सभा आणि मागच्या-पुढच्या वेळा
वेळ- सभेचा दिवस
वेळ- सभेचा दिवस
आज 3 महिन्यांनी गुलटेकडी मार्केटयार्डला गेलो (कित्ती सुख वाटलं म्हणून सांगू!? वारकऱ्यांना पंढरपूर, तैसे आम्हा मार्केटयार्ड!) उद्याच्या कामाची फुल फळ घेतली आणि भाजीत-शिरलो.
प्रत्येक माणूस वेगळा असतो तसा प्रत्येक पुरुषही वेगळा असतो. पण तरीही सर्व पुरुषांच्यात मिळून काही गोष्टी सारख्या,समान असतात. मग तो नवरा, मुलगा, भाऊ, काका, मामा कुणीही असो. याला काही सन्माननीय अपवाद असतातही. पण अपवादाने नियमच सिद्ध होतो.
या देशात जरा चुकीच्याच काळात आपण जन्माला आलो हि भावना आजकाल फार बळावते. स्वातंत्र्यानंतरची बहुदा दुसरी पिढी असावी आमची. येता जाता म्युनिसिपालिटीच्या दिव्याखाली अगोदरच्या पिढीने केलेला अभ्यास, स्वतंत्र भारतात जन्माला आल्याचे भाग्य, वगैरे गोष्टी कानावर आदळत असत. स्वातंत्र्य सैनिकांनी आंदोलनात घेतलेली उडी, आसुडाचे फटके, नखं उपसून काढणे, दगडी घाण्याला जुंपून घेणे, फाशी जाणे अशा शिक्षा भोगणे असे सहन केलेल्या लोकांनाच राष्ट्राभिमानी म्हणवून घेण्याचा अधिकार आहे असे कुठे तरी वाटायचे.
खुलासा:~ भिक्षुकी/पुरोहितपणा/भटजीगिरी, हा या अभिवाचनाचा गाभा आहे... पण तरिही,यातले अनुभव मांडणारा जो कुणी भटजी आहे,तो मी (स्वतः) नसून,आमच्यातल्या अनेक सर्वसामान्य भटजींचं ते एकत्रित व्यक्तित्व आहे असे समजावे!
-----------------------
पुढे चालू
खुला-सा:- हे व्हिडिओ अभिवाचन फेसबुक वर सुरू केलेले आहे.ते इथे देत आहे. फेसबुक वर केलेले असल्यामुळे त्या हिशोबानी मनातून आलेली ही प्रस्तावना आहे.
आपण मिपाकरांनी माझ्या गुरुजींचे भावविश्वला अलोट प्रतिसाद दिलात. आता या वरील प्रस्तावनेसह केलेल्या पहिल्या भागाच्या अभिवाचनासाठी
आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आहे. एक फरक इतकाच राहील की हे प्रत्येक एपिसोडमधले अभिवाचन येथे लिहिलेल्या भावविश्व मधल्या भाग1,भाग2 नुसार न रहाता.. 15 मिनिटे ते अर्धातास अश्या वेळेच्या हिशेबाने राहील. धन्यवाद.
आपलाच:- अतृप्त
सर्व तयारी झाली.
होता करता प्रत्यक्ष कोर्टात जाउन, जज समोर माझी बाजू मांडण्याचा दिवस आला.
-------------------------------------------------------------------------------------------
कोर्टात हजर राहण्यासाठी जेव्हा कामावरुन सुटी घेण्याची वेळ आली, तेव्हा मनात परत एकदा विचार आला की आपण उगाच याच्या मागे लागलो आहोत का ?
एवढे करुन काही तरी फायदा होणार आहे का? पण बहुदा कुणीतरी आपल्यावर चुकीचा आरोप केला आहे ही कल्पना माणसाला सहन होत नसावी.
सर्वसाधारण लोक सहसा कोर्ट-कचेर्री करायच्या फंदात फारसे पडत नाहित.
माझाहि स्वभाव मूलतः भांड्खोर नाहि अन कोर्ट-पोलिस यांच्या कहाण्या ऐकुन, मी स्वतः कधी या फंदात पडेन असे वाटले नव्हते, अन इतक्या छोट्या गोष्टिकरता तर खचितच नाहि ..
पण कधीतरी तुम्हालाच तुमच्या स्वतः विषयी नवीन कळते !