ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ
ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधायला जाऊ नये अशी एक म्हण आहे, पण मला वाटते वयाच्या एका टप्प्यावर सगळयांनाच "कस्त्वं कोऽहं कुत आयातः" असे प्रश्न पडत असावेत आणि मग माणूस आपल्या मुळाचा म्हणजे मूळ ठिकाण गाव देश कुलदैवत वगैरेचा विचार करू लागतो आणि शोध घेऊ लागतो.