जीवनमान

मानवी स्पंज आणि स्प्रिंग!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
24 Mar 2015 - 11:27 am

तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील.

समाजजीवनमानतंत्रराहणीप्रकटनविचारप्रतिसादअनुभवमत

या गावाचं काही खरं नाही!

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
23 Mar 2015 - 10:35 pm

सकाळी ली क्वान युंचे देहावसान झाल्याचे वृत्त कानी आले. बंड्याला त्याच्या वॉसप वर लिहिलं, 'शनिवार रविवार उंडारुन झालं, आज पुन्हा सोमवारी सुटी!'

बंड्याचा दोन मिनिटांनी थंड प्रतिसाद. 'कसली सुट्टी?'

अरे! एवढा मोठा नेता गेला आणि सुट्टी नाही? हां, बरोबर; अंतिम संस्कार उद्या असतील, सुट्टी उद्या देतील. पाच मिनिटांनी उत्तर आलं, 'मला काम आहे. तुलाही असावं अशी माफक अपेक्षा आहे. संध्याकाळी बोलु आरामात'. अरे देवा! काय हा माणुस की काय? सुट्टी नसल्याचं काहीच सोयर सुतक नाही? साधा माझ्यापाशी खाजगीत निषेधही नाही? असो. संध्याकाळी बघु.

वावरजीवनमानप्रकटनविचारमाध्यमवेध

निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
23 Mar 2015 - 1:54 pm

हे जग निसर्गनियमानुसार चालते. म्हणजे जे पेरले ते उगवते. तसेच पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते. त्या नियमानुसार कोणतीही गोष्ट करण्यासाठी कधीही वेळ "निघून गेलेली" नसते. वेळ/काळ परत परत येत राहतो. जीवन आपल्याला पुन्हा पुन्हा संधी देत असते. ती आपल्याला फक्त दिसली पाहिजे. जीवनाकडे सकारात्मक दृष्ट्या पाहिल्यास काहीही अशक्य नसते. प्रयत्न करीत राहावे आणि फळ निसर्गावर सोडून द्यावे. चांगल्या गोष्टी पेरत जाव्या. निसर्ग नियमानुसार फळ मिळतेच. चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळते आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते. चांगले कर्म करा आणि चांगल्या फळाची अपेक्षा जरूर करा.

जीवनमानविचार

Veer Garjana | वीरगर्जना @ Gudhi Padwa 2015

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
23 Mar 2015 - 7:37 am

वीरगर्जना ढोल ताशे आणि ध्वज पथक, ठाणे याचा एक सदस्य अशी ओळख सांगताना मला नेहमीच अभिमान वाटतो. जरी वैयक्तिक आणि कामाच्या जबाबदा-यांतून सरावाला वेळ मिळत नसला आणि त्यामुळे सध्या वादनात सहभाग घेता येत नसला, तरीही ती ओळख तशीच आहे असं मी मानतो.

कलासाहित्यिकसमाजजीवनमानछायाचित्रणसमीक्षालेखअनुभवमाहिती

मी उपवर तरुण असतो तर

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in काथ्याकूट
22 Mar 2015 - 11:42 am

ब्राह्मण समाजातील उपवर मुलींची कमतरता आणी त्यावर उपाय

हा धागा पाहिला अन विषयाची मांडणी पाहून हसूच आले. यावर आता एकाहून एक प्रतिक्रिया येणार असा विचार करत असतानाच वाटले की मांडणी कशीही असो सध्याच्या एका ज्वलंत विषयाला हात घातला आहे.

जात, धर्म, समाज अन नोकरी वा व्यवसाय कुठलाही असो अनेक उपवर पुरुषांना स्वतःचे लग्न जुळवणे आव्हानात्मक होऊ लागले आहे. प्रश्न कितीही अवघड असला तरी उपाय शोधण्याचे प्रामाणिक प्रयत्न करायला हवेतच.

भीतीच्या भिंती ६: ‘दरी’

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
22 Mar 2015 - 4:43 am

भाग ,, , ,
(विनंती : या लेखात मी ‘दरी’ शब्दांचे जे उच्चार दिले आहेत, ते वाचकांनी कृपया ग्राह्य धरू नयेत.)

समाजजीवनमानप्रवासआस्वादअनुभव

एनआरआयची भारतभेट..

गवि's picture
गवि in काथ्याकूट
18 Mar 2015 - 11:04 am

मिलिंद बोकिलांचं झेन गार्डन बर्‍याच काळाने पुन्हा उघडलं आणि पायर्‍या ही गोष्ट वाचली. सिंगापूरमधे कष्टाने सेटल झालेला बिझनेसमन श्रीपाद बर्‍याच वर्षांनी भारतात आपल्या एका मैत्रिणीला, जयाला आणि तिच्या फॅमिलीला फाईव्ह स्टार हॉटेलात भेटतो. जयाचा नवरा अशोकसुद्धा पूर्वी चळवळीतच असतो. तेव्हाचे त्यांचे संदर्भ, तरुण वयात चळवळीत असणारे हे तिघे आणि त्यांच्या इतर मित्रांचे संदर्भ.. आणि आताची वागणूक.

ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स

पुष्कर विजयकुमार जोशी's picture
पुष्कर विजयकुमा... in जनातलं, मनातलं
16 Mar 2015 - 3:12 pm

"ए बारक्या, ते तेल बाटलीत काढून ठेव, उद्या लागेल", दिवसभर जीलेब्यांचे घन काढून थकलेला राक्या बोलला. रात्रीचा थंड वाऱ्यात त्याला आत्ताच पेंगायला होत होतं.
दिवसभराच्या वाहतुकीनंतर शांत झालेला रस्ता.

राक्याच्या गाडीच्या बाजूलाच पान टपरी, तिथे २-३ लोक सिगारेटी ओढत बसलेले.
पान टपरीवाला थोडा रसिक पट्टीतला असावा, त्याच्या टपरीवर नुस्रत चे गाणे चालूए…
वोह हटा रहे है पर्दाह, सर-ए-बाम चुपके चुपके…

एका उंची दुचाकीवरून एक मुलगा उतरतो, "एक माईल्ड भाऊ"
त्याचा फोन वाजतो.
"हं बोला सर"

हे ठिकाणसाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचारलेखअनुभवमतप्रतिभा

मोबाईल आणि आपण

Gayatri Muley's picture
Gayatri Muley in जनातलं, मनातलं
14 Mar 2015 - 12:53 pm

" ती एका प्राथमिक शाळेची शिक्षिका होती, सकाळीच तिने मुलांची परीक्षा घेतली होती, उत्तरपत्रिका तपासण्यासाठी तिने घरी आणल्या होत्या. उत्तर पत्रिका वाचता वाचता तिला रडू कोसळले. तिचा नवरा तिथेच पडून मोबाइल बघत होता. त्याने रडण्याच कारण विचारल. ती म्हणाली सकाळी मी मुलांना माझी सर्वात मोठी इच्छा या विषयावर लिहिण्यास सांगितले होते. एका मुलाने इच्छा व्यक्त केली आहे की, देवा मला मोबाईल बनव...
हे ऐकून नवरा हसू लागला.
शिक्षिका म्हणाली पुढे तर ऐका, मुलाने लिहिलय, जर मी मोबाइल बनलो तर...
घरात माझी एक खास जागा असेल आणि सगळेजण माझ्या आजूबाजूला असतील.

जीवनमानविचार