माझी राधा - २
न ठरवताही अचानक कोमल ऋषभ स्वर येवून जातो. जीव कसावीस करणारा हा स्वर.एक तर तन्मय होऊन आसपासाच्या जगाला विसरून उत्कटतेने वाजवत रहावे किंवा सर्वसंग परित्याग करून दूर कुठेतरी निघून जावे अशी काहीशी भावना जागवणारा हा स्वर.
न ठरवताही अचानक कोमल ऋषभ स्वर येवून जातो. जीव कसावीस करणारा हा स्वर.एक तर तन्मय होऊन आसपासाच्या जगाला विसरून उत्कटतेने वाजवत रहावे किंवा सर्वसंग परित्याग करून दूर कुठेतरी निघून जावे अशी काहीशी भावना जागवणारा हा स्वर.
उत्तरात्र झाली आहे. कसल्याशा चाहुलीमुळे मी जागा झालो आहे.
उत्तररात्रीच्या त्या शांत वातावरणात रातकिड्यांच्या आवाजाशिवाय दुसरा कसलाच आवाज नाही. नाही म्हणायला दूरवरून अस्पष्ट ऐकू येणारी समुद्राची गाज ऐकू येतेय.
गवाक्षाबाहेरून येणारा प्राजक्ताच्या फुलांचा गंध वातावरणातील प्रसन्नता आणखीनच वाढवतोय.
इतक्या शांततेची सवय जवळजवळ संपलीच आहे. आजकाल वेळच कुठे असतो शांततेसाठी आपल्या कडे. दिवसभर काही ना काही चालूच असतं. कोणी ना कोणी सोबत असतंच. आपण एकटे असे नसतोच कधी.
"घरातून बाहेर पडलास तर तंगड्या तोडून हातात देईन," आईनं दम दिलेला. दम देण्याची तिची ही नेहमीची पद्धत. मला माहित होतं आपल्या तंगड्या बिंगड्या काही तूटणार नाहीत, पण रट्टे पडतील या भीतीने डोळे बंद करून खाटेवर नुसता पडून होतो. डोळ्यासमोर दिसत होते उनाडक्या करत हिंडणारे मित्र. कितीही प्रयत्न केला तरी झोप येत नव्हती. दुपार चांगलीच तापली होती.संध्याकाळी झाडांना गदगदा हलवणारा वारा म्हाताऱ्या माणसासारखा कुठेतरी झोप काढत असावा. कूस बदलावी तशी झाडाची पानं मधूनच हलू लागायची अन् वाटायचं वाऱ्याची गार झुळूक अंगाला स्पर्श करून जाईल. पण, तसं होत नव्हतं. खूपच उकडत होतं.
कुणीतरी, ह्या विषयावर धागा काढेल, असे वाटले होते, म्हणून थांबलो होतो...
2017 पासून, भारतीय महिला, ह्या प्रकारच्या खेळांत चांगल्याच प्रवीण झाल्या आहेत...
पण, व्यक्तीपूजेच्या शापातून, अद्याप तरी, ह्या संघाची सुटका झालेली नाही.
मिताली राज आणि हरमन प्रीत कौर, यांना अजूनही संघात का घेतले आहे? हा एक अनाकलनीय प्रश्र्न ....
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, यांच्यात अंतिम सामना होण्याची शक्यता जास्त आहे, हे माझे वैयक्तिक मत ...
सामना (३)
(पूर्वसूत्र: वकील संघ विरुद्ध न्यायाधीश संघ यांच्यात सव्वीस जानेवारीला होणारे क्रिकेट सामन्यासाठी,अनेक अडचणींना सामोरे जात न्यायाधीश संघाने तयारी केली आहे.आणि सामन्याचा दिवस .)
शेवटी तो दिवस एकदाचा उजाडला.झेंडावंदनानंतर
साडेदहा वाजता,वकील संघ विरुद्ध न्यायाधीश संघ यांच्यात कॉलेजच्या मैदानावर क्रिकेट सामना होणार होता.तालुक्याहून ठोंबरे व आणखी दोन न्यायाधीश
( दि.न्या.क.स्त) हे संघातील खेळाडू वेळेत पोहचले होते.सामन्यासाठी मैदान सज्ज झाले होते.मंडप उभारलेला होता.तो वकील,न्यायाधीश,त्यांचे कुटुंबीय,
संध्याकाळी शाळेतून आल्यावर, हात-पाय धूऊन चहा पीत होतो, तेवढ्यात संज्या निरोप घेऊन आला..
"गुरं बाहेर काढताहेत, तुला बोलावलंय!
"थांब जरा," मी म्हणालो.
आईला संज्यासाठी चहा आणायला सांगून, जावं कि, न जावं, या विचारात बुडून गेलो. शाळेचा गृहपाठ करायचा होता. तिकडं गेलो तर बराच उशीर होणार. माझं दहावीचं वर्ष, शाळेच्या पहिल्याच दिवशी सरांनी भलं मोठं भाषण दिलेलं,
सामना (२)
( पूर्वसूत्र: न्यायालयातील ल्यायब्ररीत एका महत्वाचे विषयावर चर्चेसाठी, न्यायाधीशांची बैठक,कुमठेकर साहेबांनी बोलावली आहे.तिथे ते संबोधन करत होते.)
दिल का रिश्ता.
इसवी सन- २००३
जय मेहता- अर्जुन रामपाल
टीया- ऐश्वर्या रॉय
जयचा बाप- परेश रावळ
अनिता- ईशा कोप्पीकर
टीयाची आई- राखी
सामना
(विशेष सुचना:या कथेतील सर्व प्रसंग आणि पात्रे काल्पनिक आहेत.प्रत्यक्षातील कुण्या व्यक्तीशी वा प्रत्यक्षात अनुभवलेल्या प्रसंगांशी कुणाला साम्य आढळल्यास, काय समजायचे समजा.
मी काय करू ?)
सामना १
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रबळ आरमाराची उभारणी केली. स्वत:ची प्रबळ आरमारीशक्ती असलेले आधुनिक भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हटले जाते. योगायोगाने यंदाच्या शिवजयंतीनंतर लगेचच भारताचे राष्ट्रपती येत्या 21 फेब्रुवारी 2022 ला विशाखापट्टणम येथे भारताच्या नाविकशक्तीचे अवलोकन करत आहेत.