युगांतर आरंभ अंताचा भाग १०
"बोलावलेत राजमाता?" भीष्म कक्षात प्रवेश करून हात जोडून उभा राहिला.
"हो भीष्म!"
"काय आज्ञा आहे?"
"उद्याच्या दिवशी काशीनगरीला एक स्वयंवर योजला आहे काशीनरेश नी. त्यांच्या तीन राजकन्यांचा. तु त्यात सहभागी हो. अंबा, अंबिका आणि अंबालिका मला पुत्रवधू म्हणून हव्या आहेत."
"महाराणी सत्यवती?"
"काळजी नसावी. तुझी प्रतिज्ञा मी तुला मोडायला सांगणार नाही."
"मग राजमाता, ही स्वयंवरास जाण्याची आज्ञा ?"
" विचित्रवीर्यसाठी, भीष्म!"