वाङ्मय

पुस्तक परिचय - अमलताश

पारुबाई's picture
पारुबाई in जनातलं, मनातलं
18 Mar 2015 - 10:11 am

वनवास, शारदा संगीत सारखी मराठी साहित्यातील अभिजात कलाकृती लिहिणारे लेखक प्रकाश नारायण संत (भालचंद्र दिक्षित) यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नीने, सुप्रिया दीक्षित (पूर्वाश्रमीच्या सुधा नंदगडकर) यांनी लिहिलेले हे आत्मचरित्र.
अमलताश हे एका झाडाचे हिंदी नाव आहे. त्याला मराठीमध्ये बहावा असं म्हणतात.लेखिका सुप्रिया आणि त्यांचा नवर्याच्या आवडीचे हे झाड. इंदिरा संत यांची हि थोरली सून. पुस्तकात सुप्रिया यांचे बालपण, तरुणपण, डॉक्टरकीचे शिक्षण, प्रकाश नारायण संत यांच्याबरोबरचे भावविश्व, त्यांचे कौटुंबिक जीवन आणि आयुष्यात आलेले चढउतार या सर्वाचा प्रवास आहे.

वाङ्मयसमीक्षा

* अभिनव मोडी लिपी स्पर्धा *

समिर२०'s picture
समिर२० in जनातलं, मनातलं
17 Mar 2015 - 12:18 pm

माझे मित्र श्री परेश जोशी आणि मोडी लिपीचा प्रसार करणारे त्यांचे सहकारी यांनी येत्या महाराष्ट्र दिनी एक अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

* अभिनव मोडी लिपी स्पर्धा *

... एकाच दिवशी, एकाच वेळी महाराष्ट्राच्या चार शहरात ...

(१) " सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा "
(२) " शिघ्र मोडी लिप्यंतर स्पर्धा "

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०१५ या दिवशी एकाच वेळी मुंबई, पुणे, नाशिक आणि अहमदनगर या शहरांमध्ये मोडी लिपीची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

(१) " सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा "

इतिहासवाङ्मयभाषाव्याकरणशुद्धलेखनप्रकटनशिफारस

गर्भपातल्या रानी .....!

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
16 Mar 2015 - 9:24 am

गर्भपातल्या रानी .....!

गारपीटीच्या अंगसंगाने
गर्भपातल्या रानी
अश्रू होऊन हवेत विरले
पाटामधले पाणी

एका एका झाडावरती
पक्षी हजारो होते
क्षणात पडले सड्याप्रमाणे
सरली सारी कहाणी

हातामधला हात सुटूनी
घरटे विच्छिन्न झाले
बुंध्याभवती जमीन नहाली
रक्ताळल्या पिलांनी

ऊस झोपला, कापूस निजला
खुरटून गेल्या बागा
जगण्या-मरण्यामधले अंतर
उरले नसल्यावाणी

शाबूत उरल्या धान्यवखारी
बंगले, महालमाडया
अन्नदात्याचे ‘अभय’ गेले
गेले दाणापाणी

अभय-काव्यवाङ्मयशेतीवाङ्मयकविता

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
15 Mar 2015 - 10:17 am

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत

शेती साहित्य आणि पत्रकारिता – परिसंवादाचा वृत्तांत 
(वृत्तसंस्थांच्या सौजन्याने)

महात्मा फ़ुले साहित्य नगरी, वर्धा दिनांक ०१/०३/२०१५

वाङ्मयबातमी

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
13 Mar 2015 - 11:24 pm

पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत

अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

महात्मा जोतिबा साहित्य नगरी (वर्धा) :

       देशात शेतकऱ्यांचा पक्ष उरलेला नाही. पंजाबराव देशमुखांनंतर शेतकऱ्यांना दुसरा पुढारी मिळालेला नाही. भारत हा कृषिप्रधान देश असूनही ८६ टक्के शेती कोरडवाहू आहे. देशात स्वतंत्र रेल्वे बजेट आहे, परंतु स्वतंत्र कृषी बजेट नाही; यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असू शकेल, अशा शब्दात ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी विचार मांडले.

वाङ्मयबातमी