समाज

विषय संपला????

आगाऊ म्हादया......'s picture
आगाऊ म्हादया...... in जनातलं, मनातलं
21 Feb 2016 - 1:01 am

बाबासाहेबांच्या पुरस्काराचा वाद झाला, मतांतरं, धमक्या सगळं झालं, पण काम त्या पोलिसांचं वाढलं. दिवस रात्र ड्युट्या लागल्या... तेव्हापासून पाहतोय, सारखं काहीतरी आहेच. तो ओवेसी काहीतरी बोलतो पुन्हा फेसबुक वर त्याच्या आई माईला घोडे लावले जातात. विषय संपला.
मग गुलाम अली येतात, त्यांना परत पाठवलं जातं आपला स्वाभिमान जपण्यासाठी. पुन्हा एकदा कुणाला उमाळे येतात, त्यांच्या गजला शेअर होतात. विषय संपला.

समाजविचार

प्रसार माध्यमे आणि टिपिंग पॉईंट - एक रोचक संशोधन

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
18 Feb 2016 - 9:27 pm

दि न्यूयॉर्कर साप्ताहीकाचा पत्रकार माल्कम ग्लाडवेल, याने २००० मधे एक पुस्तक लिहीले होते - "The Tipping Point - How Little Things Can Make a Big Difference". कुठलिही गोष्ट अचानक मोठी होण्याआधी कशा घटना घडत असतात त्या एकमेकांना कशा लागलेल्या असतात, याचा अन्वयार्थ लावताना या पुस्तकात अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे. असा टिपिंग पॉईंट हा रोगराई, युद्धे, गुन्हेवारी वाढ इथपासून ते राजकीय बदल या सर्वत्रच दिसू शकतो. उदा. "ऑस्ट्रीयाच्या राजपुत्राचा खून हे पहील्या महायुद्धाचे तात्कालीक कारण" समजले जाते. पण त्याआधी घडलेल्या घटना या एकमेकांना लागलेल्या असतात...

समाजजीवनमानतंत्रराजकारणशिक्षणप्रकटनविचारसमीक्षा

"नाही" चा महिमा!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
17 Feb 2016 - 5:23 pm

विश्वासघात त्याचाच केला जातो जो विश्वास ठेवतो. म्हणून जास्त आणि पटकन कुणावर विश्वास ठेवत जाऊ नका. इमोशनल ब्लॅकमेल त्यालाच केले जाते जो इमोशनल असतो. म्हणून आजच्या जगात जास्त इमोशनल राहून चालत नाही. भिडस्त राहून सुद्धा चालत नाही. नाहीतर भिडस्त माणसाचा सर्वात प्रथम बळी जातो. तुम्ही दाबले जाल तर दुनिया तुम्हाला आणखी दाबेल. आजकालच्या जगात जो सगळ्यांचा मनाचा विचार करतो त्याच्या मनाचा विचार कुणीच करत नाही. जो सगळ्यांच्या स्वभावाला सांभाळून घेतो, त्याच्या स्वभावाला मात्र कुणीच सांभाळताना दिसत नाही. अशा व्यक्तीला दुखवणे आपला हक्कच आहे असे लोक मानतात कारण अशा व्यक्तीला गृहीत धरले जाते.

समाजजीवनमानविचार

शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं

गणेश उमाजी पाजवे's picture
गणेश उमाजी पाजवे in जे न देखे रवी...
16 Feb 2016 - 7:00 pm

गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया च्या अंतर्गत महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम सुरु असताना स्टेज ला आग लागली व खूप गोंधळ उडाला. त्यावरच प्रहारचे ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता मांडली आहे. श्याम सुंदरसोन्नर यांनी आपल्या कवितेतून सरकारवर आसूड ओढले आहेत, ही कविता सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रिय होत आहे, फेसबुक तसेच व्हॉटसअॅपवर ही कविता व्हायरल होत आहे.वाचा, श्यामसुंदर सोन्नर यांची कविताशेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं
.....................................

समाजजीवनमानराजकारण

प्रेम !!! ???

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
15 Feb 2016 - 8:20 pm

प्रेम दिवसाच्या निमित्ताने ही आठवण!

आपल्या प्रियतमेची मोजून ५३ वर्षे, सात महिने, एकरा दिवस आणि अकरा रात्री , निरंतर वाट पाहणारा प्रियकर खऱ्या जगात असतो कि नाही माहित नाही, पण Gabriel García Márquez च्या ‘Love in the Time of Cholera’ या सुमारे साडेतीनशे पृष्ठांच्या कादंबरीत तो परतपरत जगतामरता भेटत राहतो.

मूळ Spanish भाषेत लिहिलेली ही कादंबरी १९८५ मध्ये प्रसिद्ध झाली आणि १९८८ साली त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. यावर आधारित याच नावाचा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला.

वावरवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानविचारप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादमाध्यमवेधलेखप्रतिभाविरंगुळा

'रोमा', अगदी जुने परदेशस्थ भारतवंशीय

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
15 Feb 2016 - 5:12 pm

पहीले परदेशस्थ भारतवंशी कोण ? हा तसा अद्यापही संशोधनाचा विषय असावा. जमिनीवरून आणि सागरी आशिया ते युरोप दोन-चार हजार वर्षापासून असावा -नेमका काळ हा आर्किऑलॉजी आणि इतिहास संशोधकांचा विषय आहे- ज्याला प्रेमळ चिनी लोक कदाचित सिल्करूट म्हणतात. हा व्यापार करणार्‍या समुदायात चिनी, अरब, उत्तर आफ्रीकन, मध्य आशियातील आणि युरोपिय सुद्धा अनेक व्यापार्‍यांचा या व्यापारात सहभाग राहीला असेल तर नवल नाही. पण हजार वर्षापुर्वीच्या काळात नेमके कोणते भारतीय बाहेर गेले असतील त्यांचे वंशज कुठे असतील हा इतिहास आजतरी माहित नाही.

समाज

दिल से सलूट....

dipak bhutekar's picture
dipak bhutekar in जनातलं, मनातलं
14 Feb 2016 - 12:29 pm

नुकताच 26 जानेवारीला गणराज्य दिना निमित्त झालेल्या पुरस्कार सोहळ्या मध्ये महाराष्ट्राच्या चार शुर मुलाना "भारत पुरस्कार" या सर्वोच्य राष्ट्रिय बाल शौर्य पुरस्कार साठी गौरवण्यात आले त्यात वैभव घंगारे (वर्धा) , नीलेश भिल्ल (जळगाव), मोहित दळवी (मुंबई) ह्याची शौर्य पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. तर, नागपुरच्या गौरव सहस्त्रबुध्दे (वय15) ह्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गौरवने आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या चार मित्रांना वाचवन्या साठी आपला जिव धोक्यात घातला मित्राचे प्राण तर त्याने वाचवले पण स्वतःचा जिव मात्र त्याला गमवावा लागला.

धोरणमांडणीसंस्कृतीसमाजविचारप्रतिसादसद्भावनाप्रतिक्रियालेखबातमीमतसल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतप्रतिभा

लान्स नाइक हनमंतआप्पा यांना विनम्र श्रद्धांजली.

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जनातलं, मनातलं
11 Feb 2016 - 6:19 pm

पस्तीस फूट बर्फाला आपल्या छाताडावर झेलून तब्बल सहा दिवस मृत्युशी झुंज दिलेला लढवय्या अशीच ओळख १९ मद्रास रेजिमेंटच्या ह्या बहादुर सैनिकाची कायम भारतीयांच्या मनात राहिल. लान्सनाईक हनमंतआप्पा आज आपल्या देशवासियांसमोर कर्तव्य आणि जबाबदारीचं अतुल्य असं उदाहरण ठेवून गेलेत.

ha

समाजजीवनमानप्रकटनसद्भावना

राजबंदिनी (पुस्तक परिचय)

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
10 Feb 2016 - 9:34 pm

हे पुस्तक बरेच महिने टेबलवर पडून होतं पण काही केल्या वाचायला मुहूर्त लागत नव्हता याचं माझं मलाच आश्चर्य वाटत होतं. कारण पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चरित्रनायिकेचं नाव स्पष्ट लिहिलं आहे आणि तिचं प्रकाशचित्रही आहे. या राजबंदिनीच्या आयुष्याबद्दल फार सविस्तर माहिती मला नसली तरी एकंदर तिचं आयुष्य संघर्षाचं आहे हे माहिती होतं. पण नुकतंच वाचलेल्या ‘मीना’चे ठसे अद्याप ताजे होते, तोवर आणखी एक तसंचं संघर्षमय आयुष्य वाचायची मनाची तयारी होत नव्हती आणि त्यामुळे पुस्तक माझी वाट पहात होतं.

इतिहाससमाजआस्वादशिफारस