समाज
पेडगाव -धर्मवीर गड-पारगाव
दोन-तीन महिन्यांत १२००-२००० वर्षे जुनं पुरातन काळ्या पाषाणात कोरलेल्या,सहज नैसर्गिक भावमुद्रेत अनंत काळापासून उभ्या मूर्ती पाहिल्या नाही की काळाच चक्र", पुढेच जात आहे ,जरा मागे डोकावून पहायला हवं असं वाटतं.वकील
नुकतच गाजलेल्या दिनानाथ प्रकरणावर विचार करत असताना समाज कसा दुट्प्पी आणी व विवेकभ्रष्ट बनला आहे याचा विचार करत असताना माझी एक जुनी पोस्ट आठवली. मग लक्षात आले की समाजात असे काही व्यवसाय आहेत की ते प्रेताच्या टाळू वरचे लोणी खाऊनच जगतात. त्यातला एक म्ह० वकीली आणि दुसरा म्ह माध्यमे. समाज दुभंगण्यात या दोन व्यवसायांचा हातभार मोठा आहे...
आज डॉक्टर घैसासाना जी शिक्षा होत आहे, तशी शिक्षा वकीलांना होते का? तर नाही. दूरदर्शनवर जेव्हा फक्त संध्याकाळी ७ च्या आणि नंतर रात्री ९ च्या बातम्या शांतपणे आणि आरडाओरडा न करता दिल्या जात होत्या तेव्हा तूलनेने समाज पण आजच्या तुलनेत शांत होता.
(ताज्या घडामोडी~ एप्रिल फूल २०२५)
चार भिडू डावे
उजवेही चार
कुंपणाच्या वर
दोन भिडू
भिडू भिडतात
त्वेषे परस्परा
मौज ही इतरा
फुकटची
राजकारणाच्या
व्यतिरिक्त काही
घडतची नाही
देशात ह्या
ऐसा आविर्भाव
भिडू बाळगती
आता झाले अती
हौस फिटे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे ज्यांनी भारताच्या सामाजिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली, भारताचे संविधान लिहिले .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अजून एक पैलू म्हणजे त्यांचे इकॉनॉमिक्स या क्षेत्रातील योगदान! त्यांनी या विषयात अनेक डिग्री मिळवल्या आणि त्यांनी यात त्यांची डॉक्टरेट पण मिळवली होती . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय आणि त्याचे भारतीय इतिहासातील महत्त्व आपण या लेखात बघणार आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महान विचारवंत, समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
बाजाराचा कल : १४ एप्रिलचा आठवडा
बाजाराचा कल : १४ एप्रिलचा आठवडा
======================================
मंडळी,
युयुत्सुनेटने परत एकदा अचूक भविष्यवाणी केली.
गॅप डाउनमुळे हिरवी मेणबत्ती तयार झाली असली तरी या आठवड्याचा बंद मागच्या आ्ठवड्याच्या बंदच्या खाली आहे. त्यामुळे एकूण परिणाम घसरण हा आहे.
या आठवड्यात आणखी एक गंमत झाली. टॅरीफ वॉरमुळे बाजारात मोठे चढाव-उतार (व्होलॅटीलिटी) आले. मी युयुत्सूनेट्ची दैनंदिन भाकीते पण तपासत असतो. या आठवड्यातील चढ-उतार युयुत्सुनेट्ला झेपले नाहीत आणि त्याने मान टाकली. इतके दिवस सगळे व्यवस्थित चालू असताना या अचानक उद्भवलेल्या अडचणीने मी पण वैतागलो.
एक आधुनिक सत्यनारायण कथा
सत्यनारायण कथेचे अधिक आधुनिक व्यवस्थापन तत्त्वांवर आधारित पुनर्सादरीकरण खालीलप्रमाणे:
१. पहिला अध्याय - ग्राहक केंद्रितता, नेटवर्किंग आणि निरंतर सुधारणा:
अरुण नावाचा एक तरुण उद्योजक होता, जो पारंपरिक फर्निचर व्यवसायात नवनवीन प्रयोग करत होता. त्याला त्याच्या व्यवसायात वाढ हवी होती.
एक दिवस त्याला, मार्गदर्शन करणारे एक अनुभवी व्यावसायिक, विनय भेटले. विनयने त्याला सत्यनारायण व्रताचे महत्त्व सांगितले, पण त्यासोबतच आधुनिक व्यवस्थापन तत्त्वेही सांगितली.
राम प्रहरीची भटकंती - स्वैर चिंतन २
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे.
परवा भाबडीची आई देवा घरी गेली. खरे म्हणजे पुण्यात स्लो लर्नर भाबड्या मुलांसाठी विद्याज्योती नावाची एक विशेष शाळा आहे, तिथे त्यांना समाजात सामावून घेण्यासाठी साजेसे शिक्षण सॉफ्ट स्कील व व्होकेशनल शिक्षण उपलब्ध आहे. विद्याज्योती शाळेबद्दलच्या या युट्यूब डोक्युमेंटरीनुसार दर शंभरातील पाच व्यक्ती स्लोलर्नर असू शकतात.
शंतनू नायडू- ध्यास घेतलेला माणूस
✪ शंतनू नायडूची प्रेरणादायी मुलाखत
✪ वाचनासाठी पुरस्कार देण्याची वेळ येऊ नये
✪ "मला रतन टाटांबद्दल प्रश्न विचारू नका!"
✪ मुंबई बूकीज- निसर्गात वाचण्याची चळवळ
✪ पुस्तकं डोनेट करणं सोपं, पण मांडीवर घेऊन वाचनाची गोडी लावणं कठीण
✪ Good fellows India – नातवंड भाड्याने देतो! ती वेळ आलेली आहे
✪ रतन टाटा माझ्यासाठी "डंबलडोर" होते!
✪ आई शिक्षिका. पण घरी शिक्षिका व शाळेत आई
✪ आई म्हणते, मराठी मुलगी मिळाली तर बरं होईल!
सर्वांना नमस्कार. काही दिवसांपूर्वी लोकमत साहित्य पुरस्कार कार्यक्रमामध्ये टाटा मोटर्समधील जनरल मॅनेजर शंतनू नायडूची मुलाखत बघितली! शंतनू नायडू! आदरणीय रतन टाटांचा तरूण मित्र!
(पावश्या लवकर आलाच आहे तर.....)
हे ताडपत्रीवाल्या,
गतसाली न खपलेल्या मालावरची धूळ झटक
हे पाणीपुरवठा खात्यातल्या टेंडर बाबू,
फिल्टर सफाईच्या निविदांच्या नैवेद्यांची ताटे सजव
हे वृक्षसंवर्धन खात्यातील खात्यापित्या लोकसेवका,
ट्री ट्रिमिंग च्या निमित्ताने कोणते वृक्ष भुईसपाट करायचे ते बिल्डरांबरोबर ठरव
हे नगर सेवका,
नालेसफाईच्या हातसफाईवरच्या श्वेतपत्रिकेचा कच्चा खर्डा बनवायला घे
हे पालक मंत्र्या,
महापुरोत्तर अन् भूस्खलनोत्तर सहसंवेदनांचे वार्षिक भावविभोर सांत्वनसंदेश बनवायला घे
हे विदग्ध साहित्यिका,
मेघदूताची नव्या अंगाने चिरफाड करणारे तुझे लेख आघाडीच्या वृत्तपत्र पुरवणीत छापून आणायला सेटिंग लाव
हे हायबरनेटिंग कविवर्या
मिसळपाव