Skip to main content

समाज

राहून गेलं !

लेखक आजी यांनी शनिवार, 03/05/2025 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी एका मैत्रिणीकडे गेले होते. म्हणजे आम्ही तिघी शाळेतल्या मैत्रीणी एका मैत्रिणीच्या घरात एकत्र जमलो होतो. दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत गप्पा मारायच्या असा बेत होता. मी त्या मैत्रीणीकडे कुसुमकडे वेळेवर पोहोचले. माझी दुसरी मैत्रीण विजू तीही वेळेवर आली. व्हॉट्सॲप ग्रुप बनून दोन तीन वर्षे झाली असली तरी विजू मला समोरासमोर मात्र शाळेच्या शेवटच्या दिवसानंतर आजच भेटत होती. सुरुवातीलाच आम्ही गळाभेट घेतली. विजूबरोबर तिचा नवरा होता. कुसुमचा नवराही घरात होताच. आम्ही सगळे स्थानापन्न झालो. माझ्या लक्षात आलं की कुसुमच्या फ्लॅटच्या खिडकीबाहेरून बांधकामाच्या ड्रिलिंग मशीनचा कर्कश्श आवाज येतोय.

चैतराम पवारांना पद्म श्री: एक खूप मोठा क्षण!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 29/04/2025 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. चांगल्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत सहसा जात नाहीत. त्यांची पुरेशी दखल घेतली जात नाही. एका अतिशय चांगल्या गोष्टीची माहिती अनेकांना व्हावी म्हणून हा लेख. चैतरामजी पवार! माझी त्यांची ओळख सांगायची तर माझ्या मामाचे- डॉ. आनंद फाटक ह्याचे ते अगदी जवळचे मित्र व सामाजिक क्षेत्रातले सहकारी. बारीपाड्याचा अभ्यास केला होता तेव्हा त्यांचा जवळून सहवास मलाही मिळाला होता. असे चैतराम दादा धुळे जिल्ह्यातील "बारीपाडा" गावामध्ये विकास घडवणारे सूत्रधार! आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर खूप मोठे रूरल इनोव्हेटर. आणखी प्रचलित भाषेत सांगायचं तर ते प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांची संपत्ती कित्येक करोड आहे.

शिवरायांचे औरंगजेबास पत्र (काल्पनीक)

लेखक OBAMA80 यांनी बुधवार, 23/04/2025 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
हे पत्र पूर्णपणे काल्पनीक असून त्यात कोणालाही दुखविण्याचा, धार्मिक तेढ वाढविण्याचा अथवा कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही याची सूज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. ******************************* हे आलमगीर, बऱ्याच वर्षानंतर तुम्हांला पत्र लिहीण्याचा योग आला. तुम्ही हिंदूवर लावलेल्या जिझीया करासंदर्भातील तुम्हांला लिहीलेल्या पत्रानंतर बहुतेक आत्ताच योग आला. आता हे पत्र २१ शतकात लिहीत आहे तेव्हा या पत्राची भाषा देखील मराठी आहे. तुमच्या आयुष्याची शेवटची कित्येक वर्षे तुम्ही महाराष्ट्रात घालविल्यामुळे कदाचित तुम्हांला ही भाषा अवगत झाली असेल अशी अपेक्षा करतो.

पेडगाव -धर्मवीर गड-पारगाव

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 18/04/2025 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
अ दोन-तीन महिन्यांत १२००-२००० वर्षे जुनं पुरातन काळ्या पाषाणात कोरलेल्या,सहज नैसर्गिक भावमुद्रेत अनंत काळापासून उभ्या मूर्ती पाहिल्या नाही की काळाच चक्र", पुढेच जात आहे ,जरा मागे डोकावून पहायला हवं असं वाटतं.

वकील

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 16/04/2025 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतच गाजलेल्या दिनानाथ प्रकरणावर विचार करत असताना समाज कसा दुट्प्पी आणी व विवेकभ्रष्ट बनला आहे याचा विचार करत असताना माझी एक जुनी पोस्ट आठवली. मग लक्षात आले की समाजात असे काही व्यवसाय आहेत की ते प्रेताच्या टाळू वरचे लोणी खाऊनच जगतात. त्यातला एक म्ह० वकीली आणि दुसरा म्ह माध्यमे. समाज दुभंगण्यात या दोन व्यवसायांचा हातभार मोठा आहे... आज डॉक्टर घैसासाना जी शिक्षा होत आहे, तशी शिक्षा वकीलांना होते का? तर नाही. दूरदर्शनवर जेव्हा फक्त संध्याकाळी ७ च्या आणि नंतर रात्री ९ च्या बातम्या शांतपणे आणि आरडाओरडा न करता दिल्या जात होत्या तेव्हा तूलनेने समाज पण आजच्या तुलनेत शांत होता.

(ताज्या घडामोडी~ एप्रिल फूल २०२५)

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 15/04/2025 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
चार भिडू डावे उजवेही चार कुंपणाच्या वर दोन भिडू भिडू भिडतात त्वेषे परस्परा मौज ही इतरा फुकटची राजकारणाच्या व्यतिरिक्त काही घडतची नाही देशात ह्या ऐसा आविर्भाव भिडू बाळगती आता झाले अती हौस फिटे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने

लेखक कपिलमुनी यांनी सोमवार, 14/04/2025 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे ज्यांनी भारताच्या सामाजिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली, भारताचे संविधान लिहिले . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अजून एक पैलू म्हणजे त्यांचे इकॉनॉमिक्स या क्षेत्रातील योगदान! त्यांनी या विषयात अनेक डिग्री मिळवल्या आणि त्यांनी यात त्यांची डॉक्टरेट पण मिळवली होती . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय आणि त्याचे भारतीय इतिहासातील महत्त्व आपण या लेखात बघणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महान विचारवंत, समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

बाजाराचा कल : १४ एप्रिलचा आठवडा

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 12/04/2025 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
बाजाराचा कल : १४ एप्रिलचा आठवडा ====================================== मंडळी, युयुत्सुनेटने परत एकदा अचूक भविष्यवाणी केली. गॅप डाउनमुळे हिरवी मेणबत्ती तयार झाली असली तरी या आठवड्याचा बंद मागच्या आ्ठवड्याच्या बंदच्या खाली आहे. त्यामुळे एकूण परिणाम घसरण हा आहे. या आठवड्यात आणखी एक गंमत झाली. टॅरीफ वॉरमुळे बाजारात मोठे चढाव-उतार (व्होलॅटीलिटी) आले. मी युयुत्सूनेट्ची दैनंदिन भाकीते पण तपासत असतो. या आठवड्यातील चढ-उतार युयुत्सुनेट्ला झेपले नाहीत आणि त्याने मान टाकली. इतके दिवस सगळे व्यवस्थित चालू असताना या अचानक उद्भवलेल्या अडचणीने मी पण वैतागलो.

एक आधुनिक सत्यनारायण कथा

लेखक माहितगार यांनी शनिवार, 12/04/2025 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
सत्यनारायण कथेचे अधिक आधुनिक व्यवस्थापन तत्त्वांवर आधारित पुनर्सादरीकरण खालीलप्रमाणे: १. पहिला अध्याय - ग्राहक केंद्रितता, नेटवर्किंग आणि निरंतर सुधारणा: अरुण नावाचा एक तरुण उद्योजक होता, जो पारंपरिक फर्निचर व्यवसायात नवनवीन प्रयोग करत होता. त्याला त्याच्या व्यवसायात वाढ हवी होती. एक दिवस त्याला, मार्गदर्शन करणारे एक अनुभवी व्यावसायिक, विनय भेटले. विनयने त्याला सत्यनारायण व्रताचे महत्त्व सांगितले, पण त्यासोबतच आधुनिक व्यवस्थापन तत्त्वेही सांगितली.