वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१९८३ मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकल्यावर वर्ल्डकपचे यजमान म्हणून इंग्लंडची मक्तेदारी संपुष्टात आली. १९८७ च्या वर्ल्डकपचं यजमानपद भारत आणि पाकिस्तानला संयुक्तपणे बहाल करण्यात आलं त्यामागे १९८३ मधल्या भारतीय विजयाचा फार मोठा हातभार होता. या वर्ल्डकपमधला आणखीन एक महत्वाचा बदल म्हणजे पूर्वीच्या तीनही वर्ल्डकपप्रमाणे एका इनिंग्जच्या ओव्हर्स ६० वरुन ५० वर आल्या. तसंच इनिंग्जच्या मध्ये लंच आणि टी-टाईमला फाटा देण्यात आला.
९ ऑक्टोबर १९८७
चेपॉक, मद्रास