बरेच दिवस झाले, ट्रेक झाला नाही


(चाल- नसतेस घरी तू जेव्हा-)
खातेस घरी तू जेव्हा
जीव घाबराघुबरा होतो
उरण्याचे होती वांधे
पोटात गोळा का येतो ..
डिश फुटून खाली पडावी
का तोल मना बिघडवतो
तोबरा मनी हीन वाटे
अन खंत वाटता रडतो ..
येतात पाहुणे घराशी
धुसफुसून सरती मागे
चिडकीशी गाठच आता
तव फंडा आठवत जातो ..
तव हालचाली बोकण्याच्या
मज डसती हजार वेळा
जीव जाई तरी हादडावे
मी बघ्याच नुसता उरतो ..
तू लांब राहशिल काय
सोडूनच या घरदारा
सगळ्यांचा जीव भकास
माझ्यासह उपास घडतो ..
एखाद्या गोष्टीची माहिती नसताना, ऐकीव किंवा दृष्य निकषांवर ठाम विश्वास ठेवणारे, किंवा स्वत:च काहीतरी अंदाजपंचे चुकीचे समज करून घेणारे जण बरेच असतात. हे असे झालेले समज कुणी काही सांगून बदलणं महाकठीण असतं; ते अनुभवाशिवाय होत नाही. आणि मग ज्या विश्वासाने ते अशा काही गोष्टी सगळ्यांना सांगतात ते बघताना फार मौज येते. आंब्याचंच घ्या ना ! आंब्याचा ‘सीझन’ आला, की मुंबईतले मुंबईबाहेरचे (यात स्वल्पविराम नाही आहे बरं का) फार कौतुकाने, हिरीरीने आंबे घेण्याच्या मागे लागतात. त्यांच्यातल्या प्रत्येकाला ही खात्री असते की त्याने जो आंबा विकत घेतलाय, तो भारीच आहे सर्वात.
नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य साहित्यच का मिपा वर पोस्ट करावं म्हटलं...
आज वैताग आलाय, कंटाळा आलाय, अशात काही सुचतं का बघावं म्हटलं...
यमक जुळतं का बघावं म्हटलं...
तर ही घ्या एक ओढून ताणून जिलबी

सगळे जसे सोडतात तशी आपण एक सोडायचीच
आज काहीही झालं तरी एक जिलबी पाडायचीच
कुणी म्हटलंय भावना इस्त्रीमधेच शोभतात
आणि असल्या तरीही म्हटलं आज इस्त्री मोडायचीच
आठवणींना चाळवायचं, भविष्याला आळवायचं
कशीतरी मनावरची एक खपली काढायचीच
नकोस टाकू
कटाक्ष तिरपा
मोहकसा ग
पुन्हा पुन्हा -
नकोस करू
गर्व रुपाचा
ठुमकत मिरवत
पुन्हा पुन्हा -
घमेंड तुजला
रूपगर्विते
दाखवी आरसा
पुन्हा पुन्हा -
नित्य आवडे
आत्मस्तुती
मनास कशी
पुन्हा पुन्हा -
डोळे अमुचे
आहेत म्हणुनी
रुपडे बघतो
पुन्हा पुन्हा -
आम्ही नसतो
डोळेही नसते
विचार कर ग
पुन्हा पुन्हा .. !
सहजसुंदर प्रेमाचे स्पंदन अनुभवत जागे व्हावे
अन निसर्गाच्या नितांत सुंदर जादूगरीशी समरस होत आरामात पहुडावे ...
चैतन्याच्या या अथांग सागरात मी काय तुम्ही काय
आपण सारेच लाटांसारखे सतत उफाळत असतो
आयुष्याच्या अनंत प्रवाहाच्या किनार्यालगत खेळताना
हाती लागलेल्या चार थेंबांचे शिंतोडे एकमेकांवर उडवत
तिथल्या सुंदर चकचकीत वाळूत ज्याने त्याने खुशाल आपापल्या स्वाक्षर्या कोरून काढाव्यात
आणि समिंदराची हाक आली की पुढल्या भरतीच्या लाटेत त्या विरूनही जाव्यात, कारण ...
कधि चन्द्र तारे मला भेट्ले कि
असे वाट्ते कि कुणि स्तब्ध आहे
कुणाशि किति बोलतो मि तरिहि
मुका वाटतो का मला शब्द आहे...
कधि सान्जवेळि असा भास होतो
कुणि हाथ हाथि अकस्मात देतो
परि साधत गोड सन्वाद थोडा
दुरावा कश्याने गोड स्वप्नास येतो.......
हवाहि जराशि स्पर्शुन जाता
कुणाचा मला बोचरा भास होतो
अशा शान्तशा या समुद्रास हि का
नदि भेट्न्याचा असा ध्यास होतो.......
कुणाला कळावि मनाचि अवस्था
कुणि या जगि ना कुणा साथ देतो
कुण्या सोबतिचि मला आस आता
म्हणोनि कुणा आज हा हाथ देतो.....
ढ
आळस देत मान वर काढता आली असती
जग म्हणजे काय ते बघता आलं असतं
हुशारपणाचं ओझं जरा हलकं झालं असतं
कधी वाटतं ढ असतो तर बरं झालं असतं ||धृ||
पुस्तकांच्या उगाचच राशी जमल्या नसत्या
गणित बिणीत गोष्टी मुळीच गमल्या नसत्या
धरल्या असत्या रोज खपल्या हाता पायांवर
क्रिकेट खोखोच्या मॅचेस रोज रंगल्या असत्या
कट्ट्यावर मग गप्पा मारत बसता आलं असतं ||१||
मी ही निळा रंग निळा रंगांच्या जातं कुळा
स्वयमेवा-रंग कधी खेळलो न मि ही खुळा
स्वप्नांचा रंग नवा दिसवे तो बहु बरवा
रंगुनीही जाइ त्यात दिसला तो आत्म खुळा
रंगांचे देश नवे काय त्यात दिसत हवे?
तो हिरवा हा पिवळा त्यातचि मी एक निळा
रंगांनी काय दिले ? दालन ते बहुत खुले
शिरूनी मग आत त्यात हो तू ही बहुत-बळा
त्या गावी एकटाच नसतो कुणि सावळाच
असला जरी कुणिही तसा तो असतो बहु विरळा
रंगांची पंचमीच असते ती नित्य नवी
त्यात दिवस-जोडताच असते ती बहुत हवी
परी त्याच्या पाठून तू पाहि काहि दिव्य कळा
आज तुकाराम बीज. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी
विनम्र अभिवादन.
तुकाराम होणे
विठ्ठल होणे सोपे आहे
कठीण तुकाराम होणे
मंबाजीची काठी खाणे
त्याचे हात कुरवाळणे
कठीण दुष्काळ सोसणे
रोखे इंद्रायणी बुडविणे
गोदाम जनात लुटविणे
आपुले दिवाळे काढणे
कठीण भंडारी एकांत
सोयरे वनचरा होणे
अंगी वृक्षवल्ली होऊन
डोई पाखरू बसणे
कठीण दैवासी हासणे
आई बाप गमावणे
पत्नी पुत्रा अग्नी देणे
विठो चरणी विसावणे