच माझा एक मित्र मल्टीलेव्हल मार्केटींगच्या प्रकाराला भुलला होता, मित्राच्या स्कीम मध्ये item काय होता? मी पाहिलेले काही मल्टिमार्केटिंग मध्ये विकले जाणारे items जपानी गादी Nutrition जादुई nutrition चा हजारो किमतीचा डबा Alkaline पाणी बनविणारी काही 2 का 3 लाखाची मशीन क्रिप्टो currency new launch झालेली मल्टिमार्केटिंग ची शाळा माहितीये मला item मध्ये interest वाटतो यंदा काय म्हणे ?

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 19:18
कृत्रिम बुद्धिमत्ते मुळे न्यायालयीन निकालांचे अनेक संदर्भ चुटकीसरशी हाती लागतात आणि आपल्याला हवा तो निवाडा न्यायालयात सादर करता येतो. परंतु जोवर न्यायाधीश आणि कायदे करणारी माणसेच आहेत तोवर न्यायसंस्थेत माणसांची गरज संपणारी नाही. कायद्याचा अर्थ कसा लावायचा हा पण एक भाग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कक्षेच्या बाहेरचा आहे. उदा. १७ व्य वर्षी मुलीचे लग्न करून दिले तर तो गुन्हा आहे परंतु कुणीच तक्रार करत नसेल तर केवळ कायद्यावर बोट ठेवून त्या जोडप्याला विभक्त करायचे का? किंवा त्या नवऱ्याला बलात्काराच्या आरोपाखाली १४ वर्षे तुरुंगात पाठवायचे. अज्ञान मुलीशी संबंध ठेवला तर तो बलात्कार ठरतो. एकंदर समाजाची ठेवण पाहून तारतम्य बाळगून निकाल द्यायला लागतो यासाठी न्यायाधीशांना वैकल्पिक अधिकार दिलेले आहेत. अमेरिकेत तर एका राज्यात गुन्हा असणारी गोष्ट दुसऱ्या राज्यात सर्रास मान्यता प्राप्त आहे. उदा चरस पिणे. अशा स्थितीत जर माणूस शेजारच्या राज्यात चरस पिऊन आला आणि इकडे दंगा केला तर ती स्थिती कशी कायद्यात बसवायची याबद्दल बरीच धूसरता आहे. अर्थात हि अगदीच ढोबळ उदाहरणे आहेत. त्यातून जोवर येणाऱ्या न्यायाधीशांची आणि वकिलांची पिढी कृत्रिम बुद्धिमत्ता शिकून त्यात पारंगत होत नाही तोवर न्यायसंस्थेतून वकील जाणार नाहीत हे नक्की. यामुळे आता वकीलांना लवकरच "टाटा-बायबाय" करायची वेळ आली आहे हे विधान सध्या तरी अतिशयोक्त वाटतं.

In reply to by सुबोध खरे

गवि Wed, 06/11/2025 - 05:50
कायद्याचा अर्थ कसा लावायचा हा पण एक भाग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कक्षेच्या बाहेरचा आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातच सध्या काम असल्याने इथे विनम्र असहमती नोंदवू इच्छितो. उलट या गोष्टी खास करून AI अधिक चांगल्या हॅण्डल करेल. इट्स अ मॅटर ऑफ टाईम. अगदी तुम्ही दिलेली दोन उदाहरणे पाहिली तरी त्यात AI सहज त्या गोष्टी पाहून अधिक योग्य निर्णय घेऊ शकतो. मुळात AI हा मानवी ऐतिहासिक डेटा वरुनच "ट्रेन" होत असतो. आणि त्याच्याकडे प्रचंड डेटा एकावेळी शिकून त्यातले सर्व सूक्ष्म ताणेबाणे आत्मसात करण्याची शक्ती आहे जी आपल्यात नाही.

In reply to by गवि

सुबोध खरे Wed, 06/11/2025 - 11:55
कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ सत्य काय ते सांगू शकेल. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे कि निकाल देण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार ति च्याकडे नाही तोवर कृत्रिम बुद्धिमत्ता काहीही करू शकणार नाही जोवर निकाल देणे हे न्यायाधिशांच्या हातात आहे तोवर कृत्रिम बुद्धिमत्ता काहीही करू शकणार नाही. ज्यांनी प्रत्यक्ष न्यायालयात काम केलं आहे अशा वकिलांना विचारून पहा. जर न्यायाधीशांनी ठरवलं असेल कि आरोपीला जामीन द्यायचा नाही तर तुम्ही हवे तितके पुरावे आणा, जामीन नाकारला जातो. किंवा न्यायाधीशांनी ठरवले कि जामीन द्यायचा कि कितीही गंभीर गुन्हा असो जामीन दिला जातो. माझ्या स्वतःच्या केस मधेय सर्वोच्च न्यायालयात न्या बी एन श्रीकृष्ण यांनी माझ्याविरुद्ध असा पवित्रा घेतला होता कि लष्कराच्या बाबीत न्यायालयाने हस्तक्षेप करू नये म्हणून ते माझी केस परत संरक्षण मंत्रालयाकडे पाठवणार होते. त्यांना परोपरीने विनवले कि उच्च न्यायालयाने केस संरक्षण मंत्रालयाकडे पाठवलेली होती तरी सुद्धा न्याय झाला नाही. त्यावर त्यांचा एकच हेका चालू होता . शेवटी कसे बसे ते केस दाखल करून घेण्यास तयार झाले. केस दाखल केल्यावर त्यांनतर येणाऱ्या सर्वच्या सर्व नऊ खंडपीठानी मला लष्करी सेवेतून मुक्त करायला हवे हे माझे म्हणणे मान्य केले होते आणि शेवटी साडे तीन वर्षांनी निकाल माझ्या बाजूने लागला. माझ्याच रूममेटची केस दिल्ली उच्च न्यायालयाने परत संरक्षण मंत्रालयाकडे पाठवली त्यांनी सध्या आम्ही याला सेवामुक्त करू शकत नाही असा निर्णय दिला आणि तो दिल्ली उच्च न्यायालयाने मान्य केला. माझा हा मित्र अजूनही लष्करी सेवेत आहे लेफ्टनंट जनरल म्हणून. माझ्या सुदैवाने मुंबई उच्च न्यायालयाने संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे साफ नाकारले यास्तव सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले होते शेवटी सत्य तेच असते जे तुम्ही न्यायालयात सिद्ध करू शकाल अशा परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता काय करेल? अमेरिकेत ओहायो या राज्यात जर गर्भ हा फेलोपियन ट्यूब मध्ये असेल तर तो तेथून काढून गर्भाशयात रोपण करावा पण गर्भपात करायचा नाही असा कायदा केला होता. Ohio bill orders doctors to ‘reimplant ectopic pregnancy’ or face 'abortion murder' charges. Ohio introduces one of the most extreme bills to date for a procedure that does not exist in medical science. https://www.theguardian.com/us-news/2019/nov/29/ohio-extreme-abortion-bill-reimplant-ectopic-pregnancy. This is the second time practising obstetricians and gynecologists have tried to tell the Ohio legislators that the idea is currently medically impossible. Reimplantation is not physiologically possible. Women with ectopic pregnancies are at risk for catastrophic hemorrhage and death in the setting of an ectopic pregnancy, and treating the ectopic pregnancy can certainly save a mom’s life. आता जगभरात कुठेही असे रोपण यशस्वी होत नाही. ट्यूब मधील गर्भ वाढून शेवटी ट्यूब फाटते आणि प्रचंड रक्तस्त्राव होऊन आईचा जीव जातो यासाठी सध्या तरी गर्भपात हा केवळ एकच उपाय आहे. परंतु ओहायो राज्यात स्त्रीरोगतज्ज्ञाने जर गर्भपात केला तर त्याच्यावर सदोष मनुष्यवधाखाली खटला भरला जाईल. Another new crime, “aggravated abortion murder”, is punishable by death, according to the bill. यामुळे तेथील कित्येक स्त्रीरोगतज्ज्ञ तेथून गाशा गुंडाळून दुसऱ्या राज्यात व्यवसाय करायला गेले. यानंतर हा कायदा परत रद्दबातल केला आहे असे ऐकतो. आपल्याकडे एक कायदा आहे. आपल्या खाजगी वाहनात दुसऱ्या ( अज्ञात )माणसाला लिफ्ट देणे हा गुन्हा आहे. तम्ही खाजगी व्यवसाय करता असे गृहीत धरले जाईल. कायद्याचा असा अर्थ लावून नव्या मुंबईत एका माणसाला पोलिसांनी दंड केला होता. या सज्जन माणसाने पावडसात अडकलेल्या तीन नागरिकांना लिफ्ट देण्याचे दुष्कृत्य केले होते. न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे कायद्यानुसार असून त्याचा दंड कायम केला आणि अज्ञात माणसाला लिफ्ट देणे हा गुन्हा आहे असे मान्य केले https://www.moneycontrol.com/news/india/mumbai-man-fined-for-giving-lift-to-strangers-stuck-in-rain-2628691.html तेंव्हा आपली कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही हुषार असली तरी कायदे करणारे/ कायद्याचा अर्थ लावणारे गाढव असले तर काहीही करता येणार नाही.

विजुभाऊ Wed, 06/11/2025 - 09:48
ए आय ला एकच प्रश्न वेगळ्याप्रकारे विचारला तर वेगवेगळे उत्तर येते उदा: तंबाखू खाणे हे आरोग्यासाठी कसे चांगले आहे हा प्रश्न तमबाखू खाणे आरोग्यासाठी कसे वाईट आहे असा विचारला तर वेगळी उत्तरे येतात

युयुत्सु Wed, 06/11/2025 - 10:40
ए आय ला एकच प्रश्न वेगळ्याप्रकारे विचारला> मग बिघडले काय? ए० आय० सर्व बाजू (विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने) मांडतो. वकील पण (नीतिमत्ता बाजूला ठेऊन) असेच करतात. ए०आय० वर मानवी नीतिमत्ता लादणे मला तरी मान्य नाही.

Bhakti Mon, 06/02/2025 - 15:26
होय,कालच युवालचा ए.आय ची मुलाखत ऐकत होते.ए.आय ला सर्व नियम माहिती आहे.तुम्हाला केस लढवताना काही नियम आठवत नाही, त्याबाबत ए आय तुम्हाला हरवू शकेल.असा काहीसा तो मतितार्थ होता.

कंजूस Mon, 06/02/2025 - 15:53
नियम सर्वांना ठाऊक असतात पण नियमांच्या व्याख्येत गुन्हा कसा बसत नाही हे तक्रारदार आणि साक्षीदारांच्या उलट तपासणीत त्यांच्या उत्तरांतून कोर्टाला दाखवून देण्याचे काम आरोपीचे वकील करतात. मग संशयाचा फायदा मिळतो. हे काम एआइ करणार नाही.

In reply to by कंजूस

गवि Mon, 06/02/2025 - 18:11
असहमत. नेमका कोणता नियम / उपनियम/ कलम इथे वापरले तर आशिलाची अलगद आणि कमीतकमी वेळात सुटका होईल किंवा सर्वात वेगवान न्याय मिळेल हे अनेक वकिलांना माहीत नसू शकते. याचा अनुभव घेतला आहे. अनेक दशके अडकलेली केस नवीन वकिलाने एक वेगळेच कलम मांडून झटक्यात क्लोज करवल्याचे बघितले आहे. AI ला कमी मानण्यात अर्थ नाही. मनुष्य हवाच पण त्याला फक्त यंत्राला योग्य प्रश्न विचारता येणे इतकेच मुख्य स्किल पुढे आवश्यक म्हणून उरणार आहे.

In reply to by गवि

कंजूस Tue, 06/03/2025 - 05:48
दोन अर्जांचा विचार करू... १. भाडेकरूला दिलेली जागा घरमालकाने परत मिळवणे. २. सोसायट्यांमध्ये पार्किंगसंबंधी होणारे वाद. सभासदाने त्याचे पार्किंगसह फ्लॅट भाड्याने दिल्यावरही भाडेकरूस सोसायटी सभासद तसे करू देत नाहीत. याबाबत स्पष्ट कलमे असली तरीही कित्येक वर्षे खटले चालतात. क्रमांक (१) बद्दल काहीही कलमे लावून खटले दाखल करतात आणि त्यातल्या आरोपांचे खंडन/समर्थन यातच वेळ जातो. मान्य असलेली कलमे तोडली आहेत याबद्दल एकही मुद्दा नसतोच. यात एआइ काय घंटा मदत करणार?

In reply to by युयुत्सु

कंजूस Tue, 06/03/2025 - 06:06
याबाबत एक उदाहरण.... हल्ली उंच इमारतीत (५-८ मजली करुया) आगी लागतात तेव्हा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना जिन्याने वर जाण्यात अडचण येते कारण तिथे रहिवाशांनी चपला स्टँड किंवा इतर वस्तू ठेवलेल्या असतात. तर अशा घटना घडल्यावर काही सोसायटींनी असे सामान काढणे किंवा केलेले बांधकाम काढण्याच्या नोटिसा पाठवल्या. ( ही जागा सोसायटीची आहे हे कलम असतेच) .तर याला उत्तर देताना 'ही जागा सोसायटीची कशी नाही' यावर वकिली उत्तर नसतेच पण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला त्रास देण्यासाठी आणि आकसाने ही कारवाई केली आहे असा खटला लावतात. खटले चालतात ते आरोपांचे खंडन करण्यात . मूळ मुद्दा बाजूलाच राहिला...की जिने मोकळे करा. तर इथे एआइ काय घंटा मदत करणार? सामान तसेच राहाते आणि निकाल लागेपर्यंत काहीही होत नाही. सामान ठेवून जागा आवडणाऱ्याला हेच पाहिजे असते. २. एका सोसायटीत तळमजल्यावर एका डॉक्टरने नर्सिंग होम काढून इमारतीच्या आवारातील मोकळ्या जागेत गॅस सिलिंडर, कॉक्स इत्यादी सामान टाकले. सोसायटीने नोटिस दिली की विनापरवाना जागा वापरात आहात. यावर " ही जागा वापरल्याने सभासदांना काय अडचण आहे ते सांगा असा मुद्दा लावला. शिवाय हे आरोग्यसेवेचाच भाग आहे. तर अशा खटल्यात सोसायटीला एका कमिटी मेंबराला सुनावणीच्या वेळी पाठवावे लागते. खर्च आहेच. तर इथे एआइ येणार मदतीला धावून.

गवि Mon, 06/02/2025 - 18:12
@युयुत्सु याही पुढे जाऊन न्यायाधीशांच्या जागीच AI येईल, याबद्दल काय वाटते?

In reply to by गवि

युयुत्सु Mon, 06/02/2025 - 18:54
लोकअदालत प्रमाणे काही खटले ए०आय० न्यायाधीशाकडे पाठवले जाऊ शकतात. त्यामुळे न्यायालयांवरचा ताण वेगाने कमी होऊ शकतो. इशु फ्रेमिंगसाठी (आरोप निश्चिती साठी) पण ए० आय्०चा उपयोग होऊ शकतो

In reply to by युयुत्सु

कंजूस Tue, 06/03/2025 - 10:54
एकदा सह्याद्री चानेलवरती तीन निवृत्त न्यायाधिशांना बोलावून प्रश्न विचारले होते. हौ. सोसायटीचे विवक्षित खटले असतात ते बरेच वर्षे चालतात आणि बरेचसे एकाच टाइपचे असतात. त्यावर ते म्हणाले की जवळपासच्या वीस पंचवीस सोसायट्यांनी एकत्र येऊन प्रश्न सोडवावे म्हणजे काम सोपे होईल. न्यायालयापुढे अर्ज आला की तो दाखल करून घ्यावा लागतो व केस चालू राहते. इथे एआइ काम करत नसून वादी, प्रतिवादींनी परस्पर मार्ग काढायचा असतो.( पण अहंपणामुळे काम होत नाही. एआइ काय निकाल देऊ शकत नाही. सुचवू शकेल पण ऐकून घेण्याची तयारी हवी ना?)

In reply to by युयुत्सु

मिसळपाव Mon, 06/02/2025 - 20:08
याचं LLM कोण करेल? कोणी करावं? कोणी केलं तर तुम्ही/आम्ही ते विश्वासार्ह मानू? ए. आय. च्या ताब्यात संपूर्णपणे देण्यापेक्षा त्याचा एक साधन म्हणून वापर करणं जास्त योग्य होईल का? मूल काही हिंदू / मुस्लिम म्हणून जन्माला नाही येत. ते ज्या कुटुंबात/समाजात वाढतं ते कुटूंब / तो समाज त्याला हिंदू किंवा मुस्लिम करतात. तद्वतंच, कुठलंही ए.आय. टूल - चॅट जीपीटी / जेमिनी / ग्रॉक वगैरे कुठलंही - जगातली सग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ळी माहीती संदर्भासाठी वापरून नि:पक्षपणे नाही तयार होत. त्याला ओपनएआय / गूगल / एक्स तयार करतात. यातले धोके दिसताहेत. पण सोशल मिडीयातले, रिल्स मधले, न्यूज / अपडेट फीडमधले धोके पण माहीत असून त्याबद्दल काही केलं जात नाहीये. तसंच ईथे पण होईल. ए. आय. उत्तम साधन आहे हे नि:संशय. ते कोणा हाती आहे ते, कसं विकसित केलं जातंय ते चिंताजनक आहे. ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

स्वधर्म Mon, 06/02/2025 - 20:15
सध्या शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हटले जाते. त्याचे कारण म्हणजे वकील, न्यायालयातले कारकून, न्यायाधीश सगळेच ढिले आहेत. त्यामुळे अशिलांचा भयानक वेळ जातो शिवाय न्याय होत नाही. ए आय आले तर खूप चांगले होईल. मी सध्या एका ए आय प्रोजेक्टमधे काम करत आहे आणि अर्थ लावण्याच्या बाबतीत ए आय परिपूर्ण नाही, पण ८०% बरोबर आहे. माणसांचे अनेक संदर्भ शोधण्याचे काम अक्षरशः क्षणात होते.

ए.आय मुळे टाटा बायबाय करावा लागेल अशी अनेक क्षेत्रे आहेत- जवळपास सगळीच. कोणीतरी जात्यात आहे तर इतर सगळे सुपात आहेत. पण सगळे कधीनाकधी जात्यात ढकलले जाणारच आहेत. मग जसा वकिलांना टाटा-बायबाय असा लेख लिहिला तसे अमक्याला टाटा-बायबाय, तमक्याला टाटा-बायबाय असे लेख लिहिणार की काय? :)

कर्नलतपस्वी Tue, 06/03/2025 - 06:04
न्याय व्यवस्थेत ए आय आल्यास न्यायाधीशांना टावेल, टोपी, नारळ देता येईल का? कारकून ए आय ला विचारून न्याय निवाडा करू शकेल काय,? LLB (Lover of Last Bench) कृपया हलकेच घ्या. लेखक,कंटेट रायटर, कवी,चित्रकार हे सुद्धा मोडीत निघण्याच्या तयारीत आहेत. ( ए आय ला विचारले की तू काय काय करू शकतो तेव्हां तो म्हणाला अहं ब्रह्मास्मी)

युयुत्सु Tue, 06/03/2025 - 07:10
गुंतागुंत कमी असलेल्या खटल्यामध्येच ए० आय० न्यायाधीश होऊ शकेल. पण आपल्याकडे न्यायव्यवस्था सर्वात संथपणे स्वतःला सुधारते. त्यामुळे प्रगत राष्ट्रात ही कल्पना रूळेपर्यंत आपण स्वस्थ बसायला हरकत नाही. कदाचित तिथे रूळली तरी आपल्याकडे स्वीकारली जाईलच असे नाही. जे चालकरहित गाड्यांचे झाले तेच इथे भारतात पण होऊ शकते. पण अनेक छोटे देश ही कल्पना अमलात आणू शकतात. आपल्याकडे केसलॉचे डेटाबेस शोधता आले तरी खुप होईल

In reply to by युयुत्सु

रामचंद्र Tue, 06/03/2025 - 10:38
केसलॉचे डेटाबेस शोधता आले तरी> जिथं किरकोळ तांत्रिक स्वरूपाचंच काम असतं पण कर्मचारी वेळकाढूपणा करतात, चहापाणी म्हणत पैसे उकळतात अशी न्यायालयीन तसेच महसूल खात्यातील, नगरपालिका, इ. मधील बरीचशी जनतेशी संबंधित कामं एआयकडून सहज करवून घेता येतील. मात्र हे काम करणारा कर्मचारी लोकांची अडवणूक करण्याची शक्यता आहेच.

कंजूस Tue, 06/03/2025 - 11:03
संपत्तीचे वारसांत आणि संदिग्ध वारसांत ( यांना वारस म्हणायचे का नाही असे) वाटप कसे करणार? एआइ ते कसे करणार? तर अशा काही गोष्टी वाचून त्यावरून सुचवणार. उदाहरणार्थ - एका माणसाकडे आठ प्राणी (घोडे/ऊंट/गायी... वगैरे)होते. तो मेल्यावर त्यांच्या तीन मुलांत ते वाटायचे होते. मुलं भांडली पण वाटप ठरेना. एका महाजनाकडे गेले. त्याने त्यांच्याकडच्या एक प्राणी त्यात घालून प्रत्येकाला तीन प्राणी दिले आणि ते मुलांना पटले. मग तो म्हणाला आता माझा मोबदला म्हणून माझ्या एका प्राण्याची किंमत तिघांनी वाटून द्या. तसे केले. तर हे एआइ करेल. पण पटवून घ्यायची तयारी हवी ना?

कपिलमुनी Tue, 06/03/2025 - 12:34
ए आय ची क्षमता अफाट आहे . मध्यंतरी ऑस्ट्रेलियाच्या एका फर्मने शक्य ते सगळे खटले, निकाल डिजिटल करून क्रॉल करून घेतले ( त्यांचा मेटाडेटा ) तयार करून घेतला . आता त्यांचा ए आय जर त्यंचा वकील खटला लढवत असेल तर सग्ळे संदर्भ , रेफरन्स क्ष्णात हजर करतो . आपण केस अपलोड केलि तर मेरीट सांगतो ( जिंकायची शक्यता वगैरे) ..

माहितगार Tue, 06/03/2025 - 18:30
१) अगदी अलिकडेच माझा एक मित्र मल्टीलेव्हल मार्केटींगच्या प्रकाराला भुलला होता, मल्टीलेव्हल मार्केटीन्गच्या बाबतीत कायदे काय सांगतात असे विचारले तर एआय ने व्यवस्थीत माहिती दिली. पण प्रत्येक वेळी एआय अचुकतेने करू शकेल किन्वा एआय नरेटीव्ह बाधीत नसतात असे नव्हे त्यामुळे ते प्रत्यक्ष वकीली सल्ल्याची जागा अद्यापतरी घेऊ शकणार नाहीत. २) सर्वसाधारणपणे पे वॉल्सच्या मागेअ असणारा जुन्या लीगल केसेसची माहिती उपलब्ध करणारा सॉफ्टवेअर सपोर्ट गेली पाच दहावर्षे पासून वकीलांना उपलब्ध आहेच एआय मुळे कदाचीत केसच्या मांडणीचे उर्वरीत काम आणि प्रुफ रिडीग भाषिक दुरुस्त्याण्चे काम सोपे होईल. यातून वकीलांचे काम पूर्ण बंद झाले नाहीतरी त्यांना असीस्टन्ट लोकांची गरज कमी भासेल आणि ज्या वकीलांकडे असीस्टंट नव्हते इंग्रजी भाषेत अंशत कच्ची होते ते इन्ग्रजीत अस्खलीत असलेल्याना चान्गली स्पर्धा देऊ लागतील ३) वकीलानी सबमीट केलेल्या केस्स्टदीज क्रॉसचेक करणे दोन्ही बाजूची परस्पर विरोधी बाजूण्च्या मांडणीची तुलना उपलब्ध करुन देणे आणि निकाल नाही पण निकालाचा रिपिटीटीव्ह भाग लिहिण्यातला वेळ वाचवणे हि कामे ए आय करु शकेल

In reply to by माहितगार

मारवा Tue, 06/10/2025 - 14:46
अगदी अलिकडेच माझा एक मित्र मल्टीलेव्हल मार्केटींगच्या प्रकाराला भुलला होता, मित्राच्या स्कीम मध्ये item काय होता? मी पाहिलेले काही मल्टिमार्केटिंग मध्ये विकले जाणारे items जपानी गादी Nutrition जादुई nutrition चा हजारो किमतीचा डबा Alkaline पाणी बनविणारी काही 2 का 3 लाखाची मशीन क्रिप्टो currency new launch झालेली मल्टिमार्केटिंग ची शाळा माहितीये मला item मध्ये interest वाटतो यंदा काय म्हणे ?

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 19:18
कृत्रिम बुद्धिमत्ते मुळे न्यायालयीन निकालांचे अनेक संदर्भ चुटकीसरशी हाती लागतात आणि आपल्याला हवा तो निवाडा न्यायालयात सादर करता येतो. परंतु जोवर न्यायाधीश आणि कायदे करणारी माणसेच आहेत तोवर न्यायसंस्थेत माणसांची गरज संपणारी नाही. कायद्याचा अर्थ कसा लावायचा हा पण एक भाग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कक्षेच्या बाहेरचा आहे. उदा. १७ व्य वर्षी मुलीचे लग्न करून दिले तर तो गुन्हा आहे परंतु कुणीच तक्रार करत नसेल तर केवळ कायद्यावर बोट ठेवून त्या जोडप्याला विभक्त करायचे का? किंवा त्या नवऱ्याला बलात्काराच्या आरोपाखाली १४ वर्षे तुरुंगात पाठवायचे. अज्ञान मुलीशी संबंध ठेवला तर तो बलात्कार ठरतो. एकंदर समाजाची ठेवण पाहून तारतम्य बाळगून निकाल द्यायला लागतो यासाठी न्यायाधीशांना वैकल्पिक अधिकार दिलेले आहेत. अमेरिकेत तर एका राज्यात गुन्हा असणारी गोष्ट दुसऱ्या राज्यात सर्रास मान्यता प्राप्त आहे. उदा चरस पिणे. अशा स्थितीत जर माणूस शेजारच्या राज्यात चरस पिऊन आला आणि इकडे दंगा केला तर ती स्थिती कशी कायद्यात बसवायची याबद्दल बरीच धूसरता आहे. अर्थात हि अगदीच ढोबळ उदाहरणे आहेत. त्यातून जोवर येणाऱ्या न्यायाधीशांची आणि वकिलांची पिढी कृत्रिम बुद्धिमत्ता शिकून त्यात पारंगत होत नाही तोवर न्यायसंस्थेतून वकील जाणार नाहीत हे नक्की. यामुळे आता वकीलांना लवकरच "टाटा-बायबाय" करायची वेळ आली आहे हे विधान सध्या तरी अतिशयोक्त वाटतं.

In reply to by सुबोध खरे

गवि Wed, 06/11/2025 - 05:50
कायद्याचा अर्थ कसा लावायचा हा पण एक भाग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कक्षेच्या बाहेरचा आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातच सध्या काम असल्याने इथे विनम्र असहमती नोंदवू इच्छितो. उलट या गोष्टी खास करून AI अधिक चांगल्या हॅण्डल करेल. इट्स अ मॅटर ऑफ टाईम. अगदी तुम्ही दिलेली दोन उदाहरणे पाहिली तरी त्यात AI सहज त्या गोष्टी पाहून अधिक योग्य निर्णय घेऊ शकतो. मुळात AI हा मानवी ऐतिहासिक डेटा वरुनच "ट्रेन" होत असतो. आणि त्याच्याकडे प्रचंड डेटा एकावेळी शिकून त्यातले सर्व सूक्ष्म ताणेबाणे आत्मसात करण्याची शक्ती आहे जी आपल्यात नाही.

In reply to by गवि

सुबोध खरे Wed, 06/11/2025 - 11:55
कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ सत्य काय ते सांगू शकेल. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे कि निकाल देण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार ति च्याकडे नाही तोवर कृत्रिम बुद्धिमत्ता काहीही करू शकणार नाही जोवर निकाल देणे हे न्यायाधिशांच्या हातात आहे तोवर कृत्रिम बुद्धिमत्ता काहीही करू शकणार नाही. ज्यांनी प्रत्यक्ष न्यायालयात काम केलं आहे अशा वकिलांना विचारून पहा. जर न्यायाधीशांनी ठरवलं असेल कि आरोपीला जामीन द्यायचा नाही तर तुम्ही हवे तितके पुरावे आणा, जामीन नाकारला जातो. किंवा न्यायाधीशांनी ठरवले कि जामीन द्यायचा कि कितीही गंभीर गुन्हा असो जामीन दिला जातो. माझ्या स्वतःच्या केस मधेय सर्वोच्च न्यायालयात न्या बी एन श्रीकृष्ण यांनी माझ्याविरुद्ध असा पवित्रा घेतला होता कि लष्कराच्या बाबीत न्यायालयाने हस्तक्षेप करू नये म्हणून ते माझी केस परत संरक्षण मंत्रालयाकडे पाठवणार होते. त्यांना परोपरीने विनवले कि उच्च न्यायालयाने केस संरक्षण मंत्रालयाकडे पाठवलेली होती तरी सुद्धा न्याय झाला नाही. त्यावर त्यांचा एकच हेका चालू होता . शेवटी कसे बसे ते केस दाखल करून घेण्यास तयार झाले. केस दाखल केल्यावर त्यांनतर येणाऱ्या सर्वच्या सर्व नऊ खंडपीठानी मला लष्करी सेवेतून मुक्त करायला हवे हे माझे म्हणणे मान्य केले होते आणि शेवटी साडे तीन वर्षांनी निकाल माझ्या बाजूने लागला. माझ्याच रूममेटची केस दिल्ली उच्च न्यायालयाने परत संरक्षण मंत्रालयाकडे पाठवली त्यांनी सध्या आम्ही याला सेवामुक्त करू शकत नाही असा निर्णय दिला आणि तो दिल्ली उच्च न्यायालयाने मान्य केला. माझा हा मित्र अजूनही लष्करी सेवेत आहे लेफ्टनंट जनरल म्हणून. माझ्या सुदैवाने मुंबई उच्च न्यायालयाने संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे साफ नाकारले यास्तव सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले होते शेवटी सत्य तेच असते जे तुम्ही न्यायालयात सिद्ध करू शकाल अशा परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता काय करेल? अमेरिकेत ओहायो या राज्यात जर गर्भ हा फेलोपियन ट्यूब मध्ये असेल तर तो तेथून काढून गर्भाशयात रोपण करावा पण गर्भपात करायचा नाही असा कायदा केला होता. Ohio bill orders doctors to ‘reimplant ectopic pregnancy’ or face 'abortion murder' charges. Ohio introduces one of the most extreme bills to date for a procedure that does not exist in medical science. https://www.theguardian.com/us-news/2019/nov/29/ohio-extreme-abortion-bill-reimplant-ectopic-pregnancy. This is the second time practising obstetricians and gynecologists have tried to tell the Ohio legislators that the idea is currently medically impossible. Reimplantation is not physiologically possible. Women with ectopic pregnancies are at risk for catastrophic hemorrhage and death in the setting of an ectopic pregnancy, and treating the ectopic pregnancy can certainly save a mom’s life. आता जगभरात कुठेही असे रोपण यशस्वी होत नाही. ट्यूब मधील गर्भ वाढून शेवटी ट्यूब फाटते आणि प्रचंड रक्तस्त्राव होऊन आईचा जीव जातो यासाठी सध्या तरी गर्भपात हा केवळ एकच उपाय आहे. परंतु ओहायो राज्यात स्त्रीरोगतज्ज्ञाने जर गर्भपात केला तर त्याच्यावर सदोष मनुष्यवधाखाली खटला भरला जाईल. Another new crime, “aggravated abortion murder”, is punishable by death, according to the bill. यामुळे तेथील कित्येक स्त्रीरोगतज्ज्ञ तेथून गाशा गुंडाळून दुसऱ्या राज्यात व्यवसाय करायला गेले. यानंतर हा कायदा परत रद्दबातल केला आहे असे ऐकतो. आपल्याकडे एक कायदा आहे. आपल्या खाजगी वाहनात दुसऱ्या ( अज्ञात )माणसाला लिफ्ट देणे हा गुन्हा आहे. तम्ही खाजगी व्यवसाय करता असे गृहीत धरले जाईल. कायद्याचा असा अर्थ लावून नव्या मुंबईत एका माणसाला पोलिसांनी दंड केला होता. या सज्जन माणसाने पावडसात अडकलेल्या तीन नागरिकांना लिफ्ट देण्याचे दुष्कृत्य केले होते. न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे कायद्यानुसार असून त्याचा दंड कायम केला आणि अज्ञात माणसाला लिफ्ट देणे हा गुन्हा आहे असे मान्य केले https://www.moneycontrol.com/news/india/mumbai-man-fined-for-giving-lift-to-strangers-stuck-in-rain-2628691.html तेंव्हा आपली कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही हुषार असली तरी कायदे करणारे/ कायद्याचा अर्थ लावणारे गाढव असले तर काहीही करता येणार नाही.

विजुभाऊ Wed, 06/11/2025 - 09:48
ए आय ला एकच प्रश्न वेगळ्याप्रकारे विचारला तर वेगवेगळे उत्तर येते उदा: तंबाखू खाणे हे आरोग्यासाठी कसे चांगले आहे हा प्रश्न तमबाखू खाणे आरोग्यासाठी कसे वाईट आहे असा विचारला तर वेगळी उत्तरे येतात

युयुत्सु Wed, 06/11/2025 - 10:40
ए आय ला एकच प्रश्न वेगळ्याप्रकारे विचारला> मग बिघडले काय? ए० आय० सर्व बाजू (विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने) मांडतो. वकील पण (नीतिमत्ता बाजूला ठेऊन) असेच करतात. ए०आय० वर मानवी नीतिमत्ता लादणे मला तरी मान्य नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
ए० आय० ने अनेक क्षेत्रात धूमाकूळ घालत आपले पाय रोवले आहेत. ए० आय० मुळे आता वकीलांना लवकरच "टाटा-बायबाय" करायची वेळ आली आहे. असे झाले तर कायद्याच्या लढाया लढण्यासाठी उर्मट आणि स्वत:च्याच अशीलांचे रक्त पिणार्‍या, तसेच फसवणार्‍या वकीलांना मोठी जरब बसेल अशी चिन्हे आहेत. अर्थात अडाणी लोकांना ही जमात फसवत राहीलच... https://youtu.be/WoqcSIcdx-Y?si=FURG5R1kytIfSUeB

पुस्तकं..

आजी ·

युयुत्सु Mon, 05/26/2025 - 14:45
मी पण मूळचा पुस्तक-वेडा पण आता युटयूबला पुस्तकांपेक्षा श्रेष्ठ मानतो- कारण केवळ एकरेषीय ज्ञानग्रहणापेक्षा दृक-श्राव्य ज्ञानग्रहण केव्हाही उत्तम! काही विषय पुस्तकं वाचून शिकायला किती वर्षे लागली असती माहित नाही, पण युटयूबमुळे अनेक अवघड गोष्टी कधी कळायला लागल्या लक्षातच आलं नाही. त्यातही भारतीय सादरकर्ते आणि शिक्षक यांच्यापेक्षा पाश्चात्य शिक्षक मला जास्त प्रभावीपणे या माध्यमाचा वापर करतात. इतकं की त्यामुळे आता आमच्या आय० आय० टी० मधले अनेक "विद्यार्थीप्रिय" प्राध्यापक सुद्धा आता रटाळ वाटतात.

कंजूस Mon, 05/26/2025 - 15:26
पुस्तक वाचनवेड आवडलं. मलाही होतं आणि अजूनही आहे. पण चांगली वाचनालये जवळ असल्याने संग्रह करावा लागला नाही. जी काही आहेत ती संदर्भ ग्रंथ किंवा स्वस्तात मिळालेली घेतली आहेत. पुढे ती रद्दीतच जाणार हे निश्चित.

किल्लेदार Tue, 05/27/2025 - 10:47
मलाही लहानपणापासूनच पुस्तकांची गोडी लागली त्यात चांदोबा, चंपक आदी मराठी आणि बऱ्याचश्या हिंदी कॉमिक्सचा समावेश होता. हिंदी सुधारण्यात तर कॉमिक्सनी सिंहाचा वाटा उचललाय. कॉमिक्स फार पूर्वी लायब्ररीला दान करून टाकली असली तरी दोन कपाटं भरून पुस्तकं आजही आहेत. एक खाणा साडेतीनशे - चारशे नॅशनल जिओग्राफिकच्या अंकांनी खच्चून भरलाय. पूर्वी कुणाला पुस्तक दिलं की त्याची नोंद एका पिवळ्या "पोस्टइट" कागदावर करून तो मी बाहेरच्या दाराच्या आतल्या बाजूला चिकट वून ठेवत असे . त्यामुळे दर वेळी प्रत्येकाला घरातून बाहेर पडताना बाहेर गेलेल्या पुस्तकांची यादी, पुस्तक नेल्याची तारीख नेणाऱ्याच्या नावासकट दिसायची. पुस्तकं निमूटपणे परत केल्या जायची.

युयुत्सु Mon, 05/26/2025 - 14:45
मी पण मूळचा पुस्तक-वेडा पण आता युटयूबला पुस्तकांपेक्षा श्रेष्ठ मानतो- कारण केवळ एकरेषीय ज्ञानग्रहणापेक्षा दृक-श्राव्य ज्ञानग्रहण केव्हाही उत्तम! काही विषय पुस्तकं वाचून शिकायला किती वर्षे लागली असती माहित नाही, पण युटयूबमुळे अनेक अवघड गोष्टी कधी कळायला लागल्या लक्षातच आलं नाही. त्यातही भारतीय सादरकर्ते आणि शिक्षक यांच्यापेक्षा पाश्चात्य शिक्षक मला जास्त प्रभावीपणे या माध्यमाचा वापर करतात. इतकं की त्यामुळे आता आमच्या आय० आय० टी० मधले अनेक "विद्यार्थीप्रिय" प्राध्यापक सुद्धा आता रटाळ वाटतात.

कंजूस Mon, 05/26/2025 - 15:26
पुस्तक वाचनवेड आवडलं. मलाही होतं आणि अजूनही आहे. पण चांगली वाचनालये जवळ असल्याने संग्रह करावा लागला नाही. जी काही आहेत ती संदर्भ ग्रंथ किंवा स्वस्तात मिळालेली घेतली आहेत. पुढे ती रद्दीतच जाणार हे निश्चित.

किल्लेदार Tue, 05/27/2025 - 10:47
मलाही लहानपणापासूनच पुस्तकांची गोडी लागली त्यात चांदोबा, चंपक आदी मराठी आणि बऱ्याचश्या हिंदी कॉमिक्सचा समावेश होता. हिंदी सुधारण्यात तर कॉमिक्सनी सिंहाचा वाटा उचललाय. कॉमिक्स फार पूर्वी लायब्ररीला दान करून टाकली असली तरी दोन कपाटं भरून पुस्तकं आजही आहेत. एक खाणा साडेतीनशे - चारशे नॅशनल जिओग्राफिकच्या अंकांनी खच्चून भरलाय. पूर्वी कुणाला पुस्तक दिलं की त्याची नोंद एका पिवळ्या "पोस्टइट" कागदावर करून तो मी बाहेरच्या दाराच्या आतल्या बाजूला चिकट वून ठेवत असे . त्यामुळे दर वेळी प्रत्येकाला घरातून बाहेर पडताना बाहेर गेलेल्या पुस्तकांची यादी, पुस्तक नेल्याची तारीख नेणाऱ्याच्या नावासकट दिसायची. पुस्तकं निमूटपणे परत केल्या जायची.
आपण सगळेच पुस्तकाला पवित्र मानतो. समग्र जगाचं ज्ञान देणारी खिडकी मानतो. "न हि ज्ञानेनसदृशं पवित्रं इह विद्यते", म्हणजे ज्ञानाइतकं पवित्र या जगात दुसरं काही नाही. असं वचन आहे. हे ज्ञान आपल्याला पुस्तकं देतात. जेव्हा माणसाला छपाईचं तंत्र अवगत नव्हतं तेव्हा मौखिक परंपरेने ज्ञान मिळवले जात होते. आपले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपनिषदे,ही मौखिक परंपरेने चालत आलेली आहेत. नंतर त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली. या ग्रंथांचे लेखक अज्ञात आहेत, म्हणून त्यांना अपौरुषेय असं म्हटलं जातं.

प्रा. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली

कपिलमुनी ·

प्रचेतस Tue, 05/20/2025 - 14:49
____/\_____ अतिशय आदरणीय व्यक्ती. डॉ. नारळीकरांना श्रद्धांजली.

Bhakti Tue, 05/20/2025 - 16:13
शाळेत असताना नारळीकरांच्या व्यक्तिमत्वाने खुप प्रभावित व्हायचे.या मराठी शास्त्रज्ञांच्या कारकिर्दीमुळे विज्ञानाकडे आकृष्ट होत राहिलो. डॉ.जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली .

नारळीकरांचा सहवास मला काही काळ मिळाला आहे. लोकसत्ता रविवार दि.१३ एप्रिल २००३ लोकरंग पुरवणी त "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...........प्रश्नोत्तरातून सुसंवाद" या माझ्या पुस्तकाचे प्रो.जयंत नारळीकर यांनी लिहिलेले परीक्षण https://faljyotishachikitsa.blogspot.com/2006/09/blog-post_115858511190534826.html 2008 साली झालेल्या फलज्योतिष चाचणी प्रकल्पाचा मी समन्वयक होतो

स्वधर्म गुरुवार, 05/22/2025 - 17:37
प्रकांड विद्वान असूनही साधे नम्र व्यक्तीमत्व होणे अवघड आहे. कोणत्याही पद व प्रतिष्ठेच्या मागे न लागता विज्ञानाचाच ध्यास घेऊन ते कार्य करत राहिले. बाकी प्रसिध्द शास्त्रज्ञ व नाऱळीकर सर यांच्यातला हा फरक नेहमी जाणवतो. त्यांचे विचार व काम देशाला प्रेरणा देत राहील.

शशिकांत ओक Fri, 05/23/2025 - 23:48
कै. डॉ जयंत नारळीकर यांना सादर श्रध्दांजली... हवाईदलात दूर पोस्टींगवर असल्याने डॉ नारळीकरांशी भेट होणे शक्य नव्हते. पण नाडी भविष्य विषयामुळे मला अशा मोठ्या लोकांच्या गाठीभेटी होतात की कल्पना करणे अशक्य असते. त्यापैकी डॉ नारळीकर एक होते. त्यांना ताडपत्रावर कोरून लिहिलेल्या मजकुरात आपले नाव व अनेक माहिती कूट तमिळमधे लिहिलेली असते हे तत्वतः मान्य नव्हते. ते त्यांचे वैयक्तिक मत होते. आपण या ताडपट्टीवरील कथनाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा अशी विनंती करायला मला त्यांना आयुकाच्या ऑफिसमधे भेट घ्यायची संधी मिळाली. एक सुसंस्कृत, मान्यवर, ज्ञानी, शास्त्रज्ञ म्हणून मला नेहमीच आदरणीय होते.

प्रचेतस Tue, 05/20/2025 - 14:49
____/\_____ अतिशय आदरणीय व्यक्ती. डॉ. नारळीकरांना श्रद्धांजली.

Bhakti Tue, 05/20/2025 - 16:13
शाळेत असताना नारळीकरांच्या व्यक्तिमत्वाने खुप प्रभावित व्हायचे.या मराठी शास्त्रज्ञांच्या कारकिर्दीमुळे विज्ञानाकडे आकृष्ट होत राहिलो. डॉ.जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली .

नारळीकरांचा सहवास मला काही काळ मिळाला आहे. लोकसत्ता रविवार दि.१३ एप्रिल २००३ लोकरंग पुरवणी त "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...........प्रश्नोत्तरातून सुसंवाद" या माझ्या पुस्तकाचे प्रो.जयंत नारळीकर यांनी लिहिलेले परीक्षण https://faljyotishachikitsa.blogspot.com/2006/09/blog-post_115858511190534826.html 2008 साली झालेल्या फलज्योतिष चाचणी प्रकल्पाचा मी समन्वयक होतो

स्वधर्म गुरुवार, 05/22/2025 - 17:37
प्रकांड विद्वान असूनही साधे नम्र व्यक्तीमत्व होणे अवघड आहे. कोणत्याही पद व प्रतिष्ठेच्या मागे न लागता विज्ञानाचाच ध्यास घेऊन ते कार्य करत राहिले. बाकी प्रसिध्द शास्त्रज्ञ व नाऱळीकर सर यांच्यातला हा फरक नेहमी जाणवतो. त्यांचे विचार व काम देशाला प्रेरणा देत राहील.

शशिकांत ओक Fri, 05/23/2025 - 23:48
कै. डॉ जयंत नारळीकर यांना सादर श्रध्दांजली... हवाईदलात दूर पोस्टींगवर असल्याने डॉ नारळीकरांशी भेट होणे शक्य नव्हते. पण नाडी भविष्य विषयामुळे मला अशा मोठ्या लोकांच्या गाठीभेटी होतात की कल्पना करणे अशक्य असते. त्यापैकी डॉ नारळीकर एक होते. त्यांना ताडपत्रावर कोरून लिहिलेल्या मजकुरात आपले नाव व अनेक माहिती कूट तमिळमधे लिहिलेली असते हे तत्वतः मान्य नव्हते. ते त्यांचे वैयक्तिक मत होते. आपण या ताडपट्टीवरील कथनाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा अशी विनंती करायला मला त्यांना आयुकाच्या ऑफिसमधे भेट घ्यायची संधी मिळाली. एक सुसंस्कृत, मान्यवर, ज्ञानी, शास्त्रज्ञ म्हणून मला नेहमीच आदरणीय होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय खगोलशास्त्र आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्र यांचे दिग्गज प्रा. जयंत नारळीकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ भारतीय विज्ञानच नाही तर जागतिक विज्ञानसमाजानेही एक महान विचारवंत, संशोधक आणि समाजसुधारक गमावला.

आव्वाज आव्वाज..

आजी ·

In reply to by प्रकाश घाटपांडे

स्वधर्म गुरुवार, 05/22/2025 - 17:26
आजींचा मूड बघता त्यांना हे कबीर भजन आवडेल असे वाटते: https://youtu.be/wWqRYmHR9XA?si=e33ElUakiCywJoZV मला लक्ष्मी शंकर यांचा आवाज आणि त्यातले संगीत अगदी शांतवणारे वाटते. कबीराच्या रचनांबद्दल काय बोलायचे?

सौंदाळा Wed, 05/14/2025 - 20:01
आनंदाच्या प्रमाणात डेसिबल्स वाढतात हल्ली लोकांचे. परीक्षांचा कालावधी, म्हातारी माणसे, अर्भके, शाळा, दवाखाने, काळ-वेळ याचे काही सोयर-सुतक नसते लोकांना.

गवि Sun, 05/18/2025 - 06:45
खूप मोठा आवाज केल्याशिवाय कोणताच कार्यक्रम सुफळ संपूर्ण होत नसतो अशी एक समजूत वाढते आहे हे नक्की. देवाचे तर कान बधिर झाले असतील कंठाळी भक्तिगीते ऐकून. त्याने कान बंद करून घेतले आहेत यात आश्चर्य नाही.

लेखनातला आशय पोहचला. आता भजन, आरत्या आणि सर्व धार्मिक परंपरा असलेल्या कार्यक्रमाचं स्वरुप दिवसेंदिवस अधिक बदलत चाललं आहे. भक्ती कमी आणि प्रदर्शन वाढलं आहे. विलाज नाही. एकतर सहन करावे किंवा बाहेर पडावे असे होऊन जाते. यजमान दुखावल्या जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. दिवसभरांच्या श्रमानं कानावर पडणारा भजनाचा तो गोड आवाज, टाळ मृदुंगाचं एकरुप होणं आनंदायी असायचं. आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे गुरुवार, 05/22/2025 - 10:10
आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. जिथे तिथे आपला पूर्वग्रह आणलाच पाहिजे का? मी रात्री दहा नंतर डी जे चालू असेल तर १०० वर फोन करून पोलिसांना फोन करतो. जवळच एका नगरसेवकाच्या गणपतीसाठी रात्री साडे दहा पर्यंत चालू असलेला डी जे मी प्रत्यक्ष जाऊन विनंती करून बंद केला. ( पोलीस फक्त हो हो येतो करत होते). आपण डीजे चा बीभत्स आवाजच कशाला ढोल ताशे सुद्धा बंद करू शकता. मिपावरच एकाने ढोल ताशे वर टाकलेल्या लेखात मी त्याविरुद्ध लिहिलेले होते त्यात आपला पूर्वग्रह आणायची आवश्यकता नाही

श्वेता२४ गुरुवार, 05/22/2025 - 12:32
आजी तुमचं लिखाण नेहमीच भावतं व पटतंदेखील कारण ते आपलं वाटतं. गणपती, नवरात्र, लग्न यांच्यामुळे होणाऱ्या आवाजकल्लोळात अजुन एक भर म्हणजे हळद या महाभयंकर समारंभाची. याचे आयोजन बहुदा रात्रीच केले जाते आणि मग होळी/रंगपंचमीपेक्षाही अगाउपणाला उत येऊन डीजेसोबत तरुणाईच्या किंकाळ्यांनी हल्लकल्लोळ माजतो. मीही मग बिनदिक्कत १० वाजून १ मिनीटांनी पोलिसांना फोन करते व त्यांच्या उत्साहावर पाणी फेरते.

स्वधर्म गुरुवार, 05/22/2025 - 17:33
आजी, तुमचे लिखाण नेहमीच आवडते. अगदी रोजच्या जीवनातले अनुभव आंम्ही जगतो आणि विसरून जातो. तुंम्ही त्यांना छान परत परत वाचावंसं वाटेल याप्रकारे पकडून ठेवता. सांगलीत 'प्रामुख्याने हिंदी, गुजराती, पंजाबी, थोडी मराठी' भजन असल्याचे नवल वाटले. अजून तरी बहुतांश वारकरी किंवा एकतारी/ नाथपंथी भजने असतील असे वाटत होते. पण सिनेमातील गाण्याच्या चालीवर भजने म्हणजे काय च्या कायच वाटते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

स्वधर्म गुरुवार, 05/22/2025 - 17:26
आजींचा मूड बघता त्यांना हे कबीर भजन आवडेल असे वाटते: https://youtu.be/wWqRYmHR9XA?si=e33ElUakiCywJoZV मला लक्ष्मी शंकर यांचा आवाज आणि त्यातले संगीत अगदी शांतवणारे वाटते. कबीराच्या रचनांबद्दल काय बोलायचे?

सौंदाळा Wed, 05/14/2025 - 20:01
आनंदाच्या प्रमाणात डेसिबल्स वाढतात हल्ली लोकांचे. परीक्षांचा कालावधी, म्हातारी माणसे, अर्भके, शाळा, दवाखाने, काळ-वेळ याचे काही सोयर-सुतक नसते लोकांना.

गवि Sun, 05/18/2025 - 06:45
खूप मोठा आवाज केल्याशिवाय कोणताच कार्यक्रम सुफळ संपूर्ण होत नसतो अशी एक समजूत वाढते आहे हे नक्की. देवाचे तर कान बधिर झाले असतील कंठाळी भक्तिगीते ऐकून. त्याने कान बंद करून घेतले आहेत यात आश्चर्य नाही.

लेखनातला आशय पोहचला. आता भजन, आरत्या आणि सर्व धार्मिक परंपरा असलेल्या कार्यक्रमाचं स्वरुप दिवसेंदिवस अधिक बदलत चाललं आहे. भक्ती कमी आणि प्रदर्शन वाढलं आहे. विलाज नाही. एकतर सहन करावे किंवा बाहेर पडावे असे होऊन जाते. यजमान दुखावल्या जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. दिवसभरांच्या श्रमानं कानावर पडणारा भजनाचा तो गोड आवाज, टाळ मृदुंगाचं एकरुप होणं आनंदायी असायचं. आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे गुरुवार, 05/22/2025 - 10:10
आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. जिथे तिथे आपला पूर्वग्रह आणलाच पाहिजे का? मी रात्री दहा नंतर डी जे चालू असेल तर १०० वर फोन करून पोलिसांना फोन करतो. जवळच एका नगरसेवकाच्या गणपतीसाठी रात्री साडे दहा पर्यंत चालू असलेला डी जे मी प्रत्यक्ष जाऊन विनंती करून बंद केला. ( पोलीस फक्त हो हो येतो करत होते). आपण डीजे चा बीभत्स आवाजच कशाला ढोल ताशे सुद्धा बंद करू शकता. मिपावरच एकाने ढोल ताशे वर टाकलेल्या लेखात मी त्याविरुद्ध लिहिलेले होते त्यात आपला पूर्वग्रह आणायची आवश्यकता नाही

श्वेता२४ गुरुवार, 05/22/2025 - 12:32
आजी तुमचं लिखाण नेहमीच भावतं व पटतंदेखील कारण ते आपलं वाटतं. गणपती, नवरात्र, लग्न यांच्यामुळे होणाऱ्या आवाजकल्लोळात अजुन एक भर म्हणजे हळद या महाभयंकर समारंभाची. याचे आयोजन बहुदा रात्रीच केले जाते आणि मग होळी/रंगपंचमीपेक्षाही अगाउपणाला उत येऊन डीजेसोबत तरुणाईच्या किंकाळ्यांनी हल्लकल्लोळ माजतो. मीही मग बिनदिक्कत १० वाजून १ मिनीटांनी पोलिसांना फोन करते व त्यांच्या उत्साहावर पाणी फेरते.

स्वधर्म गुरुवार, 05/22/2025 - 17:33
आजी, तुमचे लिखाण नेहमीच आवडते. अगदी रोजच्या जीवनातले अनुभव आंम्ही जगतो आणि विसरून जातो. तुंम्ही त्यांना छान परत परत वाचावंसं वाटेल याप्रकारे पकडून ठेवता. सांगलीत 'प्रामुख्याने हिंदी, गुजराती, पंजाबी, थोडी मराठी' भजन असल्याचे नवल वाटले. अजून तरी बहुतांश वारकरी किंवा एकतारी/ नाथपंथी भजने असतील असे वाटत होते. पण सिनेमातील गाण्याच्या चालीवर भजने म्हणजे काय च्या कायच वाटते.
आमच्या सोसायटीत सगळे बंगलेच आहेत. आपापली घरं फक्त कामवाल्यांसाठी उघडून आणि त्या कामं करून गेल्यावर ती पुन्हा बंद करून सगळ्या गृहिणी टीव्हीवर, आणि आताशा ओटीटीवर सिनेमे किंवा हिंदी भाषेतल्या कौटुंबिक मालिका बघत बसतात. पण त्या अधुनमधून बंगल्याबाहेरही पडतात. भिशी,किटी पार्टी, हळदीकुंकू,बारशी, वाढदिवस,भजन, सत्यनारायणाची पूजा, इत्यादी त्या थाटामाटात आणि एकत्र येऊन साजरे करतात. यात थोडा बदल म्हणून मी त्यांना घरपोच लायब्ररी चालू करणे, रीडर्स क्लब, साहित्य कट्टा, चांगल्या वक्त्यांची भाषणे, चांगल्या गायकांच्या गाण्याचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम सुचवून पाहिले पण त्याला शून्य प्रतिसाद मिळाला.