जीवनमान
नातं - भाग १
नातं
कुण्या एका गावाच्या वेशीवर एक कुटुंब छोट्याश्या घरात रहात असतं. आईवडील आणि त्यांची चार मुलं. आईवडील वेशीबाहेरच्या जंगलात जाऊन वनौषधी गोळा करून गावातल्या एका वैद्याला विकत असत. त्यातून मिळणार्या पैशांतून घर चालत असे. दोन वेळेचं जेवण कसंबसं भागत होतं. वडिलांकडे वंशपरंपरागत आलेलं वनौषधी आणि आयुर्वेदाचं ज्ञान त्यांना जंगलात वनस्पती निवडण्यात कामी येत होतं. आईचं काम होतं त्यांना मदत करणं आणि चूल पेटवण्यासाठी लाकडं गोळा करणं. कित्येक वर्षं हे नित्यनियमाने सुरू होतं.
माणुसकी
लहान असताना आयुष्य म्हणजे काय ते माहीतही नव्हतं
आजूबाजूचे सगळे करतील तेच आणि तसंच करायचं
कधी कौतुक व्हायचं कधी दटावणी ….
रोज खूप वेगवेगळी स्वप्न बघायचो
कधी डॉक्टर तर कधी भाजीवाला ….
कोण होणार तू? ह्या प्रश्नाला माझं ठरलेलं उत्तर…."कारकून"
अंदाज नव्हता तेव्हा त्याच्या अर्थाचा …आवडायचे म्हणून म्हणायचं !
मग म्हणायचे आधी माणूस हो ….
वय वाढतच होतं…. आजूबाजूचे तेच पण त्यांच्या अपेक्षा बदलू लागल्या
लहान मुलाचं रुपांतर स्पर्धेच्या घोड्यात झालं होतं …
पाठीवर दप्तराच खोगीर आणि डोक्यावर लादलेल्या अपेक्षा
त्यागासारखं ढोंग नाही
सिनेमा पाहता? हिरो पाहता? मारामारी पाहता? काय उद्देश असतो? अन्यायाविरूद्ध लढा वगैरे. कधी? स्वतःवर शेकेपर्यंत तर हिरो हिरवीणीचे तळवे चाटण्यात वेळ घालवत असतो. अचानक काय होतं त्याला? गझनीत हिरवीण मरते. अग्निपथात बाप मरतो. क्रिशमध्ये बाप जिवंत असल्याचं कळतं. अजूनही बरीच उदाहरणं मिळतील. सारांश, वैयक्तिक पातळीवर काहीतरी चेतना मिळेपर्यंत आमच्या हिरोंना उर्वरित जगाशी काहीही घेणंदेणं नसतं. पण सगळा लढा वैयक्तिक पातळीवरच ठेवून कसं चालेल. तसं केलं तर लोकांना हिरो हा हिरो न वाटता सूडबुद्धीनं पेटलेला माथेफिरू वाटेल. म्हणून मग व्हिलनला जास्तीत जास्त व्हिलनीश करायचं.
त्रास
कलमनामा – १२/१०/२०१४ – लेख ७ - त्रास
त्रास
२५ माळ्यांची इमारत. आठवड्यासाठी या इमारतीमधील लिफ्ट बंद. कारण नवीन लिफ्ट बसवण्याचा निर्णय सोसायटीने घेतलेला आहे. बरं, पर्यायी लिफ्ट किंवा पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे सगळ्या फ्लॅटधारकांची, आठवड्यापुरती का होईना गैरसोय होणार आहे.
अबब.. तीन पुणोकरांमागे एक लठ्ठ.!
ऐका वृत्तपत्रातील लेखानुसार, पुण्यात गेल्या वर्षामध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाटय़ाने वाढले असून, ते जवळजवळ दुप्पट झाले आहे. आता पुण्यातील 3 नागरिकांमागे एक नागरिकाला लठ्ठपणाने घेरले असल्याचे ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाच्या अभ्यासातून समोर आले आहे. ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाने गेल्या वर्षाच्या आकडेवारीचा अभ्यास केला. यामधून ही माहिती समोर आली आहे. गेल्या 5 वर्षात लठ्ठपणाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. या अभ्यासात तीन पुणोकरांमागे एक जण लठ्ठ असल्याचे दिसून आले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारही त्यांना जडत आहेत. लठ्ठपणा वाढण्यामागे पुण्याचे वेगाने होणारे नागरीकरण कारणीभूत आहे.
"e" पुस्तके आणि कागदी पुस्तके
आजचा काळ इलेक्ट्रोनिक चा आहे. पुस्तक पण त्यातून सुटली नहित. e - books , e -magzines सगळीकडे बघायला मिळतात . त्यामुळे अर्थात कागदाची, पैशाची, झाडाची बचत तर होते आणि पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखायला मदत होते. जुने अंक साठवायचा त्रास पण वाचतो आणि जागा पण .
मी पण या "e" प्रत चा वापर करते पण मी पूर्णपणे ती प्रत वाचू शकत नाही . काही सदर वाचून मी थांबते मग भले ती कितीही वाचावीशी वाटो . पण त्याचीच जर कागदी प्रत असेल तर मी ती पूर्णपणे आणि लगेच वाचून संपवते .
प्रतिमा
प्रतिमा
आत्महत्या नव्हे, शेतकर्यांचा शासकीय खून!
आत्महत्या नव्हे, शेतकर्यांचा शासकीय खून!
यंदाचा दुष्काळ "न भूतो न भविष्यति" असाच म्हणावा लागेल. विदर्भात तर आतापासून चटके बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्र उघडलं की, शेतकरी आत्महत्त्येच्या संदर्भातील निदान एकतरी बातमी दिसलीच समजायची. आता असा एकही दिवस जात नाही की, शेतकरी आत्महत्त्येची बातमी कानावर येऊन आदळत नाही. मात्र तरीही कोणत्याच पातळीवर काहीही हालचाल होताना दिसत नाही. "रोजचे मढे त्याला कोण रडे" अशी एक म्हण आहे. भारतीय मानसिकता अधोरेखित करण्यासाठी ही एकच म्हण पुरेशी ठरावी.
स्वीकार
स्वीकार