विरंगुळा
शेपूच सँडविच
सांप्रत काळ हा अत्यंत फालतुगिरीचा आहे. फेबु आणि तत्सम प्रकारांमुळे ह्या फालतुगिरीला अत्यंत चांगले दिवस आले आहेत. उदाहरणार्थ कुठल्याही गावाच्या गल्लीबोळात जाऊन तिथं मिळणाऱ्या कुठल्याही पदार्थाचे व्हिडिओ बनवणे. सुरुवातीला उत्सुकता होती नंतर त्यातही साचलेपण आलं आणि आता पुढचा टप्पा..म्हणजेच कैच्या कै पदार्थ बनवणारे लोकं आणि ते खाणारे महाभाग आणि कळस म्हणजे त्यांचे व्हिडिओ बनवणारी जनता. काही खाद्य पदार्थ विक्रेते ह्या व्हिडिओ बनविणाऱ्या लोकांची लई बिना पाण्याने करतात..तरी पण हे थांबत नाहीत. असाच एक व्हिडिओ पाहण्याचा दुःखद योग आला, जो ह्या पोस्टची प्रेरणा देऊन गेला..
अशीच एक धुंद, गुलाबी सकाळ
"ए, परीक्षेनंतर आपण लग्न करूयात ? "
"काय म्हणतेस सुले ?"
"होय रे माझ्या राजा "
-- असं म्हणत ती आवेगाने धावत येऊन त्याला बिलगते.
-- मंचावरचे लाईट फेड होऊन पडदा पडतो.
टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात -
'आटो-प्ले' मोडमुळे पुढला व्हिडियो सुरु होतो....
कुठलेतरी कविराज कवत असतात --
"अशाच एका धुंद सकाळी -
मनात माझ्या स्फुरती ओळी -
जरतारी तो शालू आणिक -
धुंद मखमली नाजुक चोळी "
जावे IT च्या डिपार्टमेंटा
Non IT कंपनीत काम करत असताना IT संबंधित काही काम जर आलं (देव करो आणि अशी वेळ कोणावर न येवो) तर तो कठीण समय आहे असं समजावं. इथं IT म्हणजे तुमचा laptop. त्याचं कुठलंही काम हे IT सोडून दुसरं कुठलंच नसतं. स्वतःच डोकं बडवून झालं की आपापल्या कुलदेवतेचं नाव घेऊन कामाला लागावं लागतं. IT मध्ये जाताना आल इझ वेल अस म्हणून प्रवेश करावा तर सुरुवातीला तुम्हाला कोणीही हुंगत नाही. तिथला प्रत्येक जण आपापल्या 'ह्यात' असतो. मग आधीची ओळख, मनातला आवाज, कुलदेवतेची कृपा, आईचा आशिर्वाद, गतजन्माची पुण्याई आणि चालूजन्माचे कर्मभोग हे सगळे एकत्र आल्यावर तिथला कोणीतरी तुम्हाला विचारतो काय प्रॉब्लेम आहे?
शब्द कल्लोळ
शब्द कल्लोळ!
शाळेच्या दिवसात,'विषय सर्वथा नावडे',या अवस्थेत, सिनेमे व गाण्यांमुळे त्यातल्या त्यात हिंदी फार जवळची वाटे.उर्दू आणि हिंदीतला फरक कळत नसल्याने,
(अजूनही नाहीच म्हणा!)उर्दू हिंदीतच गणली जाई.
गम्मत म्हणजे अनेक शब्दांचे अर्थ माहीत नसत.
अंदाजाने शब्दांचे अर्थ लावायचे.त्यातून अनर्थ होत.
'सबद सबद सब कोई कहे सबद के हाथ न पाव'असं कबीर म्हणतात.सिनेमाची शिर्षके,संवाद आणि गाण्यातल्या,अनेक 'सबदांना',मीच 'हाथ- पाव 'देवून चालवत असे.त्यामुळे,शब्दांच्या पलीकडले, सारे काही ,राग 'अडाण्यातच'असे!
द ब्यूटिफुल गेम
समुद्रमंथन - पाश्चिमात्य व्हर्जन
खंडाळ्याच्या घाटासाठी...
पंचगंगातिरीचा दिपोत्सव
Silver Trumpet and Trumpet Banner
अॅटिट्यूड वाला मुण्डा!
साल १९७५, भारताचा विश्वचषकाचा पहिला सामना. इंग्लंडनी ६० ओव्हर्समध्ये ३३५ धावांचं आव्हान ठेवलं तेव्हा न लढताच आपण शस्त्र टाकली. ना अनुभव, ना मानसिकता. तेव्हा एका विक्रमादित्यानं बॅटिंग केली तीच औपचारिकता पूर्ण करण्यासाठी. २०२ रन्सनी हारलो तरी निदान ६० ओव्हर टिकलो. किमान पूर्ण वस्त्रहरण नाही झालं. अगदीच अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली नाहीत हेच काय ते समाधान.