इकिगाई(ऐसी अक्षरे...१६)
इकिगाई

अर्थपूर्ण जगण्याचा सराव म्हणजे ईकिगाई
इकिगाई

अर्थपूर्ण जगण्याचा सराव म्हणजे ईकिगाई
कॉफी___2
माझे मिपावर लिहिलेले माझे बोटीवरचे आणि इतर सर्व अनुभव अर्थातच मराठीत आहेत. प्रतिसादामध्ये तुम्ही त्यांचं कौतुक खूपच केलंत. मात्र हल्ली बहुतांश मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. 'वाचता येत नाही' असं म्हणणं तितकसं बरोबर नाही. ते टाळतात.
5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत.
मानस - धुळवड
एक सांगू? उत्तरात नं, अलगद एक प्रश्न ठेवून द्यावा..
बासुंदीच्या वाटीवर कसं हलकं केसर पेरतो ना तसा.
मग संवादाला लाघवी स्वाद येतो, मोहक रंग चढतो,
दिवसभर चेह-यावर कळत नकळतसं एक हसू खेळत रहातं!
म्हणून तर! एक तरी प्रश्न उत्तरात असूच द्यावा ...
कारण हम्म् शी हम्म् असं किती वेळ चालणार?
स्माईली ला स्मायली असं किती वेळ खेळणार?
मारून मुटकून कवितेच्या, सुविचारांच्या मोळ्या तरी कुणी किती बांधणार ?
त्यापेक्षा उत्तरात अलगद एक प्रश्न असूच'च' द्यावा ...
मग कारण मिळतं, अकारण दार खटखटवायचं.
नाहीतर "बोलू की नको, आत्ता की मग? आवडेल की नाही?
काल पोराने ऑनलाईन मागवलेला अँपल चा एअरपोड आला. चेक करू म्हटले तर काय तंत्रज्ञान प्रगत झाले आहे याचा प्रत्यय आला. त्यात नॉइज कॅन्सलेशन चा पर्याय होता .आता नॉइज कॅन्सलेशन म्हणजे त्या एअरपोड मध्ये अशी काही रचना असेल कि ते कानात फिट बसतील अन बाहेरचा गोंगाट कमी होईल अशी माझी भाबडी समजूत.पण या एअरपोड ने तीला मूठमाती दिली.कारण कानात बसवल्या बसवल्या जेव्हा नॉइज कॅन्सलेशन चे ऑप्शन निवडले अन एकदम प्रचंड शांतता पसरली. बापरे हे मात्र जबरीच होते अन संगीत हि एकदम शुद्ध स्वरूपात ऐकायला मिळत होते.अर्थातच इंग्लिश गाणी..आजूबाजूला असलेला गोंधळ कणभरही जाणवत नव्हता.मी प्रचंड प्रभावित झालो.
पांढरा स्वच्छ टॉवेल गुंडाळून शॉवर मधून बाहेर येत तू मला कॉफी विचारतोस.
तुझ्या आजुबाजुला शॅम्पूचा वास घमघमत असतो,
माझ्या तनामनावर तृप्तीची गोड साय धरलेली असते.
ती मोडून कॉफी पिणं जीवावर येतं.
शिवाय तशीही कॉफी काही माझी फार आवडती असंही नसतं.
पण तरीही, मी मान हलवत होss म्हणते.
कारण तुला ती करताना पहाणं कॉफीहूनही फ्रेश असतं.
तू बोलता बोलता पाणी उकळायला ठेवतोस.
मग "मग" घेतोस.
मी लगेच " मला तुझ्यातलीच शेवटची थोडी" म्हणून तुझी लगबग थोडी कमी करते.
तू शांतपणे कॉफीचे दोन सॅचे त्यात रिकामे करतोस.
दोन प्राध्यापक
बांधकाम व्यावसायिकाच्या
कार्यालयात.
पहिल्या प्राध्यापकाने
दुसर्या प्राध्यापकास
कानात कुजबुजत विचारले
नव्या ईमारतीच्या अवारातील
जुने वड, पिंपळ, पारीजात, .......
समृद्धतेचे प्रतिक की अडगळ?
दुसरा प्राध्यापक उत्तरला
अर्थात अडगळ!
ह्या इंद्रियगोचर, भौतिक जगात वावरताना आपले शरीर पंचेंद्रियांद्वारे विविध प्रकारची माहिती गोळा करून ती संदेशाच्या स्वरूपात सर्व बाजूंनी बंद अशा अंधार कोठडीत असलेल्या त्याच्या कडे पाठवते. तो (पहिला) ह्या गोळा झालेल्या सर्व माहितीचे विश्लेषण करतो आणि निष्कर्ष काढतो. ह्या निष्कर्षांद्वारे तो (दुसरा) ह्या जगाची अनुभूती (first person, internal and subjective experience - Qualia) घेत असतो. ह्यातील पहिला म्हणजे आपला मेंदू आणि दुसरा म्हणजे आपण स्वतः (म्हणजे नक्की कोण?). ह्या भौतिक संदेशांची अनुभूती मात्र अभौतिक असते आणि हा बदल नक्की कसा होतो ह्याचे आकलन झालेले नाही.