जीवनमान

कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
27 Mar 2015 - 10:23 am

हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे.

जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

समाजजीवनमानतंत्रराहणीविचार

अंजिराचा चिक आणि औषधोपचार

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in काथ्याकूट
27 Mar 2015 - 4:41 am

आमच्या आवारात अंजिराचं झाड आहे. ते अगदी फाटकाला लागून आहे. त्याचा वाढायचा वेग आणि पसारा प्रचंड आहे. त्यामुळे आम्हाला ते सारखं छाटत राहावं लागतं. नाहीतर ते फाटकातून यायला जायला अडथळा करू लागतं आणि वर त्या झाडाच्या अगदी डोक्यावर विजेच्या तारा आहेत. त्यामुळे ते सरळही वाढू देऊ शकत नाही आणि आडवंही. त्याला भरपूर पाने येतात आणि कसली तरी पांढरी चिलटं भरमसाठ प्रमाणात पानांच्या खालच्या बाजूला गर्दी करतात. जणू उलट्या बाजूने बर्फवृष्टी झाली असावी सगळ्या झाडावर. ती चिलटं संध्याकाळ झाली की घरात घुसायला बघतात. ती चिलटं खूप बारीक आणि पीठासारखी अंगाला चिकटून बसणारी.

गनिमी कावा

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
26 Mar 2015 - 10:05 am

विचारत इकडे तिकडे आले
आज पाहुणे घरात आले
अहाहा सदन धन्य झाले ..

निवांत खुर्चीवर ते बसले
मान डोलवत जरासे हसले
रुमालाने तोंडही पुसले ..

'कसे काय तुम्ही वाट चुकला
आठव आमचा कसा जाहला ?'
- गूळपाणी देत प्रश्न विचारला ..

ओशाळवाणे पाहुणे हसले
हळूच इकडे तिकडे पाहिले
प्रश्नाचे उत्तर देणे टाळले ..

पिशवीतून मोबाईल काढला
रुमालाने स्वच्छही पुसला
माझ्या हाती तो सोपवला ..

"गनिमी कावा" त्याचा ध्यानी
आला माझ्या त्याच क्षणी
मुकाट उठलो हाती धरुनी ..

काहीच्या काही कवितासमाजजीवनमानप्रवासमौजमजा

तो, ती आणि एक सामान्य घटना

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
24 Mar 2015 - 11:02 pm

आजूबाजूला दिसनारी सर्वसामान्य माणसे किंवा आसपास घडनाऱ्या आणि वरकरणी सामान्य वाटनाऱ्या घटना कधीकधी बरेच काही शिकवून जातात.

साधारण दोन महीन्यापूर्वीची गोष्ट मी कुटुंबासमवेत म्हैसूरवरुन बंगलोरकडे येत होतो.
स्थळ: बंगलोर म्हैसूर रोडवरील मदुरच्या जवळचे एक अॅदीगॅसचे जॉइंट.
वेळ: रात्रीचे सव्वानउ साडेनउ.

जीवनमानप्रकटनविचारलेखमत

मानवी स्पंज आणि स्प्रिंग!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
24 Mar 2015 - 11:27 am

तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील.

समाजजीवनमानतंत्रराहणीप्रकटनविचारप्रतिसादअनुभवमत

या गावाचं काही खरं नाही!

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
23 Mar 2015 - 10:35 pm

सकाळी ली क्वान युंचे देहावसान झाल्याचे वृत्त कानी आले. बंड्याला त्याच्या वॉसप वर लिहिलं, 'शनिवार रविवार उंडारुन झालं, आज पुन्हा सोमवारी सुटी!'

बंड्याचा दोन मिनिटांनी थंड प्रतिसाद. 'कसली सुट्टी?'

अरे! एवढा मोठा नेता गेला आणि सुट्टी नाही? हां, बरोबर; अंतिम संस्कार उद्या असतील, सुट्टी उद्या देतील. पाच मिनिटांनी उत्तर आलं, 'मला काम आहे. तुलाही असावं अशी माफक अपेक्षा आहे. संध्याकाळी बोलु आरामात'. अरे देवा! काय हा माणुस की काय? सुट्टी नसल्याचं काहीच सोयर सुतक नाही? साधा माझ्यापाशी खाजगीत निषेधही नाही? असो. संध्याकाळी बघु.

वावरजीवनमानप्रकटनविचारमाध्यमवेध

निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
23 Mar 2015 - 1:54 pm

हे जग निसर्गनियमानुसार चालते. म्हणजे जे पेरले ते उगवते. तसेच पुन्हा पुन्हा पेरले की पुन्हा पुन्हा उगवते. त्या नियमानुसार कोणतीही गोष्ट करण्यासाठी कधीही वेळ "निघून गेलेली" नसते. वेळ/काळ परत परत येत राहतो. जीवन आपल्याला पुन्हा पुन्हा संधी देत असते. ती आपल्याला फक्त दिसली पाहिजे. जीवनाकडे सकारात्मक दृष्ट्या पाहिल्यास काहीही अशक्य नसते. प्रयत्न करीत राहावे आणि फळ निसर्गावर सोडून द्यावे. चांगल्या गोष्टी पेरत जाव्या. निसर्ग नियमानुसार फळ मिळतेच. चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळते आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते. चांगले कर्म करा आणि चांगल्या फळाची अपेक्षा जरूर करा.

जीवनमानविचार

Veer Garjana | वीरगर्जना @ Gudhi Padwa 2015

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
23 Mar 2015 - 7:37 am

वीरगर्जना ढोल ताशे आणि ध्वज पथक, ठाणे याचा एक सदस्य अशी ओळख सांगताना मला नेहमीच अभिमान वाटतो. जरी वैयक्तिक आणि कामाच्या जबाबदा-यांतून सरावाला वेळ मिळत नसला आणि त्यामुळे सध्या वादनात सहभाग घेता येत नसला, तरीही ती ओळख तशीच आहे असं मी मानतो.

कलासाहित्यिकसमाजजीवनमानछायाचित्रणसमीक्षालेखअनुभवमाहिती

मी उपवर तरुण असतो तर

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in काथ्याकूट
22 Mar 2015 - 11:42 am

ब्राह्मण समाजातील उपवर मुलींची कमतरता आणी त्यावर उपाय

हा धागा पाहिला अन विषयाची मांडणी पाहून हसूच आले. यावर आता एकाहून एक प्रतिक्रिया येणार असा विचार करत असतानाच वाटले की मांडणी कशीही असो सध्याच्या एका ज्वलंत विषयाला हात घातला आहे.

जात, धर्म, समाज अन नोकरी वा व्यवसाय कुठलाही असो अनेक उपवर पुरुषांना स्वतःचे लग्न जुळवणे आव्हानात्मक होऊ लागले आहे. प्रश्न कितीही अवघड असला तरी उपाय शोधण्याचे प्रामाणिक प्रयत्न करायला हवेतच.

भीतीच्या भिंती ६: ‘दरी’

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
22 Mar 2015 - 4:43 am

भाग ,, , ,
(विनंती : या लेखात मी ‘दरी’ शब्दांचे जे उच्चार दिले आहेत, ते वाचकांनी कृपया ग्राह्य धरू नयेत.)

समाजजीवनमानप्रवासआस्वादअनुभव