विज्ञान
||कोहम्|| भाग 2
1856 च्या ऑगस्ट महिन्यात, जर्मनीमधल्या निअंडरथल दरीत काही मजूर काम करत होते, एका चुन्याच्या खाणीत त्यांना काही हाडं सापडली. अशी हाडं सापडण्यात फार विशेष काही नव्हतं पण तरी त्यांनी ती एका स्थानिक अभ्यासकाला दिली. सुरवातीला वाटलं की ही एखाद्या अस्वलाची हाडं असतील, पण जेव्हा ती नीट जुळवली गेली तेंव्हा त्यांनी एक वेगळाच ईतिहास समोर आणला, 40000 वर्षांपूर्वी नाहीशा झालेल्या आपल्या सख्ख्या चुलतभावांचा इतिहास, जो आजही आपल्या प्रत्येक पेशीत स्वतःच अस्तित्व ठेवून आहे.
||कोहम्|| भाग 1
साधारण 13.5 बिलियन वर्षांपूर्वी एक महास्फोट झाला असं मानलं जातं. या महास्फोटाच्या सिद्धांतानुसार, त्या क्षणी(?) वेळ, ऊर्जा, अवकाश आणि पदार्थ अस्तित्वात आले. त्या क्षणापूर्वी ना वेळ होती ना ऊर्जा..
वेळ, ऊर्जा, अवकाश आणि पदार्थ यांच्या अभ्यासाला फिजिक्स म्हटलं जातं..
ट्रिंग ट्रिंग !!!!!
ट्रिंग ट्रिंग असा वाजतो जेव्हा Tone..
तेव्हा सर्वाना आठवतो तो "Telephone"
१९९० च्या दशकात केलेला तो पहिला कॉल
आजही आठवतो चाळमालकांच्या घरातला हॉल...
हॉल मध्ये फोनचा "डब्बा" असायचा ठेवलेला
येता-जाता निरखत असायचो आम्ही त्याला..
चाळीतले ते जोशी , नाडकर्णी , आणि पाटील
सर्वांचे कॉल त्या डब्बा फोन वर यायचे..
अन कोणाचा फोन आला आहे हे सांगायला
लहान मुलांनी घरोघरी पळायचे...
काही वर्षांनी,
कणकवली येथे होणारे श्री सुभाष पाळेकर ह्यांची नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला....
प्रिय मिपाकरांनो,
दिनांक २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर ह्या दरम्यान श्री.सुभाष पाळेकर ह्यांची "नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला" कणकवली येथे होणार आहे.
अधिक माहिती साठी श्री.सुनिल सावंत (९९६९५३४४३९) किंवा श्री. अमोल पाळेकर (९८८१६४६९३०) ह्यांच्याशी संपर्क साधावा.
मी जाणार आहेच.
आपलाच,
(शेतकरी) मुवि
ता.क. ====> सध्या माझ्याकडे आंतरजालाची जोडणी नसल्याने, वेळ मिळेल तसा मिपावर येत जाईन.
वैज्ञानिक दृष्टीकोण
चला आज दाखवतो तुम्हा विज्ञानाची प्रगती..
Video games मुळे होणारी मैदानी खेळांची अधोगती..
Robots मुळे माणूस स्वत:चे अवयव विसरलाय..
Machines च्या वाढत्या किंमतींमुळे रुपयाचा भाव घसरलाय..
Whatsapp आणि Facebook मुळे मुक्तसंवादाला बसलय टाळं..
Computer वरील प्रकाशामुळे जग दिसू लागलय काळं..
वाहनांच्या धुरामुळे Oxygen Traffic मध्ये अडकला..
Mileage Cars च्या अतिवापरामुळे Petrol चा भाव भडकला..
विज्ञानाच्या भुतांनी मिळवला अध्यात्मिक देवांवर विजय..
मुंबईसारख्या मायानगरीमुळे झाला गावच्या निसर्गाचा पराजय..
विज्ञानकथा आहेत का कुठे?
मराठी माणसाने विज्ञान क्षेत्रात एक ठसा उमटवला आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले वैज्ञानिक हि मराठी परंपरा.विज्ञानकथा हा प्रांत मराठीला तसा चांगलाच परिचयाचा आहे. इथे देखील आपला ठसा हा बऱ्यापैकी ठळक म्हणावा असाच. जयंत नारळीकर,निरंजन घाटे, बाळ फोंडके यांनी विज्ञान लेखनाला चांगले दिवस आणले. पण हि परंपरा कुठेतरी थिजली आहे असे वाटते. मराठी साहित्यातील हा रंग फिकट होतो आहे असे नाही का वाटत? दिवाळी अंकातदेखील अगदी मोजकच म्हणता येतील इतक लिखाण पण दिसत नाही. काय कारण असावीत या परिस्थितीला?
इनिग्मा
श्रद्धावानांच्या तार्कीक उणीवा
विश्वास आणि त्या पाठोपाठ येणार्या श्रद्धा सकारात्मक, रचनात्मक मंगलमय असतील आणि त्यात काही अनीष्ट आलेले नाहीना हे पाहून सुधारणाकरुन मार्गक्रमण केले तर काहीच समस्या नाही. बर्याचदा तसे होत नाही. आपलाच विश्वास आपलीच श्रद्द्धा केवळ खरी हा अट्टाहास साध्य करण्यासाठी सोईस्कर तत्वज्ञान उभेकरणे आणि अशा तत्वज्ञानातील तार्कीक उणीवांकडे लक्ष वेधण्यात विलंब झाल्याने भक्त वेगळ्याच दिशेने धावतात कुठे तरी नुकसान होते, कुठेतरी रक्त सांडते कुठे तरी माणसे संपतात आणि मग असे तत्वज्ञान उभे करणार्यांकडे सुजाण लोक दिगमूढ होऊन बघतात की हे कसं झाल आणि पुढे काय ?