समाज

पैलवान-२

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
2 Jun 2017 - 11:58 am

पैलवान-१

"ह्ये बघा, आत्ता वाजलेत साडेआठ. दत्त्याच्या म्हाताऱ्याची शेतातन गाठ घेऊन दहा वाजेपर्यंत हालूया. दुपारची यस्टी गाटली की संध्याकाळच्याला सोमनाथाच्या वाडीत! रात्रभर खाऊ-पिऊ, उद्या त्यांच्या गावातबी कुस्त्या आसत्यात. त्या बघू, तिकडून दुपारच्याला बसू... उद्या सांच्याला आपल्या घरला!" शंकऱ्याने तळहातावरील तंबाखूवर थापा मारल्या व इतरांपुढे तंबाखूचा हात पसरीत प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागला.

***************************************************************************************

संस्कृतीकलावाङ्मयकथासमाजजीवनमानमौजमजालेखविरंगुळा

शामराव

ज्ञानदेव पोळ's picture
ज्ञानदेव पोळ in जनातलं, मनातलं
29 May 2017 - 5:30 pm

बायको बाळंत झाली अन शामराव गायब झाला. कुणी म्हणायचं सोन्या चांदीची दुकानदारी शिकायला परराज्यात गेलाय. कुणी म्हणायचं राजस्थानात दिसला. आता शेठ झालाय. कुणी म्हणायचं त्यानं आता तिकडच बाई ठेवलीय. पण शामराव काय गावाला कधी नजरं पडला नाही. बायकोनं मात्र नुसत्या आठवणीवर पोटाची खळगी भरण्यासाठी गावाचा रोजगार करून पोरगा वाढवला. पुढ कधीतरी त्याच्या पोराचं लग्न पण झालं. शामरावला नातवंडे झाली. एव्हाना काळाच्या ओघात गाव शामरावला विसरून गेला. पण लेकानं न पाहिलेल्या बापाला शोधायसाठी सारी दुनिया पालथी घातली. बाप पाहिलेली भावकीतली लोकं घेऊन मैलोन मैल रल्वेने प्रवास केला.

समाजलेख

पैलवान-१

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
26 May 2017 - 11:54 am

"मोप.... मोप... मोप पटांगण व्हतं राव!" शंकऱ्या, विनोद आणि रामाचे ग्लास धरलेले हात तोंडाशी जाईना, पुढचं ऐकण्यासाठी चकणा चावायचा पण थांबवला त्या तिघांनी.

संस्कृतीकलावाङ्मयकथासमाजजीवनमानमौजमजाविरंगुळा

नाणी ते नोटा छपाई : नाशिक उद्योग ०७

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
19 May 2017 - 2:26 pm

पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते. बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे. १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती.

धोरणसंस्कृतीइतिहाससमाजजीवनमानतंत्रप्रकटनविचार

"स्वयंसेवक है" - अनिल माधव दवेंची एक आठवण.

जीएस's picture
जीएस in जनातलं, मनातलं
18 May 2017 - 7:07 pm

दोन हजार सहा सालची गोष्ट आहे. माझा एका उद्योगसमूहाच्या बायोडिझेल प्रकल्पाशी संबंध आला. अखाद्यतेलावर प्रक्रिया करून बायोडिझेलची निर्मिती असे प्रकल्पाचे स्वरूप होते. साहजिकच असे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर करंज तेलासारख्या अखाद्य तेलांची खरेदी करू शकतात. यातूनच एक योजना सुचली होती की वनवासींना पडीक वनजमिनीवर जर करंज लागवड करायला मदत केली तर एका एकरात एका कुटुंबाला २४००० रुपये एवढे शाश्वत उत्पन्न मिळू शकेल.

समाजलेख

मिपाकरांचा "शेती" विषयक माहितीच्या आदान प्रदानासाठी व्हॉट्स-अप गृप.....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
10 May 2017 - 5:30 pm

प्रिय मिपाकरांनो,

काल पासून शेती ह्या विषयात रस असलेल्या, मिपाकरां साठी, एक व्हॉट्स-अप गृप स्थापन करण्यात आला आहे.

ज्यांना शेतीची आवड असेल, अशा व्यक्तींनी खालील मिपाकरांशी संपर्क करावा.

१. सुखी (मोबाईल नंबर =====> ९७६६३१४९५१)

२. अभिजित अवलिया (मोबाईल नंबर ====> ९१५८००९८४६)

आपलाच,

मुवि

समाजजीवनमानतंत्रबातमीमाहिती

तोड पिंजरा, उड पाखरा

aanandinee's picture
aanandinee in जनातलं, मनातलं
2 May 2017 - 3:43 pm

गेला एक तास या आडरस्त्यावर त्यांची गाडी चालली होती. "साहेब पत्ता बरोबर आहे ना ?" ड्रायव्हर हरिहरने विचारलं. "हो रे, हाच रस्ता सांगितलाय." आदित्य म्हणाला खरा पण मनातून त्यालाही खात्री नव्हती. आपल्या अक्ख्या आयुष्याचाच रस्ता चुकलाय असं त्याला वाटून गेलं आणि तेवढ्यातच समोर सायोची स्कूटी रस्त्याच्या कडेला त्याला दिसली.

वाङ्मयकथासाहित्यिकसमाजविचारलेखविरंगुळा

गती

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
22 Apr 2017 - 9:46 am

अन्न, वस्त्र, निवारा किंवा “आहार निद्रा भय मैथुनंच” इतक्याच काय त्या जीवनाच्या मूलभूत गरजा असतात, असा आपला समज असतो. तसा तो सततच करून दिला जात असतो. मात्र हे खरे नाही. जीवनाला आवश्यकता असते ती गतीची. ह्याची आपल्याला जाणीवही क्वचितच करून दिली जात असते.
काळाची गती अपरंपार असते. काळासारखी गतीमान वस्तू तर जगात दुसरी कुठलीही नसेल. मनुष्य कालवश होतो. मग आपण सांत्वना करत असतो, की ईश्वर मृतात्म्यास सद्-गती देवो. म्हणजेच गतीला आपण हवीशी मानत असतो. मनुष्याच्या पूर्वसुकृतांनुरूप चांगली वा वाईट गती त्यास प्राप्त होतच असते. मात्र गतीविरहित जीवनाची कल्पनाच करता येत नाही.

समाजजीवनमानतंत्रशिक्षणप्रकटनअनुभवमाहितीप्रतिभा