सहप्रवासी
समर्थ म्हणूनच गेले आहेत की देशाटन केल्याने ज्ञानात वृद्धी होते. त्यांच्यासारख्या अवतारी पुरुषाच्या अफाट ज्ञानात प्रवासामुळे मिळालेल्या ज्ञानाचा भाग मोठा आहे. पण आपण पडलो पामर, त्यामुळे आपण प्रवासाला निघतो तेव्हा ज्ञानप्राप्ती कितपत होते ही शंकाच आहे पण गंमती, मनोरंजन, मनस्ताप आणि डोकेदुखी यांची प्राप्ती नक्कीच होते हे मी सांगू शकतो. आपल्या सगळ्यांचा सतत काही ना काही कारणाने प्रवास होत असतो. आजकाल आपण सगळं नियोजनाने करतो पण एक गोष्ट शेवटच्या क्षणांपर्यंत अनाभिज्ञ असते ती म्हणजे आपले सहप्रवासी! ह्यांच्या बाबतीत काही लय भारी किस्से आहेत आपल्याकडे. सगळ्यात भारी म्हणजे बसच्या प्रवासातील.