मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

पहिलं वहिलं प्रेम माझं

प्रज्ञादीप ·
लेखनविषय:
कवितेचा नायक ..गावातील बँक अधिकार्राचा मुलगा काॅॅलेजमद्ये नायक व नायिका एकत्र शिकतात पहिलं वहिलं प्रेम माझं मुकंच राहुन गेलं . आयुष्याचं इंद्रधनु फिकंच राहुन गेलं . कुणीच कुणाला काही नाही बोललेलं पण डोळ्यातलं प्रेम डोळ्यांना समजलेलं. एक दिवशी मी लवकर येउन त्याच्या बाकावर लाल गुलाब ठेवलेले. सगळ्या वर्गाने त्याला चिडव चिडव चिडवलेले . मग तो काही दिवस दिसलाच नाही .... अचानक त्याच्या वडीलांची बदली झाल्याचं कानावर आलं. अन् डोळ्यातलं प्रेम आसवांबरोबर वाहुन गेलं. पहिलं वहिलं प्रेम माझं मुकंच राहुन गेलं . आयुष्याचं इंद्रधनु फिकंच राहुन गेलं .

सकाळ कोवळी

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
सकाळ कोवळी रात्रीनंतर हासत येई हिरव्या गवताचा गर्द गंध घेवून येई धुक्यातून दव फुलले उतरे अलगद पानांवर शिखरावर झाडांच्या उन्ह सोनेरी हळूच येई झुळू़क हवेची थंडगार वाहते चुकार अल्लड सरत्या पावसाची सर ठिबठिबणारी सोबत येई रान फुलले रानफुलांचे रंग लेवून ताजे सुंदर वार्‍यावरती हालती डूलती नजरेला सुखवीत जाई फुलपाखरांसवे पक्षी उडती वरती आरव करती खोल दरीतून दूर कुणीतरी आल्हादक गीत गाई - पाषाणभेद १७/१०/२०२१

उत्तर दे पण...

प्राची अश्विनी ·
लेखनविषय:
काव्यरस
इंदिरा संतांची एक नितांत सुंदर कविता "पत्र लिही पण नको पाठवू". पण आजकाल पत्र तर सोडाच, हातानं लिहिणंसुद्धा दुर्मिळ झालंय. संवाद होतो तो मेसेज आणि इमोजीमधून. इंदिरा संतांच्या त्या कवितेवर आधारित ही कविता.

चांदणी अन प्रियकर

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
कुणी एक चांदणी नवथर खाली आली धरणीवर काय कसले तिला ना ठावे इकडे तिकडे कोठे जावे भूकेलेली रडवेली रडून कोमेजलेली तशात भेटला तिजला प्रियकर अशाच चांदणीसाठी होता आतूर कोण कुठली तू आलीस कशी आपूलकीने त्याने केली चौकशी लांब असते दूरदेशी येथे परदेशी कोण मज पाठवील पुन्हा मजदेशी प्रियकर उदार उमदा चांदणीस आवडला परी स्वगृहाच्या ओढीने जीव खंतावला मी तर तुझा आताचा प्रियकर घर तुझे कधीचे सुखकर नको तू गृह विरह सहू तू अन मी वेगळे होवू प्रियकर त्वरीत निर्णय घेई प्रियेस त्याच्या पोहचवून देई हा राहीला पुन्हा एकला रोज रात्री पाही तिजला चांदणीही विरहात तळपे अंधारअंगणी रात्रीस झळके दोन जिवांची अशी ताटातुट झाली प्रियक

लपाछपीचा डाव

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
निळ्या जांभळ्या ढगांआडूनी कोण बरे बोलावतो? इकडे आहे मी इकडे तिकडे देखील मीच आहे असे बोलतो. लपाछपीचा डाव असा हा राज्य माझ्यावर यावेळी शोधण्यासाठी त्याला निघालो वेळ अवेळी शोधता शोधता मी दमतो थकतो त्यानंतर हळूच कधी तो चाहूल देतो. दडूनी पुन्हा तो ढागांआड मला पुकारी शोध घेण्या पुढे जातसे कानोसा घेऊनी हा डाव कसला ठावूक नाही कधी संपतो कधी येईल समोर त्याची मी वाट पाहतो पाषाणभेद १४/१०/२०२१

वस्त्र विणताना..

Bhakti ·
लेखनविषय:
वस्त्र विणताना, मन धागा गुंफताना..हवा रंगांचा कोमल बाज, गहिवर स्पर्श साज! रेशीम पाण्याची धार, त्यात चंद्राची साद.. अलगद सांडलेले, प्राजक्त देठ सहवास.. चोचीत धरलेले, आकाश मोतियाचे भास! वाऱ्याची मंगल गुज, हिरवळ मखमल पाऊल वाट.. सागराची तुफान गाज, मातीवर रेंगाळलेली वेडी लाट! -भक्ती

कदाचित...

शिवाजी होळगे ·
लेखनविषय:
काव्यरस
... हे षडयंत्र असेल कदाचित??? तेव्हा धर्म अफुची गोळी आहे अस म्हणणारा मार्क्स नव्हता ... कदाचित धर्मभोळी माणसं होती. उत्तर वैदिक काळापासून चालत आलेली जाती पातीची उतरंड होती. ...आणि नंतर त्या उतरंडीत घातलेला हैदोस माफीला पण लज्जित करेल असा होता. ...पण राम सगळ्या स्तरात जिवंत होता. ... आणि मग आलं इस्लाम नावाच्या शांततेचे वारं??? ... चक्रिवादळ. आणि सगळे जग रोंदल गेलं. फक्त हटवादी शांततेसाठी. ... तिथे नव्हती दयामया, नव्हती शरम,नव्हती सद्सद्विवेक बुद्धी... आहो मंदिराचा इतिहास काय पाहता.. सोमनाथ काय ? काशिविश्वेश्वर काय? अयोध्या काय? तुळजाभवानी काय? पांडुरंग काय? ... ...

खुळावलो ग सखये मी खुळावलो

विजुभाऊ ·
लेखनविषय:
काव्यरस
जादु अशी , कळेना मला , काय केली नयनांनी या , ओठांनी या , मी खुळावलो. खुळावलो ग सखये मी खुळावलो. सांगू दे मला, हे या जगाला , मी खुळावलो. केस तुझे , पाऊस धारा, गुणगुणणे भिन्नाट वारा. मिटे पापणी, सूर्यास्त झाला , रस्ता ओला ,सागर किनारा. धुंद वादळाची नशा आगळी , आयुष्य गान्याच्या ओळी. सांगू दे मला, हे या जगाला , मी खुळावलो. खुळावलो ग सखये मी खुळावलो. सांगू कसे , सखये तुला, मी स्वप्नी पाहीले जे. फुलपाखरू भिरभिरणारे, फुलांसवे हसणारे तू. मी दिसता, प्राजक्त की, फूल निरागस झालीस तू सांगू दे मला, हे या जगाला , मी खुळावलो. खुळावलो ग सखये मी खुळावलो.

आठवते का ...

प्रज्ञादीप ·
लेखनविषय:
आठवते का तुला साजणा ...? तुझी माझी प्रीत कशी जुळली हृदयी प्रेम धारा कधी वाहीली न तुला कळली न मला कळली बोलता बोलता एकमेकांसोबत आपण किती दूर चालत गेलो परतीच्या या वाटा नकळत साय्रा विसरत गेलो भान न राहीले वास्तवाचे प्रेम पाखरे कशी सीमा ओलांडुन उडाली ..? आठवते का तुला साजणा ...?

सांज फुले

चांदणशेला ·
लेखनविषय:
काव्यरस
सांज फुलांनी भरू दे काळोखा रंग सावल्यांत उतरू दे धूसर झाली मावळतीची वाट मोहरला लाल केशरी क्षितिजाचा तट पंखात घेऊन भोवतीची वारे परतू लागली चुकार पाखरे सूर्य मिटून राने अंधारली प्रकाशज्योत अलगद विजून गेली अंबरी आकार घेई अर्धी चंद्रकोर रात्र पावलाने पुढे येई हळुवार