ओला कचरा निर्मूलन- इच्छा आणि त्रास
भारतात सद्या महत्वाची समस्या म्हणजे घनकचरा आहे . अर्थातच कचरा निर्मूलन जिकिरीचे होऊन बसले आहे. आजकाल साफसफाई कामगारांना सोसायटीत वरच्या मजल्यावर प्रवेश नाही . रोज कचरा खाली नेवून टाकावा लागत आहे. बरेच लोक आता हे सर्व स्वतःच करत असले तरी प्लॅस्टीकच्या पिशव्यात भरून तशीच पिशवी टाकत आहेत . ती ओल्या कचऱ्याच्या डब्यात जरी ओतली तरी निम्मा अर्धा ओला कचरा त्या पिशवीला चिकटून सुक्या कचरायच्या डब्यात जात आहे. खरे पाहता प्रत्येक घराने आपला ओला कचरा घरातच जिरवला पाहिजे, असे महापालिका सांगत आहे .