ह्या आधीचे.....
सियाचीन ग्लेशीयर ...भाग ३
....... कंट्रोल रूम मधली मंडळी गोंधळली. टीम लीडरला अजून वाटत होते व विश्वास होता की काही तरी चांगला सल्ला कंट्रोल रूम मधून मिळेल म्हणून. अशा परिस्थितीत कंट्रोल रूम मधल्या लोकांनी काहीतरी सल्ला देणे भागच होते................
(मी काढलेला फोटो)
"तुझ्याकडे स्नो स्कूटरर्स आहेत? उपयोग कर त्यांचा" बेस कमांडरने टीम लीडरला रेडिओवरून सल्ला दिला.
"व्हॉट द हेल आर यू अॅडव्हायजींग? इफ ही इज पूल्ड बाय द स्कूटर, इट विल ब्रेक हिज बोन्स्!" न राहवून तावातावाने डॉक्टर बेस कमांडरला म्हणाला.
चिडलेल्या बेस कमांडरने त्याला रागात विचारले "यू हॅव ए बेटर आयडिया दॅन धिस?" अर्थातच डॉक्टरांकडे गप्प बसण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.
खाईच्या तोंडाशी अधीरतेने असलेल्या टीम लीडरने स्वतःलाच शिवी हासडली. कारण, स्नो स्कूटर वापरायचे इतक्या वेळ त्याच्या लक्षात कसे आले नाही ह्याचे त्याला फार वाईट वाटत होते. कॅप्टनच्या इशाऱ्यावर लागलीच स्नो स्कुटरर्स् सुरू केल्या गेल्या व नेमक्या जागी उभ्या केल्या. दोरीचा हूक स्कूटरला अडकवला. हे सगळे झाल्यावर स्नोस्कुटरच्या ड्रायव्हरने तयार असल्याचा टीम लीडरला इशारा केला. टीम लीडरच्या थम्स् अप वर ड्रायव्हरने स्नोस्कुटरला फूल थ्रॉटल दिला. दोरी त्या खाईच्या तोंडाशी साठलेल्या बर्फात रुतायला लागली व ताणली जाऊ लागली पण वर काही येईना. स्कूटर बरोबरच, बाकीचे नऊ जवान न सांगताच जोर लावून त्या दोरीला त्यांच्या परीने ओढू लागले. खरे म्हणजे त्या स्नो स्कूटरच्या जोरा पुढे त्यांचा जोर नगण्य होता, पण अशा हताश स्थितीत, विवेक हरवला जातो....... आतला जवान थोडा सुद्धा हालला नाही.
"नो मुव्हमेंट" टीम लीडरने कंट्रोल रूमला कळवले.
"ट्राय अगेन" बेस कमांडर अजून दुसरे काय सांगणार होता.
टीम लीडरला त्याचा स्वतःचाच राग आला. हताश वाटले. अडकलेला जवान दिसत आहे पण त्याला तो वर काढू शकत नव्हता. रेस्क्यू टीमची व्यर्थता त्याला जाणवली.
"इटस् टाइम" हेलिकॉप्टरच्या पायलटने कंट्रोल रूमला सांगितले.
कंट्रोल रूमला अजून एका नकोश्या वस्तुस्थितीचा धक्का बसला. हळूहळू वादळी वारे व्हायला सुरू झाले होते. थोड्याच वेळात त्यांचा वेग इतका वाढणार होता की मग ते हेलिकॉप्टर व ती सगळी माणसे तेथेच अडकली असती. अडकलेला माणूस ग्लेशीयरमध्ये उघड्यावर रात्र काढू शकत नाही. मरण अटळ असते. रेस्क्यू टीमला सोडून चालणार नव्हते. त्यांना घेऊन परतायचे होते बेस कँपवर. वेळेत. ‘दोरीच्या’ बाकीच्या सात जवानांना रसद घेऊन जवळच असलेल्या त्या फॉरवर्ड पोस्टवर जायचे होते. त्यासाठीच तर ते निघाले होते इतक्या पहाटे.
रेस्क्यू टीम जरी रेस्क्यू करणारी असली तरी ते देव थोडेच होते. रात्री असे बाहेर राहिले असते तर गोठून मेलेच असते. ते बेस कँपवर स्थित असल्या कारणाने त्यांना ग्लेशीयरवर कोठेही बचाव कार्यासाठी थोड्यावेळे पुरते जाता येई. त्यामुळे नेहमी ते दहा हजार फुटांवर असायचे. दहा हजार फुटांवर असणाऱ्यांना अचानक अठरा हजार फुटांवर फार काळ राहता येत नाही. हा अपघात समुद्रसपाटीपासून अठरा हजार फूट उंचीवर झाला होता! अठरा हजार फुटांवर राहायचे असेल तर आधी त्यांना वेगळ्या प्रकारचे अॅक्लीमटायझेशन करावे लागते. अठरा हजार फुटांवर पोस्टवर राहणाऱ्या जवानांचे सुद्धा टप्प्या टप्प्याने अॅक्लीमटायझेशन केले जाते व मग तेव्हाच ते तेथे राहू शकतात. त्यामुळे वाचवण्यासाठी गेलेल्या रेस्क्यू टीमने अॅक्लेमटायझेशन व्यतिरिक्त तेथे राहणे किंवा रात्र काढणे म्हणजे मरणाला आमंत्रण दिल्या सारखेच होते. बेस कमांडरला हे
साहजिकच मान्य नव्हते.
बेस कमांडरने घड्याळाकडे पाहिले.
"दहा मिनिटे?" त्याने पायलटला विचारले.
"ह्याच्या पेक्षा जास्त नाही"
बेस कमांडरने रेडिओचा हॅन्डसेट हातात घेतला.
"माइक वन, यू हॅव अबाउट ट्वेन्टी मिनिट्स बिफोर द फर्स्ट लिफ्ट कमेन्सेस्. डू युअर बेस्ट"
खाईच्या जवळ टीम लीडरने निराशेने आपल्या घडाळ्याकडे पाहिले. "वीस मिनिटे. डॅमीट!"
वीस मिनिटात त्यांना काय करता येणार होते जे मागच्या एवढ्या वेळात ते करू शकले नव्हते. असहायपणा कशाला म्हणतात ते टीम लीडर अनुभवत होता. एव्हाना खाईतल्या जवानाला कळून चुकले काहीतरी भयंकर झालेले आहे. रेस्क्यू टीमला वाचवता येत नाही ह्याची त्याला जाणीव झाली. भीतीने त्याची तडफड पुन्हा सुरू झाली.
निराशायुक्त आवाजात टीम लीडरने त्याच्या टीमला आदेश दिला, "आपण सगळे खाईत जात आहोत".
त्यांनी दोन नव्या दोऱ्या काढल्या, खाईच्या तोंडाशी ठोकलेल्या डांबरी खिळ्यांशी पक्क्या केल्या व चारही जण दोऱ्यांवरून स्लिदर करून म्हणजे खाली घसरत खाईत गेले. प्रत्येकाने आईस एक्स घेतल्या होत्या. खाईच्या गुडुप अंधारात विजेरीच्या झोतात, चारही जणांनी अडकलेल्या जवानाच्या भोवतालची बर्फाची भिंत कुदळीने फोडायचा प्रयत्न सुरू केला. उपयोग नव्हता. जागा इतकी अरुंद होती की, कुदळीचा जोर बसण्यासाठी द्यावा लागणारा हाताचा झोका देण्या इतकी पण जागा नव्हती. त्यामुळे जोर म्हणावा तसा बसत नव्हता. बर्फ इतका कडक होता की, त्यांना त्यांच्या कुदळी एखाद्या दगडावर मारत आहोत असे वाटत होते. आवाज पण तसाच येत होता. खण् ssss, खण् ssss असा. प्रयोग निष्फळ होत चालला होता. त्या दगडासारख्या बर्फावर खरचोटा पण उठत नव्हता. वेळ कमी राहिला आहे, काम खूप आहे ह्या जाणिवेने व दमलेल्या स्थितीत हताशपणे कुदळ मारत राहिल्यामुळे त्यांचे हात कापायला लागले होते. गणिताच्या परीक्षेत शेवटची पाच मिनिटे राहिली असताना दहा प्रश्न सोडवायचे राहिले आहेत हे एकदम लक्षात येते तेव्हा आपले हात थरथरतात व सुचेनासे होते तसेच अगदी. कुदळीचे घावावर घाव घातले जात होते. त्या अंधारात व घाईत, एका कोणाचा घाव त्या अडकलेल्या जवानाच्या खांद्यावर बसला. त्या जवानाच्या संवेदना, आतल्या भयंकर गारठ्यामुळे, मालवत चालल्याच होत्या त्यातच अचानक झालेल्या ह्या वाराने, उठलेल्या भयंकर वेदनेने जवानाने किंकाळी फोडली. रक्त टपकायला लागले.
हताश होऊन शेवटी रेस्क्यू टीमला कळले काहीही केले तरी राहिलेल्या वेळेत त्याला सोडवता येणार नाही. त्यांना दुरून हेलिकॉप्टर येण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. वेळ झाली होती. टीम लीडरने त्याच्या टीमला वर जायला खुणावले. नाखुशीने टीमने त्यांच्या दोऱ्यांना इशाऱ्याचा दोनदा ओढ दिला. हळूहळू वरच्या जवानांनी त्यांना ओढायला सुरवात केली. टीम लीडर मात्र अजून त्याच्या जवळच होता, बाकीचे वर जायला लागले होते.
अडकलेला जवान आता पूर्णपणे मनाने कोलमोडला होता. आवरता न येऊ शकणारे हुंदके देत रडत होता. सोडून जाऊ नका असे त्यांना विनवीत होता. टीम लीडर स्वतःला येणारे हुंदके आवरू पाहत होता. काहीच नाही, अगदी काहीच करू शकत नव्हता तो. त्या घटकेला जेवढे त्याच्याकडे होते व जेवढे करता येण्यासारखे होते ते सर्व करून झाले होते. टीम लीडरने हेलिकॉप्टरची पहिली सॉर्टी लॅन्ड होऊन थोड्या वेळाने हेलिकॉप्टर, टेकऑफ झाल्याचे ऐकले. म्हणजे टीम मधल्या दोन जवानांना बेस कँपला पोहोचवून हेलिकॉप्टरच्या दुसऱ्या फेरीला अजून पंधरा वीस मिनिटे होती.
"मुझे छोडके मत जाना साब।" त्या कॅप्टनला उद्देशून अडकलेल्या जवानाने विनवले. त्याचे केविलवाणे विनवणे कॅप्टनला सहन होईना. तो विनवीत होता. हा काही करू शकत नव्हता. टीम लीडरला त्याचे आता पर्यंतचे सगळे शिक्षण, सगळी शिकवण, सगळा अनुभव वाया गेल्यासारखे वाटायला लागले. ह्या परिस्थितीला तोंड द्यायची त्याची इच्छा नव्हती. पण तो तिथे होता. इच्छा नसून. त्याचा साथीदार येथे त्याच्या समोर हळूहळू मरत होता. कुदळीच्या बसलेल्या घावाने वेदनेत होता व कॅप्टन हतबल होता. काही सेकंद गेले. असे वाटले की त्या अडकलेल्या जवानात थोडी शक्ती आली. त्याची निराशा गेली. एकदम उभारी आल्या सारखे वाटावे तसा त्याचा चेहरा झाला. वाटले की मरणाला सामोरे जाण्याचे धैर्य त्याने गोळा केले असावे. आता पर्यंत कापणारा त्याचा आवाज स्थिर झाला व शुद्ध स्पष्ट आवाजात अडकलेला जवान कॅप्टनला म्हणाला,
"मेरी फॅमिली साब, मेरे तीन छोटे बच्चे है। माँ व पिताजी, बहोत बुढे है साब।"
"उनका खयाल हम रखेंगे।" टीम लीडर उत्तरला.
"साब, उनको मत बताना, की मेरी मौत ऐसी हूई। वो सेह नही पाएंगे, टूंट जाएंगे"
"नही उनको नही बताएंगे। उनको कहेंगे की, तूम गिरते ही मर गये।"
"उनको बताना, बताना की...."
"तुझे जो बोलना है, बोलो।, हम बताएंगे उनको।"
"उनको मेरे तरफ सें सॉरी केहना साब। मैने उनको ऐसेही छोड दिया।" त्याच्या डोळ्यातून परत अश्रू ओघळले.
"फिकर मत करो। उनका खयाल आर्मी रखेगी।" टीम लीडरचा आवाज फुटत नव्हता. तो स्वतःचे हुंदके आवरत बोलत होता.
त्याला कसेसेच वाटत होते. पूर्णसत्य, पूर्णं वस्तुस्थिती त्यांच्या डोळ्यांसमोर दिसत होती व ते दोघे असे त्या स्थितीत ह्या विषयावर बोलत होते. अजून काही मिनिटातच लीडर, त्या अडकलेल्या जवानाला मरणासाठी एकटे सोडून जाणार होता. त्या भयाण अंधाऱ्या खाईत, त्या ग्लेशीयर मध्ये. रात्रीच्या पडलेल्या घाणेरड्या स्वप्नागत. हे असे होत नसते, सकाळी उठल्यावर आपण हुस्स करतो की ते स्वप्न होते म्हणून व विसरून पण जातो. आज स्वप्न नव्हते जागेपणीच त्याच्या समोर होत होते ते सारे.
"और कितना देर, साब।" हुंदके देत त्याने विचारले.
पहिल्यांदा टीम लीडरला कळलेच नाही. त्याने, "आता कधीही हेलिकॉप्टर येणारच आहे….", हे सांगायला सुरवातच केली होती आणि लागलीच जीभ चावली, त्या अडकलेल्या जवानाला हेलिकॉप्टर येण्यात कोणतेही स्वारस्य उरले नव्हते, त्याला काय म्हणायचे आहे हे लक्षात येऊन टीम लीडर पुढे म्हणाला,
"जादा समय नही।" तो खोटे बोलत होता.
"साब, अभी दर्द नही है। मुझे कुछ महसूस नही हो रहा है साब।"
"हss, और बहोत जलदी, तुमको निंदा लग जायेगी।............ बस।"
"मुझे डर लग रहा है, साब।"
"भगवान का नाम लो।" टीम लीडरने त्याचा हात आपल्या हाताने दाबत म्हटले.
"और बाकी सब फिकर छोडो।" त्याचे शब्द त्यालाच पोकळ वाटत होते.
"साब, मै जाने तक, आप रहोगे मेरे पास?" त्याने बिचकत विचारले.
जसे काही त्याला उत्तर देण्यासाठीच हेलिकॉप्टरचा दुरून येणारा आवाज खाई मध्ये घुमायला लागला. टीम लीडर व टीम मधल्या राहिलेल्या साथीदाराला घेण्यासाठी ते परत येत होते. त्याला सोडून जायच्या कल्पनेने कॅप्टनला ती हिमखाई अजूनच गोठणारी, एकांती व भयानक वाटायला लागली होती. अशा भकास खाईत, त्याला मरायला सोडून आपण निघून जायचे म्हणजे त्याला त्याचे आयुष्य सगळे निरर्थक वाटायला लागले. टीम लीडरने एक हात मोकळा करून दोरीला धरला, दुसऱ्या हाताने अडकलेल्या जवानाचा हात हातात घेतला. त्याच्या मनातला कल्लोळ शब्दात सांगणे कठीण.
त्याचा हात हातात घेऊन शरमून टीम लीडर त्याला म्हणतो, "मुझे जाना होगा।"
त्या अडकलेल्या जवानाने त्याचा हात इतका घट्ट पकडून ठेवला होता की कॅप्टनला आपला हात सोडवण्यासाठी जोरात खेचायला लागला. टीम लीडरने इशाऱ्यासाठी आपली दोरी दोनदा खेचली. टीम लीडर वरती खेचला जात असताना, अडकलेल्या जवानाच्या कानावर पडणाऱ्या आर्त किंकाळ्या, त्याला बाहेर येई पर्यंत ऐकायला येत होत्या. एवढेच काय त्याला असे वाटले की हेलिकॉप्टरचा कानठळ्या बसणाऱ्या आवाज सर्वत्र घुमत असताना सुद्धा त्या जवानाच्या किंकाळ्या त्याच्या कानात घुमून राहिल्या होत्या. खाईच्या बाहेर आल्यावर टीम लीडरला समजून चुकले की बाहेर वादळी वारे वाहू लागले आहेत. एकीकडे लांबवर उतरलेल्या हेलिकॉप्टरचा अधीर पायलट त्याला लवकर येण्यासाठी खुणावत होता, त्याच्या टीमचा दुसरा साथीदार एव्हाना राहिलेले साहित्य गोळा करायला लागला होता. त्यांना उशीर करून चालणार नव्हते. हे सगळे चालले असतानाच अचानक त्या हिमखाईच्या तोंडाशी टीम लीडर निःस्थब्धपणे उभा राहिला. विचारात. त्याच्यासाठी समय थांबल्या सारखा झाला होता. उतरलेल्या हेलिकॉप्टरने आपले रोटर्स थांबवले नव्हते. नाहीतर त्या वादळात त्यांचे पंखे परत सुरू करता आले नसते. हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या वाऱ्याच्या फेकाने बर्फ व हिमखडे उडत होते. टीम लीडरला लांबून पायलटने दिलेला हाताचा इशारा दिसला. लीडरला खाली राहिलेल्या जवानाच्या आर्त किंकाळ्या अजून ऐकू येतच होत्या. त्याचा साथीदार हेलिकॉप्टरच्या दिशेने पळायला लागलाच होता, तेव्हाच एकदम काहीतरी लक्षात आल्या सारखे होऊन, लीडर साथीदाराला म्हणाला, "वेट. रूको। वापीस आओ। मैं, एक मिनट कै लिये नीचे जा रहा हुँ।"
साथीदाराला धक्काच बसला म्हणाला "साब, चलो। टाइम नही है अभी। अगर नीचे कुछ सामान रह गया हो, तो जाने दो अभी। अभी जाना ठीक नही है।"
टीम लीडरने काही न बोलता, पटकन दोरीचा हूक डांबरी खिळ्याला अडकवला, व खाईत जायला सुरवात पण केली होती. साथीदाराने कॅप्टनच्या मनातले विचार जाणले की काय कोण जाणे, परत माघारी पळत येत, साथीदार कॅप्टनला ओरडून म्हणाला,
"साब, ऐसा मत करो।" हाताने इशारा करत टीम लीडरला पुढे म्हणाला "ये ठीक नही है साsssब।"
"मै। उसके लिये और कुछ कर नही सकता।" टीम लीडरने, साथीदाराला म्हटले व झपझप खाली जाऊ लागला.
"मै, आपके साथ आ रहा हू साsssब।"
"नहीss।" टीम लीडरने फटकारले साथीदाराला. "मैं टीम लीडर हूँ। ये भी मै ने ही करना हैं।"
"व्हॉट द हेल ही इज डूइंग?" शंभर यार्डावर गोंधळलेला हेलिकॉप्टर पायलट आपल्या को-पायलटला विचारत होता. एव्हाना वाऱ्याचा वेग चांगलाच वाढला होता, व वाऱ्याच्या जोराने आता सगळे हेलिकॉप्टर हालायला लागले होते. पायलटला हेलिकॉप्टरला कंट्रोल करणे मुश्किलीचे झाले होते.
"व्हिक्टर वन टू बेस, व्हॉट द हेल इज टीम लीडर डूइंग देअर. ही इज गोईंग टू किल् एव्हरी बडी ऑफ अस इफ हि इज नॉट बॅक सून. वी कांट हॅन्ग ऑन लाइक धिस एनी लॉन्गर" आपल्या रेडिओवर पायलटने बेस कँप ला कळवले.
"आय हॅव नो आयडिया" बेस कमांडर उत्तरला. "हि नोज, ही हॅज टू पुल आऊटऑफ देअर"
टीम लीडरची वाट बघणाऱ्या बाहेरच्या सगळ्यांना टीम लीडर कधी येतो असे वाटत होते. एक एक क्षण, एक एक तासाचा वाटत होता. अखेर दोरी दोन वेळेला ओढली गेली व साथीदाराने टीम लीडरला बाहेर काढले. आता वेळ नव्हता, ते पळत हेलिकॉप्टर मध्ये बसले व वीस मिनिटात बेस कँपवर पोहोचले.
बेसकॅम्पच्या रिवाजा प्रमाणे, रेस्क्यू मिशन नंतर, सगळे डी ब्रीफिंगसाठी कंट्रोल रूम मध्ये गोळा झाले. टीम लीडर त्यात नव्हता. सगळ्यांना वाटले, खाईतल्या जवानाला वाचवता आले नाही म्हणून अस्वस्थ झाल्यामुळे आला नसेल. कोणी त्याच्या न येण्या संबंधी बोलले देखील नाही...................
त्या संध्याकाळी टीम लीडर बेस कँपच्या ऑफिसर्स मेसच्या बार मध्ये दिसला. दोन लार्ज आत गेले असतील त्याचे एव्हाना, तेव्हाच बेस कमांडर आला व त्याच्या जवळ बसला.
"फायनली इट इज ऑलवेज द बार" त्याच्या खांद्यावर थोपटत बेस कमांडर म्हणाला, "वेदर वी गेट् द मॅन ऑर नॉट". टीम लीडर काही बोलला नाही. त्याने नुसती मान हालवली. परत एकदा थोपटत बेस कमांडर त्याला म्हणाला "इट्स् पार्ट ऑफ द गेम....." टीम लीडरवर काही फरक पडत नाही हे बघून बेस कमांडर त्याला पुढे म्हणाला, "समटाईम्स वी विन, आदर टाइम्स द ग्लेशीयर. नो रीझन टू फिल बॅड अबाउट डॅट."
टीम लीडर तोंड बेस कमांडरकडे करत म्हणाला, "इट्स नॉट दॅट" म्हणाला, "दॅट इज नॉट व्हाय आय एम सॅड" दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. बेस कमांडरला समजले. बराच वेळ ते दोघे बोलले नाहीत. शेवटी बेस कमांडरनेच सुरवात केली, "इफ डॅट्स् व्हॉट यू डिड. इट वॉज ब्रेव्ह"
"आय डोन्ट फिल व्हेरी प्राऊड" टीम लीडरचा आवाज उतरला होता.
"नेव्हर द लेस, इट वॉज करेजियस. नॉट मेनी वूड हॅव थॉट अबाउट इट, एन्ड फीवर कूड हॅव्ह डन इट" बेस कमांडरने खांद्यावर हात ठेवून म्हटले. टीम लीडर काही बोलला नाही.
"हाऊ" बेस कमांडरने विचारले.
टीम लीडरने एक मोठा श्वास घेतला, व मान वळवून, कमांडर पासून दुसरी कडे पाहत उत्तरला "आय यूस्ड द रोप"
"डिड ही ......?"
"नो.... आय गेस ही न्यू इट, इट वॉज द बेस्ट वे आऊट"
बेस कमांडरने एक मोठा उश्वास सोडला व जायला लागला.
"अजून दोन गोष्टी आहेत" टीम लीडर कमांडरला म्हणता झाला.
"काय आहेत त्या"
"त्याच्या घरच्यांना कळवायला हवे".
"हे काय सांगणे झाले. कोणी तरी सांगेलच, एव्हाना कळवले पण असेल, तुला माहीत आहे आर्मीत, काय करायचे व कशा पद्धतीने करायचे ह्या सगळ्याची एक स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर असते. असा अपघात झाल्यावर सुद्धा काय करायचे त्याची क्रिया वेगवेगळ्या स्तरावर सुरू झाले असेल एव्हाना."
"नाही. कळवण्याचे काम तुम्हाला करावे लागेल"
"बिकॉज.....? ऑलराईट, अॅन्ड द आदर थिंग?"
"मला बदली पाहिजे. मी हे काम नाही करू इच्छीत"
"सॉरी अबाउट द सेकंड पार्ट. नो वे. यू कांट शेअर प्रॉब्लेम्स विदाऊट अॅक्सेप्टींग टू हॅन्डल सम युवरसेल्फ". बेस कमांडर टीम लीडरच्या उत्तरासाठी न थांबता निघून गेला…………………
.
.
.
.
माझ्या बोटात धरलेली सिगारेट जळत जळत बोटांजवळ आल्याने बोटं भाजली तेव्हा मी परत वास्तवात आलो. त्या चंडीगढच्या बार मध्ये बसून आता पर्यंत मी जे ऐकत होते ती एक काल्पनिक गोष्टी होती. काल्पनिकच असणार. कारण आपल्या आयुष्यात असे कधी होते का. कधीच नाही. मी घड्याळाकडे पाहिले. बराच उशीर झाला होता. त्या कर्नलचे बोलून झाले होते.
"मी त्याच्या घरच्यांना कळवायला गेलो होतो. मागे म्हणालो तसे आपल्या घरातल्याच, जवळच्याच, अगदी आपल्या नात्यातल्याच्याच अंत्यविधीला जाऊन आलो. आजच. अंत्यविधी म्हणायलाच. कारण अजून त्याचे शरीर ग्लेशीयर मध्ये त्या खाईत आहे, व कल्पांता पर्यंत, तसेच राहील".
"म्हणजे तुम्ही...."
‘येस. आय एम द बेस कमांडर अॅट द बेस कँप"
आमचे दोघांचे मद्य पिऊन झाले होते. आम्ही आपआपल्या गेस्ट रूम्स मध्ये निघून गेलो. मला लवकर उठायचे होते..... आय एल ने थॉईसला जायचे होते.... पुढे बेस कँप..... नंतर ग्लेशीयरसाठी अॅक्लमटायझेशन......अॅक्लमटायझेशन झाल्यावर.....बेस कँपला होणारा ग्लेशीयरवरचा कोर्स करायचा आहे....... हिमलोट व खाई संबंधी शिकायचे आहे.....स्वतःला कसे वाचवायचे......दुसऱ्यांना कसे वाचवायचे(?) हे शिकायचे आहे......ग्लेशीयर मध्ये स्वतःची प्रकृती कशी सांभाळायची, हे शिकायचे आहे......तेथे एक वर्ष काढायचे आहे......द शो मस्ट गो ऑन.........
पण ती गोष्ट अजून माझ्या मनात घर करून बसली आहे. काल्पनिकच असणार. कारण आपल्या आयुष्यात असे कधी होते का. कधीच नाही. खरे ना? आणि ग्लेशीयर मध्ये? ....................................................................... असेच होते.
----------------------------------------------------------------------------
ही गोष्ट कॅप्टन रघू रामन (रिटायर्ड) ह्यांनी लिहिली होती. त्यांनी अनुवाद करण्यास परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. गोष्टीचा गाभा तसाच ठेवून, मला वाटले तेथे तेथे वर्णन वाढवले आहे, म्हणजे वाचणाऱ्याला तेथले वातावरण, सैन्यात उपयोगात येणारे शब्द व सैन्यातल्या प्रघातांबद्दल जास्त माहिती मिळेल. सियाचीन ग्लेशीयरच्या भागात भुःसंपत्ती बरीच आहे असा कयास आहे. लेह, काराकोरम, अक्साईचीन येथे पण अशी संपत्ती पुष्कळ आहे अशी समजूत आहे. कॅप्टन रघू रामन ह्यांचा ईमेल पत्ता captraman@yahoo.com व जालावरचा पत्ता असा आहे www.captraman.com . ते आर्मी मधून निवृत्त होऊन आता स्वतःचे लिडरशिप वर वर्कशॉप चालवतात. २००९ पासून गृह मंत्रालयात काउंटर टेररिझम वर सल्लागार म्हणून काम पाहतात.
-----------------------------------------------------------------------------
आपण राष्ट्रव्रत घेतले का? त्या बद्दल येथे वाचा
http://rashtravrat.blogspot.com/2010/05/rashtravrat.html
आणि येथे
http://bolghevda.blogspot.com/2010/10/blog-post.html
(मराठी ब्लॉग)
प्रतिक्रिया
10 Jan 2013 - 8:01 pm | वसईचे किल्लेदार
मान्य देवा मान्य.
10 Jan 2013 - 8:11 pm | पैसा
.
10 Jan 2013 - 8:27 pm | इष्टुर फाकडा
पण पुन्हा हे असले काही लिहू नका प्लीज. मला हे झेपत नाही. आम्हाला युद्धाच्या, शौर्याच्या पटकन येणाऱ्या मृत्युच्याच गोष्टी सांगा...हे मला झेपत नाही साला.
10 Jan 2013 - 8:42 pm | पिवळा डांबिस
एक कटू पण जिवंत अनुभव!
त्याच जिवंतपणे आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्द्ल अनेक धन्यवाद!!
10 Jan 2013 - 9:47 pm | इनिगोय
का लिहिता हे असं? सुखाने झोपतो आम्ही आमच्या घरात. हे असलं काही माहीत करून घ्यायची, मनापर्यंत पोचू द्यायची काही गरज नसते आम्हाला! आम्ही आपले ब्लडी सिव्हिलीयन्स ठीक आहोत.
10 Jan 2013 - 9:54 pm | रामपुरी
शेवटपर्यंत श्वास अडकला होता. अजूनही अडकलेलाच आहे.... ग्लेशियरच्या त्या खाईत
12 Feb 2016 - 4:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असंच.
-दिलीप बिरुटे
10 Jan 2013 - 10:00 pm | रामपुरी
तिथे कुठल्यातरी प्रकारे आग निर्माण करून बर्फ वितळवता आला नसता काय?
11 Jan 2013 - 12:10 am | शैलेन्द्र
शेवटपर्यंत असं काही करता येइल का हा विचार डोक्यात फिरत होता.
11 Jan 2013 - 12:36 pm | हंस
अगदी अगदी, मी पण हाच विचार करत होतो, बॅटरी ऑपरेटेड हिटींग गनने तो बर्फ वितळवता आला असता. पण ह्या झाल्या जर तर च्या गोष्टी, त्याला आता तसा काही अर्थ नाही.
11 Jan 2013 - 12:46 pm | गवि
१००% हेच..
सतत मनात हाच विचार येतो की काही करता आलं नसतं का?
अतिशय रुखरुख लावणारा प्रसंग वर्णन केलेला आहे. अशावेळी आपल्यासारख्या कमकुवत व्यक्तीला आयुष्यभर भुताटकीप्रमाणे भेडसावत राहील अशी घटना.
तरीही आपल्या मनुष्यस्वभावानुसार काहीतरी करता आलं असतं याची रुखरुख लागतेच. आपल्याला नुसतं वाचून असं वाटत राहतं तर त्या लीडरला काय काय आणि किती काळ वाटलं असेल.
पण लष्कर हा वेगळाच प्रकार आहे. मला वाटतं आपल्यासारख्यांना जी भावनाप्रधानता परवडते, ती जर त्यांनी ठेवायची ठरवली तर जगणं किंवा कोणतंही मिशन पार पाडणं अवघड, अशक्य होईल.
दिल पे मत ले यार, मर जायेगा. अशा ओळी लक्षात ठेवूनच काम करावं लागत असणार.
कथा अस्वस्थ करणारी असली तरी प्रत्यक्ष काय स्वरुपाचा अपघात होता किंवा वाचवण्यासाठी नेमकं काय करावं लागणार होतं (की जे वेळेत जमलं नाही) याचं स्पष्ट चित्र त्यातून सामान्य वाचकापुढे उभं राहात नाही. अशा वेळी त्यातल्या तांत्रिकतेला प्राधान्य नाहीये, भावनेला आहे हे लक्षात घेऊन असं गृहीत धरावं लागेल की इन गिव्हन कंडिशन सर्वात जास्त प्रयत्न करुनही त्या "अडकलेल्या (?)" जवानाला वाचवून सोबत घेऊन जाणं शक्य नव्हतं. अन्यथा ते केलं गेलंच असतं. आपण शहरी जीवनातसुद्धा संकटकाळी सुटकेसाठी ज्या लष्करी जवानांना बोलावतो, आणी तेही बोअरवेलमधे पडलेल्या पोरासाठी दिवसरात्र जीव धोक्यात घालून खाणकाम करतात, ते स्वतःच्या साथीदाराला वाचवण्यासाठी एकही शक्यता मोकळी सोडतील असं वाटत नाही.
(तो अॅक्सेसिबलच नव्हता असं धरलं तर त्याच्यावर "रोप" कसा वापरला हा प्रश्न तरीही मनात उरलाच. पण तो माझ्या समजुतीचा दोष असेल)
अतिशय उत्कट कथेबद्दल आभार चितळेसाहेब..
11 Jan 2013 - 9:41 pm | रामपुरी
" अन्यथा ते केलं गेलंच असत"
याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही. पण सतत वाटत होतं की ते असं काहीतरी करून बर्फ वितळवतीलच. म्हणून आपली एक शंका की असं का करू शकले नाहीत? अस्वस्थ करणारा प्रसंग (कथा म्हणू शकत नाही त्याला) आहे म्हणूनच तर आपणसुद्धा इथे पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतो.
11 Jan 2013 - 10:47 pm | मोदक
(तो अॅक्सेसिबलच नव्हता असं धरलं तर त्याच्यावर "रोप" कसा वापरला हा प्रश्न तरीही मनात उरलाच. पण तो माझ्या समजुतीचा दोष असेल)
गवि - माझ्या समजूतीप्रमाणे तो अॅक्सेसेबल होता आणि त्या अरूंद घळईत तो पडल्यामुळे उभा अडकला होता, अडकलेल्या वेळापासून त्याच्या भोवतीचा बर्फ गोठल्यामुळे त्याला वर काढणे शक्य होत नसावे...
************
अवांतर - सैबेरीयातील कँपमध्ये (आणि बहुदा कॉन्संट्रेशन कँपमध्येही!) दोषी कैद्यांना, त्यातही पळून जाण्याचा प्रयत्न करणार्यांना अशीच शिक्षा ठरलेली असायची.
थंडीने गोठलेल्या नदीच्या पात्रात एक माणूस आत जाईल इतका खड्डा करायचा आणि त्यामध्ये कैद्याला सोडायचे. मात्र त्याला सोडण्याआधी नदीपात्राच्या बाजूच्या एका झाडाला एक दोरी घट्ट बांधून त्याचे दुसरे टोक कैद्याच्या कमरेला / छातीला घट्ट गुंडाळायचे जेणेकरून तो खालच्या प्रवाहाने वाहून जाणार नाही.
इंचाइंचाने शरीर गोठून भयाण मृत्यू येत असे...
10 Jan 2013 - 10:09 pm | यशोधरा
हे खरंच कठीण..
10 Jan 2013 - 11:00 pm | रेवती
भयानक आहे. अगदी शेवटच्या पळापळीपर्यंत आशा होती चमत्काराची. पण नाहीच काही घडलं.
12 Jan 2013 - 8:25 pm | किसन शिंदे
पहिला भाग काल वाचला आणि बाकिचे सगळे आत्ताच. मलाही शेवटपर्यंत चमत्काराची आशा होती. :(
10 Jan 2013 - 11:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
देशाचे बाहेरचे दिखाऊ स्वरूप कळसासारखे नेहमीच दिसते पण हे त्याच्या पायातले कटू सत्य अतिशय संयतपणे निवेदन केले आहे. धन्यवाद !
भारतिय सैनीकांना मानाचा मुजरा !!!
10 Jan 2013 - 11:50 pm | ५० फक्त
हे सगळं करणा-यांना लाख लाख सलाम.
10 Jan 2013 - 11:52 pm | मोदक
:-(
11 Jan 2013 - 12:10 am | वाटाड्या...
फारच भयंकर अनुभव आहे. सलाम त्या वीरांना...
11 Jan 2013 - 12:38 am | कवितानागेश
वाईट आहे हे सगळं :(
11 Jan 2013 - 12:59 am | संजय क्षीरसागर
अक्षरशः त्या टीमचा एक भाग होऊन शेवटापर्यंत आशेवर राहिलो.
11 Jan 2013 - 3:48 pm | विटेकर
सहमत
11 Jan 2013 - 7:37 am | स्पंदना
पाणी गळल डोळ्यातुन त्याच शेवटच निरोपाच बोलण ऐकताना. हताश हताश वाटतय. आनि आम्ही साधा आन्मच्या जवानांचा आदर नाही राखु शकत.
11 Jan 2013 - 8:35 am | प्रचेतस
अस्वस्थ करणारा समारोप.
11 Jan 2013 - 9:38 am | अशोक पतिल
अविश्वसनिय !
सलाम त्या वींरांना ...लाख लाख सलाम त्या दुर्देवी जवानाला !!!
11 Jan 2013 - 10:08 am | ऋषिकेश
.
11 Jan 2013 - 10:16 am | अमोल खरे
अतिशय वाईट. चमत्काराची आशा होती शेवटपर्यंत. वर कोणीतरी म्हणाल्याप्रमाणे छोट्या स्केलवर आग निर्माण करता आली नसती का ? का त्याने सर्वचजण खाली गेले असते ?
11 Jan 2013 - 10:36 am | अनन्न्या
पिक्चरमध्ये जसा काहीही झाले तरी हिरो सहीसलामत..आशेने वाचत होते..
11 Jan 2013 - 11:04 am | चेतन माने
शूरा मी वंदिले !!! :(
11 Jan 2013 - 11:32 am | मैत्र
हिमखाईत मृत्यू येतो, गोठून येतो. एव्हरेस्ट वरची एक डॉक्युमेंटरी नुकतीच पाहिली होती.
पण हे खूप भयंकर वाटलं. शेवट सुन्न झालो...
यांना प्रणाम करण्याची पण लायकी नाही असं वाटलं.
एकीकडे माझ्या घरच्यांना मृत्यूच्या दारात हे असं घडलं सांगू नका म्हणणारा तो जवान,
ते अविश्वसनीय काम करणारा लीडर
आणि दुसरीकडे देशाबद्दल चीड निर्माण करणारे हजारो भ्रष्ट लोक .. नक्की कुठला माझा देश आहे समजत नाही...
11 Jan 2013 - 11:51 am | नि३सोलपुरकर
सलाम त्या वीरांना...
11 Jan 2013 - 11:59 am | लाल टोपी
चारही भाग आताच वाचले. नाही सर्वच भावना शब्दांत नाही व्यक्त करता येत.. सलाम त्या अनाम विरांना...
11 Jan 2013 - 12:36 pm | मालोजीराव
लेख वाचताना शेवट पर्यंत वाटत होतं...तो जवान वाचेल...पण :(
नीट जा रे बाबा,देव तुझं रक्षण करो !
11 Jan 2013 - 12:56 pm | एकुजाधव
अनाम वीरान्स मानाचा मुजरा!
11 Jan 2013 - 1:09 pm | आनंद भातखंडे
जवानांची चिकाटी, मानसिक कणखरपणा हे सगळं पणाला लागलेलं असतं. मरण दाराशी असताना सगळे आपल्याला सोडून जात आहेत ही भावना आणि आपल्या सहकाऱ्याला असहाय्य सोडून जाण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नसलेली परिस्थिती किती त्रास दायक असू शकते याची कल्पनाच करवत नाही. ग्लेशियर मध्ये अडकलेला जवान काही क्षणातच शहीद झाला असेल पण जो टीम लीडर त्याला सोडून आला त्याला ही घटना कायमची अस्वस्थ करत राहील.
मन अस्वस्थ करणारे लिखाण. अजून अश्याच सैन्याच्या सत्यकथा वाचायला आवडेल.
11 Jan 2013 - 2:05 pm | मूकवाचक
.
11 Jan 2013 - 2:12 pm | सूड
जवानाच्या विनवण्या वाचून जूनं काहीतरी आठवलं.
11 Jan 2013 - 7:19 pm | रणजित चितळे
काय आठवले आपल्याला ते समजायला उत्सूक
11 Jan 2013 - 3:34 pm | विटेकर
.
11 Jan 2013 - 4:01 pm | स्मिता.
शेवटपर्यंत काहितरी चमत्कार होण्याची आशा होती, पण ते झालंच नाही. इथे केवळ वाचून आमची ही मनस्थिती होतेय तर आपल्या सहकार्याला असं मरणाच्या दारात सोडून येतांना जवानांना काय वाटत असेल याची कल्पनाही करवत नाही.
आमच्या सुखासाठी कायम प्राण तळहातावर घेऊन लढणार्या जवानांना मानाचा मुजरा!
11 Jan 2013 - 8:03 pm | उपास
अस्साच एक किस्सा ऐकलाय मी.. एका व्याख्यानात कर्नल साहेबांकडून.. अंगावर येतं असं वाचलं की.
वाचताना रारंगढांगचीही आठवण झाली.
सिव्हिलियन्सना सैन्याच्या गोष्टी, त्यांनी काढलेल्या हाल अपेष्टा कळायलाच हव्यात.. असे प्रभावी आणि जिवंत लिखाण मिळेल त्या माध्यमातून तरुण पिढी पर्यंत गेलेच पाहिजे. निदान उरली सुरली लाज असेल तरी देशाचा विचार करेल आपली पिढी.
अवांतर - पूर्वी परमवीर चक्र बघायचो तेव्हा अशीच कालवा कालव व्हायची आपला सैनिक गेला की.
आणि हो - मागच्या धाग्याच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, डी-आयसर चा अजिबात उपयोग होत नाही का, इतक्या कंइ तापमानाला आग प्रज्वलित करणे आणि ती टिकवणे कठीण आहे पण डी आयसर नक्कीच उपयोगी पडेल ना?
11 Jan 2013 - 9:36 pm | रणजित चितळे
जेव्हा हिसखाईत कोणी पडते तेव्हा त्या बर्फात घसरून खाली जाते लागलीच.त्या मुळे आडकायचा प्रश्नच नसतो.त्या मुळे बर्फ वितळवायच्या साधनांचा खाई मध्ये साधारण उपयोग नसतो. उलट येथे जे साधारणतः कधी होत नाही ते झाले. तो घसरला पण दोन भिंतीत शेवटी असा अडकला की त्याचा अर्धे शरीर जवळ जवळ त्या दोन भिंतींनी एका व्हाईस सारख्या घट्ट पकडीने दाबले गेले. जवळ जवळ चेचलेच गेले............
12 Jan 2013 - 1:05 am | सलिल २४
त्या कॅप्टन,जवान आणि हे सर्व आमच्या पर्यंत पोहोचवणार्या तुम्हासही.डोळ्यांनी त्यासर्वांना कृतज्ञतेचा अभिषेक कधी वाहिला कळलेच नाही.त्या दोन्ही माणसांची मनोवस्था त्या दरीत काय झाली असेल?आणि एकाला पुढे जगायचं हि होते या आठवणीस सोबत घेऊन.छे.सून्न झाले डोके.
16 Jan 2013 - 3:41 pm | स्वराजित
सून्न झालो लेख वाचुन .
अशा अनाम वीरांना मानाचा मुजरा
21 Aug 2014 - 4:06 pm | शिद
आजच चारही भाग सलग वाचून काढले. डोकं सून्न झालं हे वाचून. :(
+११११११
21 Aug 2014 - 6:00 pm | आदूबाळ
सॉलिड आहे. रणजित चितळे सर सध्या मिपावर लिहीत नाहीत का?
1 Apr 2015 - 10:15 am | ब़जरबट्टू
अंगावर काटा आणनारी ही लेखमाला आज वाचुन काढली... सलाम आपल्य जवानांना..
असे वाचनिय व थरारक लेख कुणितरी उखरुन काढल्यावरच वर येतात..मिपासुध्दा आता एक ग्लेशियर झालेय.. त्याच्या पोटात काय काय दडले आहे... :)
1 Apr 2015 - 2:34 pm | वेल्लाभट
एक मृत्यूची कल्पना असते
एक मृत्यू समोर बघणं असतं
आणि एक रोजच्या रोज मृत्यू अंगावर घेऊन फिरणं असतं.
आपले जवान धन्य आहेत. त्यांच्याबद्दल बोलायचीही लायकी नाही आपली.
पण तुमचं लिखाण बेक्कार (चांगल्या अर्थी) भारी. ते सगळं डोळ्यासमोर दिसत होतं यार. शिट!
काहीच शब्द नाहीत.
6 Apr 2015 - 5:49 pm | अत्रन्गि पाउस
हे राहून कसे गेले वाचायचे ?.....पण मग नव्हते वाचले तेच बरे असे वाटते आहे ...
....'मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा'
11 Feb 2016 - 12:08 pm | महासंग्राम
नका लिहू असे, वाचून मन/डोकं सुन्न झाले आहे असंही होऊ शकते आणि यावेळेस आपल्याला आपली हतबलता जाणवते, आला आपली जिंदगीच बेक्कार आहे अस राहून राहून वाटते आहे.
11 Feb 2016 - 7:51 pm | सुमीत भातखंडे
खूप त्रास झाला हे वाचून.
शेवटपर्यंत आशा होती काहीतरी होईल म्हणून.
चितळे सर तुमचे मनापासून आभार. त्रास तर झालाच वाचून आणि स्वतःची शरम पण वाटली. रोजच्या जगण्यात येणार्या छोट्या-मोठ्या अडचणींनीच आम्ही खचून जातो आणि तिकडे आपले जवान ह्या अशा परिस्थितीला तोंड देत जगत असतात.
सिंप्ली ग्रेट _/\_.
(नतमस्तक) सुमीत भातखंडे
11 Feb 2016 - 8:30 pm | यशोधरा
प्लीज, पुन्हा असं कधी लिहू नका. आमच्यासाठी दृष्टीआड सृष्टीच बरी! :(
12 Feb 2016 - 3:36 pm | पियुशा
माय गॉड !!! काल की परवाच डीस्कवरिवर सिअचिन ग्लेशिअरचे एपिसोड पाहिले पण हे वाचुन जिवाचा थरकाप झालाय अगदी ! किति सुखी आहोत आम्ही तुमच्यामुळे .
" मानाचा मुजरा : ----/\----- "
12 Feb 2016 - 4:15 pm | कविता१९७८
वाचुन रडु आवरले नाही, वाचायची ही हिम्मत नाही असे काही
21 Feb 2016 - 1:24 pm | रॉजरमूर
शब्द ही गोठले..........
भारत मातेच्या या वीर सुपुत्रांना सलाम .
त्यांच्या बलिदानाचे मोल अपार आहे .
सियाचीन मधील सैनिकाच्या जीवनाचे जिवंत चित्रण उभे केलेत.
या लेखमालेचे चारही भाग आता वाचून काढले . ते वाचल्यानंतर खरेच आपण किती क्षुद्र आहोत याची जाणीव प्रकर्षाने झाली .
एकीकडे हे सैनिक जीवावर उदार होऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ,खरे तर मानवी काय कुठल्याच जीवाला अनुकूल नसलेल्या प्रदेशात
निसर्गाशी दोन हात करून भारतमातेच्या सीमेचे रक्षण करीत असताना ,इकडे मात्र फुकटात सर्व भौतिक सुख सुविधांचा उपभोग घेऊन अवाजवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सोयीनुसार अर्थ काढून देशाचे तुकडे पाडण्याची भाषा केली जाते . थेट सरकारलाच आव्हान दिले जाते हे बघून अत्यंत चीड येते .
यातल्या घोषणा देणार्यांना तुरुंगातील शिक्षेपेक्षा वर्षभर सियाचीन मध्ये नेउन ठेवले पाहिजे . मग त्यांना कळेल .
सियाचीन ह्या प्रदेशाबद्दल आतापर्यंत खूप असे काही माहिती नव्हते परंतु या लेखमालेने बऱ्याच गोष्टी समजल्या त्यामुळे कुतुहूल जागृत झाल्याने,सियाचीन विषयी अधिक माहीती मिळविण्याच्या उत्सुकतेपोटी
कालचा हा Buisness Standard मधील Life in Siachen हा लेख वाचून काढला सियाचीन मधील सैनिकांचे जीवन किती कष्टदायक आहे याची जाणीव झाली .
खरे तर नवीन पिढीला स्वातंत्र्याची किंमत नाही राहिली आहे. सगळं आयतं मिळाल्याने कर्तव्यांपेक्षा हक्कांचीच जाणीव यांना होते.
इस्रायल सारखे प्रत्येक विद्यार्थ्याला सक्तीने किमान वर्षभर तरी सीमेवर पाठवले पाहिजे. तेव्हा त्यांना आपल्या देशाची कदर राहील .
15 Mar 2016 - 12:50 pm | रणजित चितळे
धन्यवाद रॉजरमूर
24 Oct 2019 - 10:39 am | मृणमय
घटनाक्रम डोळ्यासमोर उभा राहतो. सगळ्यांच्या प्रतिक्रिया पण वाचल्या. आपले सैनिक देशासाठी प्राण पणाला लावत असताना आपण भ्रष्ट लोकांचा विचार आणि त्यांना शिव्याशाप देण्यापेक्षा आपलं काम चोख करावं. स्वतःच्या वतीने जमेल तशी मदत करावी.
24 Oct 2019 - 12:10 pm | मधुरा कुलकर्णी
खरं तर की प्रतिसाद द्यावा तेच समजत नाहीय....
__माणसाला एक तर शांत मरण हवं असतं, नाहीतर सुखद जीवन, ना जगणं ना मरणं या स्थितीत राहणं फार भयानक असतं__
आणि असा मृत्यू साधा वाचवत पण नाही तसा मृत्यू आपले जवान रोज वागवतात ....
सलाम त्या वीरांना...