लॉकडाऊननंतरचा पहिला प्रवास
कोयनेचे आरक्षण केल्यावर मी सकाळी लवकरच कोल्हापूरच्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर पोहचलो. लॉकडाऊनच्या परिस्थितीचा परिणाम रेल्वेच्या प्रत्येक बाबीवरही दिसत होता. स्थानकात प्रत्येकाला तिकीट तपासूनच प्रवेश दिला जात होता. दोन नंबरच्या फलाटावर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी कोयना उभी होतीच. अजून बाकीच्या गाड्या सुरू झालेल्या नव्हत्या. त्यामुळे एरवी कोयना सुटण्याच्या आधी दिसणारी प्रवाशांची गर्दी आणि लगबग यावेळी दिसत नव्हती.