काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -२
आणखी काही नामांकित रसायने ही आहेत.
शेजारी.
आणखी काही नामांकित रसायने ही आहेत.
शेजारी.
'परसूंकीच बात है' हा लेख लिहून बरेच दिवस झाले. त्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये दक्खनी भाषेबद्दलही काही विचारणा होत्या. मी काही दक्खनी भाषेचा जाणकार नाही. पण त्या भाषेची आणखी ओळख वाचकांना व्हावी म्हणून
म्हणून इथे त्या भाषेतील एक कविता देत आहे. दक्खनी ही मराठीची खूपच जवळची बहिण आहे. (कदाचित 'सख्खी' असे म्हणता येईल.)
दक्खनी भाषेचे एक अभिमानी, उर्दु-हिंदीचे हरहुन्नरी कवी आणि प्रथितयश चित्रकार श्री. नरेन्द्र राय श्रीवास्तव 'नरेन' यांची एक विनोदी दक्खनी कविता वाचनात आली.
http://www.youtube.com/watch?v=FSbTl3kEyMI
'सुन री पवन' या अनुराग चित्रपटातल्या अप्रतिम गाण्याचं हे रसग्रहण नव्हे, त्यातल्या व्हिडिओची ही रनिंग कॉमेंटरी. गाण्याची टिंगल करण्याचा हेतू नाही. केवळ मौजमजा.
बालपणातली आठवण अशी की आजारी पडलो, की आई-वडील किंवा आजी-मावशी बरोबर (औषधाच्या) बाटल्या घेऊन दवाखान्यात जायचो. तिथं एक (च) डॉक्टर अन एक कंपाउंडर असायचा. डॉक्टरकाका तपासायचे अन एका कागदावर चार ‘अर्वाच्य’ (पक्षी-वाचता न येणारे ) शब्द खरडून द्यायचे. मग कंपाउंडरकाका मागच्या कपाटातून भरलेल्या असंख्य बाटल्यांपैकी काहींची बुचे फिरवून एका पत्र्याच्या पांढऱ्या मगात त्याचे ‘मिक्स्चर’ बनवीत अन आमच्या बाटल्यांमध्ये भरून देत. अन पुढे चार दिवस आम्ही ते मिक्स्चर अन वहीच्या कागदाने बांधलेल्या पुडीतल्या गोळ्या पोटात ढकलायचो. चार दिवसांनी तब्येत खडखडीत !
आमच्या शेजारच्या पावटे काकूंना त्यांच्या पोरीच्या म्हंजे स्वर्णीच्या लग्नाबद्दलचा लेख मुकपीठ मध्ये छापून आणायचा होता. त्यांच्या मते हे लग्न आगळेवेगळे आणि अभिनव पद्धतीने झालेले होते.शेजारधर्म पाळण्यात कसूर नगं म्हणून त्यांच्याकडून तिच्या लग्नाची बैजवार माहिती घेऊन लेख लिहून काढला. म्हटलं छापायला देण्यापूर्वी एकदा सगळ्यांच्या डोळ्याखालून सरकवावा. आन् कोणी अजुन काही चांगलं शीर्षक सुचवतय का ते बघावं. कारण ह्या बाबत मिपाकरांनी खटासि खट यांना त्यांच्या मुतपीठाच्या लेखासाठी केलेल्या मदतीचा अनुभव जमेला व्हता. तेव्हा शांत चित्ताने आपण हा लेख वाचावा अशी नम्र इनंती करुन माझे भाषण संपिवतो.
देहाला चोळुन घेता
राखेने उदी बनावे
धुवून सारी पापे
स्वर्गात स्थानही द्यावे
घाबर्या कोडग्या मनाते
दुजे न काही रुचते
भस्माच्या पट्टी मागे
ते तोंड लपवुनी बसते
(कुण्या भाग्यवंताचा)
हा तुटता लटका आधार
आत्मरुप दिसे भेसुर
गलीतगात्र मग होई
नरपुंगव तो लाचार,
मग तुटती तटतट पाश
मनी पडतो स्वच्छ प्रकाश
त्या अनंत धेय्या साठी
सुरु अंतहीन प्रवास
आजतागायत मानवप्राणी जे काही साध्य करू शकलाय ते त्याच्या 'कुतुहल' या गुणामुळेच, असं अनेक विचारवंत म्हणतात. पण माझा मात्र यावर काडी इतकाही विश्वास नाही. खरंतर माझा 'विचारवंत' या जातीवरच विश्वास नाही. मुळात डोक्यावरचं जंगल अन दाढीचे खुंट अस्ताव्यस्त वाढवून लोकं विचारवंत होतातच कशाला?? हा प्रश्न मला नेहमी पडतो.हे असले अवतार करून लोकांची टरकवण्यापेक्षा स्वत:च्या डोक्याला अधून मधून 'कंगवा' दाखवून ते 'विंचारवंत' का होत नाहीत ? हे माझं आपलं एक कुतूहल आहे. असो... कोणाच्याही डोक्यापर्यंत पोहचण्याचा हक्क आपल्याला नसल्यामुळे आय रेस्ट माय 'केस'!!: :)
(लेख इतरत्र पुर्व-प्रकाशित)
पुण्यनगरी हि तेथील पुणेरी (खाष्ट ?) पाट्या साठी प्रसिद्ध आहे. हे लोण आता अहमदाबाद पर्यंत पोचले आहे असे वाटते. नुकतीच Times ऑफ इंडिया मध्ये छापलेली चार उदाहरणे उद्धृत करत आहे.
१. शहराच्या मध्यभागात भद्र म्हणून एक विस्तार आहे. पुरातत्व विभागाने त्याची रक्षित स्थानांमध्ये गणना केली आहे. तेथील एका ४०० वर्षे जुन्या गणेश मंदिराबाहेर असा फलक लावला आहे.
--मन्दिराच्य्या कोठेही शाखा नाहीत. भाविकांनी फसवणूक होऊ देऊ नये.
२. एका लस्सीच्या दुकानाबाहेर मालकांनी वाटर कुलर बसवला आहे आणि त्याच्या शेजारी असा फलक लावला आहे.
नमस्कार मंडळी. मी चित्रगुप्त...
आता या चित्रगुप्ताचा अध्यात्माशी काय संबंध? असे तुम्ही म्हणत असाल.