समाज

त्सो मोरिरी : एक समृद्ध अनुभव

हर्मायनी's picture
हर्मायनी in जनातलं, मनातलं
15 Aug 2019 - 5:01 pm

मागच्या वर्षी २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात लेह लडाखला जाण्याचा योग आला. या अविस्मरणीय ट्रिप बद्दल सविस्तर लिहिण्याचा विचार आहे पण तूर्तास एक अशी घटना जी मनात कायम कोरलेली राहील.. शीत वाळवंट असलेल्या लडाखचे निसर्ग सौन्दर्य एकदम वेगळेच.. आधी कधीच न पाहिलेले.. राखाडी आणि तपकिरी रंगाच्या छटा बघताना निसर्गाच्या पॅलेट मधला मधला हिरवा रंग हरवलेलासा वाटला. एक प्रकारची गूढ शांतता, ठिकठिकाणी रचलेले दगडांचे मनोरे आणि बौद्ध धर्माचे मंत्र वाऱ्याद्वारे आसमंतात पसरवणाऱ्या रंगीत पताका संपूर्ण प्रवासात साथ देत राहिल्या.

समाजजीवनमानप्रवासप्रकटनअनुभव

प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ? (Beyond the 'Rainwater Harvesting')

सुनिल प्रसादे's picture
सुनिल प्रसादे in जनातलं, मनातलं
14 Aug 2019 - 12:43 pm

प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ?
(Beyond the 'Rainwater Harvesting')

भाग - एक.
--------------

'रेनवॉटर हार्वेस्टिंग' ही इसवीसनपूर्व बारा हजार वर्षांचा इतिहास असलेली संकल्पना आहे. माणसं तेव्हापासून हे करत आली आहेत. 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'च्या आजपर्यंतच्या व्याख्येमध्ये पावसाचे जमिनीवर पडलेले पाणी गोळा करणे आणि ते साठवणे ह्या दोनच गोष्टींचा समावेश आहे.

समाजप्रकटनविचारलेखमाहिती

डिप्रेशन

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
10 Aug 2019 - 7:43 pm

डिप्रेशनची कारणं असंख्य आहेत . आयुष्याच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात म्हणजे - शिक्षण , नोकरी , अर्थार्जन , विवाह / संसार यात आलेलं अपयश हे कारण तर सर्वज्ञात आहे .

पण डिप्रेशनचं दुसरंही एक तितकंच प्रभावी कारण म्हणजे अपराधीपणाची भावना , गिल्ट हेही असतं हे कदाचित कमी लोकांना माहीत असेल .. म्हणजे जे त्या अनुभवातून गेलेले नाहीयेत असे इतर डिप्रेशन फ्री हेल्दी लोक ...

मांडणीसमाजप्रकटनविचारआरोग्य

काश्मिर भारताला लाभदायक आहे की तापदायक

तमराज किल्विष's picture
तमराज किल्विष in जनातलं, मनातलं
9 Aug 2019 - 4:14 am

आजकाल चाललेल्या घडामोडी पाहता काश्मीर चे विभाजन करून केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करणे व उर्वरित भारताचा कायदा प्रस्थापित करण्यासाठी हालचाली झाल्या. यासाठी मुळ हेतू काश्मिरचे भले व्हावे, सैनिकांची हानी थांबून खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी हा आहे. पर्यायाने पाकिस्तान ची नांगी ठेचली जाईल व पुढेमागे पाकव्याप्त काश्मीर परत घेता येईल.
पण माझ्या बुध्दीच्या आकलनाप्रमाणे माझी मतं मांडत आहे. सहमत असण्याची अपेक्षा नाही. फक्त मला काय वाटतं ते सांगतो.

समाजप्रकटन

युनिटी इज स्ट्रेंथ

लोकेश तमगीरे's picture
लोकेश तमगीरे in जनातलं, मनातलं
2 Aug 2019 - 5:28 pm

गोपनार.....भामरागड तालुक्यातील १२१ गावांपैकी एक माडिया आदिवासीबहुल गाव. साधारणतः २२०-२५० पर्यंत लोकसंख्या असलेलं गाव. हेमलकसाहून १३ किलोमीटरचा कुठे पक्का तर कुठे कच्चा रस्ता ओलांडला की कुक्कामेटा फाटा येतो. या फाट्याहून डावीकडे साधारणतः ८-९ किलोमीटरची जंगलवाट आहे. वाटेत ३ मोठ-मोठे नाले आहेत. ६ महिने हा रस्ता सुरळीत चालू असतो. पण एकदा का पाऊस पडला की, मग ४-५ महिने कुठलीही दुचाकी जाऊ शकत नाही. कुक्कामेटा गाव ओलांडलं की समोर वाटेत लाहेरी नदीचं एक मोठं पात्रं लागते. ते लाकडी डोंग्याने पार केल्यावर लष्कर गाव येतं. लष्कर हून २.५ किलोमीटर अंतर गाठलं की अखेरीस गोपनार गाव येते.

समाजअनुभव

दिव्यांची कहाणी

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
2 Aug 2019 - 2:51 pm

(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) )

ऐका दीपांनो तुमची कहाणी.
कैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी?’
‘काय झाले?’
‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी? या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार!’

मांडणीवावरसंस्कृतीधर्मवाङ्मयकथासाहित्यिकसमाजप्रकटनविचारप्रतिभा

'पागोळी वाचवा अभियान' शंका आणि समाधान

सुनिल प्रसादे's picture
सुनिल प्रसादे in जनातलं, मनातलं
30 Jul 2019 - 5:09 pm

'पागोळी वाचवा अभियान' हळूहळू पसरत चाललंय. सुरवातीला आम्हाला आमच्या दापोली तालुक्यातूनच त्याबद्दल विचारणा होत होती, परंतु सांगायला आनंद वाटतोय की आता आमच्याकडे सावंतवाडी, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, चीपळूण, म्हसळा, श्रीवर्धन,अलिबाग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली पासून ते पुणे, नाशिक, इंदापूर, जुन्नर, नंदुरबार, शहादा, धुळे, औरंगाबाद, बुलढाणा, सेलू, परभणी, सांगली, कोल्हापूर पर्यंतच्या लोकांकडून ह्या अभियानाबद्दलची माहिती विचारली जात आहे. आतापर्यंत नऊशेपेक्षाही जास्त लोक ह्या अभियानाशी जोडले गेले असून अभियानाची माहिती घेत आहेत आणि इतरांनाही देत आहेत. दिव्याने दिवा लागत आहे.

समाजविचारप्रतिसादलेखमाहिती