सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
25 Jul 2024 - 10:58 am | अथांग आकाश
प्रगती आहे! कॅटरपिलरकडे शिकवणी सुरु ठेवा!!

वाचकांचा मेन्दु कुरतडण्यात लवकर प्राविण्य मिळेल :-)
25 Jul 2024 - 11:01 am | Bhakti
चांगलय काव्य!
25 Jul 2024 - 12:23 pm | कर्नलतपस्वी
लिहीत रहा.
सुख दु:खाची मांदियाळी,
आयुष्य भोगीले
गुणिले भागिले हाती शुन्य आले
शुन्यात शुन्य मिळूनी ,अंनंत तत्व झाले
X/0 = ∞ ? !
25 Jul 2024 - 1:13 pm | अथांग आकाश
हुक शॉट येत नसेल तर बाउन्सर चेंडू सोडून द्यायचा!
उगीच बॅट मधे घातली तर फलंदाज झेलबाद होतो :-)
25 Jul 2024 - 1:51 pm | प्रसाद गोडबोले
अनंतयात्री ,
अफलातुन सुंदर लिहिलं गेलें आहे हे !
हे कडवे वाचल्या वाचल्या माऊलींच्या अभंगातील कडवे आठवले .
"दर्पणीं पाहता रूप न दिसे ओ आपुले | बाप रखुमादेवीवरें अम्ज ऐसे केलें "
हे म्हणताना माऊलींच्या मनात जी भावना असेल ती काहीसी अशीच असावी. आपण आपलाच शोध घ्यायला जातो अन लक्षात येतें की आपण ह्या अखंड अनंत अस्तित्वाचाच एक हिस्सा आहोत , रादर आपण तेच आहोत . मग तुम्ही म्हणता तसें अनंत्त्वाची भेटी होते !
मग हे जे अनंतत्व आहे ते मोजयला , कवेत घ्यायला गेलो तर कवेत घेताच येत नाही . जी आसावला , कसनुसा होऊन जातो !
"क्षेमालागीं जीव उतावीळ माझा । म्हणवूनि स्फुरताती बाहो । क्षेम देऊं गेले तंव मीची मी एकली । आसावला जीव राहो ॥ "
आणि मग पुढे - आणि मग हे अनंत कवेत येत नाही, समजुन घेता येत नाही, अनुभवता येत नाही. कारण कोण अनुभवणार ? आणि आणि हा अनुभवणारा हा ज्याचा अनुभव घ्यायचा ते अनंत ,त्याच्यातच आहे सामावलेला, म्हणजे अख्खा अनुभवच ह्या अनंताच्या कवेत आहे, अनंतच आहेत , अनुभवणारा आणि अनुभाव्य भिन्न नाहीच ! आपण तोच आहोत ! आपल्याच अंतरात ती अनंताची धुन झंकारते !
"बाप रखुमादेविवरू ह्रदयींचा जाणुनि ।
अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचा डोळा पाहों मी गेलीये ।
तंव भीतरीं पालटु झाला ॥ "
आणि मग हा केवळ झंकारण्याचा , ध्यानाचा समाधीचा एक क्षण रहात नाही, कारण प्रत्येक क्षणात, जळी स्थळी काष्टी पाषाणी तुम्हाला अनंतच दिसत आहे. त्यानंतर अख्खा प्रवासच अनंतात आहे ! तेव्हा तुम्ही अनंताचे यात्री झालेला असता , अनंताकडुन अनंताकडे अनंताच्या मार्गावरुन प्रवास करणारे!
माऊली म्हणतात :
घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये ।
ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥
अहाहा.
खुपच सुंदर कविता लिहिलीत तुम्ही आज. माऊलींची आठवण करुन दिलीत . मनःपुर्वक धन्यवाद :)
पुढील लेखनासाठी शुभेच्छा !