पाचा ऊत्तराची कहाणी
देवाघरची नाती संभाळावी
खत पाणी घालुन वाढवावी
तेव्हा कुठं प्रेमाच फळ आणी
विसाव्या पर्यंतची साथ मिळते
पाचा ऊत्तराची (आयुष्याची) कहाणी
साठा ऊत्तरी सुफळ संपूर्ण होते
जो पर्यंत होत नाही जाळ
तो पर्यंत तुटत नाही नाळ
कमळाची फुले सोडुन
उचलत बसतात गाळ
नाईलाजाने आशांची साथ आणी
हातातला हात सोडावा लागतो
कारण बुडत्याचा पाय खोलात आसतो
पण आतला माणुस काही मरत नाही
माणुसकीचा उमाळा काही सुटत नाही