मनातला ऐवज..
मनातला ऐवज..
दिलाय उधार
ठेव जपून...
वाटलं तर
परत कर..
कातर सांजवेळ
डोळ्यातलं काजळ
स्मिताच मोहळ
..
अन् नाहीच जमलं तर
उधळूही नको
फक्त कुरवाळत राहा
एक एक भाव जपत राहा..
मनातला ऐवज..
दिलाय उधार
ठेव जपून...
वाटलं तर
परत कर..
कातर सांजवेळ
डोळ्यातलं काजळ
स्मिताच मोहळ
..
अन् नाहीच जमलं तर
उधळूही नको
फक्त कुरवाळत राहा
एक एक भाव जपत राहा..
हे वेगवेगळे दिन थोतांड वाटतात, पटत नाही, जर प्रकृती पुरुष एकमेकांना पुरक मग एकाचाच उदोउदो का। माणसाने माणसा सारखे वागावे एवढीच अपेक्षा
महिलादिन
दाखवण्याचे दात वेगळे
जगण्याची ऱीत आगळी
जागतीक महिलादिनी
मोजा किती आसवं गळली
किती चढल्या बोहल्यावरी
किती ठरल्या हुंडाबळी
असल्या कसल्या रितीभाती
कधी तुडवे पायतळी
तर कधी घेई डोईवरी
सारे दिवस थोतांड
उद्दमींचे कुभांड
तुबंडी भरण्यासाठी
एक दिवसांचे खोटे पण
हिरवी गर्द वनराई, भोवताली पर्वत रांगा
ते भिरभिरणारे पक्षी, ती संथ प्रवाही गंगा
डोळे भरून पाहताना, ते स्मरणी साठवताना
मज ती अचानक दिसली, विवस्त्र स्नान करताना
भोळी आदिवासी अबला, स्वच्छंद तिच्या जल क्रिडा
ना भोवतालची जाण, संकोच, भीती ना पीडा
सौंदर्य मिसळले होते, सृष्टी ने तिच्या यौवनात
कोलाहल होता उठला, माझ्या अस्थिर मनात
क्षण मोहाचा सामोरी, क्षण नाजूक परी अघोरी
क्षण लपवणे ही चोरी, क्षणात पाटी कोरी
क्षणभर गढूळ झालो मी, ती क्षणाचीच कसोटी
क्षणी भानावर ज्या आलो,तो क्षण किमती कोटी कोटी
माना की आये थे मुठ्ठी बंद करके।
जायेंगे खाली हाथ
कुछ न लाये थे न ले जायेंगे साथ।
लोग कहते है दुनिया
ईक सराय है।
थोडेही दिन रहना है।
मगर सराय का किराया भी
तो हमे ही भरना है।
भरम मत पाल कोई आयेगा।
और खाट पे दे जयेगा।
जीतना दिन रहना है।
तेरा तुझे ही कमाना है।
"कफन मे जेब नही
ना कबर मे अलमारी
सारा यही छोड जाना है ।"
हमे बताते है, फिर ये बताओ
ये खुद क्यूँ कमाते है।
सोमिवरच्या पोष्टी पाहून विचारलेच त्याने एकदा
बरा वेळ मिळतो तुम्हाला बघावं तेव्हा पडीक असायला.
सतत ऑनलाईन दिसता; रिकामटेकडे आहात का?
आता आली वेळ बौद्धिक घेण्याची या वैतागेश्वराची
म्हणालो "तुला रे का इतकी काळजी इतरांच्या वेळेची?"
गरज काय दुसर्याच्या खाजगी जीवनात डोकावायची?
४७ नंतर विज्ञानातली किती नोबेल मिळाली भारताला?
की मिळाले एखादे ऑस्कर इथल्या उत्कृष्ट सिनेमाला?
बघ करतोस का प्रयत्न यातले एखादे मिळवायला?
*आपलं कुणी*
जेव्हा मनाला हुरहूर लागते
मन अस्वस्थ, बेचैन होतं
काहीच नको वाटु लागतं,
तेव्हा हवा असतो एक तरी
खांद्यावर थोपटून अलगद
धीर देणारा 'मैत्रीचा हात' !!
जेव्हा मन व्याकुळ होतं,
कोणीच नाही आपलं इथं
असं वाटायला लागतं,
तेव्हा डोकं टेकवण्यासाठी
कोणाच्या तरी खांद्याची
हवी असते 'खरी सोबत' !!
कधी उदास नयनांत
दाटून येतं आभाळ, नी
टपो-या अश्रूंची येते सर,
तेव्हा असावं 'आपलं कुणी'
हळुवार समजूत घालून
हसु फुलवणारं गालावर !!
©️वृंदा
*आपलं कुणी*
जेव्हा मनाला हुरहूर लागते
मन अस्वस्थ, बेचैन होतं
काहीच नको वाटु लागतं,
तेव्हा हवा असतो एक तरी
खांद्यावर थोपटून अलगद
धीर देणारा 'मैत्रीचा हात' !!
जेव्हा मन व्याकुळ होतं,
कोणीच नाही आपलं इथं
असं वाटायला लागतं,
तेव्हा डोकं टेकवण्यासाठी
कोणाच्या तरी खांद्याची
हवी असते 'खरी सोबत' !!
कधी उदास नयनांत
दाटून येतं आभाळ, नी
टपो-या अश्रूंची येते सर,
तेव्हा असावं 'आपलं कुणी'
हळुवार समजूत घालून
हसु फुलवणारं गालावर !!
©️वृंदा
डिस्क्लेमर:
१. ठिपसे असे एक आडनाव असते.
२. इथे केवळ मीटरमध्ये बसवायला आणि यमक जुळवण्यासाठी घेतले आहे.
३. त्यामुळे त्यावरून कृपया गैरसमजूत नको.
४. मूळ कविता आवडली आहेच, त्यामुळे कवींनी माफ करावे.
पालिकेतले कळकट ठिपसे
काळ्या मळक्या फाईलींच्या
ढीगात घुसूनि
हरवण्याच्या
थोडे आधी
तिथून निघूया,
पण ठिपश्यांच्या साहेबाला,
खात्यापित्या ज्यूनियरांना
सहकार्याचा
कंठ फुटेतो
जरा बसूया
मग बोलूया,
शहरदिव्यांचे पिवळट ठिपके
काळ्याकरड्या रस्त्यांवरच्या
धुरात भेसुर
चमचमण्याच्या
थोडे आधी
तिथून निघूया,
पाखरठिपक्यांच्या नक्षीला
भगव्यापिवळ्या मावळतीशी
किलबिलणारा
कंठ फुटेतो
जरा थांबूया
मग बोलूया,
चांदणठिपक्यांची रांगोळी
गारूड पाडून विस्कटण्याच्या
थोडी आधी
चंद्रधगीने
जरा वितळू दे
मग थांबूया.
पत्र नाही चिठ्ठी नाही
कावळा ओरडतो फांदीवर
चला चला गोडधोड करा
पाव्हणा पोचला पांदिवर
तोंडभरून आवातन
चार दिस आदुगरच यायचं
तेलच्या गुळवणी नळीचा
पहुणचार घ्यायचां
पाव्हणं तुमच्या बिगर जत्रा नाय
आस सोयर धायर म्हणायचं
वरमाई रुसली लाडाची
सार गाव धावलं
पोरीच्या आईबापाला
जग भरून पावल
आमंत्रण येत ऩव्हतं
निमंत्रण लागत नव्हतं
सुख दुखाःच्या वाटेवर
माणुस माणसाला भेटत होतं
जसा जसा काळ पुढ गेला
तसा तसा मेळ कमी झाला
माणुस सुधारला पण
नात्याचा भाव मात्र वधारला