चा-वट पॉर्निमा!
तिचे बोलणे खरे करते
ती असे नखरे करते
पिझ्झा बर्गर नेहेमीचे पण
जेवण सुद्धा बरे करते
राग नक्की झूठ असावा
प्रेम बहुदा खरे करते
मिठी मध्ये घेते आणिक
हट्ट सारे पुरे करते
तिचे बोलणे खरे करते
ती असे नखरे करते
पिझ्झा बर्गर नेहेमीचे पण
जेवण सुद्धा बरे करते
राग नक्की झूठ असावा
प्रेम बहुदा खरे करते
मिठी मध्ये घेते आणिक
हट्ट सारे पुरे करते
महाजनस्य संसर्गः
-राजीव उपाध्ये
पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाईम्स
पञ्चतंत्रात एक श्लोक आहे : महाजनस्य संसर्गः कस्य नोन्नतिकारकः। पद्मपत्रस्थितं तोयं धत्ते मुक्ताफलश्रियम्॥ ‘मोठ्या लोकांचा सहवास कुणाला प्रगतीकारक नसतो? कारण कमळाच्या पानावर पडलेले पाणी मोत्यांची शोभा धारण करते,’ हा याचा अर्थ.
साहित्य तेव्हा जॉब करत होता, आणि ललिता सध्या फ्री लान्सिंग. त्यांची मुलगी लेखना आता ५ वर्षांची झाली होती. सध्या ती एका शाळेत सिनियर के जी मध्ये होती. एका उच्चभ्रू सोसायटीतील स्वतःच्या फ्लॅट मध्ये ते राहत होते. त्यांच्या फ्लॅटच्या लॉबीच्या समोरचा फ्लॅट नुकताच विकला गेला होता. पण अजून कोणी तेथे राहायला आले नव्हते. त्या फ्लॅटच्या जुन्या मालकांचे आणि साहित्य ललिता यांचे चांगले संबंध होते. आता कोण तिथे नवीन येणार याची साहित्य आणि ललिताला उत्सुकता होती.
उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती.
घ्या कविता...
'कॅश'वंत वर्मा,
भोग आता कर्मा,
महाभियोगधर्मा
सामोरी जा ||
जर दिला राजीनामा,
तर नाही काजीनामा,
सांग तुझा कारनामा,
निवृत्ती जा ||
न्यायाधीशाच्या घरी रोकड,
आता तो शोधतो बोकड,
जो घेईल खांद्यावर जोखड,
वाचवण्या ||
संसदेत घेराव,
मांडला ठराव,
तरी हे राव,
ढिम्म नाही ||
न्यायाधीश यशवंत
पकडला गेला 'कॅश'वंत
आता करणार बस वंत
घरातच ||
तुम्ही फक्त किडनी, लिव्हर आणि दिलच जिंकू शकता आयपीएल ट्रॉफी तुमच्या नशिबात नाही.. विराट कोहली आरसीबीसाठी पनौती आहे त्याच्यामुळे आरसीबी ट्रॉफी जिंकत नाहीये.. विराटने एकतर टीम बदलावी किंवा आयपीएल खेळणे सोडून द्यावे.. या आणि अशाच प्रकारे विराट, विराट फॅन्स आणि आरसीबीला ट्रोल केले गेले, मजाक उडवला गेला, सल्ले दिले गेले. १८ वर्षे, तब्बल १८ वर्षे आरसीबी एका आयपीएल ट्रॉफी साठी झगडत होती, चाहते तळमळत होते. यादरम्यान २- ४ वेळेस आरसीबी जेतेपदाच्या अगदी जवळ सुद्धा गेली पण कधी नशीब तर कधी समोरील संघाच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना ट्रॉफीने हुलकावणी दिली.
बाजाराचा कल : ९ जूनचा आठवडा
====================
मंडळी,
मागील आठवड्यात केलेले भाकीत बरोबर ठरले आहे. बाजाराने दमदार रिकव्हरी केली आहे. फक्त माझा मेणबत्तीच्या आकाराचा अंदाज चुकला.
आकृती -१ निफ्टीचा साप्ताहिक आलेख

आकृती -२ बाजार वर/खाली जायची शक्यता १२%/८८%

त्रिमितीच्या तुरुंगात
घुसमटे जीव ज्यांचा
उघडीन त्यांच्यासाठी
मार्ग चवथ्या मितीचा
कळसा नंतर पाया
तिथे नियम असतो
कार्यकारण भावाचा
जाच जराही नसतो
स्थळ-काळात तिथल्या
पेव खाच खळग्यांचे
उतरवी वर्तमान
भूत वेडे भविष्याचे
दोर परतीचे मात्र
नाही कापणार नक्की
आपापल्या कोठडीची
खूण ध्यानी ठेवा पक्की :)
साधारणतः सर्वांकडे जी समस्या सुरू होते तिच समस्या आमच्याकडे सुरू झाली आहे.
"१०-१२ वर्षांतील मुलांचा चिडचिडेपणा"
मुलांच्या बाबतीत आपण खुप गोष्टी ठरवल्या असतात.पण मुलांचे किंचित बंड चिडचिड वाढलेली दिसते.त्यात नोकरी करणारी आई म्हणजे मुलांच्या वाढीमध्ये तारेवरची कसरत ,अनेक अपराधी भावनेने ग्रस्त व्हायला होते.वरती समाजाकडून उठणारे बोटं तो तर वेगळाच विषय..
डिसेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला हा - काजोल, विशाल जेठवा यांच्यासह आमिर खान ची छोटी भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच 'चॅनेल सर्फिंग' करताना दिसला. एवढ्या सशक्त अभिनेत्यांचा हा कोणता सिनेमा आपण पाहीला नाही, या विचाराने सर्फिंग थांबले. जसजसं कथानक पुढे सरकायला लागलं, तसतसं न पाहिलेल्या भागाचा अंदाज येऊ लागला आणि चित्रपटात गुंतत गेलो - याचे श्रेय नक्कीच दिग्दर्शक रेवती (दक्षिणात्य अभिनेत्री), पटकथा लेखक समीर अरोरा व कौसर मुनीर या त्रयीना जातं. हा चित्रपट श्रीकांत मूर्थी यांच्या The Last Hurrah या पुस्तकांवर आधारित आहे.