माझा कुकिंग एक्सपिरिमेंट
नमस्कार, मी आरती, आता कुणाची विचारू नका :)
नमस्कार, मी आरती, आता कुणाची विचारू नका :)
गणेशोत्सव १९७७
उधमपुरची विसर्जन मिरवणूक! ६० किमी अंतराची!
पायलट ऑफिसर रँक बॅडमिंटनच्या खेळातील 'शटल कॉक' प्रमाणे वापरली जात असे. आता ती रँकच बंद झाली. असो.
असेच "जा उदमपूरला" म्हणून पाठवले गेले होते. आम्हा जुनियर्सना काहीच हरकत नसे. कारण दर आठवड्याला ड्युटीऑफिसर म्हणून सर्व समावेशक मोठ्या होल्डॉल मधे गाशा गुंडाळून मेस पासून 35 किमी दूर एयरपोर्ट वर राहायला जाणे अंगवळणी पडले होते! शिवाय टीए डीए वेगळा!
उधमपुरच्या छोटेखानी मूर्तीचे विसर्जन आठवणी राहिले.
माझा आजचा स्वभाव आणि काही वर्षांपूर्वीचा स्वभाव यात बराच फरक पडलेला आहे. खास करून जे मला लहानपणापासून ओळखतात त्यांना तर माझ्यातील हा बदल खास करून जाणवतो. अगदी शुल्लक कारणही मला चिडचिड करण्यासाठी पुरेसं असायचं. हेच नाही तर मी कधी कुणाला चेष्टेत काय बोलून जाईल हे मलाही समजत नव्हतं. ज्यावेळेस लक्षात यायचं त्यावेळेस वेळ निघून गेलेली असायची. बरे त्यासाठी माफी मागायची म्हटली तर माझा इगो आड यायचा. या कारणावरून माझे आणि वडिलांचे तर जवळपास दिवसाआड खटके उडत. इतकेच काय तर यासाठी जवळपास ७/८ वेळेस माझी ‘ग्रहशांती’ही केली आहे. पण माझ्यात काहीच फरक पडत नव्हता. घरचेही काहीसे वैतागले होते.
आपली मराठी भाषा खरंच खूप ग्रेट आहे. मराठीत एकाच वाक्याचे अनेक अर्थ होऊ शकतात. इतकेच काय पण संदर्भ बदलला की वाक्याचा अर्थही बदलू शकतो. याचा एक अगदी ताजा ताजा अनुभव मला काल आला. निमित्त होते मित्राच्या घरच्या कार्यक्रमाचे. तसे माझे एकदोन मित्र सोडले तर बाकी सगळे विवाहित आहेत. बरे सगळेच मला ‘लग्न कर... लग्न कर’ असे सुचवत असतात. अर्थात अजून तरी मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलेले नाही. जर कुणी जास्तच त्याबद्दल म्हणायला लागले तर सरळ बोलून टाकतो... “च्यायला... माझे सुख बघवत नाही काय तुम्हाला?” अहो... काही जणांनी तर मला तसे स्पष्ट बोलूनही दाखवले आहे. असो...
आपल्या जीवनात घडणाऱ्या काही घटना खूप छोट्या असतात पण त्यांच्यात सभोवतालचे वातावरण काही वेळासाठी का होईना पण बदलण्याची अफाट शक्ती असते. याचाच अनुभव मी काल घेतला.
माझ्या मित्राच्या बहिणीचे लग्न होते. आदल्या दिवशी पासूनच आम्ही लग्नघरी तळ ठोकला होता. काय आहे ना लग्नघर म्हटले की अनेक गोष्टी येतात. बरीच कामे असतात, धावपळ असते आणि घरातील लोकं आलेल्या पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यात अडकलेले असतात. त्यामुळे कामासाठी जितके जण जास्त तितके चांगलेच. बरे अनेकदा तर मुलगी सासरी गेल्यावरही मित्रांची कामे संपतील असे नाही. असो.
माझ्या एका मित्राला अर्थाचे अनर्थ करण्याची खूप वाईट खोड आहे. अर्थात माझाच मित्र तो... माझ्यासारखाच असणार... पण असे करताना मी किमान आजूबाजूचे भान तरी बाळगतो... हा पठ्ठ्या मात्र माझ्याही पुढची पायरी...
आज खूप दिवसानंतर मी सकाळच्या वेळी भूपाळी गायली. तसा आपला आवाज खूप दमदार आहे. ते पहाडी का काय म्हणतात ना... तस्साचं... निमित्त होते माझ्या भावाला उठवण्याचे. तसा तो नेहमीच माझ्या आधी उठत असतो, पण काल जवळपास पहाटे चार वाजेपर्यंत एडिटिंगचे काम करत बसला होता. त्यामुळे मग सकाळी फक्त दोन तीन तासात जाग येणे कितपत शक्य आहे? अर्थात व्यवसाय म्हटला की या गोष्टी येतातच. रात्री कितीही वाजता झोपला तरी सकाळी ९ वाजता ऑफिसला जावेच लागते... त्याला हो... इथे त्याच्याबद्दल बोलतोय मी. तर... काय सांगत होतो? हां आठवलं... मी गायलेली भूपाळी... याबद्दल सांगत होतो मी.
गणेश पूजा... सन १९७२
बल्ले बल्ले जी...! गनेस पूजे दी!!
भाग १
हवाईदलातील माझ्या आठवणी...
माझा एक मित्र आहे. तो चित्रपट, टीव्ही सिरीयल यासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतो. मधून अधून काही चित्रपटात, टीव्ही सिरीयल मध्ये छोट्या भूमिका देखील करतो. पण ते फक्त हौस म्हणून. मुख्य काम मात्र डायरेक्टरला असिस्ट करण्याचेच. परवा त्याची आणि माझी बऱ्याच दिवसानंतर भेट झाली. खरं तर तो असिस्टंट डायरेक्टर आहे म्हणजे काय हेच मला नीट समजत नव्हते. मग त्याला विचारलेच.
“यार... तू असिस्टंट डायरेक्टर आहे म्हणजे नक्की काय करतोस? कित्येक वेळेस तर तू टीव्हीवर दिसतोस पण तुझे नाव मात्र कोणत्याच यादीत दिसत नाही. असे कसे?” मी भाबडेपणाने प्रश्न विचारला.
काही लोकांना इतरांची प्रशंसा ( म्हणजे तारीफ हो... ) करण्याची खूप चांगली सवय असते. अगदी हृदयाच्या तळापासून ते समोरच्या माणसाची प्रशंसा करतात. मलाही खूप आवडते, लोकांनी माझी प्रशंसा केलेली. अगदी स्पेशल वाटतं दिवसभर. पण काही वेळेस अशा व्यक्ती आपली प्रशंसा करताना आपल्याला असली एकेक बिरुदे चिकटवतात की त्यावर हसावे की रडावे अशा प्रश्न पडतो.
गोष्ट तशी बरीच जुनी आहे... माझ्या कॉलेज जीवनातली. पण अजूनही अगदी जशीच्या तशी आठवते आहे. त्या काळी मी क्रिकेट खेळायचो... म्हणजे अजूनही खेळतो म्हणा. पण आताच्या खेळण्यात आणि त्या वेळेसच्या खेळण्यात खूप फरक पडला आहे.