कंपास पेटी
कंपास पेटी
**********************
कंपास पेटी
**********************
Epppie.... चिनी गुलाबाचे सीड्स मागवली होती अम्माजानकडुन. पावली नुकतीच. आता ५० बीयापासुन किती रोपं बनताय बघुयात. लगे हातो नर्सरीत चक्कर टाकुन आलो. तर तिथंही त्यानं चिगुची रोप लावलीयेत नुकतीच. अचानक मागणी वाढली म्हणे.
आमच्या गच्चीवरील बाग प्रेमी मंडळाची देखिल तुफान चर्चा सत्र होतायेत. फुलांचे नवनवे रंग तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संवाद, संपर्क , समन्वय सुरु झालाय.
--चिनी गुलाबाचे कलम करून नवीन कलर बनवता येईल का ?
--भाबड्या अपेक्षा लागल्यात फुलांच्या रंगाच्या
--बरेचसे ड्युअल कलर बघितलेत मी नेट वर
--सगळ्याना द्यायला सोपे जाईल... सगळे कलर
फायनल इयर हा कॉलेजलाईफ मधला एक वेगळाच काळ असतो. सीनियर्सना फेयरवेल देऊन झाली कि, आपलाही शेवट जवळ आल्याची जाणीव होऊ लागते. आयुष्यभर पुरतील अशा आठवणी पटापट जमा करण्याचा असा का काळ. सगळ्यांना मैत्रीचचं भरत येत असत. गेल्या तीन वर्षांमध्ये निर्माण झालेल्या ऋणानुबंधांची खास काळजी घेतली जाते. लांब गेलं तरी तुटू नये म्हणून त्यांना अगदी घट्ट करण्याचा प्रयत्न नकळतपणे चालू असतो. वर्गात अभूतपूर्व एकी निर्माण होऊ लागते. सगळे वेगवेगळे ग्रुप्स एकत्र येऊन, एकच मोठ्ठा ग्रुप तयार होतो. कॉलेजच्या पार्किंगमध्ये रेंगाळण वाढत. दर चार दिवसाआड कुठेना कुठे जायचे प्लॅन्स ठरत असतात.
०५ ऑगस्ट
सकाळी : ७ वा.
भाग ०१ पासून पुढे.....
( ठरवल्या प्रमाणे तिघेही ९:०५ ला तिथं हजर झाले.. संकेत मस्त इस्त्री करून फॉर्मल कपड्यात आला होता.. अनाहून पसरलेली शांतता मोडत मयुरी म्हणाली )
मयुरी : आता?
राघव : निघुया?
संकेत : हो.
मयुरी : काय हो?. राघव, काय प्लॅन आहे?
राघव : प्लॅन काहीच नाहीये, जे होईल ते बघून घेऊ.
मयुरी : म्हणजे?
राघव : अग "डर के आगे जीत है"
मयुरी : पण जीत तर या सुकड्याची ना, आपलं काय?
राघव : आपल्या मैत्रीची जीत.
संकेत : नीघुया का?
मयुरी : बघ या सुकड्याला किती घाई आहे जायची!
राघव : ए.. चला बस आली निघुया आता.
संकेत : मयुरी... या राघवचं तोंड झाक जरा..
मयुरी : ए तु गप्प बस ना रे राघव...
राघव : मी कशाला गप्प बसू?.. या थेरड्याला सांग ना त्याच तोंड झाकायला...
संकेत : ए थेरडा कोणाला म्हणतोे रे..
राघव : तुला म्हणतोय तुला..
मयुरी : अरे तुम्ही दोघंही शांत होता का जरा..
संकेत.. सांग.. काय प्रॉब्लेम आहे तुझा..
राघव : हं.. आता याचा पण प्रॉब्लेम ऐकावा लागेल.. परमेश्वरा...
मयुरी : राघव चुप्प.. तु बोल संकेत..
संकेत : मी काय म्हणतो
राघव : काय म्हणतोस तु??
संकेत : हेच्या आयलां...
मयुरी : संक्या शांत हो.. राघव निघ इथुन..
" अहो ऐकताय ना?.."
" नाही.. कानात तेल ओतलयं मी.."
" काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी.."
" अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का?"
" ओ.. झोपताय काय?.. आज काय आहे माहीत आहे ना?"
" काय आहे?..."
" अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे.."
" मग?.."
" मग काय?.. चला ना जाऊया आपण पण.."
" छ्छे... काय गं... कोण कविता आणि कोणाची बहीण?.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा.."
" काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी.."
" बरं मग, तू जाऊन ये "
" मी एकटी नाही जाणार.."
साधारण ३ वर्षांपूर्वी घडलेली ऐक घटना.
जून २०१६ मध्ये मी यांगोंला आले. तेव्हापासून दोन वेळा इथल्या भारतीय दूतावासात जाणं झालं. २०१६ चा स्वातंत्र्यदिन समारंभ आणि २०१७ चा प्रजासत्ताक दिन समारंभ या निमित्ताने जाणं झालं होतं. बाकी तसा माझा दूतावासाशी काही संबंध येत नाही. दूतावासाला फेसबुकवर ‘लाईक’ केलं होतं, त्यामुळे घडामोडी कळत राहतात.
ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात कधीतरी ‘पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी म्यानमा भेटीवर येत आहेत आणि यांगोंमध्ये ते जनतेशी संवाद साधतील’ असं फेसबुकवर कळलं. ‘अधिक माहितीसाठी दूतावासाशी संपर्क साधावा’ असंही एक आवाहन जाहीर झालं. मग मी दूतावासाशी संपर्क साधला.
हि २०१० सालातील गोष्ट आहे. मी अमेरिकेत नुकताच आलो होतो आणि त्यावेळी स्मार्टफोनचे तितकेसे प्रस्थ नव्हते आणि माझ्याकडेही स्मार्टफोन नव्हता. त्यामुळे बारीक सारीक गोष्टींसाठी गूगल करणे नसायचे. मी माझ्या रूममेट बरोबर रहात होतो आणि अमेरिकेत येऊन मला ४ दिवस झाले होते. घर दाखवताना घरमालकाने इथून १० मिनिटावर किराणा - भाजीपाला ह्यासाठीच दुकान आहे असे सांगितले होते. पहिले २ दिवस भारतातून आणलेले पदार्थ खाऊन काढले पण आज जरा गरम खायची हुक्की आली. रूममेटला कांदा बटाट्याचा रस्सा करता येत होता , तो म्हटला मस्त रस्सा आणि भात करू , तू सामान घेऊन ये . आता किराणा आणण्याची गरज होती.