बात निकलेगी तो...
तू म्हणालास, कविता लिहिणार... पण जरा जपून हो!
प्रेम बीम तर बिलकूल नको, लोकं बसलेयत टपून हो!
नको लिहूस चंद्र बिंद्र किंवा कंकणभरला हात
इथं सगळेच ओळखतात "त" वरून ताकभात..
विस्कटलेल्या केसांवरून उगाच करतील भलते तर्क.
एका नजरेत ओळखतील सरलेली वयवर्षं..
सहज म्हणून विचारतील इतका तू उदास का रे?
उतरलेला चेहरा मग न बोलता सांगेल सारे..
तुझ्या हरेक शब्दाचा अगदी कीssस पाडतील
बोलता बोलता हळूच माझं नाव काढतील.
तेव्हा मात्र सांभाळ हं, चेहरा ठेव कोरडा
एक जरी हलली रेष, अनर्थ होईल केवढा..
आणखी एक गोष्ट तू कटाक्षाने पाळ,

