मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टवाळी

युयुत्सु ·

विजुभाऊ Mon, 02/09/2026 - 16:24
या लेखावर प्रतिक्रीया देण्याची इच्छा होत नाहिय्ये. नारळीकर कय किंवा विजय भटकर काय हे सर्वसामान्य लोकांसमवेत सहज मिसळायचे . या दोनही मराठी व्यक्तींच्या ज्ञानाबद्दल आणि कामाबद्दल अत्यंत आदर आहे. त्या दोघांबद्दलही कधी त्यानी कोणाबद्दल आकस धरून ठेवल्याचे की त्यानी कोणाबद्दल गैर उद्गार काढल्याचे ऐकीवात नाही. गोविंद स्वरूप यांच्या बद्दल काही राजकीय अडचणीची वक्त्वये आहेत. पण आपला मोठेपणा दाखवण्यासाठी नारळीकरांसारख्या व्यक्तीला हिणवणॅ नक्कीच आवडले नाहीय्ये

आहे. मला पूर्वी TIFR किंवा IIT मधे शिकलेल्या लोकांचे फार कौतुक वाटायचे मात्र नंतर त्यांचे मातीचे पाय आणि अत्यंत भंगार दर्जाच्या टेस्ट्स पाहून त्यांच्याविषयी फार काही वाटायचे बंद झाले. बहुतेकांना बुद्धिमत्तेच्या ऑब्जेक्टिव्हिटीपेक्षा खरेतर सोशल कॅपिटल मुळे अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळाला एवढेच सत्य. नंदा खऱ्यांनी तर एकदा या लोकांवर सरकार किती खर्च करत होते (आताच्या पैशात जवळ जवळ चार कोटी रुपये प्रति विद्यार्थी) हेही सविस्तर सांगितले होते आणि यातले बरेच जण नेहरूंची तत्कालीन सरकारांची बदनामी करत अमेरिकेत पळून गेली

युयुत्सु Tue, 02/10/2026 - 09:58
श्री० गा०पै० खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले. तेव्हा टवाळी व्यक्तीची की थिअरीची या प्रश्नाला फारसा अर्थ उरत नाही. शिवाय "आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - त्याच्या विषयातील - म्हणजे इथे अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची आणि त्यात १०% तरी पुस्तकात त्यांच्या नावाचा उल्लेख सापडतो का हे सांगावे. विजुभाऊंच्या प्रतिसादाबद्द्ल काय बोलणार - लोकांमध्ये मिसळल्याने एखाद्या व्यक्तीचे काम मोठे होत असेल तर सगळंच कठीण आहे. हणमंतअण्णांच्या कॉमेण्ट वाचून - आय० आय० टी० च्या नावाने बोटे मोडणारा मोठा वर्ग आपल्या देशात आहे, त्याचीच आठवण झाली. आय० आय० टी० च्या विद्यार्थ्यांना देशात थांबवता येत नाही हा प्रॉब्लेम देशाचा की त्या विद्यार्थ्यांचा? अनेक प्रतिष्ठीत संस्था देशात - आय आय एस सी, एन आय डी, आयसर, बार्क इ०.त्यांच्याबद्दल हणमंतअण्णा काहीच बोलले नाहीत. पण हणमंतअण्णाकडून माझ्या फार अपेक्षा नाहीत.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 02/10/2026 - 11:08
आय आय टी च्या लोकांनी परदेशात जाणे यात गैर आहे असे नाही पण त्यांच्यावर केलेला खर्च त्यांनी परत करणे यासाठीतरी त्यांच्यावर बॉण्ड असायला हवा. जसा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातुन एम बी बी एस किंवा एम डी केल्यावर आहे. आणि बॉण्ड करायचा नसेल तर तेवढे पैसे सरकार जमा करायला हवेत. बाकी आय आय टी किंवा आय आय एम या संस्थेत *तुम्हीच* जगात सर्वात हुशार असा अहंगंड मोठ्या प्रमाणावर पसरवला जातो. जगात इतरही अनेक संस्था आहेत जेथे अतिशय हुशार माणसे शिकत असतात. भारताने अवकाश संशीधन किंवा क्षेपणास्त्रे किंवा अणुशक्ती या विषयात दैदिप्य मान प्रगती केली आहे. पण इसरो किंवा भाभा अणुकेंद्र सरकारी संस्था असल्यामुळे तेथे आय आय टी मधील विद्यार्थी जवळ जवळ नाहीतच. वैद्यकीय किंवा सनदी लेखापरीक्षण अर्थ शास्त्र अशा विषयात अत्यंत हुशार माणसे कार्यरत आहेत. पण ती आय आय टी ची नाहीत म्हणजे ती हुशार नाहीतच (असे बऱ्याच आय आय टीयन ना वाटते). असो. आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात काही कमी नाहीत.

In reply to by युयुत्सु

शिवाय "आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - त्याच्या विषयातील - म्हणजे इथे अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची आणि त्यात १०% तरी पुस्तकात त्यांच्या नावाचा उल्लेख सापडतो का हे सांगावे.
शास्त्रात रिसर्चमध्ये प्रगती होत असते म्हणजे 'अ' या व्यक्तीने काही पायोनिअरींग काम केले ते 'ब' ने पुढे नेले, 'ब' चे काम 'क' ने काम पुढे नेले वगैरे. त्यामुळे ताजी पुस्तके घेतली तर त्यात कदाचित 'क' चे नाव असेल पण 'अ' चे नसेल. तसे असेल तर 'अ' हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शास्त्रज्ञ नाही असे म्हणता येईल का? आता प्रसिध्द होणार्‍या किती पेपरमध्ये किंवा पुस्तकांमध्ये न्यूटनचे नाव असेल? पण न्यूटनच्या दुसर्‍या लॉ वर बरेच काही अवलंबून आहे- उदाहरणार्थ नेव्हिअर-स्टोक्स चे इक्वेशन वगैरे. त्या नेव्हिअर-स्टोक्सचे नाव असेल पण न्यूटनचे असेलच असे नाही. म्हणजे न्यूटन बोगस होता असा त्याचा अर्थ होतो का? नारळीकरांच्या कामाविषयी असे काही होत असेल का? बाकी खगोलशास्त्र हा माझ्या अजिबात आवडीचा विषय नाही. खरं तर विज्ञानाचीही फार आवड आहे असे नाही आणि त्यात गतीही नाही. तरीही कोणत्याही रिसर्चच्या क्षेत्रात ही साधारण अशीच प्रोसेस असते एवढे माहित आहे. (एक बत्थड मेकॅनिकल इंजिअर आणि पी.एच.डी न झेपल्याने पळून आलेला) चंसूकु

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 02/10/2026 - 11:14
खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले पूर्वग्रह दूषित मन असलं कि अशी विधाने येतात. न्यूटनचे अनेक सिद्धांत आज दोषपूर्ण आहेत असे सिद्ध झाले म्हणू न्यूटनचे अफाट बुद्धिमत्ता आणि त्याने भौतिकशास्त्रात दिलेले मूलभूत योगदान कमी होत नाही. जसा काळ जातो तसे नवीन संशोधन येत राहते म्हणजे अगोदरचे सर्व मूर्ख ठरत नाहीत. अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची त्यात एखाद्या पुशतकात न्यूटनचा उल्लेख आढळेल तो सुद्धा अ‍ॅस्ट्रोफिजिक्स च्या इतिहासाच्या धंद्यात असेल. म्हणजे न्यूटन आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शास्त्रज्ञ नाही असे म्हणायचे? मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मीच

युयुत्सु Wed, 02/11/2026 - 10:29
श्री० चंद्रसूर्यकुमार तुमच्या युक्तीवादात फार गल्लत झाली आहे. प्रथम न्युटन आणि नारळीकर ही तूलना किंवा बरोबरी करायचा प्रयत्न अतिशय अयोग्य, हास्यास्पद आहे (आणि न्युटनला अपमानकारक). न्यूटन अजुनही रिलेव्हण्ट आहे कारण प्रकाशाच्या वेगाच्या तूलनेत बराच कमी वेग असलेल्या पदार्थ किंवा वस्तूना, कमी घर्षणात अजुनही न्युटन्चे नियम लागु पडतात. त्यामुळे न्युटन अजुनही शिकवणे आवश्यक ठरते. नारळीकरांच्या थिअरीला कचर्‍याची टोपली दाखवली गेली आहे. Historical dead end (हॉईल-नारळीकर सिद्धांत) vs useful limiting theory (न्युटनचे कार्य) हे आपण समजून घ्यायचा प्रय्त्न केला तर आपल्याला सत्य समजायला मदत होईल. बाकी. आय० आय० टी० च्या विद्यार्थ्यांकडून बॉण्ड लिहून घ्यायला माझी काहीच हरकत नाही. फक्त असा बॉण्ड लिहून घेतला तर सरकारची अवस्था अरेबियन नाईटस मधल्या वर्षातून फकत दोनदा खोटं बोलणार्‍या देखण्या, हुशार गुलामाच्या मालकासारखी होईल. बरं ते जाऊ दे, आय० आय० आय० टी०चे माजी विद्यार्थी बॉण्ड लिहून देत नसले तरी आपल्या मातृसंस्थांना किती भरभरून देत असतात ते एखाद्या आय० आय० आय० टी० च्या कॅम्पस मध्ये फेरफटका मारून आल्यावर समजेल. असो...

अप्पा जोगळेकर Sun, 02/15/2026 - 11:08
आता आयुर्मान वाढले आहे. निवृत्ती नंतर अनेक जणांच्या आयुष्यात रिकामपण येते आणि ते २०,२५ वर्षे टिकते. काल परवा पर्यंत साहेब साहेब करत पुढे मागे करणाऱ्या मंडळींचा गोतावळा नसतो. निवृत्ती जसजशी जुनी होत जाते तसतशी घरात फारशी किंमत राहत नाही, वयोमानाप्रमाणे आदर दिला जातो पण दिलेले मत हे सल्ला म्हणून विचारात घेतले जात नाही. यामुळे लक्ष वेधून घेण्यासाठी अशी (सगळी नाही, अपवाद असतात) माणसे काही ना काही तर्हेवाईकपण करतात. जुन्या काळातल्या कर्तबगारीच्या खऱ्या किंवा खोट्या कथा एकत्र करून आजूबाजूच्या लोकांना सांगत राहतात, मोठ्या लोकांवर,सरकारवर, व्यवस्थेवर दुगाण्या झाडत राहतात. आता सोशल मीडियाचा उदय झाल्यानंतर तर अशा लोकांचे पेव फुटले आहे. बढाया मारण्यासाठी नवीन मंच उपलब्ध असतो आणि माणूस कोणालाही answerable सुद्धा नसतो. प्रशासनाने 'ज्येष्ठ नागरिक' मंडळींसाठी वेगळे सदरच सुरु करावे आणि असे धागे त्या सदरात हलवावेत म्हणजे सगळ्यांसाठी सोयीचे होईल.

गामा पैलवान Mon, 02/16/2026 - 23:39
लोकहो, युयुत्सु हे सदस्य आता इतिहासजमा झालेले आहेत. त्यांची दोन विधानं भाष्य करण्याजोगी वाटली. त्याबद्दल माझी मतं सांगतो. १.
खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले. तेव्हा टवाळी व्यक्तीची की थिअरीची या प्रश्नाला फारसा अर्थ उरत नाही.
आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताची रुदरफोर्ड आणि सॉडी यांनी खिल्ली उडवली आहे. मात्र खुद्द आईनस्टाईनची कोणीही खिल्ली उडवीत नाही. २.
"आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - ....
माझ्या माहितीप्रमाणे जयंत नारळीकर स्वत: आंख्याशा म्हणून बिरूद मिरवीत नसंत. मात्र याबद्दल चूकभूल देणेघेणे. आ.न., -गा.पै.

चित्रगुप्त Wed, 02/18/2026 - 19:07
फोटूतला दंताडा बाबाजी कोण, भटकरबाबा कोण, गोविंदस्वरूप कोण, हे मजसारख्या अडाण्याला ठाऊक नसणे सहाजिकच आहे (तसेच सहाजिक जयंत नारळीकर कोण हे ठाऊक असणेही आहे) पण ते सगळ्याच मिपाकरांना ठाऊक असावे, असे लेखकर्त्याला वाटते आहे का ? -- म्हणजे या लेखात जे काही लिहीले आहे, ते कळण्यासाठीही आयायटीयनच हवेत की काय ? -- मुळात ही जिलबी सोडण्यात मूळ हेतु काय आहे, काहीच समजले नाही. .

In reply to by चित्रगुप्त

गामा पैलवान Wed, 02/18/2026 - 20:15
फोटोतले गृहस्थ प्रा. गोविंद स्वरूप आहेत. पुण्यानजीक खोडद गावांत जायंट मीटरवेव्ह रेडियो टेलिस्कोप ( = GMRT ) उभारणारे प्रभृती. -गा.पै.

विजुभाऊ Mon, 02/09/2026 - 16:24
या लेखावर प्रतिक्रीया देण्याची इच्छा होत नाहिय्ये. नारळीकर कय किंवा विजय भटकर काय हे सर्वसामान्य लोकांसमवेत सहज मिसळायचे . या दोनही मराठी व्यक्तींच्या ज्ञानाबद्दल आणि कामाबद्दल अत्यंत आदर आहे. त्या दोघांबद्दलही कधी त्यानी कोणाबद्दल आकस धरून ठेवल्याचे की त्यानी कोणाबद्दल गैर उद्गार काढल्याचे ऐकीवात नाही. गोविंद स्वरूप यांच्या बद्दल काही राजकीय अडचणीची वक्त्वये आहेत. पण आपला मोठेपणा दाखवण्यासाठी नारळीकरांसारख्या व्यक्तीला हिणवणॅ नक्कीच आवडले नाहीय्ये

आहे. मला पूर्वी TIFR किंवा IIT मधे शिकलेल्या लोकांचे फार कौतुक वाटायचे मात्र नंतर त्यांचे मातीचे पाय आणि अत्यंत भंगार दर्जाच्या टेस्ट्स पाहून त्यांच्याविषयी फार काही वाटायचे बंद झाले. बहुतेकांना बुद्धिमत्तेच्या ऑब्जेक्टिव्हिटीपेक्षा खरेतर सोशल कॅपिटल मुळे अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळाला एवढेच सत्य. नंदा खऱ्यांनी तर एकदा या लोकांवर सरकार किती खर्च करत होते (आताच्या पैशात जवळ जवळ चार कोटी रुपये प्रति विद्यार्थी) हेही सविस्तर सांगितले होते आणि यातले बरेच जण नेहरूंची तत्कालीन सरकारांची बदनामी करत अमेरिकेत पळून गेली

युयुत्सु Tue, 02/10/2026 - 09:58
श्री० गा०पै० खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले. तेव्हा टवाळी व्यक्तीची की थिअरीची या प्रश्नाला फारसा अर्थ उरत नाही. शिवाय "आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - त्याच्या विषयातील - म्हणजे इथे अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची आणि त्यात १०% तरी पुस्तकात त्यांच्या नावाचा उल्लेख सापडतो का हे सांगावे. विजुभाऊंच्या प्रतिसादाबद्द्ल काय बोलणार - लोकांमध्ये मिसळल्याने एखाद्या व्यक्तीचे काम मोठे होत असेल तर सगळंच कठीण आहे. हणमंतअण्णांच्या कॉमेण्ट वाचून - आय० आय० टी० च्या नावाने बोटे मोडणारा मोठा वर्ग आपल्या देशात आहे, त्याचीच आठवण झाली. आय० आय० टी० च्या विद्यार्थ्यांना देशात थांबवता येत नाही हा प्रॉब्लेम देशाचा की त्या विद्यार्थ्यांचा? अनेक प्रतिष्ठीत संस्था देशात - आय आय एस सी, एन आय डी, आयसर, बार्क इ०.त्यांच्याबद्दल हणमंतअण्णा काहीच बोलले नाहीत. पण हणमंतअण्णाकडून माझ्या फार अपेक्षा नाहीत.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 02/10/2026 - 11:08
आय आय टी च्या लोकांनी परदेशात जाणे यात गैर आहे असे नाही पण त्यांच्यावर केलेला खर्च त्यांनी परत करणे यासाठीतरी त्यांच्यावर बॉण्ड असायला हवा. जसा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातुन एम बी बी एस किंवा एम डी केल्यावर आहे. आणि बॉण्ड करायचा नसेल तर तेवढे पैसे सरकार जमा करायला हवेत. बाकी आय आय टी किंवा आय आय एम या संस्थेत *तुम्हीच* जगात सर्वात हुशार असा अहंगंड मोठ्या प्रमाणावर पसरवला जातो. जगात इतरही अनेक संस्था आहेत जेथे अतिशय हुशार माणसे शिकत असतात. भारताने अवकाश संशीधन किंवा क्षेपणास्त्रे किंवा अणुशक्ती या विषयात दैदिप्य मान प्रगती केली आहे. पण इसरो किंवा भाभा अणुकेंद्र सरकारी संस्था असल्यामुळे तेथे आय आय टी मधील विद्यार्थी जवळ जवळ नाहीतच. वैद्यकीय किंवा सनदी लेखापरीक्षण अर्थ शास्त्र अशा विषयात अत्यंत हुशार माणसे कार्यरत आहेत. पण ती आय आय टी ची नाहीत म्हणजे ती हुशार नाहीतच (असे बऱ्याच आय आय टीयन ना वाटते). असो. आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात काही कमी नाहीत.

In reply to by युयुत्सु

शिवाय "आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - त्याच्या विषयातील - म्हणजे इथे अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची आणि त्यात १०% तरी पुस्तकात त्यांच्या नावाचा उल्लेख सापडतो का हे सांगावे.
शास्त्रात रिसर्चमध्ये प्रगती होत असते म्हणजे 'अ' या व्यक्तीने काही पायोनिअरींग काम केले ते 'ब' ने पुढे नेले, 'ब' चे काम 'क' ने काम पुढे नेले वगैरे. त्यामुळे ताजी पुस्तके घेतली तर त्यात कदाचित 'क' चे नाव असेल पण 'अ' चे नसेल. तसे असेल तर 'अ' हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शास्त्रज्ञ नाही असे म्हणता येईल का? आता प्रसिध्द होणार्‍या किती पेपरमध्ये किंवा पुस्तकांमध्ये न्यूटनचे नाव असेल? पण न्यूटनच्या दुसर्‍या लॉ वर बरेच काही अवलंबून आहे- उदाहरणार्थ नेव्हिअर-स्टोक्स चे इक्वेशन वगैरे. त्या नेव्हिअर-स्टोक्सचे नाव असेल पण न्यूटनचे असेलच असे नाही. म्हणजे न्यूटन बोगस होता असा त्याचा अर्थ होतो का? नारळीकरांच्या कामाविषयी असे काही होत असेल का? बाकी खगोलशास्त्र हा माझ्या अजिबात आवडीचा विषय नाही. खरं तर विज्ञानाचीही फार आवड आहे असे नाही आणि त्यात गतीही नाही. तरीही कोणत्याही रिसर्चच्या क्षेत्रात ही साधारण अशीच प्रोसेस असते एवढे माहित आहे. (एक बत्थड मेकॅनिकल इंजिअर आणि पी.एच.डी न झेपल्याने पळून आलेला) चंसूकु

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Tue, 02/10/2026 - 11:14
खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले पूर्वग्रह दूषित मन असलं कि अशी विधाने येतात. न्यूटनचे अनेक सिद्धांत आज दोषपूर्ण आहेत असे सिद्ध झाले म्हणू न्यूटनचे अफाट बुद्धिमत्ता आणि त्याने भौतिकशास्त्रात दिलेले मूलभूत योगदान कमी होत नाही. जसा काळ जातो तसे नवीन संशोधन येत राहते म्हणजे अगोदरचे सर्व मूर्ख ठरत नाहीत. अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- मधील कोणतीही १०० ताजी पुस्तके डोळे मिटून उचलायची त्यात एखाद्या पुशतकात न्यूटनचा उल्लेख आढळेल तो सुद्धा अ‍ॅस्ट्रोफिजिक्स च्या इतिहासाच्या धंद्यात असेल. म्हणजे न्यूटन आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शास्त्रज्ञ नाही असे म्हणायचे? मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मीच

युयुत्सु Wed, 02/11/2026 - 10:29
श्री० चंद्रसूर्यकुमार तुमच्या युक्तीवादात फार गल्लत झाली आहे. प्रथम न्युटन आणि नारळीकर ही तूलना किंवा बरोबरी करायचा प्रयत्न अतिशय अयोग्य, हास्यास्पद आहे (आणि न्युटनला अपमानकारक). न्यूटन अजुनही रिलेव्हण्ट आहे कारण प्रकाशाच्या वेगाच्या तूलनेत बराच कमी वेग असलेल्या पदार्थ किंवा वस्तूना, कमी घर्षणात अजुनही न्युटन्चे नियम लागु पडतात. त्यामुळे न्युटन अजुनही शिकवणे आवश्यक ठरते. नारळीकरांच्या थिअरीला कचर्‍याची टोपली दाखवली गेली आहे. Historical dead end (हॉईल-नारळीकर सिद्धांत) vs useful limiting theory (न्युटनचे कार्य) हे आपण समजून घ्यायचा प्रय्त्न केला तर आपल्याला सत्य समजायला मदत होईल. बाकी. आय० आय० टी० च्या विद्यार्थ्यांकडून बॉण्ड लिहून घ्यायला माझी काहीच हरकत नाही. फक्त असा बॉण्ड लिहून घेतला तर सरकारची अवस्था अरेबियन नाईटस मधल्या वर्षातून फकत दोनदा खोटं बोलणार्‍या देखण्या, हुशार गुलामाच्या मालकासारखी होईल. बरं ते जाऊ दे, आय० आय० आय० टी०चे माजी विद्यार्थी बॉण्ड लिहून देत नसले तरी आपल्या मातृसंस्थांना किती भरभरून देत असतात ते एखाद्या आय० आय० आय० टी० च्या कॅम्पस मध्ये फेरफटका मारून आल्यावर समजेल. असो...

अप्पा जोगळेकर Sun, 02/15/2026 - 11:08
आता आयुर्मान वाढले आहे. निवृत्ती नंतर अनेक जणांच्या आयुष्यात रिकामपण येते आणि ते २०,२५ वर्षे टिकते. काल परवा पर्यंत साहेब साहेब करत पुढे मागे करणाऱ्या मंडळींचा गोतावळा नसतो. निवृत्ती जसजशी जुनी होत जाते तसतशी घरात फारशी किंमत राहत नाही, वयोमानाप्रमाणे आदर दिला जातो पण दिलेले मत हे सल्ला म्हणून विचारात घेतले जात नाही. यामुळे लक्ष वेधून घेण्यासाठी अशी (सगळी नाही, अपवाद असतात) माणसे काही ना काही तर्हेवाईकपण करतात. जुन्या काळातल्या कर्तबगारीच्या खऱ्या किंवा खोट्या कथा एकत्र करून आजूबाजूच्या लोकांना सांगत राहतात, मोठ्या लोकांवर,सरकारवर, व्यवस्थेवर दुगाण्या झाडत राहतात. आता सोशल मीडियाचा उदय झाल्यानंतर तर अशा लोकांचे पेव फुटले आहे. बढाया मारण्यासाठी नवीन मंच उपलब्ध असतो आणि माणूस कोणालाही answerable सुद्धा नसतो. प्रशासनाने 'ज्येष्ठ नागरिक' मंडळींसाठी वेगळे सदरच सुरु करावे आणि असे धागे त्या सदरात हलवावेत म्हणजे सगळ्यांसाठी सोयीचे होईल.

गामा पैलवान Mon, 02/16/2026 - 23:39
लोकहो, युयुत्सु हे सदस्य आता इतिहासजमा झालेले आहेत. त्यांची दोन विधानं भाष्य करण्याजोगी वाटली. त्याबद्दल माझी मतं सांगतो. १.
खुद्द 'आयुका' मध्ये नारळीकरांच्या थिअरीवर कुणी काम करत नाही असे तिथल्याच एका व्यक्तीने सांगितले. तेव्हा टवाळी व्यक्तीची की थिअरीची या प्रश्नाला फारसा अर्थ उरत नाही.
आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताची रुदरफोर्ड आणि सॉडी यांनी खिल्ली उडवली आहे. मात्र खुद्द आईनस्टाईनची कोणीही खिल्ली उडवीत नाही. २.
"आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" म्हणून बिरुद मिरवणार्‍यासाठी मी एक टेस्ट नेहेमी सांगतो - ....
माझ्या माहितीप्रमाणे जयंत नारळीकर स्वत: आंख्याशा म्हणून बिरूद मिरवीत नसंत. मात्र याबद्दल चूकभूल देणेघेणे. आ.न., -गा.पै.

चित्रगुप्त Wed, 02/18/2026 - 19:07
फोटूतला दंताडा बाबाजी कोण, भटकरबाबा कोण, गोविंदस्वरूप कोण, हे मजसारख्या अडाण्याला ठाऊक नसणे सहाजिकच आहे (तसेच सहाजिक जयंत नारळीकर कोण हे ठाऊक असणेही आहे) पण ते सगळ्याच मिपाकरांना ठाऊक असावे, असे लेखकर्त्याला वाटते आहे का ? -- म्हणजे या लेखात जे काही लिहीले आहे, ते कळण्यासाठीही आयायटीयनच हवेत की काय ? -- मुळात ही जिलबी सोडण्यात मूळ हेतु काय आहे, काहीच समजले नाही. .

In reply to by चित्रगुप्त

गामा पैलवान Wed, 02/18/2026 - 20:15
फोटोतले गृहस्थ प्रा. गोविंद स्वरूप आहेत. पुण्यानजीक खोडद गावांत जायंट मीटरवेव्ह रेडियो टेलिस्कोप ( = GMRT ) उभारणारे प्रभृती. -गा.पै.
लेखनविषय:
लेखनप्रकार
 टवाळी -- राजीव उपाध्ये (पूर्वप्रसिद्धी - फेसबुक) १९९३-९४ च्या सुमारास भटकरांनी माझे रखडवलेले प्रमोशन करायचेच असा विडा एका सहकारी-हितचिंतकाने उचलला. माझी बढती रखडवण्याची जी कारणे होती त्यातले एक ठळक कारण म्हणजे भटकरांनी पाळलेले एक मांजर मी त्याच्या हाताखाली पी०एच०डी० करावी म्हणून माझ्या मागे हात धुवून लागले होते.

मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन -राजीव उपाध्ये २०२५ च्या अखेरीस 'नेचर कम्युनिकेशन्स' मध्ये प्रकाशित झालेल्या कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या संशोधनाने मानवी परिपक्वतेच्या पारंपारिक सीमांना पूर्णपणे बदलले आहे. या संशोधनाने मेंदूच्या रचनेचे पाच मुख्य कालखंड आणि ९, ३२, ६६ आणि ८३ हे चार कालखंड पाडले. या वयातील "वळण-बिंदू (टर्निंग पॉईण्ट) ओळखून, हे संशोधन असे स्पष्ट करते की मानवी मेंदू त्याच्या स्थिर आणि पूर्ण विकसित अवस्थेत चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाही. तसेच हे संशोधन असे सूचित करते की, ज्याला सध्या पौंडावस्था (adolescence) मानले जाते, ती अवस्था वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंत सुरू राहते.

कुंपण

रांचो ·
लेखनप्रकार
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती. ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे. इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता. वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती. लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.

उलाढाल

अनुस्वार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
उत्कट, उत्स्फूर्त हे शब्द आणि या भावना आपण विसरत चाललोय का? अनंताची अगाध ओढ असणाऱ्या आपल्या जीवांना सगळं मिळमिळीत का आवडू लागलंय? पाण्याने बोजड झालेले अवाढव्य ढग एकमेकांना घासावेत असं गडगडाटी हास्य कुठे कोसळून कायमचं संपलं? बांध फुटल्यासारखे रडणारे डोळे आता कुठे आहेत? कुठल्या वाळवंटात गडप झाले? चहूकडे फक्त कोरडे डोळे दिसतात - खाली माना घातलेले; लाजेने! वर तरी कुणाकडे पाहतील? सगळ्याच माना खाली असतात. हनुमानाने भक्तीचा पुरावा दाखवायला स्वतःची छाती फाडली होती म्हणतात. इथे स्वतःचा हात स्वतःच्या छातीवर ठेवला तरी ऊर दडपायला होतं. अंत्ययात्राही निघत नाहीत राव आता. प्रेताकडे टक लावून पाहता यायचं.

व्हेनेझुएला

खटपट्या ·

कंजूस Mon, 01/12/2026 - 05:55
एकदम झटका लेखन शैली. ( पुलंची उगाचच आठवण झाली.) तरी मी सांगत होतो यालोकांना की मिपा सोडू नका. ______________________________ [ काही वर्षांपूर्वी कळवा येथे हॉटेल अमितमध्ये झालेल्या मिपाकट्ट्याला आपण भेटलो होतो हे आठवत आहे. ट.का. ( उर्फ टवाळ कार्टाही होता.]

In reply to by कंजूस

खटपट्या Mon, 01/12/2026 - 06:11
काका, पुलं चं नाव घेऊन तुम्ही मला लाजवताय, मला आता आठवलं, आपण भेटलो होतो अमित गार्डन मध्ये. पूर्वीचे लोक का सोडून गेले मलाही माहीत नाही. प्रत्येकाची काही कारणे असतील. पण अचानक शुकशुकाट झाला होता / आहे हे खरे आहे. असो.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर Mon, 01/12/2026 - 13:59
( पुलंची उगाचच आठवण झाली.)
+१ मला पण ह्या 'बंडु' वरुन असा मी असामी मधले 'दत्तोबा कदम' आणि 'नानु सरंजामे' आठवले 😀 खटपट्यापंत... मजेदार लेख आवडला आहे 👍

सोत्रि Mon, 01/12/2026 - 08:24
मस्त खुसखुशीत!! - (बंडूसारखा मित्र असलेला) सोकाजी

विवेकपटाईत Mon, 01/12/2026 - 11:41
मस्त लेख. बंडूची पृथ्वी काका सोबत तुलना. साऊथ ब्लॉक मध्ये असताना, एकदा त्यांच्या चेंबर मध्ये सोबत कॉफी घेतली होती. अत्यंत शांत स्वभाव , मधुर वाणी आणि मुद्देसूद बोलणारे. बहुतेक वाढते वय आणि बेरोजगारीचा परिणाम.

सकाळ मध्ये ब्रिटिश नंदी यांचे एक सदर यायचे तसा खुसखुशीत लेख!! आता म्हणे तात्यांचा कोलंबियावरही डोळा आहे. मग ग्रीनलँड वगैरे आहेतच. येउंद्या अजुन.

कंजूस Mon, 01/12/2026 - 05:55
एकदम झटका लेखन शैली. ( पुलंची उगाचच आठवण झाली.) तरी मी सांगत होतो यालोकांना की मिपा सोडू नका. ______________________________ [ काही वर्षांपूर्वी कळवा येथे हॉटेल अमितमध्ये झालेल्या मिपाकट्ट्याला आपण भेटलो होतो हे आठवत आहे. ट.का. ( उर्फ टवाळ कार्टाही होता.]

In reply to by कंजूस

खटपट्या Mon, 01/12/2026 - 06:11
काका, पुलं चं नाव घेऊन तुम्ही मला लाजवताय, मला आता आठवलं, आपण भेटलो होतो अमित गार्डन मध्ये. पूर्वीचे लोक का सोडून गेले मलाही माहीत नाही. प्रत्येकाची काही कारणे असतील. पण अचानक शुकशुकाट झाला होता / आहे हे खरे आहे. असो.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर Mon, 01/12/2026 - 13:59
( पुलंची उगाचच आठवण झाली.)
+१ मला पण ह्या 'बंडु' वरुन असा मी असामी मधले 'दत्तोबा कदम' आणि 'नानु सरंजामे' आठवले 😀 खटपट्यापंत... मजेदार लेख आवडला आहे 👍

सोत्रि Mon, 01/12/2026 - 08:24
मस्त खुसखुशीत!! - (बंडूसारखा मित्र असलेला) सोकाजी

विवेकपटाईत Mon, 01/12/2026 - 11:41
मस्त लेख. बंडूची पृथ्वी काका सोबत तुलना. साऊथ ब्लॉक मध्ये असताना, एकदा त्यांच्या चेंबर मध्ये सोबत कॉफी घेतली होती. अत्यंत शांत स्वभाव , मधुर वाणी आणि मुद्देसूद बोलणारे. बहुतेक वाढते वय आणि बेरोजगारीचा परिणाम.

सकाळ मध्ये ब्रिटिश नंदी यांचे एक सदर यायचे तसा खुसखुशीत लेख!! आता म्हणे तात्यांचा कोलंबियावरही डोळा आहे. मग ग्रीनलँड वगैरे आहेतच. येउंद्या अजुन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एका आळसावलेल्या रविवारी माझा परममित्र बंडू सकाळी ८ वाजता माझ्या दारात येऊन उभा राहिला. मी - काय रे इतक्या सकाळी ? बंडू - झोपा काय काढताय ? जगात काय चालू आहे याचा काही थांगपत्ता नसेलच तुमच्या सारख्या लोकांना ! बंडू नेहमी मला "तुमच्यासारख्या लोकांना" असेच संबोधतो. म्हणजे आमच्यासारख्या लोकांचा (म्हणजे कोणत्या लोकांचा हे त्यालाच माहित) एक समूह आहे. आणि मी आमच्या सारख्या लोकांचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे आमच्या सारख्या लोकांना काही सांगायचे असेल तर हा भल्या सकाळी येऊन माझ्यावर तोंडसुख घेतो. मी - काय झालं जगात? मला कसं माहीत असणार ? बंडू - व्हेनेझुएला माहीत आहे का ? मी - नाही ! बंडू - देश आहे एक.

सहज सुचले ते...

जयंत कुलकर्णी ·

अगोचर Sun, 01/11/2026 - 21:18
सहज सुचले म्हणता !! पण खूप खोल विचार करायला लावणारे .. संन्यस्त खड्ग वाचले नाहि अजुन .. युट्युब वर सापडले तर बघणार ! पुलेशु !!

अगोचर Sun, 01/11/2026 - 21:18
सहज सुचले म्हणता !! पण खूप खोल विचार करायला लावणारे .. संन्यस्त खड्ग वाचले नाहि अजुन .. युट्युब वर सापडले तर बघणार ! पुलेशु !!
लेखनविषय:
लेखनप्रकार
सहजच जसे सुचले तसे... सुकतातची जगिया.. मृत्यू आणि जीवन यावर आजवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. काही जण मृत्यूला काडीचीही किंमत देत नाहीत त्यामुळे त्यांच्या मते जन्मालाही फारसे महत्त्व उरत नाही. उदा. काफ्का काय म्हणतो ते पहा -"ते कधितरी थांबते" एवढाच आयुष्याचा अर्थ आहे... काफ्का मृत्यूबद्दल फारच अलिप्तपणे विचार करतो आहे असे दिसते. काफ्काच्या सगळ्या कथांमधून आणि कादंबऱ्यांमधून आपल्याला हाच दृष्टीकोन पाहण्यास मिळतो.

दहा मिनिटांत घरपोच.

chetanasvaidya ·

मदनबाण Sun, 01/11/2026 - 11:52
ब्लिंकिट च्या अँब्युलन्स मागण्याच्या अ‍ॅप बद्धल कुठुन तरी मला समजले होते, त्या अ‍ॅप बद्धल मला तितकच समजल होतं आणि ते फक्त त्यासाठीच असावे असा माझा समज झाला आणि नंतर मी त्या बद्धल सर्व काही विसरुन देखील गेलो, पण काही काळाने मला काश चौधरी [ ट्रॅव्हलर व्ह्लॉगर ] च्या एका व्हिडियोतुन मला अ‍ॅप बद्धल परत कळाले! कोरियन टुरिस्टन तो हिंदुस्थानात बोलवतो, त्यांच्या बरोबर आपल्या देशात भटकंती करतो आणि दोन कोरियन पैकी एकावर या अ‍ॅपचा जबरदस्त परिणाम झालेला दिसतो. हे असं हिंदुस्थान घडु शकतं आणि खरचं सामान इतक्या कमी वेळा येऊ देखील शकतं हे पाहुन त्याला चक्क धक्का बसतो. माझ्या लेकीला या बद्धल [ म्हणजे ब्लिंकिट बद्धल माहित होते ] माहित होते, ती माझ्या मागे लागली की, बाबा काही तरी असं तप्तरते मागव! मग यावर विचार करायला लागलो मग माझ्या लक्षात आले की अ‍ॅमेझॉन ची अशीच अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हीस देतो. मी प्रयोग करायचे ठरवले रात्री १० वाजता लेकीला आवडर्‍या अणि तिची इच्छा असलेल्या गोष्टींची ऑर्डर मी दिली १२ व्या मिनिटाला समान घरी आले! आपल्या हिंदूस्थानात इतकी लोकसंख्या झाली आहे की पैसे कमवण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात, मनुष्य प्राणी सोडुन इतर सर्व गोष्टींची किंमत आहे. हल्लीच एक व्हिडियो माझ्या पाहण्यात आला होता ज्यात एका व्यक्तीने ट्रेन मधुन ऑर्डर दिली होती आणि ती ऑरडर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तो डिलेव्हरी बॉय त्या ट्रेन मधुन उतरण्याच्या नादात प्लॅटफॉम वर पडला ! चालत्या पॅसेंजर ट्रेन मधुन त्याने उडी मारली,कारण लगेच दुसरी डिलेव्हरी त्याला करायची होती. काश चौधरी चे २ व्हिडियो देऊन जातो. : https://www.youtube.com/watch?v=mkbwTVoIaJ8 https://www.youtube.com/watch?v=cLaCIVT1pdc

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Toca Toca... : Fly Project

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 13:43
दहा मिनिटांच्या आत, ताबडतोब वस्तू हातात पाहिजे.. इतकी घाई कसली? किंवा तेवढाही दम धरवत नाही अशी अवस्था का? हा प्रश्न ग्राहकांना विचारलेला आहे असे गृहीत धरून लिहीत आहे. Quick com कंपन्या दहा-पंधरा मिनिटांमध्ये हवी ती उपलब्ध वस्तू घरपोच आणून देत आहेत, त्याची जी काही किंमत त्या कंपन्या मागत आहेत ती ग्राहक देत आहेत‌. हा एक व्यवहार आहे.‌ त्यामध्ये घाई असणे किंवा दम न धरविणे याचा काय संबंध आहे? ग्राहकांनी या सेवा वापरू नयेत असे म्हणणे आहे का?

In reply to by कांदा लिंबू

गवि Sun, 01/11/2026 - 15:11
प्रश्न रोचक आहे. रास्तही आहे. विचार करू जाता असे वाटले की अशी सर्व्हिस उपलब्ध करून देणे आणि ती ग्राहकाने घेणे हा व्यवहार असला तरी अशा प्रकारच्या अतिशय टोकाच्या स्पर्धेतून येणाऱ्या सेवा उपलब्ध करून रूढ करण्याच्या प्रक्रियेत काही काळाने लेखात म्हटली आहे तशी मानसिकता (मनात येईल ते ताबडतोब, आत्ता, दहा मिनिटांत हाती पडलेच पाहिजे) तयार होऊन तीच एक नॉर्म बनू शकते. मग पुढे काय ? पाच मिनिटे ? या सर्व्हिसेस वरवर पाहता एक सोय असली तरी अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. शिवाय स्पर्धेचे बाय प्रॉडक्ट म्हणून ग्राहकाला झटपट डिलिव्हरी मिळणे ही आज सोय वाटत असली तरी "इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय दीर्घकाळात आणि सार्वत्रिक असणे कितपत योग्य हे बघायला हवं.

In reply to by गवि

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:43
"इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय... या संदर्भात एकूण प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहेच; पण त्याबद्दल कालाय तस्मै नमः असेच म्हणावे लागेल. तथापि ...अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. असे घटक सर्वच क्षेत्रांत, सर्वच काळांत असतात, नाही का? माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, कामाच्या, वेळेच्या ताणामुळे असंख्य अभियंते शारीरिक व मानसिक आरोग्याशी तडजोड करतात. --- Food delivery व Q-com कंपन्या ग्राहकांना जो अपेक्षित वेळ देतात, तो त्या भागातील ट्रॅफिकचा विचार करून अवरेज वेळ दिलेला असतो. तेवढ्या वेळात डिलिव्हरी देण्यासाठी घाई करून जाण्याची गरज नसते.

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:30
मी, माझे कुटुंबीय, माझा स्थानिक मित्रपरिवार इ लोक्स् हे e-com, q-com, food delivery, ride-hailing, hyper-local वगैरे सारख्या सेवांचे नियमित उपभोक्ते आहोत. एक ग्राहक म्हणून ह्या आणि अशा इतर सेवांमुळे खूपच सुविधा झाली आहे असा अनुभव आहे. इतर कोणत्याही उद्योगाप्रमाणे याही उद्योग-प्रकारांत बरे-वाईट अनुभव आहेत; पण एक सेवाक्षेत्र म्हणून ग्राहकांच्या वेळेच्या व पैशाच्या दृष्टीने या उद्योगांचा उदय व वाढ चांगलीच म्हणावी लागेल. ‌ यातल्या बव्हंशी सेवांसाठी delivery partners ना स्वतःची दुचाकी व स्मार्टफोन एवढ्या भांडवलावर महिना वीस-पंचवीस हजार रुपये किंवा अधिक उत्पन्न मिळते. दहा-पंधरा हजार रुपयापर्यंतचा स्मार्टफोन, व एक-दीड लाख रुपयापर्यंतची दुचाकी हे दोन्ही कर्जावर मिळतात. ‌व्यवस्थित, प्रामाणिक काम करणाऱ्याला तीन वर्षांमध्ये कर्जाचे हप्ते फेडून महिना किमान दहा-पंधरा हजार रुपये कमाई होते. या पार्श्वभूमीवर, सदर धाग्याच्या आशयाने विचार करुन, तसेच वरील अनेक प्रतिसादांचा विचार करून, delivery partners ची सुरक्षितता या दृष्टीने, या सेवांचे ग्राहक (किंवा मिसळपावचे वाचक) या भूमिकेतून काय action items अपेक्षित आहे?

In reply to by कांदा लिंबू

निनाद Mon, 01/12/2026 - 05:17
मला हे हवे आहे असे वाटते: १. वेळेचा अवास्तव दबाव टाळता येण्याची सुविधा - म्हणजे मला वस्तू हवी आहे पण दहा मिनिटा ऐवजी दोन तासात आली तरी चालेल हे सांगण्याची सुविधा हवी. २. जर एखाद्या वेळी डिलिव्हरीला ५-१० मिनिटे उशीर होत असेल तर, डिलिव्हरी पार्टनर्सना "काही हरकत नाही, सुरक्षित या" असा निरोप देण्यासाठी वन क्लिक बटन वर अ‍ॅपमध्ये येणे. (एक मेसेज त्यांचा मानसिक ताण कमी करू शकतो.) ३. मी कंपनी म्हणून डिलिव्हरी पार्टनर्सना लिफ्ट वापरू द्यावी यासाठी सोसायटी कमिटीकडे पाठपुरावा करेन. त्या सोसायटी अधिक चांगली प्रायोरिटी वगैरे मिळेल असे ही पाहता येईल. पायऱ्या चढून होणारा थकवा शारीरिक आरोग्यावर आणि एकाग्रतेवर परिणाम करतो असे वाटते. ४. सुरक्षिततेला महत्त्व देण्याची सुविधा म्हणजे जर एखादा रायडर हेल्मेट घालून आला असेल आणि ट्रॅफिकचे नियम पाळून आला असेल, तर त्याला रेटिंगमध्ये दाद देता आली पहिजे. छोटी टीप देणे शक्य व्हावे. ५. अ‍ॅप ने मला सांगितले पाहिजे की रात्री उशिरा किंवा खराब हवामानात असून मुसळधार पाऊस आहे. तेंव्हा ऑर्डर करणे टाळणे किंवा ऑर्डर केल्यास त्यांना 'सुरक्षित या' असा मेसेज करता आला पहिजे - त्यासाठी अ‍ॅप ने हवामान पाहून मला तसे सुचवले पाहिजे. ६. पर ट्रिप रायडर इंशुरंस मला पे करण्याची सुविधा असली पहिजे. म्हणजे माझ्यासाठी काम करणार्‍या माणसाची सुरक्षितता मी पाळतो आहे - आणि मला ते करणे शक्य आहे - याचा चांगला संदेश जाऊ शकतो. जे लोक असा इंशुरंस प्रिमियम देणार आहेत त्यांना वेगळ्या सुविधा देता येतील. तातडीच्या परिस्थितीत मदत म्हणजे अपघातात मदत म्हणून हे फार महत्त्वाचे आहे! (पर ट्रिप रायडर इंशुरंस पे करण्याची सुविधा ही सद्य काळात मायक्रो इंशुरंस विकण्याची एक उत्तम व्यवसाय कल्पना + संधी आहे असे वाटते!) इतरः डिलिवरी झाल्यावर रायडर एक 'थँक्यू' किंवा 'सांभाळून जा' असा शब्द अ‍ॅपवर टाकता आला पाहिजे. सोसायटीमध्ये डिलिव्हरी पार्टनर्ससाठी Safe Delivery Zone किंवा किमान पाणी पिण्याची सोय असली पहिजे.

रीडर Sun, 01/11/2026 - 22:11
गरजेच्या वेळेला या सेवा खूप उपयोगी पडतात पण तेच गरज नसताना सतत वापरल्यास बरेच पैसे जास्तीचे खर्च होतात. ॲप वर उपलब्ध असतील त्याच पर्यायांमधून वस्तू घ्याव्या लागतात आणि बरेचदा ब्रँडेड मोठे पॅक्स घ्यावे लागतात.. अधिक डिलिवरी फी, marketplace फी असे करत नेहमीच्या ग्रोसरी शॉपिंग पेक्षा बरेच पैसे जास्ती खर्च होतात

मदनबाण Sun, 01/11/2026 - 11:52
ब्लिंकिट च्या अँब्युलन्स मागण्याच्या अ‍ॅप बद्धल कुठुन तरी मला समजले होते, त्या अ‍ॅप बद्धल मला तितकच समजल होतं आणि ते फक्त त्यासाठीच असावे असा माझा समज झाला आणि नंतर मी त्या बद्धल सर्व काही विसरुन देखील गेलो, पण काही काळाने मला काश चौधरी [ ट्रॅव्हलर व्ह्लॉगर ] च्या एका व्हिडियोतुन मला अ‍ॅप बद्धल परत कळाले! कोरियन टुरिस्टन तो हिंदुस्थानात बोलवतो, त्यांच्या बरोबर आपल्या देशात भटकंती करतो आणि दोन कोरियन पैकी एकावर या अ‍ॅपचा जबरदस्त परिणाम झालेला दिसतो. हे असं हिंदुस्थान घडु शकतं आणि खरचं सामान इतक्या कमी वेळा येऊ देखील शकतं हे पाहुन त्याला चक्क धक्का बसतो. माझ्या लेकीला या बद्धल [ म्हणजे ब्लिंकिट बद्धल माहित होते ] माहित होते, ती माझ्या मागे लागली की, बाबा काही तरी असं तप्तरते मागव! मग यावर विचार करायला लागलो मग माझ्या लक्षात आले की अ‍ॅमेझॉन ची अशीच अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हीस देतो. मी प्रयोग करायचे ठरवले रात्री १० वाजता लेकीला आवडर्‍या अणि तिची इच्छा असलेल्या गोष्टींची ऑर्डर मी दिली १२ व्या मिनिटाला समान घरी आले! आपल्या हिंदूस्थानात इतकी लोकसंख्या झाली आहे की पैसे कमवण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात, मनुष्य प्राणी सोडुन इतर सर्व गोष्टींची किंमत आहे. हल्लीच एक व्हिडियो माझ्या पाहण्यात आला होता ज्यात एका व्यक्तीने ट्रेन मधुन ऑर्डर दिली होती आणि ती ऑरडर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तो डिलेव्हरी बॉय त्या ट्रेन मधुन उतरण्याच्या नादात प्लॅटफॉम वर पडला ! चालत्या पॅसेंजर ट्रेन मधुन त्याने उडी मारली,कारण लगेच दुसरी डिलेव्हरी त्याला करायची होती. काश चौधरी चे २ व्हिडियो देऊन जातो. : https://www.youtube.com/watch?v=mkbwTVoIaJ8 https://www.youtube.com/watch?v=cLaCIVT1pdc

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Toca Toca... : Fly Project

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 13:43
दहा मिनिटांच्या आत, ताबडतोब वस्तू हातात पाहिजे.. इतकी घाई कसली? किंवा तेवढाही दम धरवत नाही अशी अवस्था का? हा प्रश्न ग्राहकांना विचारलेला आहे असे गृहीत धरून लिहीत आहे. Quick com कंपन्या दहा-पंधरा मिनिटांमध्ये हवी ती उपलब्ध वस्तू घरपोच आणून देत आहेत, त्याची जी काही किंमत त्या कंपन्या मागत आहेत ती ग्राहक देत आहेत‌. हा एक व्यवहार आहे.‌ त्यामध्ये घाई असणे किंवा दम न धरविणे याचा काय संबंध आहे? ग्राहकांनी या सेवा वापरू नयेत असे म्हणणे आहे का?

In reply to by कांदा लिंबू

गवि Sun, 01/11/2026 - 15:11
प्रश्न रोचक आहे. रास्तही आहे. विचार करू जाता असे वाटले की अशी सर्व्हिस उपलब्ध करून देणे आणि ती ग्राहकाने घेणे हा व्यवहार असला तरी अशा प्रकारच्या अतिशय टोकाच्या स्पर्धेतून येणाऱ्या सेवा उपलब्ध करून रूढ करण्याच्या प्रक्रियेत काही काळाने लेखात म्हटली आहे तशी मानसिकता (मनात येईल ते ताबडतोब, आत्ता, दहा मिनिटांत हाती पडलेच पाहिजे) तयार होऊन तीच एक नॉर्म बनू शकते. मग पुढे काय ? पाच मिनिटे ? या सर्व्हिसेस वरवर पाहता एक सोय असली तरी अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. शिवाय स्पर्धेचे बाय प्रॉडक्ट म्हणून ग्राहकाला झटपट डिलिव्हरी मिळणे ही आज सोय वाटत असली तरी "इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय दीर्घकाळात आणि सार्वत्रिक असणे कितपत योग्य हे बघायला हवं.

In reply to by गवि

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:43
"इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय... या संदर्भात एकूण प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहेच; पण त्याबद्दल कालाय तस्मै नमः असेच म्हणावे लागेल. तथापि ...अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. असे घटक सर्वच क्षेत्रांत, सर्वच काळांत असतात, नाही का? माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, कामाच्या, वेळेच्या ताणामुळे असंख्य अभियंते शारीरिक व मानसिक आरोग्याशी तडजोड करतात. --- Food delivery व Q-com कंपन्या ग्राहकांना जो अपेक्षित वेळ देतात, तो त्या भागातील ट्रॅफिकचा विचार करून अवरेज वेळ दिलेला असतो. तेवढ्या वेळात डिलिव्हरी देण्यासाठी घाई करून जाण्याची गरज नसते.

कांदा लिंबू Sun, 01/11/2026 - 20:30
मी, माझे कुटुंबीय, माझा स्थानिक मित्रपरिवार इ लोक्स् हे e-com, q-com, food delivery, ride-hailing, hyper-local वगैरे सारख्या सेवांचे नियमित उपभोक्ते आहोत. एक ग्राहक म्हणून ह्या आणि अशा इतर सेवांमुळे खूपच सुविधा झाली आहे असा अनुभव आहे. इतर कोणत्याही उद्योगाप्रमाणे याही उद्योग-प्रकारांत बरे-वाईट अनुभव आहेत; पण एक सेवाक्षेत्र म्हणून ग्राहकांच्या वेळेच्या व पैशाच्या दृष्टीने या उद्योगांचा उदय व वाढ चांगलीच म्हणावी लागेल. ‌ यातल्या बव्हंशी सेवांसाठी delivery partners ना स्वतःची दुचाकी व स्मार्टफोन एवढ्या भांडवलावर महिना वीस-पंचवीस हजार रुपये किंवा अधिक उत्पन्न मिळते. दहा-पंधरा हजार रुपयापर्यंतचा स्मार्टफोन, व एक-दीड लाख रुपयापर्यंतची दुचाकी हे दोन्ही कर्जावर मिळतात. ‌व्यवस्थित, प्रामाणिक काम करणाऱ्याला तीन वर्षांमध्ये कर्जाचे हप्ते फेडून महिना किमान दहा-पंधरा हजार रुपये कमाई होते. या पार्श्वभूमीवर, सदर धाग्याच्या आशयाने विचार करुन, तसेच वरील अनेक प्रतिसादांचा विचार करून, delivery partners ची सुरक्षितता या दृष्टीने, या सेवांचे ग्राहक (किंवा मिसळपावचे वाचक) या भूमिकेतून काय action items अपेक्षित आहे?

In reply to by कांदा लिंबू

निनाद Mon, 01/12/2026 - 05:17
मला हे हवे आहे असे वाटते: १. वेळेचा अवास्तव दबाव टाळता येण्याची सुविधा - म्हणजे मला वस्तू हवी आहे पण दहा मिनिटा ऐवजी दोन तासात आली तरी चालेल हे सांगण्याची सुविधा हवी. २. जर एखाद्या वेळी डिलिव्हरीला ५-१० मिनिटे उशीर होत असेल तर, डिलिव्हरी पार्टनर्सना "काही हरकत नाही, सुरक्षित या" असा निरोप देण्यासाठी वन क्लिक बटन वर अ‍ॅपमध्ये येणे. (एक मेसेज त्यांचा मानसिक ताण कमी करू शकतो.) ३. मी कंपनी म्हणून डिलिव्हरी पार्टनर्सना लिफ्ट वापरू द्यावी यासाठी सोसायटी कमिटीकडे पाठपुरावा करेन. त्या सोसायटी अधिक चांगली प्रायोरिटी वगैरे मिळेल असे ही पाहता येईल. पायऱ्या चढून होणारा थकवा शारीरिक आरोग्यावर आणि एकाग्रतेवर परिणाम करतो असे वाटते. ४. सुरक्षिततेला महत्त्व देण्याची सुविधा म्हणजे जर एखादा रायडर हेल्मेट घालून आला असेल आणि ट्रॅफिकचे नियम पाळून आला असेल, तर त्याला रेटिंगमध्ये दाद देता आली पहिजे. छोटी टीप देणे शक्य व्हावे. ५. अ‍ॅप ने मला सांगितले पाहिजे की रात्री उशिरा किंवा खराब हवामानात असून मुसळधार पाऊस आहे. तेंव्हा ऑर्डर करणे टाळणे किंवा ऑर्डर केल्यास त्यांना 'सुरक्षित या' असा मेसेज करता आला पहिजे - त्यासाठी अ‍ॅप ने हवामान पाहून मला तसे सुचवले पाहिजे. ६. पर ट्रिप रायडर इंशुरंस मला पे करण्याची सुविधा असली पहिजे. म्हणजे माझ्यासाठी काम करणार्‍या माणसाची सुरक्षितता मी पाळतो आहे - आणि मला ते करणे शक्य आहे - याचा चांगला संदेश जाऊ शकतो. जे लोक असा इंशुरंस प्रिमियम देणार आहेत त्यांना वेगळ्या सुविधा देता येतील. तातडीच्या परिस्थितीत मदत म्हणजे अपघातात मदत म्हणून हे फार महत्त्वाचे आहे! (पर ट्रिप रायडर इंशुरंस पे करण्याची सुविधा ही सद्य काळात मायक्रो इंशुरंस विकण्याची एक उत्तम व्यवसाय कल्पना + संधी आहे असे वाटते!) इतरः डिलिवरी झाल्यावर रायडर एक 'थँक्यू' किंवा 'सांभाळून जा' असा शब्द अ‍ॅपवर टाकता आला पाहिजे. सोसायटीमध्ये डिलिव्हरी पार्टनर्ससाठी Safe Delivery Zone किंवा किमान पाणी पिण्याची सोय असली पहिजे.

रीडर Sun, 01/11/2026 - 22:11
गरजेच्या वेळेला या सेवा खूप उपयोगी पडतात पण तेच गरज नसताना सतत वापरल्यास बरेच पैसे जास्तीचे खर्च होतात. ॲप वर उपलब्ध असतील त्याच पर्यायांमधून वस्तू घ्याव्या लागतात आणि बरेचदा ब्रँडेड मोठे पॅक्स घ्यावे लागतात.. अधिक डिलिवरी फी, marketplace फी असे करत नेहमीच्या ग्रोसरी शॉपिंग पेक्षा बरेच पैसे जास्ती खर्च होतात
लेखनप्रकार
ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, झेप्टो आणि असे अन्यही खूप क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आता एकमेकांशी स्पर्धा करत दहा मिनिटांच्या डिलिव्हरी शर्यतीत उतरले आहेत. हे डिलिव्हरी करणारे लोक प्रचंड ताणाखाली वेगाने वाहने चालवतात हे आपल्याला रस्त्यात दिसतंच.

सैरभैर डायरी - २.१

कपिलमुनी ·

गवि Mon, 01/05/2026 - 18:44
ऑ? उत्सुकता वाढवणारी कथा. ...पण असं कसं? "हाच होता का तो?" याला "हो" ? गैरसमज की दुभंग व्यक्तिमत्व?!! उस्मान कॉलिंग उस्मान ? आधीचे भाग असतील तर वाचनातून सुटले. आता शोधणे आले. पुढच्या भागाची प्रतीक्षा..

गवि Mon, 01/05/2026 - 18:44
ऑ? उत्सुकता वाढवणारी कथा. ...पण असं कसं? "हाच होता का तो?" याला "हो" ? गैरसमज की दुभंग व्यक्तिमत्व?!! उस्मान कॉलिंग उस्मान ? आधीचे भाग असतील तर वाचनातून सुटले. आता शोधणे आले. पुढच्या भागाची प्रतीक्षा..
आयुष्यात काय काय गंमती जमती झाल्यात चाळीशी नंतर याच्या आठवणी लिहाव्यात आता असा विचार केला. यात सलगता काही नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील सामान्य घटना ! पहिल्या भागाला प्रतिसाद देणार्यांचे आभार .

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग २: पिथौरागढ़ भ्रमंती

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
३ डिसेंबरची‌ सकाळ! कालची रात्र उघड्या बस स्टॉपवर थंडीत काढल्यानंतरचा पहाटेचा अंधारातला घाटाचा प्रवास! ही रात्र संपणारच नाहीय असं वाटत होतं. पण चक्क रात्र लवकर गेली. डुलकी लागली आणि तास गेलेले कळालं नाही. टाईम लॅप्स फोटोग्राफीमध्ये जसे काही तासांचे काही सेकंद होतात, तशीच रात्र भरभर गेल्यासारखी वाटली! टनकपूरवरून तीनला निघालेली बस साडेपाचला चंपावतला चहासाठी थांबली तेव्हा पहाट झाल्याचं दिसलं! सर्वदूर उंच पर्वत! वळणा वळणांचा रस्ता! डोंगरात थोडी थोडी घरं आणि उतारावरची‌ शेती! "बीआरओ" च्या हिरक परियोजनेच्या अंतर्गत हा रस्ता येतो. नंतर लोहाघाट, गुरना मार्गे पिथौरागढ़!

सैरभैर डायरी - १

कपिलमुनी ·

कांदा लिंबू गुरुवार, 01/01/2026 - 09:54
एक नंबर कपिलमुनी! नवीन वर्षातलं पहिलंच जनातलं, मनातलं वाचतोय; मस्त जमलंय. सुरुवात आकर्षक झालीय; शेवटही भारी होईल असे वाटतेय. पुभाप्र.

अभ्या.. गुरुवार, 01/01/2026 - 15:29
बेस्ट एकदम. शेवटी लिहायचे मनावर घेतला हे फार भारी झाले. . एकदम परफेक्ट जमलं आहे सगळच. येऊद्या एकेक भाग पटापटा.

कांदा लिंबू गुरुवार, 01/01/2026 - 09:54
एक नंबर कपिलमुनी! नवीन वर्षातलं पहिलंच जनातलं, मनातलं वाचतोय; मस्त जमलंय. सुरुवात आकर्षक झालीय; शेवटही भारी होईल असे वाटतेय. पुभाप्र.

अभ्या.. गुरुवार, 01/01/2026 - 15:29
बेस्ट एकदम. शेवटी लिहायचे मनावर घेतला हे फार भारी झाले. . एकदम परफेक्ट जमलं आहे सगळच. येऊद्या एकेक भाग पटापटा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बेदरकार बेफिकीर असे पुण्यातील त्या दिवसांचे वर्णन करावे लागेल. गावाकडून कोणी येत नव्हता,फोनबिन भानगड नसल्याने काही विचारत नव्हता,घरी सांगत नव्हता. माझ्यासारख्या वळूला एवढे पुरेसे होते.. पेठेत तलाठी परीक्षा द्यायला आलेल्या किश्याने कॉइनबॉक्स मधून रूमवर फोन केला.. "आक्का अप्पाबळवंतचौकात विजय नरसिंग होमला ऍडमिट आहे, संध्याकाळी ये" इमर्जन्सी असल्याशिवाय फोन करायचा नाही अशी घर मालकांची तंबी होती,त्यामुळे असे कोडवर्ड लागायचे..बहुतेक त्याची मनी ऑर्डर किंवा गावाकडून कोणीतरी पाकीट घेऊन आले असणार,त्याशिवाय हा भाड्या एवढा उदार व्हायचा नाही.