स्मारक बांधून काय होतं ?
कालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पात छत्रपती श्री शिवाजी महाराज, स्व. श्री बाळासाहेब ठाकरे ,स्व. श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे स्मारक बांधण्यासाठी ४००-५०० कोटींची तरतूद करण्यात आली. गुजरात मध्ये सुद्धा स्व. श्री वल्लभभाई पटेल याचं स्मारक बांधण्यात येणार आहे. खर्च जवळपास ४००० कोटी. या स्माराकांद्वारे काय साध्य होते ? जनतेच्या पैशांनी स्मारक बांधणे या महापुरुषांना तरी आवडेल का ?
याद्वारे पर्यटनाला थोडीफार मदत होते हे मान्य ! पण पण हेच पैसे योग्य ठिकाणी वापरून पर्यटन आणी अन्य व्यवसाय जास्त वृद्धिंगत करता येणार नाही का ?