तात्या ......... !
तात्या वारला !
चंद्रशेखर अभ्यंकर असं भारदस्त नाव धारण केलेला हा आडमाप माणूस - वयाने आणि आकाराने माझ्यापेक्षा बराच मोठा होता. मोठा असूनही त्याला कधी अहोजाहो केलं नाही. तो वारला हे भिडेखातर लिहितोय - तात्या मेला अस लिहिलं पाहिजे.
तात्या वारला !
चंद्रशेखर अभ्यंकर असं भारदस्त नाव धारण केलेला हा आडमाप माणूस - वयाने आणि आकाराने माझ्यापेक्षा बराच मोठा होता. मोठा असूनही त्याला कधी अहोजाहो केलं नाही. तो वारला हे भिडेखातर लिहितोय - तात्या मेला अस लिहिलं पाहिजे.
“मागच्या वेळी तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा कधी पाहिलं होतं,त्याला भेटला होता आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व तुम्हाला जे वाटलं होतं तेच होतं का?
कदाचित कधीच नसावं.विचार करा, एका दिवसात तुम्हाला किती वेळा “अरे, तो अबोल आहे”, किंवा “ती इतकी छान नाही” किंवा “ते तिथे का असतील?” असे प्रश्न मनात उद्भवले
असतील.
कसला वेल्हाळ आणि गोssड असतो हा 'गं'!
मागचे "सा रे" विसरायला लावणारा,
पुढलं "मा प" ओलांडू न देणारा,
"धा नी" रंगात मोहरवणारा,
पायाला हळूच मिठी मारणारा ठेहरावसा उंबराच जणू..
थोडासा सरळ, थोडासा वळणदार..
पण आतल्या गाठीचा मात्र बिलकुलच नाही.
कान्याला टेकून आपला ऐटीत उभा.
सुबक, कमनीय, गोजिरा अगदी!
आणि जेव्हा तो तुझ्या तोंडून ऐकते ना,
त्याचा लगाव, लहेजा आणि लगन...किती रे कातील!
तुझ्या ग च्या लडीवाळ चक्रव्यूहात मी कधी कशी ओढली जाते कळतच नाही..
गोल गोल गोल गोल, तिथंच फिरत रहाते मी.
आजुबाजुचे शब्द विरून जातात.
कथा
या विषयावरची चर्चा
आपण लहानपणापासून गोष्टी ऐकत आलेलो असतो . पुढे आपली तीच आवड कथेकडे वळते . पण असं म्हणतात की कथा हा प्रकार मूळचा आपला नाही . तरीही आता तो भारतात चांगलाच रुजलाय . सदर चर्चा ही त्या संदर्भात आहे .
कथा अनेक प्रकारची असू शकते. ती अनेक प्रकारे मांडता येऊ शकते . काही कथा या कायम मनात घर करून राहतात .
मराठी मध्ये चारुतासागर यांची ' नागीण' ही कथा , हिंदी - उसने कहा था , इंग्लिश - द सिक्रेट लाईफ ऑफ वॉल्टर मिट्टी , अशा काही कथांचे संदर्भ नेहमी दिले जातात . आणि अशा अनेक कथा .
त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे एका मोठ्या बालडीत कपडे धुण्यासाठी साधारण कोमट पाणी भरून साबूची पावडर टाकून दोन्ही हात पाण्यात बुडवून साबूचा फेस बाथरुम मध्ये तयार करीत होतो.
तेव्हड्यात मी एक काळा कोळी त्या साबूच्या फेसावर तरंगताना पाहिला. माझ्या बोटांनी मी फेसाच्या खाली असलेले माझे दोन्ही हात हळुवारपणे हलवून,त्या कोळ्याने आपली सुटका करून घेत पळून जावं या उद्देशाने प्रयत्न करीत होतो.
युद्धात शस्त्रापेक्षा शस्त्र कोण चालवत आहे हे महत्त्वाचे असते. जेव्हा पाकिस्तानी लष्कराने लाहोर आघाडीवर हल्ला करायला सुरुवात केली तेव्हा भारतीय लष्कराकडे कोणता पर्याय होता? त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले होते, तसेच रस्तेही बंद करण्यात आले होते. त्याचवेळी त्यांना अखनूर (काश्मीर) वाचल्याची बातमी मिळत होती. पाकिस्तानी वायुसेना लाहोर आघाडीवर जोरदार हल्ला करत होती, त्यामुळे भारतीय लष्कर आपली पोझिशन बदलत होते. पाकिस्तानच्या युद्ध इतिहासात मेजर जनरल निरंजन प्रसाद यांच्या पलायनाचे चित्रण मोठ्या चवीने केले जाते.
काल एका नातेवाईकाच्या इस्टेटीच्या प्रकरणावरून रजिस्ट्रेशनच्या कामासाठी जावे लागले. भावाच्या मुलाने मला गादीत घातले आणि म्हणाला चल. गेलो.
मी पुण्यात लहानाचा मोठा झालो. पण ह्या माझ्या पुण्याचे असे भाग आहेत कि ज्यांचे मी नावही ऐकले नव्हते. अशाच एका भागात आम्हीला जायचं होतं.
मी त्याला विचारलं, “बबन आपण कुठं चाललो आहोत?”
मला उत्तर द्यायच्या ऐवजी त्याने अतिफचे गाण लावलं, “हम किस गलीमे...”
मग म्हणाला, “मलाही माहित नाही. गुगल बाबा लावला आहे, तो जिकडं नेईल तिकडं जायचं.”
छान.
मी खिडकीच्या बाहेरचे कॉंक्रिट जग बघत होतो.
“नंबर फिफ्टी फोर.
समथिंग इज मिसिंग असं वाटतं असतांनाच काही मराठी सिनेमे मन गाभाऱ्याशी पुन्हा नाळ जुळवून देतात.नाळ सिनेमाने आई आणि मुल या नात्याची वेगळीच कथा दाखवली होती.चैत्याचा गोड निरागस वावर ,त्याची आईच्या नजरेत भरण्याची हुरहूर सगळं कसं अलगद तरीही मनात वेगाने घडत होतं.
“आपला भारत देश आता प्रगतीच्या
मार्गावर आहे. आणि भारताला प्रगती
करण्याच्या मार्गात आता कुणी ही खीळ घालू शकत नाही.”
हे मी प्रो.देसायांना चर्चेच्या दरम्यान
सांगत होतो.
आणि मी पूढे म्हणालो,
“भारतात खूप संशोधन संस्था निर्माण केल्या पाहिजेत.TIFR आणि BARC सारख्या संस्था श्री.टाटा आणि डॉ.भाभा ह्यांच्या सहाय्याने सत्तर बहात्तर वर्षांपूर्वी स्थापन झाल्या. स्वतःच्या हिम्मतीवर अणू अस्त्रांवर अभ्यास करून स्वतःची अणू अस्त्रं भारताने निर्माण केली.
पाऊले चालती बीजेपीची वाट
सद्य पक्षाची सोडूनिया साथ
गांजुनिया भारी इडी चौकशीने
पडता हातात बेड्यांची माळ
पाऊले चालती …
अण्णा आबा नेते कार्यकर्ते ते
पाहुनिया सारे फिरविती पाठ
पाऊले चालती …
येता होकार श्री पक्षश्रेष्ठींचा
तसा चौकशीचा व्हावा नायनाट
पाऊले चालती …
सारे शांत होता पुन्हा लागे ओढ
तस्सा वाहू लागे भ्रष्टाचाराचा पाट
पाऊले चालती …