कारण तू
हल्ली मी कुठेच जात नाही.
कारण काय विचारतेस?
कारण तूच.
सवय लागलीये मनाला,
नको तिथे तुझे संदर्भ शोधायची..
तुझ्या पाऊलखुणा,
पुन्हा पुन्हा शोधायची.
एक दिवस उबग आला तुझा,
तुझ्या आठवणींचा,
मग ठरवलं आता जायचंच नाही कुठे..
हल्ली मी कुठेच जात नाही.
कारण काय विचारतेस?
कारण तूच.
सवय लागलीये मनाला,
नको तिथे तुझे संदर्भ शोधायची..
तुझ्या पाऊलखुणा,
पुन्हा पुन्हा शोधायची.
एक दिवस उबग आला तुझा,
तुझ्या आठवणींचा,
मग ठरवलं आता जायचंच नाही कुठे..
हि सर पावसाची पुन्हा आज आली
हि सर पावसाची पुन्हा आज आली
पुन्हा आसवांची मोकळी वाट झाली
मन व्याकुळ होते, पुन्हा चिंब न्हाते,
क्षितिजावरी का तुला ते पहाते ?
पुन्हा पावसाशी तुझी बात झाली.
हि सर पावसाची, हि ओढ तुला भेटण्याची.
हि सर पावसाची पुन्हा आज आली
तुझ्या आठवाणी पुन्हा जाग आली
मन बेभान होते, तुझे गीत गाते.
का मिलनाची तुला साद देते ?
तुला भेटण्याची का मना आस झाली ?
हि सर पावसाची, हि ओढ फक्त मिलनाची.
वेड इतकं जडलं, मन यॉडलं यॉडलं!
पार पार बिघडलं, मन यॉडलं यॉडलं!
स्वप्न मनात फुललं, मन स्वप्नात झुललं
स्वप्नरंजनी दडलं, मन यॉडलं यॉडलं!
माझं दुरून पाहणं, तुझं चोरून लाजणं
कसं कळेना घडलं, मन यॉडलं यॉडलं!
तुझं दिवसा टाळणं, माझं रात्रीचं झुरणं...
अंगवळणी पडलं, मन यॉडलं यॉडलं!
वाटे हवासा होकार; पण नकार स्वीकार!
नाही खेटर अडलं, मन यॉडलं यॉडलं!
- कुमार जावडेकर
मी हळूहळू पण निश्चितपणे
पार दिसेनाशी होईन
तेव्हा तू चौकट ओलांड,
आणि निघताना.....
आपल्या हसल्याबोलल्या
आवाजांची फूले घेऊन ये
आपल्यातल्या गहिवरांचे
कढ, न हिंदकळता आण
मी न ओलांडलेली अंतरे
तू सहजच पार करुन ये
माझे न उच्चारलेले नाव
चारचौघांत सरळच घे
सगळे उठून जातील तेव्हा
आपल्यातल्या शब्दांची
आरास मांड
त्यानंतर आपोआप दिवा लागेल
तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल
भाळी लाल कुंकु
गळ्यात काळे मणी
अस्तित्व तुझे जाणवे
साजणे क्षणोक्षणी
*
अंगणी रोज शेणसडा
रेखते नाजुक रांगोळी
जोडव्याचा तो पदान्यास
भासे तू नाजुक कळी
*
सकाळची तुझी लगबग
चुलीस करी चूल पोतेरे
कंकणाचा नाद भिनला
अन्नपुर्णा भासे मजला
*.
तुळशी समोर तेवावी
ज्योत दिव्याची मंद
अस्तित्व तसं तुझं
उजळते माझे जीवन
अकुकाका
जिच्यासाठी झटून दिनरात
दिली परीक्षा प्रीतीची
आज भेटली ती, होऊन
गर्भार सातव्या महिन्याची!
मावळला ध्यास, गळाली आस
गळ्यापाशी कोंडला श्वास
म्हणतील मामा, तिची लेकुरे
भीती मला त्या नात्याची!
क्षण पदोपदी झुरण्याचे
नकळत मागे फिरण्याचे
आता आठवती ते खर्च
आणि उसनवार मित्रांची!
आता काय, शोधू दुसरी
तीही नसेल तर तिसरी
करणार काय, मुळातच
आहे, बागेत गर्दी फुलांची!
- संदीप चांदणे
झोंबू लागे सुखद गारवा, मंदसा पाऊस झाला
जाऊ या लोणावळ्याला, सखीस इशारा केला
.
मारली दांडी ऑफिसला, अन तिने हि कॉलेजला
ठरे भेटायचे ,सकाळीच, जिमखान्याच्या स्टॉपला
.
लो वेस्ट जिन वर, स्लीव्हलेस टॉप शोभत होता
तिच्या मधाळ स्मिताने ,मुड रोम्यान्टीक होता
.
नेली फटफटी पंपावर, म्हटले कर टाकी फुल्ल
सुटे गाडी भन्नाट,बुंगाट .असे वातावरण कूल
.
चाले रस्ता ,धावे रस्ता, झाडे मागे पडू लागली
टेकले उरोज पाठीला, मिठी तारुण्याची घातली.
आज हलके वाटले तर
चांदण्या तोलून धर
बोल.. पण नयनातुनी
उघडू नको देऊ अधर
उजळुनी हे विश्व अवघे
सावरिशी का पदर
होऊ दे गलका उसासा
मोकळे कर मूक स्वर
जीव घे हासून हलके
ओठ हेच धनु नि शर
ने कुशीतून कालडोही
गुदमरूदे रात्रभर
बरस आता अंतरातुनी
हो पुरी सारी कसर
व्यापूनिया ये तमासम
गात्र गात्र नि शांत कर
चांदण्या तोलून धर
आयुष्यात कोणाची तरी साथ असणं खूप गरजेचं असत म्हणून कोणीतरी आपल्यासोबत कायम असाव त्याच वर्णन मी या कवितेत केल आहे. तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू शकता. https://www.truptiskavita.com
पहिल्या नजरेतच घातली ही मोहनी
माझ्या ह्दयाची तू तर स्वामिनी
काय माहिती काय ,काय पुढे होईल
पण हा क्षण मिळून , साजरा होइल
मी तर इथे , तू ही इथे
माझ्या मिठीत ये , ये ना...
हे प्रियसी , हे उर्वशी
माझ्या मिठीत ये , विसरूनी सारे..
हरएक प्रार्थनेत तुझे प्रेम असे
तुजविण ते क्षण माझे , व्यर्थ भासे
तुझीच आस मज हदयास असे
तुझपासुनी शांतीही , तुझपासुनी प्रितीही..
ज्या दिवशी गवसलीस मजला
माझा जीव तो कुठे हरपला