Skip to main content

समाज

टवाळी

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 06/02/2026 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
 टवाळी -- राजीव उपाध्ये (पूर्वप्रसिद्धी - फेसबुक) १९९३-९४ च्या सुमारास भटकरांनी माझे रखडवलेले प्रमोशन करायचेच असा विडा एका सहकारी-हितचिंतकाने उचलला. माझी बढती रखडवण्याची जी कारणे होती त्यातले एक ठळक कारण म्हणजे भटकरांनी पाळलेले एक मांजर मी त्याच्या हाताखाली पी०एच०डी० करावी म्हणून माझ्या मागे हात धुवून लागले होते.

मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 02/02/2026 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन -राजीव उपाध्ये २०२५ च्या अखेरीस 'नेचर कम्युनिकेशन्स' मध्ये प्रकाशित झालेल्या कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या संशोधनाने मानवी परिपक्वतेच्या पारंपारिक सीमांना पूर्णपणे बदलले आहे. या संशोधनाने मेंदूच्या रचनेचे पाच मुख्य कालखंड आणि ९, ३२, ६६ आणि ८३ हे चार कालखंड पाडले. या वयातील "वळण-बिंदू (टर्निंग पॉईण्ट) ओळखून, हे संशोधन असे स्पष्ट करते की मानवी मेंदू त्याच्या स्थिर आणि पूर्ण विकसित अवस्थेत चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाही. तसेच हे संशोधन असे सूचित करते की, ज्याला सध्या पौंडावस्था (adolescence) मानले जाते, ती अवस्था वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंत सुरू राहते.

कुंपण

लेखक रांचो यांनी शुक्रवार, 23/01/2026 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती. ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे. इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता. वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती. लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.

उलाढाल

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 22/01/2026 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
उत्कट, उत्स्फूर्त हे शब्द आणि या भावना आपण विसरत चाललोय का? अनंताची अगाध ओढ असणाऱ्या आपल्या जीवांना सगळं मिळमिळीत का आवडू लागलंय? पाण्याने बोजड झालेले अवाढव्य ढग एकमेकांना घासावेत असं गडगडाटी हास्य कुठे कोसळून कायमचं संपलं? बांध फुटल्यासारखे रडणारे डोळे आता कुठे आहेत? कुठल्या वाळवंटात गडप झाले? चहूकडे फक्त कोरडे डोळे दिसतात - खाली माना घातलेले; लाजेने! वर तरी कुणाकडे पाहतील? सगळ्याच माना खाली असतात. हनुमानाने भक्तीचा पुरावा दाखवायला स्वतःची छाती फाडली होती म्हणतात. इथे स्वतःचा हात स्वतःच्या छातीवर ठेवला तरी ऊर दडपायला होतं. अंत्ययात्राही निघत नाहीत राव आता. प्रेताकडे टक लावून पाहता यायचं.

व्हेनेझुएला

लेखक खटपट्या यांनी रविवार, 11/01/2026 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका आळसावलेल्या रविवारी माझा परममित्र बंडू सकाळी ८ वाजता माझ्या दारात येऊन उभा राहिला. मी - काय रे इतक्या सकाळी ? बंडू - झोपा काय काढताय ? जगात काय चालू आहे याचा काही थांगपत्ता नसेलच तुमच्या सारख्या लोकांना ! बंडू नेहमी मला "तुमच्यासारख्या लोकांना" असेच संबोधतो. म्हणजे आमच्यासारख्या लोकांचा (म्हणजे कोणत्या लोकांचा हे त्यालाच माहित) एक समूह आहे. आणि मी आमच्या सारख्या लोकांचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे आमच्या सारख्या लोकांना काही सांगायचे असेल तर हा भल्या सकाळी येऊन माझ्यावर तोंडसुख घेतो. मी - काय झालं जगात? मला कसं माहीत असणार ? बंडू - व्हेनेझुएला माहीत आहे का ? मी - नाही ! बंडू - देश आहे एक.

सहज सुचले ते...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 11/01/2026 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
सहजच जसे सुचले तसे... सुकतातची जगिया.. मृत्यू आणि जीवन यावर आजवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. काही जण मृत्यूला काडीचीही किंमत देत नाहीत त्यामुळे त्यांच्या मते जन्मालाही फारसे महत्त्व उरत नाही. उदा. काफ्का काय म्हणतो ते पहा -"ते कधितरी थांबते" एवढाच आयुष्याचा अर्थ आहे... काफ्का मृत्यूबद्दल फारच अलिप्तपणे विचार करतो आहे असे दिसते. काफ्काच्या सगळ्या कथांमधून आणि कादंबऱ्यांमधून आपल्याला हाच दृष्टीकोन पाहण्यास मिळतो.

दहा मिनिटांत घरपोच.

लेखक chetanasvaidya यांनी रविवार, 11/01/2026 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, झेप्टो आणि असे अन्यही खूप क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आता एकमेकांशी स्पर्धा करत दहा मिनिटांच्या डिलिव्हरी शर्यतीत उतरले आहेत. हे डिलिव्हरी करणारे लोक प्रचंड ताणाखाली वेगाने वाहने चालवतात हे आपल्याला रस्त्यात दिसतंच.

सैरभैर डायरी - २.१

लेखक कपिलमुनी यांनी सोमवार, 05/01/2026 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात काय काय गंमती जमती झाल्यात चाळीशी नंतर याच्या आठवणी लिहाव्यात आता असा विचार केला. यात सलगता काही नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील सामान्य घटना ! पहिल्या भागाला प्रतिसाद देणार्यांचे आभार .

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग २: पिथौरागढ़ भ्रमंती

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 02/01/2026 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
३ डिसेंबरची‌ सकाळ! कालची रात्र उघड्या बस स्टॉपवर थंडीत काढल्यानंतरचा पहाटेचा अंधारातला घाटाचा प्रवास! ही रात्र संपणारच नाहीय असं वाटत होतं. पण चक्क रात्र लवकर गेली. डुलकी लागली आणि तास गेलेले कळालं नाही. टाईम लॅप्स फोटोग्राफीमध्ये जसे काही तासांचे काही सेकंद होतात, तशीच रात्र भरभर गेल्यासारखी वाटली! टनकपूरवरून तीनला निघालेली बस साडेपाचला चंपावतला चहासाठी थांबली तेव्हा पहाट झाल्याचं दिसलं! सर्वदूर उंच पर्वत! वळणा वळणांचा रस्ता! डोंगरात थोडी थोडी घरं आणि उतारावरची‌ शेती! "बीआरओ" च्या हिरक परियोजनेच्या अंतर्गत हा रस्ता येतो. नंतर लोहाघाट, गुरना मार्गे पिथौरागढ़!

सैरभैर डायरी - १

लेखक कपिलमुनी यांनी बुधवार, 31/12/2025 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
बेदरकार बेफिकीर असे पुण्यातील त्या दिवसांचे वर्णन करावे लागेल. गावाकडून कोणी येत नव्हता,फोनबिन भानगड नसल्याने काही विचारत नव्हता,घरी सांगत नव्हता. माझ्यासारख्या वळूला एवढे पुरेसे होते.. पेठेत तलाठी परीक्षा द्यायला आलेल्या किश्याने कॉइनबॉक्स मधून रूमवर फोन केला.. "आक्का अप्पाबळवंतचौकात विजय नरसिंग होमला ऍडमिट आहे, संध्याकाळी ये" इमर्जन्सी असल्याशिवाय फोन करायचा नाही अशी घर मालकांची तंबी होती,त्यामुळे असे कोडवर्ड लागायचे..बहुतेक त्याची मनी ऑर्डर किंवा गावाकडून कोणीतरी पाकीट घेऊन आले असणार,त्याशिवाय हा भाड्या एवढा उदार व्हायचा नाही.