गंधीत आठवणी
साधारण एप्रिल-मे महीन्यात परीक्षा आटोपत्या आलेल्या आणि सुटीची आतुरता लागलेली असायची. उन्हाळ्याच्या उकाड्यासोबतच सगळीकसे हवा कशी मोकळी वहात असे. अधुन मधुन घामाळलेल्या अंगावरुन एखादी हवेची झुळूक गेली की काय तो आनंद व्हायचा. पडवीत असलेले कडुलिंबाचे झाड उन्हाची दाहकता बर्याच अंशी कमी करायचे. आम्ही गल्लीतील सगळी मुले ह्या झाडाखालीच खेळायचो. उन्हाळ्याच्या त्या दिवसांचा गावाकडचा विशिष्ट असा गंध आजही माझ्या लक्षात आहे. उन्हाळा आला कि आजही मला तो गंध सुटीची आतुरता देऊन जातो. सुटीमधे चाखायला मिळणारे आंबे, कैरी यांचेही विशिष्ट वास मनात घर करुन आहेत.