कविता
शिववंदना
शिववंदना
गांधी भेटला होता कविता आवडली का ?
मला गांधी भेटला होता ही कविता फेसबुकवर वाचायला मिळाली. कवितेतला आशय कसा असावा याबद्दल कुठलंही मत न नोंदवता पण असं म्हणावंसं वाटतं की साहीत्य अकादमी वगैरे वगैरे वाचून अपेक्षा बनल्या त्या मानाने कविता तितकीशी ग्रेट वाटली नाही. पण या अपेक्षा बाजूला ठेवल्या तर नामदेव ढसाळांच्या प्रभावात कविता लिहीली गेली का अशी शंका येते. कवीविषयी माहीती असल्याशिवाय मत बनवू नये असा नियम आहे हे नव्याने कळालं.
वरूणराजाचे आगमन
वरूणराजाचे आगमन
ऐश आरामात जगती माणसे,
निसर्गाची विल्हेवाट लावून.
पाऊस पडला नाही म्हणून,
शेतकरी घेतो जीवन संपवून.
वाचवा सर्वांचा शेतकरी राजा,
घ्या हे मनावर कोरून.
पिकवतो धान्य आपल्यासाठी तो,
स्वतः काबाडकष्ट करून.
वरूणराजाचे आगमन होणार,
म्हणून मन प्रसन्न आहे.
कसा बरसेल कोणावर ?
हेच एक प्रश्न चिन्ह आहे.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२६ मे २०१५
९८९२५६७२६४
भोगदासी........
घडयाळ्याचे काटे मध्यरात्रीकडे कलत असताना
जेव्हा सारे शहर निद्रेच्या अधीन होत असते
हरवलेल्या डोळ्यांनी, वखवखलेल्या नजरांमध्ये
तेव्हा ती आपलं गिर्हाईक शोधत असते
ओठांवर लाली,केसांत मोगर्याच्या माळा
सर्वांगावर मंद अत्तर दरवळत असते
वरकरणी लावलेल्या पावडरच्या थरांमागे
नशिबाने गंजलेला चेहरा लपवत असते.
रात्री घराकडे परतणारी जोडपी डोळ्यांत साठवूण
नकळत मग तीही मनातून सुखावत असते
त्याच्या बाहुत विश्वासाने विसावलेल्या तिच्याजागी
गुपचुप स्वतःची छबी नेऊन ठेवत असते
'कविता' म्हणजे काय वेगळे
खोल दरीतले वाहते पाणी
उंच डोंगरावर पक्षी प्राणी
कानावर घोंघावणारे वादळ
नितळ दिसणारा सागरतळ
फांदीवर हळूच फूल डुलणारे
वाऱ्यावरून पान तरंगणारे
नभात चांदणी चमचमणारी
सागरात बोट हेलकावणारी
झाडावरून खार तुरुतरुणारी
रोपट्यावर कळी मोहावणारी
सशाचा डोळा लुकलुकणारा
वाळूतला शिंपला चमकणारा
कोपऱ्यातले कोळ्याचे जाळे
एका झुरळाचे सहस्र डोळे
शब्दात रंगवणे हेच सगळे
"कविता" म्हणजे काय वेगळे ..!
.
अनमोल ते सारे
अजुनी दूर किनारे
उरलेत भाव काही
संपलेत शब्द सारे
संपला प्रवास केव्हाच
अजुनी दूर किनारे
जेथे मैफीली सुरांच्या
होत्या कधी काळी
सजली तिथे आता
जखमांची मांदीयाळी
भिजलेला श्रावणगंध
वाहती अजूनी वारे ...
संपला प्रवास केव्हाच
अजूनी दूर किनारे ...
वाटेतल्या फुलांनो
रोखा श्वास तुमचे
विपरीत अर्थ आहेत
तुमच्या स्पंदनांचे
क्षण शेवटाचा उशाशी
तरीही गंध का रे?
संपला प्रवास केव्हाच
अजूनी दूर किनारे
कवी : निशांत तेंडोलकर ..
"भयग्रस्त जाहलो आहे भयमुक्त जाहलो आहे "
मी मुक्त जाहलो आहे उन्मुक्त जाहलो आहे
हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (धृ)
ही स्थिती कोणती आहे कोणती अवस्था आहे
अस्ताव्यस्तच असण्याची कोणती व्यवस्था आहे
भयग्रस्त जाहलो आहे भयमुक्त जाहलो आहे
हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (1)
मी स्पर्श कराया आलो की स्पर्श व्हावया आलो
उत्कटता होता होता उत्कर्ष व्हावया आलो
आरक्त जाहलो आहे आसक्त जाहलो आहे
हळव्या कातरवेळेला संपृक्त जाहलो आहे (2)
रेल्वे पोलीस
रेल्वे पोलीस
महिला रेल्वे डब्यात,
तो एकच पुरुष होता.
तो दुसरा तिसरा कोणी नाही,
बंदुक धारी रेल्वे पोलीस होता.
नजर त्याची तीक्ष्ण होती,
संकटाचा मनी तो अंदाज धरी.
मनात कसली भीती न बाळगता,
महिला बिनधास्त प्रवास करी.
तासंतास रक्षणासाठी उभा.
आपली तहान भूक हरवून,
सलाम माझा त्या जवानाला,
ते भीतीला लावतात पळवून.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१/०३/२०१५
९८९२५६७२६४