कातर वेळ
कातर वेळी आभाळ भरुन
येणं फार वाईट असतं
----
संध्याकाळची ती वेळ
एकटाच खिडकीत उभा राहून
नुकत्याच अवतरलेल्या चंद्राकडे
पहात उभा होतो
कशी कोण जाणे पण
तुझी आठवण
त्या भरून आलेल्या
ढगांबरोबर वाहत आली
---
कातर वेळी आभाळ भरुन
येणं फार वाईट असतं
----
आभाळ इतकं भरलं
ढगांनी इतकी दाटीवाटी केली की
त्यांना आभाळ पुरेना
कोणता ढग कोणत्या ढगात
विलीन होतोय तेच कळेनास झालं
आणि मग गडगडाटाने सारा
आसमंत भरुन गेला
या सगळ्या गोंधळात
तो चंद्र दिसेनासा झाला
अन्