धोरण
माफ करा राजे आम्ही पितो , होय आम्ही पितो
माफ करा राजे
आम्ही पितो , होय आम्ही पितो
पिता असलो जरी कुणाचे तरी आम्ही पितो
होय राजे , हे राज्य जरी तुम्हामुळे लाभले
आमची मुलेबाळे सुखशांतीने नांदत असली
तरी आम्ही पितो , आम्ही धुंदित मस्तीत बेफाम पितो
पिताना बरेच फोन वाजतात , घरच्यांचे
आम्ही दुर्लक्ष करतो , आणि बिनधास्त पितो
मग आम्ही धडपडत सावरत कसेबसे उठतो
तुम्हीच राखून दिलेल्या घराकडे वळतो
तिथे आमची माँसाहेब , असलीच तर पत्नी
डोळ्यात प्राण आणून वाट बघत असते
आम्ही गडाच्या मुख्य दरवाजाशी पोचतोच तोपर्यंत
दार उघडलेले असते
शूर दुचाकीस्वार श्रीमान अभिवंदनचे अरमान
आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरु काकासाहेब खोपोलीकर यांनी लिहिलेले १४(बहुतेक, जास्तकमी झाल्यास जबाबदार नाही) ओळींचे खंडकाव्य!
(हे लिहिण्यास काकासाहेबांना अडिच दिवस लागले. तस्मात् वाचकांनी एक दिवस तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व फोनबुकमधील कुठल्याही मोबाईल नंबरवर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!)
मराठी माणसे स्वताची प्रगती स्वःताच करू शकतात
आपण ही आपली प्रगती करुन घ्याच.
मराठी माणूस धंद्यात का माघे?
परप्रातीयाचे गणित समजून घ्या.
धंद्यामधे सिंडीकेटस असतात, रॅकेट्स असतात तसेच जातीय ग्रुप्ससुद्धा असतात फक्त त्याला चेंबर ऑफ कॉमर्स असे नाव नसते. ते पृष्ठभागावर देखील नसते. ही सिस्टीम इतकी स्मूथ बसली आहे कि आपल्याला रोज पाहून सुद्धा त्यातला जातीय कोन लक्षात येत नाही. ते वाईटच आहे असे म्हणता येईल का याबद्दल वेगवेगळी मतं येतील.
असा व्यवसाय केला जातो हे कोणताही अभ्यासक्रमात किव्वा कार्यक्रमात शिकवले जात नाही . हे कुठे पुस्तकातही वाचायला मिळणार नाही .
यांचे काम कसे चालते ? ते त्यांच्याकडूनच शिका .
विहीर खोदण्याचा विचार
विहीर खोदण्याचा विचार...
डोळ्यांतील उजेड कमीकमी होऊ लागला
हसण्यातील सच्चेपणा संपू लागला
तेव्हा मी विहीर खोदण्याचा विचार करू लागले....
जमिनीला भेगा, उन्हाच्या झळा
पाण्याची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला लाव्हाच दिसू लागला!
विहीर खोदल्यावर पाणीच लागेल
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?
डोळ्यांतील उजेड संपताना, संपू द्यावा
उन्हात हसू हरवताना, हरवू द्यावे
दुष्काळात विहीर खणू नये
जमिनीला कष्ट देऊ नयेत .....
इतकेच काय पावसाचीही वाट पाहू नये
विचार मन्थन
भारताची सध्याची आव्हाने : रोजगार निर्मिती आणि उत्पादकता
विचार मंथन
विचार मंथन
विचार मंथन
विचार मंथन
फ्रान्सिस्को डे गोया
नुकतेच सुप्रीम कोर्टाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणुन बंगाल सरकारला झापले ! इतर कोणत्याही केस मध्ये " असहिष्णुता" सिध्द झाली नाही म्हणणार्या कोर्टाने ह्या केस मध्ये मात्र दीदींच्या सरकारला तब्बल २० लाख रुपायाचा दंड ठोठावला !
https://thewire.in/law/supreme-court-west-bengal-film-bhobishyoter-bhoot
वरील माहीती देण्यात आचारसंहितेचा भंग होत नाही कारण आहे ही वस्तुस्थिती आहे !
तळवे
हेच ते जीवघेणे हळवे तळवे
ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!!
शक्य वा हिंमत असती तर
हे तळवे बाजूला काढून
फोटोत घडी घालून
पुरून टाकले असते...
ना ही असोशी असली असती...
ना अंधारात डोळे खुपसून
न उजळणार्या पूर्वेकडे
पहात राहिले असते....
ना रक्तातून तुझे भिरभिरणे ऐकत राहिले असते....
नाहीतर,
माझ्या दोन्ही तळव्यांना
पंख व्हायची शक्ती घटकाभर देता,
तर विधात्याचे काय जाते?
-शिवकन्या