जीवनमान
ध्यानधारणा ....ज्याची त्याची....
प्रेरणा ... विपश्यना आणि रॅन्डम मी ... https://www.misalpav.com/node/49591 ...
--------
मुळात, ध्यानधारणा ही आवश्यक आहे का?
माझ्या अनुभवा नुसार, ध्यानधारणा ही अत्यावश्यक आहे...
मला जाणवलेले काही मुद्दे म्हणजे, आपणच आपली उन्नती करत जातो. हळूहळू का होईना पण, निश्र्चितच आपण आपल्याला ओळखायला लागतो. मनाचा मनाशी मनापासून संवाद होणे, म्हणजेच ध्यानधारणा. (हे माझे वैयक्तिक मत आहे.)
-------
ध्यानधारणा करण्यासाठी गुरूची आवश्यकता असते का?
जात्या मधले दाणे रडती सुपातले हसती......
जात्या मधले दाणे रडती सुपातले हसती.
" वृद्धांचे फालतू लाड बंद करा" ,लेख मिसळपाव ब्लॉग वर वाचला. आवडला, भरपूर प्रतिसाद मिळाले. लेखक यशस्वी झाले.
एवढ्या सगळ्या प्रतिक्रिया वाचल्यावर असे वाटू लागले आहे की वृद्धत्व शाप की वरदान. अर्थात तो एक वेगळा धागा होऊ शकतो.
प्रत्येकाचा अनुभव, दृष्टिकोन वेगळा अगदी पंचतत्रांतल्या गोष्टी सारखा.
आमची खेळातली पहिली पारी खेळून झाली. एक्स्ट्रा ओव्हर्स पण संपल्यात. आता पँव्हेलियन मधे बसलोय सामना संपण्याची वाट बघत.
संत साहित्य विषेशतः कबीरदासजी आणी कवी बोरकर यांच्या साहित्या मधे सूर गवसला.
कबीरदासजी म्हणतात ,
विपश्यना आणि रॅन्डम मी
(हे वाचणाऱ्यास विपश्यनेच्या दहा दिवसांच्या कोर्ससंबंधी अनुभवाने किंवा ऐकून वाचून माहिती असेल, असं गृहीत धरून लिहितोय.)
१. तर फारा वर्षांनी एकदाचा दहा दिवसांच्या सुट्टीचा जुगाड करून, पद्धतशीर बॅग वगैरे घेऊन, ट्रेनमधून उतरलो.
रिक्षातून विपश्यना सेंटरच्या दिशेने जाताना 'कदम बंधू बिअर शॉपी' असा एक ओझरता बोर्ड दिसला.
म्हटलं, कोर्स संपल्यानंतर आपल्यासारख्यांसाठी ह्या कदम बंधूंनी जवळच 'सोय' करून ठेवली आहे, हे एक बरंय.
मिपाकट्टा@नाशिक ०७/११/२०२१
मिपाकट्टा@नाशिक ०७/११/२०२१
आज दिनांक 07/11/2021, रविवार, नाशिक मध्ये मिपाकरांची छोटी भेट (मीनी कट्टा) आयोजित केला गेला. त्याचा हा वृतांत.
आपणास माहित असेलच की मिपाकर नाशिककरांनी गेल्याच महिन्यात मिपाकट्टा@नाशिक ०३/१०/२०२१ साजरा केला होता.
आवाज बंद सोसायटी - भाग ५
अवकाळी आला पाऊस
अवकाळी आला पाऊस त्यानं सारं रानं धुतलं
हाती आलेलं पीक गेलं ते डोळ्यासमूर घडलं
काय सांगावी दैना चहूबाजूनी तो आला
ढगफुटी झाली जणू एकाजागी बरसला
किती निगूतीनं केलं व्हतं शेत आवंदा
बैलं नव्हते मदतीला औताला लावी खांदा
खतं बियाणं आणूनीया येळेवर केला पेरा
पाण्यासारखा पैसा पाण्यातच वाया गेला
पाऊस आला घेवून पाण्याचा मोठा लोंढा
न उरली बांधबंदिस्ती न उरला माती भेंडा
दु:ख सारं गेलं वाहून आलेल्या पाण्यात
उभारीनं करू पुन्हा तेच आपल्या हातात
- पाषाणभेद
२४/१०/२०२१
***हरिश्चंद्रगडावरचं खरेपणं***
*******
डोळ्यांनी फळे खावित का?
आमच्या डाळिंबांच्या बागेत आलेली ही फळे:
ब्रेथलेस
रस्त्यात अचानक खड्डा आल्यामुळे समजा आपण करकचून ब्रेक मारल्यानंतर पाठीमागचा एखादा आपल्यासारखाच मध्यमवर्गीय गाडीवाला आपल्यावर येऊन चढला असता सदर घटनेमध्ये नेमकी चूक कुणाची हे निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नसतो ह्याचं साधं कारण असं आहे की आपल्याकडे कोणत्याही रस्त्यावर गाडी चालवताना फूटभर खोल खड्डा अकस्मातपणे समोर येतच असतो, हे जनरल नॉलेज अगदी लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडत असल्याने ते एव्हाना आपल्या एकूणच जगण्याचा भाग झालेलं असतं तरीही यामागचं खरं कारण म्हणजे जनतेचं ध्यान चालू क्षणावर तल्लखपणे टिकून रहावं ह्या उदात्त भूमिकेतून मायबाप सरकार, प्रशासन आणि कंत्राटदार वग