टेक्श्चर
कापडाच्या दुकानात
एक कापड आवडलं
पण घेतलं नाही
दुकानदाराला सांगितलं
धागा छान आहे
रंग उत्तम आहे
नक्षीही सुरेख आहे
फक्त 'टेक्श्चर' चांगलं नाही
नंतर विचार केला, तेंव्हा
काही माणसं डोळ्यासमोर तरळली;
त्यांचही असंच आहे....
कापडाच्या दुकानात
एक कापड आवडलं
पण घेतलं नाही
दुकानदाराला सांगितलं
धागा छान आहे
रंग उत्तम आहे
नक्षीही सुरेख आहे
फक्त 'टेक्श्चर' चांगलं नाही
नंतर विचार केला, तेंव्हा
काही माणसं डोळ्यासमोर तरळली;
त्यांचही असंच आहे....
आय टी मध्ये राजीनामा देणे, या क्रियेला पेपर टाकणे असे म्हणतात, त्यावर हि कविता.
साल्याने पेपर टाकलाय...................
तो रोज ऑफिसला येतो
वेळेत येतो; वेळेत जातो
नऊ तास भरले नाहीत; तर चिंता करतो
कमी भरले तास; तर नंतर भरून काढतो
साहेबाने काम दिले; तर नाश्त्याला पण जात नाही
साहेब जागेवर असताना; जागचा उठत नाही
कितीपण महत्वाचे काम असो; साहेब गायब झाल्याशिवाय हा जागचा हालत नाही
साहेब खुर्चीत यायच्या आत, जागेवर यायची सवय काही जात नाही
आमचे जहाज संध्याकाळी गोव्याच्या आसपास पोहोचले. अर्थात हे फक्त आम्हाला जी पी एस आणि दीप स्तंभांवरून कळत होते. पावसाळी वातावरणामुळे समुद्रकिनारा दिसत नव्हताच. पण गोव्याच्या आसपास पोहोचल्यावर तेथील तट रक्षक दलाच्या मुख्यालयात संपर्क केला असता पुढचे दोन दिवस गोवा ते कारवार अशी गस्त घालण्याचे आदेश मिळाले. म्हणजे सरळ दक्षिणेकडे कूच करायच्या ऐवजी तिथेच खेटे मारत राहायचे होते.
एका सामान्य माणसाची आत्मकविता-
सांगा असतो का कधी मी माझा?
----------------------
नाही नसतोच कधी मी माझा!
नाही नसतोच कधी मी माझा!
असतो मी शिक्षकांचा,
असतो जेव्हा शाळेमध्ये!
असतो मी सवंगडी अन भावंडांचा,
खेळतो जेव्हा अंगणामध्ये!
असतो मी बाॅसचा,
असतो जेव्हा आॅफिसमध्ये!
असतो मी कस्टमरचा,
असतो जेव्हा व्यवसायामध्ये!
असतो मी बायको मुलांचा,
असतो जेव्हा घरामध्ये!
असतो मी आई वडीलांचा,
असतो जेव्हा घरामध्ये!
असतो मी मित्रांचा,
बसतो जेव्हा त्यांचेमध्ये!
http://www.misalpav.com/node/29468 भाग दोन...http://www.misalpav.com/node/29344...भाग एक
चिपळूणला गांधरेश्वर नावाच शंकराच देउळ आहे.मूळ शहरापासून जरा बाजूलाच आहे.वाशिष्ठी नदीकिनारी हे वसलय.माझ एक आवडत देउळ.खर तर देउळ साधास आणि छान आहे.पण त्याभोवतीचा परिसर जास्त रम्य आहे.
(कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांची माफी मागून)
खचाखच भरलेली बस स्टॉपवर उभी राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, पावलांवर झेलून घे बुटांचे मार
इवलसं दुःख पिउन टाक
बघ माझी आठवण येते का?
रिक्षाने उडणारा धुळीचा लोट अंगावर घे,
पदर सांभाळ, हात दाखव
इतक करुनही तो नाहीच थांबला तर चालत जा, स्टेशनवर ये
तिथे गर्दी उसळलेली असेलच, फलाटावर पाय रोवून उभी रहा
सारी गर्दी सरकेल एकाच डब्यात, बघ माझी आठवण येते का?
आकाशवाणीच्या वृत्तकक्षात मी छान रमले होते. विद्यार्थी कधीतरी शंका विचारायला यायचे, शुभेच्छापत्रांसाठी कॉपी रायटिंगही सुरू होतं. घरात बहिणीच्या लग्नाची धामधूम सुरू होती. घरातलं पहिलं कार्य. सगळेच उत्साहात होते. ठरल्याप्रमाणे सगळं छान पार पडलं आणि ती आपल्या नव्या घरी रूळली. आमच्या घरी आम्ही अवघे पाच जण. आई-बाबा आणि आम्ही तीन भावंडं. त्यामुळे ताई लग्न करून गेल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस तिचं नसणं खूप प्रकर्षाने जाणवत राहिलं. घरात आम्हा भावंडांमध्ये कॉलेजमध्ये जाणारी ताई पहिली. त्यातून ती कॉलेजच्या तिसऱ्या वर्षापासून अर्धवेळ नोकरी करायची. तिच्याकडे तिच्या रोजच्या अनुभवांचा खजिना असायचा.
काकशाला
“ओकांना कावळे आवडते दिसतायत....”!
… खरे आहे. पुण्यातल्या ओंकारेश्वराच्या आसपास नदीपार जवळून पास होताना सहज जाता जाता नुकतेच आईच्या अंत्यविधीसाठी जमलो असताना निर्माण झालेले दृष्य डोळ्यासमोर तरळले. कावळा शिवायची व कावळ्याच्या पिंडाला स्पर्षाच्या गमती-जमती पहाताला मिळाल्या त्यावरून काही सुचले ते सादर.
-----
“
विठ्ठलाचा पुत्र
रुक्मिणीचा बाळ
संन्याशाचे पोर
म्हणूनी अस्पृश्य
नका देऊ अन्न
नका देऊ पाणी
नका देऊ थारा
पहा हा अस्पृश्य
सावली पडता
दूर हो म्हणती
शिव्या शाप देती
म्हणती अस्पृश्य
दुषणे ठेविली
भिक्षा नाही दिली
मुंज नाही केली
ठेविले अस्पृश्य
ज्ञानराज श्रेष्ठ
भक्तराज श्रेष्ठ
योगीराज श्रेष्ठ
परि तो अस्पृश्य?
गीता उपदेशी
बोले ज्ञानदेवी
ज्ञान करी मुक्त
परि तो अस्पृश्य?
विठोबाचा प्राण
विसोबाचा गुरू