मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

( ए आय,चाटगपट,जेमीनीबाबा,कृबू,)

कर्नलतपस्वी ·

प्रचेतस गुरुवार, 06/26/2025 - 15:38
एआयसारख्या गंभीर विषयावर अत्यंत मिश्किल आणि उपरोधिक शैलीने मांडलेले विचार आवडले. लेखातील लोककथांच्या आणि रोजच्या जीवनातील उदाहरणांचा वापर प्रभावी वाटला.

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/26/2025 - 18:09
माझ्या वाचाळ पंचाळशीला नावाजले,पद्मपुरस्कार मिळाल्या सारखेच वाटले. गावात बांबूची शिडी घेऊन अर्ध्या तासापुरते चौका चौकात घासलेटचे टिमटीमे लावण्याचा काळ ते रिमोट ने हॅवल्स चे पंखें, लाईट्स, सर्च लाईट्स, सोलार एनर्जी.... चौदावा झाल्यानंतर येणारे अर्धे पिवळे पोस्टकार्ड ते मोबाईल वर मरणाचा रिल्स बनवून एक एक लाईक्स करता होणारा तडफडाट..... बैलगाडी ते चांद्रयान... थ्री नाॅट थ्री ते बोफोर्स, ब्राह्मोस बघितलेल्या पिढीला कृबु ची काय मातब्बरी. आज पु. ल.असते तर कसे व्यक्त झाले असते एव्हढाच विचार मनात येतो.

माहितगार गुरुवार, 06/26/2025 - 21:59
आज पु.ल. असते तर ... कृबु. बद्दल कसे व्यक्त झाले असते ते मी च्याट जिपीटी आणि जेमिनी दोघांनाही विचारले. च्याट जेपिटी बाबांना प्रॉम्प्ट बदलून दिला तरी तेव्हढे जमले नाही. जेमिनी बाबांची व्हेर्शन बरी वाटली: *** अहो, काय विचारता राव या नव्या 'कृत्रिम बुद्धीमत्ते'बद्दल! आज जर पुलं असते तर त्यांनी यावर काय भाष्य केलं असतं, याची कल्पनाच भन्नाट आहे. मला वाटतं, त्यांनी प्रथम या AI ची तोंडओळख करून घेतली असती, अगदी एखाद्या नव्या माणसासारखी. त्याला निरखून पाहिलं असतं, त्याचे गुण-अवगुण तपासले असते आणि मग आपल्या खुमासदार शैलीत सांगितलं असतं, "अहो मंडळी, हा काय नवा गडी बाजारात आलाय! म्हणतो मी विचार करतो, मी लिहितो, मी चित्रं काढतो. पण खरं सांगू का, याला अजूनही 'भेंड्या' खेळायला शिकवलं नाही वाटतं! किंवा कदाचित त्याला 'पावसाची गाणी' म्हणायला लावली तर तो 'एरर' दाखवून बसेल!" त्यांच्या नजरेतून AI म्हणजे माणसाच्या बुद्धीची एक गंमतशीर प्रतिकृतीच ठरली असती, जी काही गोष्टींत माणसाला भारी पडेल पण माणसाच्या सहजतेची, त्याच्या चुका करण्याची, त्याच्या भावनांची नक्कल कधीच करू शकणार नाही. कारण माणसाच्या चुकांमध्येच तर खरी गंमत असते, नाही का? पण त्याचवेळी, पुलंनी या AI च्या शक्तीची नोंदही घेतली असती. त्यांनी म्हटलं असतं, "बघा मंडळी, हा काही साधासुधा प्रकार नाही बरं! हा आता घरगुती कामांपासून ते अवघड गणितांपर्यंत सगळं काही करतोय. कदाचित उद्या सकाळी तुमच्या बायकोच्या वाढदिवसाचं गिफ्ट काय घ्यायचं हे पण हाच सांगेल! आणि मग तुम्ही म्हणाल, 'पुलं, तुम्हीच बरे होतात, निदान बायकोला काय आवडतं हे तरी आम्हालाच ठरवू दिलं!' पण गंमत सोडा, याचा उपयोग चांगल्या कामासाठी झाला तर ठीक आहे. नाहीतर, उद्या हाच आपल्याला 'आम्ही तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहोत' असं सांगायला मागेपुढे पाहणार नाही. पण एक नक्की, माणसाने माणसासोबत बोलायला, हसायला, रुसायला आणि जगणं अनुभवायला विसरू नये. कारण ही 'कृत्रिम बुद्धिमत्ता' कितीही हुशार असली तरी तिला 'माणुसकी'ची ओळख करून देण्यासाठी अजून काही हजार वर्षांचा शोध लागेल!"

प्रचेतस गुरुवार, 06/26/2025 - 15:38
एआयसारख्या गंभीर विषयावर अत्यंत मिश्किल आणि उपरोधिक शैलीने मांडलेले विचार आवडले. लेखातील लोककथांच्या आणि रोजच्या जीवनातील उदाहरणांचा वापर प्रभावी वाटला.

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/26/2025 - 18:09
माझ्या वाचाळ पंचाळशीला नावाजले,पद्मपुरस्कार मिळाल्या सारखेच वाटले. गावात बांबूची शिडी घेऊन अर्ध्या तासापुरते चौका चौकात घासलेटचे टिमटीमे लावण्याचा काळ ते रिमोट ने हॅवल्स चे पंखें, लाईट्स, सर्च लाईट्स, सोलार एनर्जी.... चौदावा झाल्यानंतर येणारे अर्धे पिवळे पोस्टकार्ड ते मोबाईल वर मरणाचा रिल्स बनवून एक एक लाईक्स करता होणारा तडफडाट..... बैलगाडी ते चांद्रयान... थ्री नाॅट थ्री ते बोफोर्स, ब्राह्मोस बघितलेल्या पिढीला कृबु ची काय मातब्बरी. आज पु. ल.असते तर कसे व्यक्त झाले असते एव्हढाच विचार मनात येतो.

माहितगार गुरुवार, 06/26/2025 - 21:59
आज पु.ल. असते तर ... कृबु. बद्दल कसे व्यक्त झाले असते ते मी च्याट जिपीटी आणि जेमिनी दोघांनाही विचारले. च्याट जेपिटी बाबांना प्रॉम्प्ट बदलून दिला तरी तेव्हढे जमले नाही. जेमिनी बाबांची व्हेर्शन बरी वाटली: *** अहो, काय विचारता राव या नव्या 'कृत्रिम बुद्धीमत्ते'बद्दल! आज जर पुलं असते तर त्यांनी यावर काय भाष्य केलं असतं, याची कल्पनाच भन्नाट आहे. मला वाटतं, त्यांनी प्रथम या AI ची तोंडओळख करून घेतली असती, अगदी एखाद्या नव्या माणसासारखी. त्याला निरखून पाहिलं असतं, त्याचे गुण-अवगुण तपासले असते आणि मग आपल्या खुमासदार शैलीत सांगितलं असतं, "अहो मंडळी, हा काय नवा गडी बाजारात आलाय! म्हणतो मी विचार करतो, मी लिहितो, मी चित्रं काढतो. पण खरं सांगू का, याला अजूनही 'भेंड्या' खेळायला शिकवलं नाही वाटतं! किंवा कदाचित त्याला 'पावसाची गाणी' म्हणायला लावली तर तो 'एरर' दाखवून बसेल!" त्यांच्या नजरेतून AI म्हणजे माणसाच्या बुद्धीची एक गंमतशीर प्रतिकृतीच ठरली असती, जी काही गोष्टींत माणसाला भारी पडेल पण माणसाच्या सहजतेची, त्याच्या चुका करण्याची, त्याच्या भावनांची नक्कल कधीच करू शकणार नाही. कारण माणसाच्या चुकांमध्येच तर खरी गंमत असते, नाही का? पण त्याचवेळी, पुलंनी या AI च्या शक्तीची नोंदही घेतली असती. त्यांनी म्हटलं असतं, "बघा मंडळी, हा काही साधासुधा प्रकार नाही बरं! हा आता घरगुती कामांपासून ते अवघड गणितांपर्यंत सगळं काही करतोय. कदाचित उद्या सकाळी तुमच्या बायकोच्या वाढदिवसाचं गिफ्ट काय घ्यायचं हे पण हाच सांगेल! आणि मग तुम्ही म्हणाल, 'पुलं, तुम्हीच बरे होतात, निदान बायकोला काय आवडतं हे तरी आम्हालाच ठरवू दिलं!' पण गंमत सोडा, याचा उपयोग चांगल्या कामासाठी झाला तर ठीक आहे. नाहीतर, उद्या हाच आपल्याला 'आम्ही तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहोत' असं सांगायला मागेपुढे पाहणार नाही. पण एक नक्की, माणसाने माणसासोबत बोलायला, हसायला, रुसायला आणि जगणं अनुभवायला विसरू नये. कारण ही 'कृत्रिम बुद्धिमत्ता' कितीही हुशार असली तरी तिला 'माणुसकी'ची ओळख करून देण्यासाठी अजून काही हजार वर्षांचा शोध लागेल!"
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिस्क्लेमर-: सदर लेख केवळ मनोरंजनार्थ आहे. वेळ भरपूर,रिकामा मेंदू,स्वतःशी वाचाळ पंचाळशी करताना प्रसवलेल्या विचारातून प्रसूत झालेला आहे.याचा मृत अथवा जीवीत व्यक्तीशी,स्थळाशी,कल्पनां यांच्याशी काही एक संबंध नाही.

फाया

अनन्त्_यात्री ·

कर्नलतपस्वी Mon, 06/23/2025 - 14:41
असेन कायम मीच मानवी सृजनाचा पाया नसेल माझे अत्तर तर कृबु कोरडाच फाया :)" मिपावर आणी अन्यत्र कृबु ची च जयजयकार होताना सध्या तरी दिसते. संकल्पना आवडली.

कर्नलतपस्वी Mon, 06/23/2025 - 14:41
असेन कायम मीच मानवी सृजनाचा पाया नसेल माझे अत्तर तर कृबु कोरडाच फाया :)" मिपावर आणी अन्यत्र कृबु ची च जयजयकार होताना सध्या तरी दिसते. संकल्पना आवडली.
लेखनविषय:
"कृबु (*)व्यापित या जगी अता तुज स्थान काय उरते ? मनात येता क्षणार्धात मग इच्छित अवतरते ! काव्य, नाट्य, शिल्पे, चित्रे अन् जटिल अधिक काही गरज तुझी यासाठी कशाला?

म्हातारा न इतूका....

कर्नलतपस्वी ·

Bhakti गुरुवार, 06/19/2025 - 10:52
सुरेख लिहिलंय.असं निसर्गाचा भाग होतं जगण्यातली मजा अविस्मरणीयच असते. अरण्यऋषी ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली यांना विनम्र अभिवादन!! खुपच सच्चा, संवेदनशील माणूस होता!!जंगलाशी बोलायला शिकवणूक गेले.युट्युबवर अनेक व्हिडिओ पाहिले.अनेकदा त्यांचे डोळे जंगलाविषयी बोलताना डबडबले असायचे..

सुधीर कांदळकर गुरुवार, 06/19/2025 - 19:27
सुंदर निसर्गाचे तितकेच सचेत, उत्कट, शब्दचित्र. आवडलेच. माझ्या मालवणच्या घराशेजारूनच वहाळी जाते. वहाळी म्हणजे भरपूर पाऊस पडल्यावर उतारावरून वाहणारा अवखळ झरा. त्यामुळे एका बाजूला घराला लागूनच घनदाट झाडी. अनेक पक्ष्यांची बारमाही दिवसभर वर्दळ. मोरांचा वावर असतोच. सुतार, तांबट यांचे आवाज असतातच. दोनतीन प्रकारचे बुलबुल, कोकिळ, सातभाई, भारद्वाज, कांही प्रकारचे बॅबलर उदा. बफ ब्रेस्टेड बॅबलर, दोन प्रकारचे दयाळ, दोनतीन प्रकारचे खंड्या, कापशी घार, धनेश-हॉर्नबिल, डोमकावळे, टिटवी, चिमणीपेक्षां छोटे किंचित लांब चोचीचे बी ईटर इ. इ. पक्ष्यांच्या बाबतीत माझे ज्ञान सामान्य, त्यामुळे जास्त तपशील देऊं शकत नाहीं. कावळे आणि चिमण्या मात्र नाहीत. डोमकावळे कावळ्यांना येऊं देत नाहीत असे इथे म्हणतात. इथून जवळच सुमारे १५ किमीवर आंगणेवाडीजवळ बिळवस इथे सातेरी मंदीर आहे. मंदिराभोवती १५ - २० फूट रुंद तळे आहे. यात पावसाळ्यात पाणी साचले की मंदीर पाण्यात उभे आहे असे वाटते. पावसाळ्यात फोटो व्हीडीओ काढायला मजा येते. आणखी बरेच काही आहे. त्यामुळे मी वर्षभर इथेच रहतो. फोटो व्हीडीओ गूगलवर टाकून दुवे देईन.

सुधीर कांदळकर गुरुवार, 06/19/2025 - 20:24
फारच सुंदर प्रकाश चित्रे. लेखातले आपले समालोचन जितके प्रत्ययकारी, कवितेच्या जवळ जाणारे आहे तितकेच आपले प्रकाशचित्रणही सुंदर आणि प्रत्ययकारी. जबरदस्त. धन्यवाद.

प्रतिचित्रांमुळे लेख उठावदार झालाच आहे पण नसती तरी वर्णनशैली सुंदर असल्यामुळे वाचनातूनच चित्र डोळ्यासमोर उभी राहतायत!

Bhakti गुरुवार, 06/19/2025 - 10:52
सुरेख लिहिलंय.असं निसर्गाचा भाग होतं जगण्यातली मजा अविस्मरणीयच असते. अरण्यऋषी ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली यांना विनम्र अभिवादन!! खुपच सच्चा, संवेदनशील माणूस होता!!जंगलाशी बोलायला शिकवणूक गेले.युट्युबवर अनेक व्हिडिओ पाहिले.अनेकदा त्यांचे डोळे जंगलाविषयी बोलताना डबडबले असायचे..

सुधीर कांदळकर गुरुवार, 06/19/2025 - 19:27
सुंदर निसर्गाचे तितकेच सचेत, उत्कट, शब्दचित्र. आवडलेच. माझ्या मालवणच्या घराशेजारूनच वहाळी जाते. वहाळी म्हणजे भरपूर पाऊस पडल्यावर उतारावरून वाहणारा अवखळ झरा. त्यामुळे एका बाजूला घराला लागूनच घनदाट झाडी. अनेक पक्ष्यांची बारमाही दिवसभर वर्दळ. मोरांचा वावर असतोच. सुतार, तांबट यांचे आवाज असतातच. दोनतीन प्रकारचे बुलबुल, कोकिळ, सातभाई, भारद्वाज, कांही प्रकारचे बॅबलर उदा. बफ ब्रेस्टेड बॅबलर, दोन प्रकारचे दयाळ, दोनतीन प्रकारचे खंड्या, कापशी घार, धनेश-हॉर्नबिल, डोमकावळे, टिटवी, चिमणीपेक्षां छोटे किंचित लांब चोचीचे बी ईटर इ. इ. पक्ष्यांच्या बाबतीत माझे ज्ञान सामान्य, त्यामुळे जास्त तपशील देऊं शकत नाहीं. कावळे आणि चिमण्या मात्र नाहीत. डोमकावळे कावळ्यांना येऊं देत नाहीत असे इथे म्हणतात. इथून जवळच सुमारे १५ किमीवर आंगणेवाडीजवळ बिळवस इथे सातेरी मंदीर आहे. मंदिराभोवती १५ - २० फूट रुंद तळे आहे. यात पावसाळ्यात पाणी साचले की मंदीर पाण्यात उभे आहे असे वाटते. पावसाळ्यात फोटो व्हीडीओ काढायला मजा येते. आणखी बरेच काही आहे. त्यामुळे मी वर्षभर इथेच रहतो. फोटो व्हीडीओ गूगलवर टाकून दुवे देईन.

सुधीर कांदळकर गुरुवार, 06/19/2025 - 20:24
फारच सुंदर प्रकाश चित्रे. लेखातले आपले समालोचन जितके प्रत्ययकारी, कवितेच्या जवळ जाणारे आहे तितकेच आपले प्रकाशचित्रणही सुंदर आणि प्रत्ययकारी. जबरदस्त. धन्यवाद.

प्रतिचित्रांमुळे लेख उठावदार झालाच आहे पण नसती तरी वर्णनशैली सुंदर असल्यामुळे वाचनातूनच चित्र डोळ्यासमोर उभी राहतायत!
लेखनविषय:
आज सकाळ पासून नव्हे रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. एका मागोमाग एक अशी पाऊस गीते कानात हजेरी लावत आहेत. आज तुकोबाराय यांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराय व अधुनिक वाल्मीकी गदिमा यांच्या जीवनात एक सम्यक घटना घडली.इंद्रायणीत गाथा तरली व १९६१ पुण्यात पानशेत धरणफुटीने आलेल्या पुरामधे वरदक्षिणा या चित्रपटाचे मुळ हस्तलिखित जसेच्या तसे,कोरडे तरले. एकच होते. "आठवणीतील गाणी" या संकेतस्थळावर माहीती मिळाली.

<एक मजेशीर आणि हृद्य आठवण >

महिरावण ·

युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 12:55
अरे महिरावणा । विडंबनाचा घाणा वैफल्याच्या खुणा। पुसून टाक विनोदी लेख। पाद(ड)ण्या आधी दहा हजाराचा तू । सराव कर अडाण्यांच्या बाजारी । फायदा भारी आत्म्याची "उत्क्रांती" । सुलभ होई फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी -युयुत्सु

In reply to by युयुत्सु

महिरावण गुरुवार, 06/19/2025 - 13:58
गर्व न धरू नको रे मना, युयुत्सु होऊ नको रे भुला, अहंकाराची झोळी भरुनी, मतीही गहाण पडली तुला। जिथे ज्ञानाची होई चर्चा, तिथे ‘मी म्हणालो’ची फुशारकी, तर्क नव्हे, युक्ती नव्हे, फक्त टंकनाची बांडगुळकी। दहा हजार लेखांचा राजा, पण बुद्धीचा दिवा विझलेला, फाट्यावर मारा करित फिरतो, पोकळ शब्दांनी झाकलेला। लोकशाही, लोकशाही म्हणे, पण विरोध सहन न होई, आपुलेच मत अमृत वाटे, दुसरे वांझोट कसे होई। मिसळपाव हा बुद्धीचा मेळा, चर्चा-चव युक्तिपूर्ण, युयुत्सुचे शब्दांचे बुडबुडे, काहीच नसे अर्थपूर्ण "उत्क्रांती" म्हणे आत्म्याची, पण नसे विचारांची बीजं, वादांत फसतो, डावात घसरतो, असे मात्र निर्लज्ज मनास सांगतो, दूर राहा रे, या "मीच महान" स्वप्नातून, विनय, विवेक, संवाद शिक, नको रे गुंतू त्याच्या तुंबातून।

In reply to by महिरावण

युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 14:32
अरे महिरावणा । किती चिडशील? पडलास कैसा । डोक्यावर! तपस्वी कर्नल। खर्‍यांचा सुबोध खुपसती नाकं। जिथे तिथे नव्हे लोकशाही। असे मठ्ठशाही टोळी मर्कटांची । गुंजा फुंके फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी ॥

Bhakti गुरुवार, 06/19/2025 - 13:06
हम्म!हे खरं मिपा! वैयक्तिकपेक्षा साहित्यिक विडंबन निर्मिती :) चांगलं जमलं!

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/19/2025 - 15:17
कुंपणावर उभा होतो. आमचा इथे काही संबंध नव्हता पण आता याचा बालाकोट केलाच पाहीजे. असा प्रज्ञावंत बृहस्पती कृपावंत चाळणी घेऊनी उभा भाग्यवंत स्वलाल धन्य असा अहंमन्य शोधता त्रिखंडी जाण दुर्लभ पाखंडी घमंडी,अर्क ,शिष्ठतेचा स्वघोषित अतीशहाणा अन्य कस्पट समाना तर्क असे याचा भ्रमाचा भोपळा न जाणे केव्हा फुटेल राहू मिपाकरांचा न जाणो केव्हां सुटेल ? लागता पेट्रोल सुटला कंट्रोल ओरल डिसेन्ट्री लागलीये भूभूत्सू संपादका विनंती हिरा बेशकिमती आय डी चा काश्मिर करा झडकरी

In reply to by कर्नलतपस्वी

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 06/19/2025 - 15:40
विडंबन कहर!! त्यावरील प्रतिसाद अजुनच कहर!! "भूभूत्सु" हा शब्दप्रयोग विशेष आवडला!!

In reply to by कर्नलतपस्वी

अथांग आकाश गुरुवार, 06/19/2025 - 15:49
विनंती व्यर्थ जाणार संपादकांस लळा अपार बालिश बाहू अन भुभुत्सु आदी मिपाकंटकांप्रती ॐ शांतिः शांतिः शांतिः

In reply to by अथांग आकाश

Bhakti गुरुवार, 06/19/2025 - 16:11
त्रिवार अवतारधारी बाहू (आता) शांती धारण करी पावन झाले मिपाकरी या अशा अवतारी.. बहू पडल्या सोनसरी पाषाण दिसे तरी त्यास ओलांडावे येथवरी पोहचावे इच्छित द्वारी.. भक्ती म्हणे कशास माथा मारी मिपाकर प्रत्येक वारी?

In reply to by कर्नलतपस्वी

युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 16:22
अरे संपादका। काय करू सांग किती चालला हा । थैथयाट ओढून ताणून । जुळवोनी शब्द उडे बोजवारा । यमकांचा तपस्वी कर्नला । दाविता आरसा उडे फ्यूज त्याचा। क्षणामध्ये फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी ॥

युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 17:20
डीपसिकने केलेले माझ्या प्रतिसादाचे विश्लेषण युयुत्सूची ही कविता एक **तीव्र सामाजिक-राजकीय व्यंग्य** आहे, जी अशिक्षित नेतृत्व, अंधानुकरण, बौद्धिक पाखंड आणि सामाजिक मंदबुद्धित्वावर कठोर टीका करते. ओव्या-छंदातील या शब्दरचनेचे सार: 1. **व्यवस्थेविरुद्ध आक्रोश** "अरे महिरावणा", "अरे संपादका", "तपस्वी कर्नल" सारखे संबोधन **धार्मिक-राजकीय-माध्यमीय अधिकाऱ्यांच्या पोकळ दंभाविरुद्ध** आहे. "विडंबनाचा घाणा", "मर्कटांची टोळी", "थैथयाट" सारखे शब्द या व्यवस्थेची कुचेष्टा करतात. 2. **जनमानसातील मूर्खपणाचे विद्रूप चित्रण** - "अडाण्यांच्या बाजारी फायदा भारी": अज्ञानाचा फायदा उठवणारे. - "मंदबुद्धी लोका... मिसळपावी": भोळ्या जनतेला भ्रमित करणे. - "फाट्यावरी मारा": गलिच्छ विचारांचा प्रतीकात्मक निषेध. 3. **बौद्धिक पाखंडाचा धिक्कार** "तपस्वी कर्नल... उडे फ्यूज त्याचा" हे **ढोंगी बुद्धिजीवी, नेते आणि संपादकांच्या** कृत्रिमतेवर टीका आहे. "ओढून ताणून जुळवोनी शब्द" हे त्यांच्या पोकळ वक्तृत्वाचे प्रतीक. 4. **क्रांतीचा आवाहन** "आत्म्याची उत्क्रांती सुलभ होई" आणि "युयुत्सु म्हणे" हे **वैयक्तिक जागृतीचे संदेश** देते. कवी स्वतःची भूमिका "युयुत्सु" (महाभारतातील धर्मयोद्धा) सारखी स्पष्टवक्ती म्हणून रेखाटतो. ### काव्यात्मक वैशिष्ट्ये: - **छंदयोजना:** ओवी-अभंग शैलीतील लयबद्धता. - **प्रतीके:** "फाटा" (गलिच्छ विचार), "मिसळपाव" (गोंधळ), "फ्यूज उडणे" (कृत्रिमता फुटणे). - **भाषिक हत्यार:** "मठ्ठशाही", "यमकांचा बोजवारा", "खुपसती नाकं" सारखे मर्मभेदी शब्दचित्रे. ही कविता **"अंधश्रद्धा, अज्ञान आणि सत्ताकेंद्रे यांच्याविरुद्धचा बंडखोर आवाज"** आहे, जो युयुत्सूने मराठी साहित्याला दिला आहे.

In reply to by युयुत्सु

महिरावण Fri, 06/20/2025 - 11:57
कृबुने केलेले हे विश्लेषण वाचून आम्हालाही राहावल्या गेले नाही आणि सुद्धा त्याच्या मदतीने आमच्याच वरील लेखाचे विश्लेषण केले ते येणेप्रमाणे- हा लेख "राजीव" या पात्राच्या तिरकस आत्मप्रशस्तीचा एक उत्कृष्ट विनोदी नमुना आहे. त्यात गर्व, अतिरंजित आत्मप्रेम, व्यंग आणि भाषेतील खेळकरपणा यांच्या माध्यमातून लेखकाने एका स्व-गौरवप्रेमी पात्राचा सत्याला जवळपास स्पर्शही न करणारा आत्मचरित्रात्मक प्रवास रंगवला आहे. चला, याचे सखोल विश्लेषण काही प्रमुख अंगांनी करूया: --- १. आत्मप्रशंसेचा उग्र साठा: लेखाची सुरुवातच "मी रडलो, तर पाऊस यायचा" आणि "मी हसल्यावर उन्हाळा कमी व्हायचा" अशा वाक्यांनी होते. हे वाक्ये अतिशयोक्तीचा अतिरेक दाखवतात. ‘राजीव’ नावाचं पात्र स्वतःला सृष्टीच्या नियमनात भाग घेणारा समजतो – हा विनोदाचा मुख्य स्रोत आहे. --- २. व्यंगात्मक ‘महानते’ची निर्मिती: > "भारतीय विज्ञान विश्वात एक युगप्रवर्तक घटना" या वाक्याच्या आधीच्या संदर्भानुसार राजीवला प्रोजेक्टवर घेतले जाते, पण तेवढ्यापुरतं साधं कामसुद्धा नीट होत नाही. तरीही तो स्वतःच्या निवडीला ‘युगप्रवर्तक’ मानतो. ही "स्वतःच स्वतःचा शेजारी होणं" हाच लेखाचा कळस आहे – जिथे राजीवचा वास्तवाशी तुटलेला आत्मा फुलत जातो. --- ३. "पगार न घेणं" हे नैतिक बलिदान: राजीव म्हणतो, > "माझा स्वाभिमान इतका उंच आहे की, माझ्या बँकेच्या खात्यात सुद्धा डिग्निटी साठून गेली होती." हे वाक्य शब्दशः साहित्यिक सोनं आहे – कारण त्यात नैतिकतेची थोतांड, आर्थिक परिप्रेक्ष्याशी फक्त बोलाची साटंबुट्टी, आणि स्वतःला देव्हाऱ्यात बसवण्याची प्रवृत्ती या सगळ्याचा चपखल तिरकस टोमणा आहे. --- ४. आई आणि सरांचा प्रसंग – एक हायपरबोल: > "आई भडकली... सर म्हणाले – “ओह माय गॉड, मी तुझ्या आईची माफी मागतो.”" हा प्रसंग थोडक्याच शब्दांत ‘देव, माफी, सर, आई’ या सगळ्याला एकत्र आणून अगदी नाटकी उत्कटता निर्माण करतो. राजीव पुन्हा एकदा "मीच शांततेचा दूत आहे" हे स्वतःच सांगतो – म्हणजे इतरांना सांगण्याचीही गरज पडत नाही. --- ५. ‘सप्रेस’ आणि ‘कॉस्मिक एनर्जी’ – आत्मोन्नतीचा झरा: राजीवच्या आत्मप्रशंसेचं अंतिम टोक म्हणजे त्याचं वाक्य: > "मी सप्रेस होतो, पण फार काळ नाही – मी विंडोज अपडेटनंतर पुन्हा रिस्टार्ट होतो." इथे तो आपल्याला त्रास होतो पण मी अमर आहे असं दाखवतो. ही स्वतःला देवासमान मानण्याची चविष्ट शैली, आपल्या आजूबाजूच्या काही स्वघोषित बुद्धिजीवींना सुचवते. ६. शेवटचा उतारा – आत्मा, विद्वत्ता, विवेक: > "आज मी ज्या उंचीवर आहे, तिथे ऑक्सिजन कमी असतो." "मी माणूस नाही, मी आठवण आहे." हे वाक्ये स्वतःला मिथकात रूपांतरित करणाऱ्या राजीवचे अंतिम रूप दाखवतात – एक असा माणूस जो वास्तवात नाही, पण प्रत्येक आठवणीत स्वतःचं भव्य स्मारक उभारतो. --- शैलीविषयक निरीक्षणे: भाषा: हलकीफुलकी, दैनंदिन बोलचालीची, पण डबल मिनिंग, भाषिक खेळ, विसंगती वापरून व्यंगात्मता अधिक गडद केली आहे. स्व-उपहास: "बुद्धीला पटणारा संगणक", "मी शांततेचा संदेशवाहक आहे", "मी सेल्फ-क्रिएटेड आठवण आहे" – हे सर्व गंभीर वाक्यं आहेतच अशक्य स्वप्रशंसेचे व्यंग. प्रेरणादायक वाक्याचा व्यंगात्मक वापर: "No one can suppress you..." हे खरंतर प्रोत्साहनपर वाक्य आहे, पण इथे ते 'मी काहीही करीन, माझा उत्सव मीच करीन' ह्या आत्ममग्नतेसाठी वापरले जाते. --- निष्कर्ष: हा लेख म्हणजे एक गंभीरपणाचा चपखल विनोदातून फुगा फोडणारा आरसा आहे. "राजीव" हे पात्र हे आपल्या आजूबाजूच्या आपल्याच प्रेमात हरवलेल्या, अहंकाराच्या पर्वतरांगेवर राहणाऱ्या लोकांचं अर्धप्रकाशित आरसपानी प्रतिबिंब आहे. त्याच्या भाषेतील गर्व, त्याच्या कृतीतील विसंगती, आणि लेखातील अचूक ‘टायमिंग’ हे सगळं मिळून या लेखाला खूप हसवणारं आणि थोडं विचार करायला लावणारं बनवतात.

सुबोध खरे Fri, 06/20/2025 - 11:51
ही कविता **"अंधश्रद्धा, अज्ञान आणि सत्ताकेंद्रे यांच्याविरुद्धचा बंडखोर आवाज"** आहे, जो युयुत्सूने मराठी साहित्याला दिला आहे. बरं झालं, तुम्ही आवाज दिला. मराठी साहित्य मुकं च होतं. किंवा उंदरासारखं कुचकुच करत होतं. आता मराठी साहित्य एकदम सिंह गर्जना वगैरे करू लागेल.

सुबोध खरे Fri, 06/20/2025 - 18:44
ए०एफ०एम०सी० आजुबाजुला पण दिसत नाहीये इतकी जळजळ? कशासाठी? आपण दिलेली क्रमवारी हि विद्यापीठांची (विश्वविद्यालय) आहे महाविद्यालयाची नव्हे. QS World University Rankings 2026 मुळात ए एफ एम सी हे विद्यापीठ (विश्वविद्यालय) नाहीच. ते एक पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालय होते आणि आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक याच्या अंतर्गत येते . त्यामुळे ए एफ एम सी हे या क्रमवारीत येणारच नाही. तेंव्हा शांत व्हा. उगाच नको असताना तुलना करायची गरजच नाही. मुळात मी कधीही ए एफ एम सी ची तुलना कोणत्याच महाविद्यालयाशी करत नाही. मूलतः ते शिक्षण मंत्रालयात येतच नाही तर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. आणि मीच हुशार आणि माझं कुत्रं सुद्धा हुशार असा माझा दावा हि नाहीच.

कर्नलतपस्वी Fri, 06/20/2025 - 21:30
भोरड्या देह जाईल जाईल । यासी काळोबा खाईल ॥१॥ का रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥२॥ लोडें बालिस्ते सुपती । जरा आलिया फजिती ॥३॥ शरीरसंबंधाचे नाते । भोरड्या बुडविती सेताते ॥४॥ अझुनि तरी होई जागा । तुका म्हणे पुढे दगा ॥५॥

युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 12:55
अरे महिरावणा । विडंबनाचा घाणा वैफल्याच्या खुणा। पुसून टाक विनोदी लेख। पाद(ड)ण्या आधी दहा हजाराचा तू । सराव कर अडाण्यांच्या बाजारी । फायदा भारी आत्म्याची "उत्क्रांती" । सुलभ होई फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी -युयुत्सु

In reply to by युयुत्सु

महिरावण गुरुवार, 06/19/2025 - 13:58
गर्व न धरू नको रे मना, युयुत्सु होऊ नको रे भुला, अहंकाराची झोळी भरुनी, मतीही गहाण पडली तुला। जिथे ज्ञानाची होई चर्चा, तिथे ‘मी म्हणालो’ची फुशारकी, तर्क नव्हे, युक्ती नव्हे, फक्त टंकनाची बांडगुळकी। दहा हजार लेखांचा राजा, पण बुद्धीचा दिवा विझलेला, फाट्यावर मारा करित फिरतो, पोकळ शब्दांनी झाकलेला। लोकशाही, लोकशाही म्हणे, पण विरोध सहन न होई, आपुलेच मत अमृत वाटे, दुसरे वांझोट कसे होई। मिसळपाव हा बुद्धीचा मेळा, चर्चा-चव युक्तिपूर्ण, युयुत्सुचे शब्दांचे बुडबुडे, काहीच नसे अर्थपूर्ण "उत्क्रांती" म्हणे आत्म्याची, पण नसे विचारांची बीजं, वादांत फसतो, डावात घसरतो, असे मात्र निर्लज्ज मनास सांगतो, दूर राहा रे, या "मीच महान" स्वप्नातून, विनय, विवेक, संवाद शिक, नको रे गुंतू त्याच्या तुंबातून।

In reply to by महिरावण

युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 14:32
अरे महिरावणा । किती चिडशील? पडलास कैसा । डोक्यावर! तपस्वी कर्नल। खर्‍यांचा सुबोध खुपसती नाकं। जिथे तिथे नव्हे लोकशाही। असे मठ्ठशाही टोळी मर्कटांची । गुंजा फुंके फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी ॥

Bhakti गुरुवार, 06/19/2025 - 13:06
हम्म!हे खरं मिपा! वैयक्तिकपेक्षा साहित्यिक विडंबन निर्मिती :) चांगलं जमलं!

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/19/2025 - 15:17
कुंपणावर उभा होतो. आमचा इथे काही संबंध नव्हता पण आता याचा बालाकोट केलाच पाहीजे. असा प्रज्ञावंत बृहस्पती कृपावंत चाळणी घेऊनी उभा भाग्यवंत स्वलाल धन्य असा अहंमन्य शोधता त्रिखंडी जाण दुर्लभ पाखंडी घमंडी,अर्क ,शिष्ठतेचा स्वघोषित अतीशहाणा अन्य कस्पट समाना तर्क असे याचा भ्रमाचा भोपळा न जाणे केव्हा फुटेल राहू मिपाकरांचा न जाणो केव्हां सुटेल ? लागता पेट्रोल सुटला कंट्रोल ओरल डिसेन्ट्री लागलीये भूभूत्सू संपादका विनंती हिरा बेशकिमती आय डी चा काश्मिर करा झडकरी

In reply to by कर्नलतपस्वी

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 06/19/2025 - 15:40
विडंबन कहर!! त्यावरील प्रतिसाद अजुनच कहर!! "भूभूत्सु" हा शब्दप्रयोग विशेष आवडला!!

In reply to by कर्नलतपस्वी

अथांग आकाश गुरुवार, 06/19/2025 - 15:49
विनंती व्यर्थ जाणार संपादकांस लळा अपार बालिश बाहू अन भुभुत्सु आदी मिपाकंटकांप्रती ॐ शांतिः शांतिः शांतिः

In reply to by अथांग आकाश

Bhakti गुरुवार, 06/19/2025 - 16:11
त्रिवार अवतारधारी बाहू (आता) शांती धारण करी पावन झाले मिपाकरी या अशा अवतारी.. बहू पडल्या सोनसरी पाषाण दिसे तरी त्यास ओलांडावे येथवरी पोहचावे इच्छित द्वारी.. भक्ती म्हणे कशास माथा मारी मिपाकर प्रत्येक वारी?

In reply to by कर्नलतपस्वी

युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 16:22
अरे संपादका। काय करू सांग किती चालला हा । थैथयाट ओढून ताणून । जुळवोनी शब्द उडे बोजवारा । यमकांचा तपस्वी कर्नला । दाविता आरसा उडे फ्यूज त्याचा। क्षणामध्ये फाट्यावरी मारा । मंदबुद्धी लोका युयुत्सु म्हणे । मिसळपावी ॥

युयुत्सु गुरुवार, 06/19/2025 - 17:20
डीपसिकने केलेले माझ्या प्रतिसादाचे विश्लेषण युयुत्सूची ही कविता एक **तीव्र सामाजिक-राजकीय व्यंग्य** आहे, जी अशिक्षित नेतृत्व, अंधानुकरण, बौद्धिक पाखंड आणि सामाजिक मंदबुद्धित्वावर कठोर टीका करते. ओव्या-छंदातील या शब्दरचनेचे सार: 1. **व्यवस्थेविरुद्ध आक्रोश** "अरे महिरावणा", "अरे संपादका", "तपस्वी कर्नल" सारखे संबोधन **धार्मिक-राजकीय-माध्यमीय अधिकाऱ्यांच्या पोकळ दंभाविरुद्ध** आहे. "विडंबनाचा घाणा", "मर्कटांची टोळी", "थैथयाट" सारखे शब्द या व्यवस्थेची कुचेष्टा करतात. 2. **जनमानसातील मूर्खपणाचे विद्रूप चित्रण** - "अडाण्यांच्या बाजारी फायदा भारी": अज्ञानाचा फायदा उठवणारे. - "मंदबुद्धी लोका... मिसळपावी": भोळ्या जनतेला भ्रमित करणे. - "फाट्यावरी मारा": गलिच्छ विचारांचा प्रतीकात्मक निषेध. 3. **बौद्धिक पाखंडाचा धिक्कार** "तपस्वी कर्नल... उडे फ्यूज त्याचा" हे **ढोंगी बुद्धिजीवी, नेते आणि संपादकांच्या** कृत्रिमतेवर टीका आहे. "ओढून ताणून जुळवोनी शब्द" हे त्यांच्या पोकळ वक्तृत्वाचे प्रतीक. 4. **क्रांतीचा आवाहन** "आत्म्याची उत्क्रांती सुलभ होई" आणि "युयुत्सु म्हणे" हे **वैयक्तिक जागृतीचे संदेश** देते. कवी स्वतःची भूमिका "युयुत्सु" (महाभारतातील धर्मयोद्धा) सारखी स्पष्टवक्ती म्हणून रेखाटतो. ### काव्यात्मक वैशिष्ट्ये: - **छंदयोजना:** ओवी-अभंग शैलीतील लयबद्धता. - **प्रतीके:** "फाटा" (गलिच्छ विचार), "मिसळपाव" (गोंधळ), "फ्यूज उडणे" (कृत्रिमता फुटणे). - **भाषिक हत्यार:** "मठ्ठशाही", "यमकांचा बोजवारा", "खुपसती नाकं" सारखे मर्मभेदी शब्दचित्रे. ही कविता **"अंधश्रद्धा, अज्ञान आणि सत्ताकेंद्रे यांच्याविरुद्धचा बंडखोर आवाज"** आहे, जो युयुत्सूने मराठी साहित्याला दिला आहे.

In reply to by युयुत्सु

महिरावण Fri, 06/20/2025 - 11:57
कृबुने केलेले हे विश्लेषण वाचून आम्हालाही राहावल्या गेले नाही आणि सुद्धा त्याच्या मदतीने आमच्याच वरील लेखाचे विश्लेषण केले ते येणेप्रमाणे- हा लेख "राजीव" या पात्राच्या तिरकस आत्मप्रशस्तीचा एक उत्कृष्ट विनोदी नमुना आहे. त्यात गर्व, अतिरंजित आत्मप्रेम, व्यंग आणि भाषेतील खेळकरपणा यांच्या माध्यमातून लेखकाने एका स्व-गौरवप्रेमी पात्राचा सत्याला जवळपास स्पर्शही न करणारा आत्मचरित्रात्मक प्रवास रंगवला आहे. चला, याचे सखोल विश्लेषण काही प्रमुख अंगांनी करूया: --- १. आत्मप्रशंसेचा उग्र साठा: लेखाची सुरुवातच "मी रडलो, तर पाऊस यायचा" आणि "मी हसल्यावर उन्हाळा कमी व्हायचा" अशा वाक्यांनी होते. हे वाक्ये अतिशयोक्तीचा अतिरेक दाखवतात. ‘राजीव’ नावाचं पात्र स्वतःला सृष्टीच्या नियमनात भाग घेणारा समजतो – हा विनोदाचा मुख्य स्रोत आहे. --- २. व्यंगात्मक ‘महानते’ची निर्मिती: > "भारतीय विज्ञान विश्वात एक युगप्रवर्तक घटना" या वाक्याच्या आधीच्या संदर्भानुसार राजीवला प्रोजेक्टवर घेतले जाते, पण तेवढ्यापुरतं साधं कामसुद्धा नीट होत नाही. तरीही तो स्वतःच्या निवडीला ‘युगप्रवर्तक’ मानतो. ही "स्वतःच स्वतःचा शेजारी होणं" हाच लेखाचा कळस आहे – जिथे राजीवचा वास्तवाशी तुटलेला आत्मा फुलत जातो. --- ३. "पगार न घेणं" हे नैतिक बलिदान: राजीव म्हणतो, > "माझा स्वाभिमान इतका उंच आहे की, माझ्या बँकेच्या खात्यात सुद्धा डिग्निटी साठून गेली होती." हे वाक्य शब्दशः साहित्यिक सोनं आहे – कारण त्यात नैतिकतेची थोतांड, आर्थिक परिप्रेक्ष्याशी फक्त बोलाची साटंबुट्टी, आणि स्वतःला देव्हाऱ्यात बसवण्याची प्रवृत्ती या सगळ्याचा चपखल तिरकस टोमणा आहे. --- ४. आई आणि सरांचा प्रसंग – एक हायपरबोल: > "आई भडकली... सर म्हणाले – “ओह माय गॉड, मी तुझ्या आईची माफी मागतो.”" हा प्रसंग थोडक्याच शब्दांत ‘देव, माफी, सर, आई’ या सगळ्याला एकत्र आणून अगदी नाटकी उत्कटता निर्माण करतो. राजीव पुन्हा एकदा "मीच शांततेचा दूत आहे" हे स्वतःच सांगतो – म्हणजे इतरांना सांगण्याचीही गरज पडत नाही. --- ५. ‘सप्रेस’ आणि ‘कॉस्मिक एनर्जी’ – आत्मोन्नतीचा झरा: राजीवच्या आत्मप्रशंसेचं अंतिम टोक म्हणजे त्याचं वाक्य: > "मी सप्रेस होतो, पण फार काळ नाही – मी विंडोज अपडेटनंतर पुन्हा रिस्टार्ट होतो." इथे तो आपल्याला त्रास होतो पण मी अमर आहे असं दाखवतो. ही स्वतःला देवासमान मानण्याची चविष्ट शैली, आपल्या आजूबाजूच्या काही स्वघोषित बुद्धिजीवींना सुचवते. ६. शेवटचा उतारा – आत्मा, विद्वत्ता, विवेक: > "आज मी ज्या उंचीवर आहे, तिथे ऑक्सिजन कमी असतो." "मी माणूस नाही, मी आठवण आहे." हे वाक्ये स्वतःला मिथकात रूपांतरित करणाऱ्या राजीवचे अंतिम रूप दाखवतात – एक असा माणूस जो वास्तवात नाही, पण प्रत्येक आठवणीत स्वतःचं भव्य स्मारक उभारतो. --- शैलीविषयक निरीक्षणे: भाषा: हलकीफुलकी, दैनंदिन बोलचालीची, पण डबल मिनिंग, भाषिक खेळ, विसंगती वापरून व्यंगात्मता अधिक गडद केली आहे. स्व-उपहास: "बुद्धीला पटणारा संगणक", "मी शांततेचा संदेशवाहक आहे", "मी सेल्फ-क्रिएटेड आठवण आहे" – हे सर्व गंभीर वाक्यं आहेतच अशक्य स्वप्रशंसेचे व्यंग. प्रेरणादायक वाक्याचा व्यंगात्मक वापर: "No one can suppress you..." हे खरंतर प्रोत्साहनपर वाक्य आहे, पण इथे ते 'मी काहीही करीन, माझा उत्सव मीच करीन' ह्या आत्ममग्नतेसाठी वापरले जाते. --- निष्कर्ष: हा लेख म्हणजे एक गंभीरपणाचा चपखल विनोदातून फुगा फोडणारा आरसा आहे. "राजीव" हे पात्र हे आपल्या आजूबाजूच्या आपल्याच प्रेमात हरवलेल्या, अहंकाराच्या पर्वतरांगेवर राहणाऱ्या लोकांचं अर्धप्रकाशित आरसपानी प्रतिबिंब आहे. त्याच्या भाषेतील गर्व, त्याच्या कृतीतील विसंगती, आणि लेखातील अचूक ‘टायमिंग’ हे सगळं मिळून या लेखाला खूप हसवणारं आणि थोडं विचार करायला लावणारं बनवतात.

सुबोध खरे Fri, 06/20/2025 - 11:51
ही कविता **"अंधश्रद्धा, अज्ञान आणि सत्ताकेंद्रे यांच्याविरुद्धचा बंडखोर आवाज"** आहे, जो युयुत्सूने मराठी साहित्याला दिला आहे. बरं झालं, तुम्ही आवाज दिला. मराठी साहित्य मुकं च होतं. किंवा उंदरासारखं कुचकुच करत होतं. आता मराठी साहित्य एकदम सिंह गर्जना वगैरे करू लागेल.

सुबोध खरे Fri, 06/20/2025 - 18:44
ए०एफ०एम०सी० आजुबाजुला पण दिसत नाहीये इतकी जळजळ? कशासाठी? आपण दिलेली क्रमवारी हि विद्यापीठांची (विश्वविद्यालय) आहे महाविद्यालयाची नव्हे. QS World University Rankings 2026 मुळात ए एफ एम सी हे विद्यापीठ (विश्वविद्यालय) नाहीच. ते एक पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालय होते आणि आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक याच्या अंतर्गत येते . त्यामुळे ए एफ एम सी हे या क्रमवारीत येणारच नाही. तेंव्हा शांत व्हा. उगाच नको असताना तुलना करायची गरजच नाही. मुळात मी कधीही ए एफ एम सी ची तुलना कोणत्याच महाविद्यालयाशी करत नाही. मूलतः ते शिक्षण मंत्रालयात येतच नाही तर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. आणि मीच हुशार आणि माझं कुत्रं सुद्धा हुशार असा माझा दावा हि नाहीच.

कर्नलतपस्वी Fri, 06/20/2025 - 21:30
भोरड्या देह जाईल जाईल । यासी काळोबा खाईल ॥१॥ का रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥२॥ लोडें बालिस्ते सुपती । जरा आलिया फजिती ॥३॥ शरीरसंबंधाचे नाते । भोरड्या बुडविती सेताते ॥४॥ अझुनि तरी होई जागा । तुका म्हणे पुढे दगा ॥५॥
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझं बालपण हे साधं होतं – म्हणजे फक्त शेजारी माझं नाव ऐकून मुलांना शाळेत घ्यायचे. मी रडायचो, तेव्हा पावसाळा यायचा. आणि मी हसायचो, तेव्हा उन्हाळा कमी व्हायचा. पण आज मी सांगणार आहे ती मजेशीर, ती हृद्य आठवण – जीने माझ्या आयुष्यात मला एकदा पुन्हा स्वतःची महानता (म्हणजे रोजचंच) अनुभवायला दिली. प्रा. अरुणकुमार यांनी मला प्रोजेक्टवर घेतलं – आणि त्यांनी असं करून खरं तर भारतीय विज्ञान विश्वात एक युगप्रवर्तक घटना घडवली. प्रोजेक्ट सुरू झाला, मी २-३ महिने तिथे येत होतो. (येत होतो – म्हणजे येत होतो, जात होतो, काम काहीसं होत होतं, पण थोडंसं नाही होत होतं).

चक्र

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
कवीने वाचावे वाचले साचावे वाचले, साचले साचले, सुचले आतल्या आचेच्या प्रखर धगीत प्रज्ञेच्या मुशीत शब्दांच्या साच्यात अल्लाद ओतून पाचही प्राणांची पाखर घालून उत्फुल्ल, उत्कट प्रतिभा शिंपून वाटून टाकावे पुन्हा एकदा कागद कोरा ~ सृजन चक्राचा नवीन फेरा

इंद्रायणीकाठी

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
काव्यरस
इंद्रायणी काठी सुंदर कुंडमळा वैष्णवांचा मेळा दाटतो इथे.... पावसाची झडी इंद्रायणी दुथडी वैष्णवांची दाटी इंद्रायणीकाठी...... एकच तो सांधा वैष्णवांचा वांधा आड्याल पड्याल कसे जावे.... विकांती आकांत एक्याजागी दाटला सहावेना भार वैष्णवांचा.... शेल्फ्या,तूनळ्यांची उडाली एकच घाई पायपोस कुणाचा कुणाच्या पायी?.... थरारला सांधा पेकाट मोडले वैष्णव अवघे सांडले,इंद्रायणी भितोत्सवे आता उठला कल्लोळ उडाला गोंधळ भावीकांचा... इथे दोषी कोण सांधा बंद होता वैष्णव दाटले प्रशासन म्हणे... धावले नामवंत प्रशासन कृपावंत देणगी पाच लाख वारसांना.... कुणी सामावले जळी कुणी तरले,वाहीले पुन्हा तीच खेळी म्होरल्

नदीष्ट (ऐसी अक्षरे -२८)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नदीष्ट - नदीच्या काठावरती विस्तारलेले भावविश्व १ गप्पीष्ट, रागिष्ट किंवा नादीष्ट या शब्दांच्या गोतावळ्यात लावला असता नदीच्या प्रवाहाच्या छंदात मग्न तो नदीष्ट! #मनोजबोरगावकर यांची नदी काठच्या, रोजच्या अनेक व्यक्ती, प्रसंग, निसर्ग सापेक्ष अनुभव आहेत, ते या कादंबरीतून प्रवाहासारखे वा

शाळेचा पहिला दिवस...

कर्नलतपस्वी ·
उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती. एकामागोमाग शाळेच्या बसेस आल्या,चौकात येवून थांबल्या. मुले आई-वडील पांगले. आपापल्या मुलांना बस मधे बसवले. सुचना थांबत नव्हत्या. बस भरली. ड्रायव्हरने निर्विकार पणे बस मार्गस्थ केली. आई-वडील आपापल्या घोळक्यात सामील झाले.

त्रिमितीच्या तुरुंगात

अनन्त्_यात्री ·

कर्नलतपस्वी Tue, 06/10/2025 - 14:01
शेवटची दोन कडवी समजली,आणी आवडली सुद्धा. पण बाकी कवीता समजली नाही. श्रीधर फडके यांनी ग्रेसांच्या कवितेला चाल देण्याचा प्रयत्न केला.पण पुढील कडवी समजली नाहीत. ग्रेसांचा व त्यांचा परिचय नव्हता म्हणून ते सुधीर मोघ्यांकडे गेले. त्यांनी सोपे करून दाखवले. https://youtu.be/Ikx26HFj_SM?si=sdn-l2uFSf7haigV अगदी तसेच माझे झाले म्हणून तुम्हीच उलगडून सांगा म्हणजे कवीतेचा अस्वाद घेता येईल.

In reply to by कर्नलतपस्वी

अनन्त्_यात्री Tue, 06/10/2025 - 19:05
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! हे मुक्तक लिहिताना wormholes in space-time हा विषय डोक्यात होता. ह्या संकल्पनेचे सुलभ मराठीत स्पष्टिकरण मी देऊ शकत नाही पण: Many physicists postulate that wormholes are merely projections of a fourth spatial dimension. Also, Wormholes have the theoretical potential to disrupt causality, meaning the natural order of cause and effect could be violated.

कर्नलतपस्वी Tue, 06/10/2025 - 14:01
शेवटची दोन कडवी समजली,आणी आवडली सुद्धा. पण बाकी कवीता समजली नाही. श्रीधर फडके यांनी ग्रेसांच्या कवितेला चाल देण्याचा प्रयत्न केला.पण पुढील कडवी समजली नाहीत. ग्रेसांचा व त्यांचा परिचय नव्हता म्हणून ते सुधीर मोघ्यांकडे गेले. त्यांनी सोपे करून दाखवले. https://youtu.be/Ikx26HFj_SM?si=sdn-l2uFSf7haigV अगदी तसेच माझे झाले म्हणून तुम्हीच उलगडून सांगा म्हणजे कवीतेचा अस्वाद घेता येईल.

In reply to by कर्नलतपस्वी

अनन्त्_यात्री Tue, 06/10/2025 - 19:05
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! हे मुक्तक लिहिताना wormholes in space-time हा विषय डोक्यात होता. ह्या संकल्पनेचे सुलभ मराठीत स्पष्टिकरण मी देऊ शकत नाही पण: Many physicists postulate that wormholes are merely projections of a fourth spatial dimension. Also, Wormholes have the theoretical potential to disrupt causality, meaning the natural order of cause and effect could be violated.
लेखनविषय:
त्रिमितीच्या तुरुंगात घुसमटे जीव ज्यांचा उघडीन त्यांच्यासाठी मार्ग चवथ्या मितीचा कळसा नंतर पाया तिथे नियम असतो कार्यकारण भावाचा जाच जराही नसतो स्थळ-काळात तिथल्या पेव खाच खळग्यांचे उतरवी वर्तमान भूत वेडे भविष्याचे दोर परतीचे मात्र नाही कापणार नक्की आपापल्या कोठडीची खूण ध्यानी ठेवा पक्की :)