मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उंटावरल्या प्रा.डॉ. दा.ता.

माहितगार ·

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 03/19/2020 - 15:17
लंगड्या उंटावर बसले की पाठीचा व्यायाम आपोआप होतो, दूरचे दिसते, उंट सतत चालत असल्या मूळे झोप लागत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जमिनीवर सरपटणारे अतिक्षुद्र सामान्य लोक दृष्टीसही पडत नाहीत. याशिवाय तहान लागली तर आपल्याच उंटाचे पोट फाडून पाणी मिळवता येते. हाकानाका पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चांदणे संदीप गुरुवार, 03/19/2020 - 17:50
मिपाप्रंप्रेनुसार स्क्रोल करून खाली येऊन आधी कमेंट वाचाव्या म्हटलं तर तळाचा ठाव लागेना. माऊसच्या स्क्रोल बटणावर जसजसे बोट चालत होते तसतशी उत्कंठा वाढत होती आणि आता पैजारबुवांच्या प्रतिसादानंतर तर कविता वाचावीच लागणार. हे प्रभो, मला शक्ती दे! सं - दी - प

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार गुरुवार, 03/19/2020 - 16:45
:)) मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार. प्रा. मंडळींचे 'भावनेचा निचरा होणे आवश्यक आहे.' हे खासे बचावात्मक हत्यार आहे. माझे एक महाविद्यालयीन प्राध्यापक मोठ्या आत्मियतेने वर्षातून एकदा चिठ्ठ्या टाकण्याचे एक खोके वर्गात आणतं. सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारीच्या चिठ्ठ्या लिहून मागत आणि 'आता तुमच्या भावनांचा निचरा झाला ना ! त्याचे अभिनंदन' अशी शाब्बासकी देत. तक्रारी लिहिणारे बिच्चारे विद्यार्थी. या वरुनच एका छोट्या सोसायटीतील वसंतोत्सव व्याख्यानास एक राज्यशास्त्र प्राडॉ आणि एक सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. कायदा जरा जरा आवडीचा विषय असल्याने त्यांनी कार्यक्रमा शेवटी संधी शंका विचारण्याची देताच मी काही मुद्द्यांवर जराशी हजेरी घेतली त्या राज्यशास्त्र प्राडाँनी 'या निमीत्ताने तुमच्या मनातील किल्मीषे बाहेर पडली' असे भारी पुणेरी वापरत असाच बचाव केला. अधिक काय लिहीणे सगळ्यांनाच जराशी बचावाची जागा असलेली बरी असते. :))

चौकस२१२ Fri, 03/20/2020 - 05:10
आपल्या लांब पाल्याचा कवितेचा रोख कळला ...एकूण रोख असं दिसतो कि ..."आम्हाला नास्तिकांचे मुद्दे कळत आहेत पण आम्ही असेच वागणार + त्याला देशभक्ती ची जोड देणार " "आमच्या ईट्टलाला आमच्या रामकृष्णाला आमच्यापासून दूर करण्याचं लायसन कुणाबी मिळत न्हाय" अहो असा लायसन कोणी मागत नाहीये... जरा सद्सद्विविक बुद्धी ने तारतम्य बाळगून समाजाने जगावे एवढाच म्हणणे असते.. ना कोणी "लंगड्या अरबी उंटावर बसू गाई खाण्याचे तत्वज्ञान सांगित "आहे खरं अंतर सावरकरांनी जरूर पडल्यास ते हि करा असे काहीसे सांगितले होते ...(पण तो वेगळा विषय त्यांचे विचार नागपूरच्या हेच QU ला पण पचणार नाहीत ना ते पचणार बाबासाहेबांचं नातवाला, जाणत्या राजाचा तर सोडून द्या त्याला हे नाव ऐकलं कि खाजखुजली होते ) श्रदेहमुळे/ आस्तिकतेमुळे समाजाला काही तरी फायदा होत असेल तर कोण कशाला विरोध करेल? विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे" असे राबवले जाते तेव्हा माझ्यासारखा अर्ध आस्तिक सुद्धा नास्तिकतेच्या वाटेकडे चालू लागतो ... समाजात दोन टोक कशाला? अनिस चे कार्य मुळात चांगले आहे हे म्हणणारा लगेच नास्तिक उन्टवरचा अरबी होतो! आणि अनिस चे काहीतरी चुकतंय म्हणणारा लगेच संघोटे मनुवादी ठरतो? बाकी आपले एक निरीक्षण पटले ते म्हणजे "देशाच्या तुकड्यांना सौदी आमरीकी ,चिनी कसे वापरुन घेत्यात देशाचे तुकडे पडण्याचे ईतर देश फायदे घेत्यात" यात मी अमेरिके बरोबर व्हॅटिकन हा देश पण घालीन आणि असेही म्हणेन कि चिन्यांचे युद्ध फक्त भारतशी नाही तर सर्वांशी आणि ते फक्त आता पैसे आणि सत्ता यावर आहे, वर्ण किंवा धर्म यावर नसावे ) धर्मांतर करून आपली वाढ करण्याचा ज्यांचा हजारो वर्षे मानस आहे त्या दोन धर्मनच्या मध्ये उभे असलेले दगड म्हणजे भारतीय हिंदू आणि जगातील बुद्ध ...म्हणजे तलवार घेऊन उद्या चाल करून प्रेमळ लोक आले तर ते हे बघणार नाहीत कि समोरचा पाटील आहे की जोशी कि कांबळे. कि आस्तिक कि नास्तिक सगळे काफीरच )

माहितगार Fri, 03/20/2020 - 11:59
चौकस १२ - आपण रोख कळला म्हणून जो निष्कर्ष दिला आहे ते पहाता कदाचित कवितेच्या लांबी मुळे पुढचे पाठ मागचे सपाट होत असेल, कवितेचा काही भागच तुकड्यात लक्षात घेतला गेला असेल अथवा अंशतः का होईना जे म्हणावयाचे आहे ते पोहोचवण्यातले कवितेचे अपयश असेल. मला वाटते पैजारबुवांना आणि अगदी प्राडॉ सरांनाही कवितेचा रोख बर्‍यापैकी लक्षात आला असावा. प्राडॉ सरांना एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांना माझ्या मिपावरील आधीच्या लेखनाची पूर्वकल्पना आहे की ज्यात नास्तिकेतेच्या बाजूनेही केलेल्या माझ्या लेखनाचा समावेश होतो. आपण म्हणता तसे या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रात अनेक मुद्दे एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजात दोन टोक कशाला?
हिंदूपणा हि जगण्याची एक पद्धती आहे हे लक्षात घेतले तर हिंदूपणाने आस्तिक दर्शनांसोबत नास्तिक दर्शनांचाही मेळ रोजच्या जिवन पद्धतीन न सांगता घातला आहे -अर्थात हे बर्‍यापैकी अप्रत्यक्षपणे आणि आस्तिकांच्याही नकळत घडले आहे - हे दुर्दैवाने नास्तिक खासकरून नवनास्तिक मंडळी लक्षातच घेत नाहीत. कवितेचा टिकेचा भर नास्तिकांवर नव्हे न्हाऊच्या पाण्यासोबत हजारो वर्षांपासून विकासाचे कष्ट घेतलेल्या सांस्कृतिक आणि प्रगल्भ तत्वज्ञानाचे बाळही फेकुन देण्याचा आग्रह करणार्‍या नवनास्तिकांवर आहे. एकीकडे विवीधता हवी म्हणायचे आणि दुसरीकडे समाजात दोन टोक कशाला? श्रद्धा कशाला म्हणायचे हिंदूपणाच्या सर्वच श्रद्धांना आणि श्रद्धेच्या संकल्पनेला पूर्णतः चुकीचे ठरवायचे ह्यात दांभिक विरोधाभास असावा किंवा कसे.
श्रदेहमुळे/ आस्तिकतेमुळे समाजाला काही तरी फायदा होत असेल तर कोण कशाला विरोध करेल? विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे" असे राबवले जाते तेव्हा
श्रद्धा आणि आस्तिकता सोबत आढळत असल्यातरी आस्तिकता = श्र्द्धा हे जरुरी नाही, आस्तिकते शिवाय श्रद्धा असू शकते मी देव मानत नाही पण मी मुल्ये मानतो आणि माझी चांगल्या मुल्यांवर श्रद्धा असू शकते. एवढेच काय चांगल्या मुल्यांवरील श्रद्धेचा चांगल्या उद्देशाचा आग्रहही असू शकतो. प्रामाणिक डोळस श्रद्धेतून जी प्रामाणिक लॉयल्टी आणि इंटेग्रिटी मिळते जे झोकुन देणे शक्य होते ते तेवढे श्रद्धेचा अभाव असलेल्यांना सोपे जात नाही. पश्तुनवलीत देशभक्ती श्रद्धेचा भाग असते तेव्हा अफगाण महासत्तांनाही जेरीस आणतात. हिंदू धर्मीय पुरुषार्थात धर्माची म्हणजे चांगल्याची बाजू घेण्यासाठी सांगितले जाते -पण देशभक्तीचा सरळ उल्लेख नाही- तसे काही जण देशभक्तीचे महत्व लक्षात घेऊन देशभक्तीचा पुरुषार्थात समावेश करतील पण स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे सर्वजण करणार नाहीत. आणि मग देशाच्या एकतेवर श्रद्धा नसेल तर देशाला परकीयांशी नको त्या तडजोडींना सामोरे जावे लागते. आणि असे असेल तर मी देशाच्या एकतेप्रती श्रद्धेचा आग्रह का धरु नये? "विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे"" हे वाक्य हिंदूपणाचे सरसकट मिस रिप्रेझेंटेशन नाही का ? कशा वर श्रद्धा ठेवायचे ठेवायची की नाही याचे हिंदू धर्मा एवढे स्वातंत्र्य इतर धर्मात सोडाच नास्तिक सुद्धा देत नसावेत. कुणि चुकीची श्रद्धा सक्ती सांगत असेल तर त्याचा ठाम विरोध करण्याचे स्वातंत्र्य हिंदूपणा व्यतरीक्त इतर कुठे उपभोगले जाते? -आणि हिंदूपणाची हि बाजू लोकांना पटणार्‍या शब्दात लोकांपर्यंत नेता येत नसेल तर मुद्दा पटवून देण्यात आपणही कुठे कमी पडत असू शकतो हे स्विकारण्यात कमीपणा कोणता?
ना कोणी "लंगड्या अरबी उंटावर बसू गाई खाण्याचे तत्वज्ञान सांगित "आहे
गोमांस खाण्यात आले तर धर्मभ्रष्ट करणे चुकीचीच प्रथा होती -परधर्मीयांनी धर्मपरिवर्तनासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि सावरकरांचा उद्देश ती मोडीत काढण्याचा होता आणि त्याचे मी समर्थन करतो. गायी बैलांच्या शेतकी व्यवस्थेतील उपयूक्ततेबद्दल सावरकरांना साशंकता असण्याचे कारण नव्हते. एखादी गोष्ट अप्रशस्त असेल न करण्याबद्दल श्रद्धा नसलेली व्यक्ती एकदा विचार करेल तर श्रद्धा असलेली व्यक्ती दोनदा विचार करेल. माझी श्रद्धा नाही म्हणून मी एनकेन मार्गाने गायी बैल मिळवतो वाघाची कातडी मिळवतो हत्तीचे दात मिळवतो जंगले संपवतो असे सगळेच वागले नाही काही जण वागले तरी निसर्गचक्र असो वा अर्थचक्र असो धोक्यात येणार असेल तर माझ्या श्रद्धांचे मी समर्थन का करू नये माझ्या श्रद्धा तुम्हाला थोपवल्या जात आहेत असे वाटत असले तरी जर श्रद्धेसोबतच माझी तार्कीक माझी बाजू सुद्धा उजवी असेल तर एकदा समजावून सांगता येते पण ज्यांना समजूनच घ्यायचे नसते त्यांच्यावर का थोपवू नये? गाई खाण्याच्या तत्वज्ञानाचा प्रसार केला जात नाही आहे असे कुणि म्हणत असेल तर गांधीचे डोळे बंद केलेले माकड आपण पाळता का हा प्रश्न विचारणे अवश्यंभावी असावे. केरळातले कम्युनीस्ट गोमांसाचा अधिकृतपणे प्रसार करतात तेव्हा मला कम्युनिस्टांच्या नास्तिक्यावर आक्षेप जाणवतो. पण केरळातले कम्युनीस्ट दूर राहीले. गोहत्येसाठी गाईच्या ट्रेडींगवरुन जी काही लिंचीग झाली ती उत्तर भारतात झाली महाराष्ट्राततर नव्हे ना? पण या गोष्टीचा चेव आमच्या शिवसेना प्रमुखांना यावा यात भूषणावह काय आहे. दुसर्‍या एका मिपा टायीपच्याच मराठी वेबसाईटच्या मालकीणीने चक्क गोमांसाच्या रेसिपीज मराठीतून टाकण्याचा सपाटा लावला कशासाठी ? उत्तरभारतात लिंचींग झालीतर त्याचे खापर फोडून महाराष्ट्रात गोमांस प्रसारात तुम्ही सहभागी होणार ? हेही एक द्वेषाचा बदला द्वेषानेच घेणे झाले ना आणि हे का होते ? गायीची शेतकी अर्थव्यवस्थेतील उपयूक्तता न मसजण्या एवढे हे अज्ञानी असतात की श्रद्धा हरवली म्हणावे ?
"आमच्या ईट्टलाला आमच्या रामकृष्णाला आमच्यापासून दूर करण्याचं
इथे एकतर ते सांस्कृतिक मेटाफोर म्हणून वापरले आहेत. दुसरे वृद्धांना मुलांपासून दूर केले जाण्याची जी संस्कृती फोफावते आहे त्यावरही टिका आहे. आम्ही पंढरीच्या पांडूरंगाची भक्ती तिथे केवळ विठ्ठल आहे म्हणून करत नाही. हिंदूपणाचा विठ्ठल कणाकणात विराजमान आहे असे म्हणताना अवघा भाजी पाल्यात विठ्ठल पाहताना आमच्या परिचित सृष्टीतच ईशवराचा वास पाहील्या नंतर आस्तिक्यात आणि नास्तिक्यात फरक कोणता रहातो. कराग्रे वसते लक्ष्मी म्हटल्या नंतर आस्तिक्यात आणि नास्तिक्यात कोणता फरक रहातो ? पांडूरंगाच्या आपल्या वडीलधार्‍यांच्या सेवेतच आम्ही विठ्ठल पहातो तेव्हा विठ्ठल पहाणारा आस्तिक असूनही नास्तिक असतो. आणि त्याची आस्तिकतेतील नास्तिकता न समजणारा नास्तिक , नास्तिक असूनही आस्तिक असतो. आज आकाशवाणीच्या सकाळी वाजवल्या जाणार्‍या भावसंगिताचा काळ राहीलेला नाही पण आस्तिक भक्ती संगितासोबतच देव दगडात नाहीरे हे गाडगेबाबांचे गितही भारतीय सश्रद्ध हिंदूला -काही असाह्यता मानसिक असुरक्षीतता किंवा कामनांच्या भरात तात्कालिक विसर पडला तरीही - व्यवस्थित ठाऊक असते. पण म्हणून तो नास्तिकांप्रमाणे अथवा मुर्तीभंजकांप्रमाणे मुर्ती द्वेष्टा होत नाही. त्याला हेही माहित असते की समस्या मुर्ती आणि भक्तीत नाही कामनांमध्ये काम्यव्रतांमध्ये मध्ये आहे आणि काम्यव्रते टाळण्याच्या चळवळी संतएकनाथांसहीत अनेक भारतीय संतांनी केलेल्या आहेत. जशा जशा असुरक्षीतता कमी होतात तशा तशा अंधश्रद्धा आणि काम्यव्रते मागे पडतात. बदलांना उत्क्रांतींला आणि अगदी विज्ञानवादाला विरोध नाही हे कवितेत व्यवस्थित स्पष्ट केले आहे. विरोध न्हाऊच्या पाण्यासोबत आमच्या संस्कृती आणि तवज्ञानाने साध्य केलेल्या चांगल्या बाजूही फेकुन देण्याला आहे. दुसरे असे की विवीधता जपायची म्हणायचे आणि श्रद्धावंतांचे श्रद्धेचे स्वातंत्र्यच नाकारायचे त्याची टवाळी आणि हेटाळणी करायची संपूर्ण संस्कृतीच नाकारायची हा काय प्रकार आहे ? हे होतच नाही असे म्हणत असाल तर जे करतात त्यांच्या कडे आपण जाणता अजाणता दुर्लक्ष करता असे म्हणावे का? माझा या कवितेतील टिकेचा कंपास केवळ मिपाकर प्राडाँपर्यंत मर्यादीत नाही उत्तर ते दक्षिण पुर्व ते पश्चिम विद्यापीठातन काय होतय हे बघुन मगच केलेली टिका आहे. मिपाकर प्राडॉ केवळ प्रातिनिधीक उदाहरण आहेत. आमचे प्राडॉसर आमचे असल्याबद्दल आमचे त्यांच्यावर प्रेम आहेच पण आता हे उदाहरण घ्या इथे विवीधतेतून एकता सांगण्यसाठी आवर्जून हजेरी लावतात. पण तेच या प्रतिसादात ज्या धर्मीयांच्या अंधश्रद्धांवर टिका करणे सोपे आहे त्यांच्यावर विनासायास टिका आहे - ती टिका असू द्यातच पण अरबस्थानातल्यांचा त्यात उल्लेख का नाही ? त्यांच्याचसाठी विवीधतेतून एकता ऐकवण्यासाठी आला होताना मग जिथे त्यांचेही चुकते त्यात टिकेची कमतरता का ? करोना कोविड१९ वीषाणूचा प्रभाव केवळ हिंदू आणि ख्रिस्चन भक्तांवर होतो आणि मस्जिदीतील भक्तांवर होत नाही असे काही असते का? मी जेव्हा टिका करतो तेव्हा अरबी धर्मातून काय चांगले घेण्यासारखे आहे ते घ्यावे या बद्दलचा ही माझा मिपा धागा असतो , समुह द्वेष न ठेवता तत्वज्ञानातील उणीवांवरही टिका करतो . आमची नवनास्तिक मंडळी केवळ हिंदू धर्मीय गोष्टींवर टिका करावी आणि दुसर्‍यांची वेळ आली की विवीधतेचे लेक्चर झोडावे हा कोणता न्याय आहे ? बरे हे परदेशात बसून नव्हे हिंदूच्या देशात हिंदूपणाच्या उदारतेचा उघड फायदा घेऊनच करतात ना ? असो.

Bhakti गुरुवार, 04/29/2021 - 18:06
द्विधा अवस्थेत पाडणारी पण उत्तराकडे नेणारी.आवडली.

गॉडजिला गुरुवार, 04/29/2021 - 18:27
आस्तिकांच्या भावना दुखावल्या जातात कारण वैयक्तिक असेल तरी श्रध्देला तडा नास्तिकक्रुतितुन मिळतो. पण जेंव्हा एक नास्तिक इतरांची आस्तिक कृती जेंव्हा सहन करतो तेंव्हा त्याच्या वैयक्तिक असल्या तरी भावना दुखावल्याबद्दल किती आस्तिक माफि मागतात ?

In reply to by गॉडजिला

माहितगार Fri, 04/30/2021 - 08:33
अज्ञेय आणि नास्तिकांनी कविता अधिक वेळा वाचावी अशा तळटिपेची गरज होती का ? (सहसा नास्तिकांना डोळस गृहीत धरले जाते गृहीतकातल्या त्रुटी कविता दाखवण्याचे कवितेचे यश समजायचे का?) बरखूरदार, कविता श्रद्धेची वैचारीकपणे सकारात्मक बाजू मांडते पण कवितेत नसलेले 'भावना दुखावल्याचे हत्यार' आपण कुठून शोधले ? कवितेत नास्तिकांवर टिका आहेच, सश्रद्धांप्रमाणे नास्तिकांची भावना दुखावत असेल तर त्याची नास्तिकता संपून तो / ती कशात तरी विवेक सोडून सश्रद्ध झाला समजावे का ? हा वेगळ्या चर्चा धाग्याचा प्रश्न आहे तो इथे हाताळत नाही. भावना दुखावण्याचा विषय उपरोक्त कवितेत आणि संबंधीत चर्चेत संबंध असण्याचे काही कारण दिसत नाही. आपल्याला विषयास अनुसरून व्यवस्थित व्यक्त करता आले नसेल तर अधिक विसृत लिहिण्यास हरकत नाही पण वर म्हटल्या प्रमाणे भावना दुखावणे हा विषय कवितेचा नसल्याने विषयातंर असेल तर वेगळा धागा काढून व्यवस्थित व्यक्त होणे अधिक प्रशस्त असावे किंवा कसे? आता या कवितेनेच नास्तिकांची भावना दुखावल्याची भावना असेल (या विवेकनिष्ठ कवितेबद्दल नास्तिकांना तसे कारण असू नये ) तरीही आस्तीकांची माफी हवी असेल तर ती कवितेच्या शेवट्च्या ओळींचे सौजन्यशील आस्तिकांच्या सौजन्यातील आस्तिकतेचे आपले वाचन सुटलेले दिसते आपल्या माहिती साठी शेवटच्या ओळी पुन्हा एकदा:
....कठोर बोल्ली आसन तर आडाण्यास्नी माफी असावी समजून घ्याल याची आशा ठेवणारी आपलीच अडाणी आशा देवाळु

In reply to by माहितगार

गॉडजिला Fri, 04/30/2021 - 10:38
बरखूरदार, कविता श्रद्धेची वैचारीकपणे सकारात्मक बाजू मांडते पण कवितेत नसलेले 'भावना दुखावल्याचे हत्यार' आपण कुठून शोधले ?
श्रध्दा व भावना या एका नाण्याच्या दोन बाजु आहेत. अर्थात भावना तर आस्तिकांच्या दुखावल्या जाउ शकतात असाच आप्लाही समज असल्याने तठ्स्त विषद केलेले वास्तव 'भावना दुखावल्याचे हत्यार' वाटले तर आश्चर्य कोणते म्हणा...
कवितेत नास्तिकांवर टिका आहेच, सश्रद्धांप्रमाणे नास्तिकांची भावना दुखावत असेल तर त्याची नास्तिकता संपून तो / ती कशात तरी विवेक सोडून सश्रद्ध झाला समजावे का ?
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची नास्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ?
आता या कवितेनेच नास्तिकांची भावना दुखावल्याची भावना असेल (या विवेकनिष्ठ कवितेबद्दल नास्तिकांना तसे कारण असू नये ) तरीही आस्तीकांची माफी हवी असेल तर ती कवितेच्या शेवट्च्या ओळींचे सौजन्यशील आस्तिकांच्या सौजन्यातील आस्तिकतेचे आपले वाचन सुटलेले दिसते
माफी कसली मागता, जाण जरी ठेवलीत कि एक आस्तिक माणुस त्याच्या आस्तिकतेच्या सार्वजनीक प्रदर्शनाने नास्तिकाच्या जितक्या वेळा आणि प्रमाणात भावना दुखवतो तितक्या प्रमाणात (काही बिंडोक प्राडॉदाता वगळता) कोणताही नास्तिक आस्तिकाच्या भावना दुखावतो ना आस्तिकाच्या वागण्याने दुखावला जातो. बाकि ते रेसीपी टाकणे वगैरेबाबत आपल्याशी तिव्र सहमत आहे मुद्दाम असे करणे चुक आहे त्याचा त्यांच्या संस्थळावर तुम्ही समाचार घ्यायलाच हवा.

In reply to by गॉडजिला

गॉडजिला Fri, 04/30/2021 - 10:58
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची नास्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ?
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची आस्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ? असे वाचावे. आणि हो माझ्या वैयक्तीक अनुभवानुसार नास्तिक लोकांची समग्र चर्चेत उतरायची कधीही तयारी नसते असे मत बनले आहे.

माहितगार Fri, 04/30/2021 - 08:44
@ रंगीला रतन ; Bhakti; चित्रगुप्त; मूकवाचक; कुमार१; यश राज सकारात्मक पावती मिळत काव्य धागा अचानक वर आल्याचे पाहून श्रमांचे चीज झाल्यासारखे वाटले. आपणा सर्व प्रतिसाद कर्त्यांचे मनःपुर्वक आभार

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 03/19/2020 - 15:17
लंगड्या उंटावर बसले की पाठीचा व्यायाम आपोआप होतो, दूरचे दिसते, उंट सतत चालत असल्या मूळे झोप लागत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जमिनीवर सरपटणारे अतिक्षुद्र सामान्य लोक दृष्टीसही पडत नाहीत. याशिवाय तहान लागली तर आपल्याच उंटाचे पोट फाडून पाणी मिळवता येते. हाकानाका पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चांदणे संदीप गुरुवार, 03/19/2020 - 17:50
मिपाप्रंप्रेनुसार स्क्रोल करून खाली येऊन आधी कमेंट वाचाव्या म्हटलं तर तळाचा ठाव लागेना. माऊसच्या स्क्रोल बटणावर जसजसे बोट चालत होते तसतशी उत्कंठा वाढत होती आणि आता पैजारबुवांच्या प्रतिसादानंतर तर कविता वाचावीच लागणार. हे प्रभो, मला शक्ती दे! सं - दी - प

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार गुरुवार, 03/19/2020 - 16:45
:)) मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार. प्रा. मंडळींचे 'भावनेचा निचरा होणे आवश्यक आहे.' हे खासे बचावात्मक हत्यार आहे. माझे एक महाविद्यालयीन प्राध्यापक मोठ्या आत्मियतेने वर्षातून एकदा चिठ्ठ्या टाकण्याचे एक खोके वर्गात आणतं. सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारीच्या चिठ्ठ्या लिहून मागत आणि 'आता तुमच्या भावनांचा निचरा झाला ना ! त्याचे अभिनंदन' अशी शाब्बासकी देत. तक्रारी लिहिणारे बिच्चारे विद्यार्थी. या वरुनच एका छोट्या सोसायटीतील वसंतोत्सव व्याख्यानास एक राज्यशास्त्र प्राडॉ आणि एक सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. कायदा जरा जरा आवडीचा विषय असल्याने त्यांनी कार्यक्रमा शेवटी संधी शंका विचारण्याची देताच मी काही मुद्द्यांवर जराशी हजेरी घेतली त्या राज्यशास्त्र प्राडाँनी 'या निमीत्ताने तुमच्या मनातील किल्मीषे बाहेर पडली' असे भारी पुणेरी वापरत असाच बचाव केला. अधिक काय लिहीणे सगळ्यांनाच जराशी बचावाची जागा असलेली बरी असते. :))

चौकस२१२ Fri, 03/20/2020 - 05:10
आपल्या लांब पाल्याचा कवितेचा रोख कळला ...एकूण रोख असं दिसतो कि ..."आम्हाला नास्तिकांचे मुद्दे कळत आहेत पण आम्ही असेच वागणार + त्याला देशभक्ती ची जोड देणार " "आमच्या ईट्टलाला आमच्या रामकृष्णाला आमच्यापासून दूर करण्याचं लायसन कुणाबी मिळत न्हाय" अहो असा लायसन कोणी मागत नाहीये... जरा सद्सद्विविक बुद्धी ने तारतम्य बाळगून समाजाने जगावे एवढाच म्हणणे असते.. ना कोणी "लंगड्या अरबी उंटावर बसू गाई खाण्याचे तत्वज्ञान सांगित "आहे खरं अंतर सावरकरांनी जरूर पडल्यास ते हि करा असे काहीसे सांगितले होते ...(पण तो वेगळा विषय त्यांचे विचार नागपूरच्या हेच QU ला पण पचणार नाहीत ना ते पचणार बाबासाहेबांचं नातवाला, जाणत्या राजाचा तर सोडून द्या त्याला हे नाव ऐकलं कि खाजखुजली होते ) श्रदेहमुळे/ आस्तिकतेमुळे समाजाला काही तरी फायदा होत असेल तर कोण कशाला विरोध करेल? विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे" असे राबवले जाते तेव्हा माझ्यासारखा अर्ध आस्तिक सुद्धा नास्तिकतेच्या वाटेकडे चालू लागतो ... समाजात दोन टोक कशाला? अनिस चे कार्य मुळात चांगले आहे हे म्हणणारा लगेच नास्तिक उन्टवरचा अरबी होतो! आणि अनिस चे काहीतरी चुकतंय म्हणणारा लगेच संघोटे मनुवादी ठरतो? बाकी आपले एक निरीक्षण पटले ते म्हणजे "देशाच्या तुकड्यांना सौदी आमरीकी ,चिनी कसे वापरुन घेत्यात देशाचे तुकडे पडण्याचे ईतर देश फायदे घेत्यात" यात मी अमेरिके बरोबर व्हॅटिकन हा देश पण घालीन आणि असेही म्हणेन कि चिन्यांचे युद्ध फक्त भारतशी नाही तर सर्वांशी आणि ते फक्त आता पैसे आणि सत्ता यावर आहे, वर्ण किंवा धर्म यावर नसावे ) धर्मांतर करून आपली वाढ करण्याचा ज्यांचा हजारो वर्षे मानस आहे त्या दोन धर्मनच्या मध्ये उभे असलेले दगड म्हणजे भारतीय हिंदू आणि जगातील बुद्ध ...म्हणजे तलवार घेऊन उद्या चाल करून प्रेमळ लोक आले तर ते हे बघणार नाहीत कि समोरचा पाटील आहे की जोशी कि कांबळे. कि आस्तिक कि नास्तिक सगळे काफीरच )

माहितगार Fri, 03/20/2020 - 11:59
चौकस १२ - आपण रोख कळला म्हणून जो निष्कर्ष दिला आहे ते पहाता कदाचित कवितेच्या लांबी मुळे पुढचे पाठ मागचे सपाट होत असेल, कवितेचा काही भागच तुकड्यात लक्षात घेतला गेला असेल अथवा अंशतः का होईना जे म्हणावयाचे आहे ते पोहोचवण्यातले कवितेचे अपयश असेल. मला वाटते पैजारबुवांना आणि अगदी प्राडॉ सरांनाही कवितेचा रोख बर्‍यापैकी लक्षात आला असावा. प्राडॉ सरांना एवढ्यासाठी म्हणतोय की त्यांना माझ्या मिपावरील आधीच्या लेखनाची पूर्वकल्पना आहे की ज्यात नास्तिकेतेच्या बाजूनेही केलेल्या माझ्या लेखनाचा समावेश होतो. आपण म्हणता तसे या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रात अनेक मुद्दे एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजात दोन टोक कशाला?
हिंदूपणा हि जगण्याची एक पद्धती आहे हे लक्षात घेतले तर हिंदूपणाने आस्तिक दर्शनांसोबत नास्तिक दर्शनांचाही मेळ रोजच्या जिवन पद्धतीन न सांगता घातला आहे -अर्थात हे बर्‍यापैकी अप्रत्यक्षपणे आणि आस्तिकांच्याही नकळत घडले आहे - हे दुर्दैवाने नास्तिक खासकरून नवनास्तिक मंडळी लक्षातच घेत नाहीत. कवितेचा टिकेचा भर नास्तिकांवर नव्हे न्हाऊच्या पाण्यासोबत हजारो वर्षांपासून विकासाचे कष्ट घेतलेल्या सांस्कृतिक आणि प्रगल्भ तत्वज्ञानाचे बाळही फेकुन देण्याचा आग्रह करणार्‍या नवनास्तिकांवर आहे. एकीकडे विवीधता हवी म्हणायचे आणि दुसरीकडे समाजात दोन टोक कशाला? श्रद्धा कशाला म्हणायचे हिंदूपणाच्या सर्वच श्रद्धांना आणि श्रद्धेच्या संकल्पनेला पूर्णतः चुकीचे ठरवायचे ह्यात दांभिक विरोधाभास असावा किंवा कसे.
श्रदेहमुळे/ आस्तिकतेमुळे समाजाला काही तरी फायदा होत असेल तर कोण कशाला विरोध करेल? विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे" असे राबवले जाते तेव्हा
श्रद्धा आणि आस्तिकता सोबत आढळत असल्यातरी आस्तिकता = श्र्द्धा हे जरुरी नाही, आस्तिकते शिवाय श्रद्धा असू शकते मी देव मानत नाही पण मी मुल्ये मानतो आणि माझी चांगल्या मुल्यांवर श्रद्धा असू शकते. एवढेच काय चांगल्या मुल्यांवरील श्रद्धेचा चांगल्या उद्देशाचा आग्रहही असू शकतो. प्रामाणिक डोळस श्रद्धेतून जी प्रामाणिक लॉयल्टी आणि इंटेग्रिटी मिळते जे झोकुन देणे शक्य होते ते तेवढे श्रद्धेचा अभाव असलेल्यांना सोपे जात नाही. पश्तुनवलीत देशभक्ती श्रद्धेचा भाग असते तेव्हा अफगाण महासत्तांनाही जेरीस आणतात. हिंदू धर्मीय पुरुषार्थात धर्माची म्हणजे चांगल्याची बाजू घेण्यासाठी सांगितले जाते -पण देशभक्तीचा सरळ उल्लेख नाही- तसे काही जण देशभक्तीचे महत्व लक्षात घेऊन देशभक्तीचा पुरुषार्थात समावेश करतील पण स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे सर्वजण करणार नाहीत. आणि मग देशाच्या एकतेवर श्रद्धा नसेल तर देशाला परकीयांशी नको त्या तडजोडींना सामोरे जावे लागते. आणि असे असेल तर मी देशाच्या एकतेप्रती श्रद्धेचा आग्रह का धरु नये? "विरोध केव्हा होतो कि जेव्हा "श्रद्धा असलीच पाहिजे"" हे वाक्य हिंदूपणाचे सरसकट मिस रिप्रेझेंटेशन नाही का ? कशा वर श्रद्धा ठेवायचे ठेवायची की नाही याचे हिंदू धर्मा एवढे स्वातंत्र्य इतर धर्मात सोडाच नास्तिक सुद्धा देत नसावेत. कुणि चुकीची श्रद्धा सक्ती सांगत असेल तर त्याचा ठाम विरोध करण्याचे स्वातंत्र्य हिंदूपणा व्यतरीक्त इतर कुठे उपभोगले जाते? -आणि हिंदूपणाची हि बाजू लोकांना पटणार्‍या शब्दात लोकांपर्यंत नेता येत नसेल तर मुद्दा पटवून देण्यात आपणही कुठे कमी पडत असू शकतो हे स्विकारण्यात कमीपणा कोणता?
ना कोणी "लंगड्या अरबी उंटावर बसू गाई खाण्याचे तत्वज्ञान सांगित "आहे
गोमांस खाण्यात आले तर धर्मभ्रष्ट करणे चुकीचीच प्रथा होती -परधर्मीयांनी धर्मपरिवर्तनासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि सावरकरांचा उद्देश ती मोडीत काढण्याचा होता आणि त्याचे मी समर्थन करतो. गायी बैलांच्या शेतकी व्यवस्थेतील उपयूक्ततेबद्दल सावरकरांना साशंकता असण्याचे कारण नव्हते. एखादी गोष्ट अप्रशस्त असेल न करण्याबद्दल श्रद्धा नसलेली व्यक्ती एकदा विचार करेल तर श्रद्धा असलेली व्यक्ती दोनदा विचार करेल. माझी श्रद्धा नाही म्हणून मी एनकेन मार्गाने गायी बैल मिळवतो वाघाची कातडी मिळवतो हत्तीचे दात मिळवतो जंगले संपवतो असे सगळेच वागले नाही काही जण वागले तरी निसर्गचक्र असो वा अर्थचक्र असो धोक्यात येणार असेल तर माझ्या श्रद्धांचे मी समर्थन का करू नये माझ्या श्रद्धा तुम्हाला थोपवल्या जात आहेत असे वाटत असले तरी जर श्रद्धेसोबतच माझी तार्कीक माझी बाजू सुद्धा उजवी असेल तर एकदा समजावून सांगता येते पण ज्यांना समजूनच घ्यायचे नसते त्यांच्यावर का थोपवू नये? गाई खाण्याच्या तत्वज्ञानाचा प्रसार केला जात नाही आहे असे कुणि म्हणत असेल तर गांधीचे डोळे बंद केलेले माकड आपण पाळता का हा प्रश्न विचारणे अवश्यंभावी असावे. केरळातले कम्युनीस्ट गोमांसाचा अधिकृतपणे प्रसार करतात तेव्हा मला कम्युनिस्टांच्या नास्तिक्यावर आक्षेप जाणवतो. पण केरळातले कम्युनीस्ट दूर राहीले. गोहत्येसाठी गाईच्या ट्रेडींगवरुन जी काही लिंचीग झाली ती उत्तर भारतात झाली महाराष्ट्राततर नव्हे ना? पण या गोष्टीचा चेव आमच्या शिवसेना प्रमुखांना यावा यात भूषणावह काय आहे. दुसर्‍या एका मिपा टायीपच्याच मराठी वेबसाईटच्या मालकीणीने चक्क गोमांसाच्या रेसिपीज मराठीतून टाकण्याचा सपाटा लावला कशासाठी ? उत्तरभारतात लिंचींग झालीतर त्याचे खापर फोडून महाराष्ट्रात गोमांस प्रसारात तुम्ही सहभागी होणार ? हेही एक द्वेषाचा बदला द्वेषानेच घेणे झाले ना आणि हे का होते ? गायीची शेतकी अर्थव्यवस्थेतील उपयूक्तता न मसजण्या एवढे हे अज्ञानी असतात की श्रद्धा हरवली म्हणावे ?
"आमच्या ईट्टलाला आमच्या रामकृष्णाला आमच्यापासून दूर करण्याचं
इथे एकतर ते सांस्कृतिक मेटाफोर म्हणून वापरले आहेत. दुसरे वृद्धांना मुलांपासून दूर केले जाण्याची जी संस्कृती फोफावते आहे त्यावरही टिका आहे. आम्ही पंढरीच्या पांडूरंगाची भक्ती तिथे केवळ विठ्ठल आहे म्हणून करत नाही. हिंदूपणाचा विठ्ठल कणाकणात विराजमान आहे असे म्हणताना अवघा भाजी पाल्यात विठ्ठल पाहताना आमच्या परिचित सृष्टीतच ईशवराचा वास पाहील्या नंतर आस्तिक्यात आणि नास्तिक्यात फरक कोणता रहातो. कराग्रे वसते लक्ष्मी म्हटल्या नंतर आस्तिक्यात आणि नास्तिक्यात कोणता फरक रहातो ? पांडूरंगाच्या आपल्या वडीलधार्‍यांच्या सेवेतच आम्ही विठ्ठल पहातो तेव्हा विठ्ठल पहाणारा आस्तिक असूनही नास्तिक असतो. आणि त्याची आस्तिकतेतील नास्तिकता न समजणारा नास्तिक , नास्तिक असूनही आस्तिक असतो. आज आकाशवाणीच्या सकाळी वाजवल्या जाणार्‍या भावसंगिताचा काळ राहीलेला नाही पण आस्तिक भक्ती संगितासोबतच देव दगडात नाहीरे हे गाडगेबाबांचे गितही भारतीय सश्रद्ध हिंदूला -काही असाह्यता मानसिक असुरक्षीतता किंवा कामनांच्या भरात तात्कालिक विसर पडला तरीही - व्यवस्थित ठाऊक असते. पण म्हणून तो नास्तिकांप्रमाणे अथवा मुर्तीभंजकांप्रमाणे मुर्ती द्वेष्टा होत नाही. त्याला हेही माहित असते की समस्या मुर्ती आणि भक्तीत नाही कामनांमध्ये काम्यव्रतांमध्ये मध्ये आहे आणि काम्यव्रते टाळण्याच्या चळवळी संतएकनाथांसहीत अनेक भारतीय संतांनी केलेल्या आहेत. जशा जशा असुरक्षीतता कमी होतात तशा तशा अंधश्रद्धा आणि काम्यव्रते मागे पडतात. बदलांना उत्क्रांतींला आणि अगदी विज्ञानवादाला विरोध नाही हे कवितेत व्यवस्थित स्पष्ट केले आहे. विरोध न्हाऊच्या पाण्यासोबत आमच्या संस्कृती आणि तवज्ञानाने साध्य केलेल्या चांगल्या बाजूही फेकुन देण्याला आहे. दुसरे असे की विवीधता जपायची म्हणायचे आणि श्रद्धावंतांचे श्रद्धेचे स्वातंत्र्यच नाकारायचे त्याची टवाळी आणि हेटाळणी करायची संपूर्ण संस्कृतीच नाकारायची हा काय प्रकार आहे ? हे होतच नाही असे म्हणत असाल तर जे करतात त्यांच्या कडे आपण जाणता अजाणता दुर्लक्ष करता असे म्हणावे का? माझा या कवितेतील टिकेचा कंपास केवळ मिपाकर प्राडाँपर्यंत मर्यादीत नाही उत्तर ते दक्षिण पुर्व ते पश्चिम विद्यापीठातन काय होतय हे बघुन मगच केलेली टिका आहे. मिपाकर प्राडॉ केवळ प्रातिनिधीक उदाहरण आहेत. आमचे प्राडॉसर आमचे असल्याबद्दल आमचे त्यांच्यावर प्रेम आहेच पण आता हे उदाहरण घ्या इथे विवीधतेतून एकता सांगण्यसाठी आवर्जून हजेरी लावतात. पण तेच या प्रतिसादात ज्या धर्मीयांच्या अंधश्रद्धांवर टिका करणे सोपे आहे त्यांच्यावर विनासायास टिका आहे - ती टिका असू द्यातच पण अरबस्थानातल्यांचा त्यात उल्लेख का नाही ? त्यांच्याचसाठी विवीधतेतून एकता ऐकवण्यासाठी आला होताना मग जिथे त्यांचेही चुकते त्यात टिकेची कमतरता का ? करोना कोविड१९ वीषाणूचा प्रभाव केवळ हिंदू आणि ख्रिस्चन भक्तांवर होतो आणि मस्जिदीतील भक्तांवर होत नाही असे काही असते का? मी जेव्हा टिका करतो तेव्हा अरबी धर्मातून काय चांगले घेण्यासारखे आहे ते घ्यावे या बद्दलचा ही माझा मिपा धागा असतो , समुह द्वेष न ठेवता तत्वज्ञानातील उणीवांवरही टिका करतो . आमची नवनास्तिक मंडळी केवळ हिंदू धर्मीय गोष्टींवर टिका करावी आणि दुसर्‍यांची वेळ आली की विवीधतेचे लेक्चर झोडावे हा कोणता न्याय आहे ? बरे हे परदेशात बसून नव्हे हिंदूच्या देशात हिंदूपणाच्या उदारतेचा उघड फायदा घेऊनच करतात ना ? असो.

Bhakti गुरुवार, 04/29/2021 - 18:06
द्विधा अवस्थेत पाडणारी पण उत्तराकडे नेणारी.आवडली.

गॉडजिला गुरुवार, 04/29/2021 - 18:27
आस्तिकांच्या भावना दुखावल्या जातात कारण वैयक्तिक असेल तरी श्रध्देला तडा नास्तिकक्रुतितुन मिळतो. पण जेंव्हा एक नास्तिक इतरांची आस्तिक कृती जेंव्हा सहन करतो तेंव्हा त्याच्या वैयक्तिक असल्या तरी भावना दुखावल्याबद्दल किती आस्तिक माफि मागतात ?

In reply to by गॉडजिला

माहितगार Fri, 04/30/2021 - 08:33
अज्ञेय आणि नास्तिकांनी कविता अधिक वेळा वाचावी अशा तळटिपेची गरज होती का ? (सहसा नास्तिकांना डोळस गृहीत धरले जाते गृहीतकातल्या त्रुटी कविता दाखवण्याचे कवितेचे यश समजायचे का?) बरखूरदार, कविता श्रद्धेची वैचारीकपणे सकारात्मक बाजू मांडते पण कवितेत नसलेले 'भावना दुखावल्याचे हत्यार' आपण कुठून शोधले ? कवितेत नास्तिकांवर टिका आहेच, सश्रद्धांप्रमाणे नास्तिकांची भावना दुखावत असेल तर त्याची नास्तिकता संपून तो / ती कशात तरी विवेक सोडून सश्रद्ध झाला समजावे का ? हा वेगळ्या चर्चा धाग्याचा प्रश्न आहे तो इथे हाताळत नाही. भावना दुखावण्याचा विषय उपरोक्त कवितेत आणि संबंधीत चर्चेत संबंध असण्याचे काही कारण दिसत नाही. आपल्याला विषयास अनुसरून व्यवस्थित व्यक्त करता आले नसेल तर अधिक विसृत लिहिण्यास हरकत नाही पण वर म्हटल्या प्रमाणे भावना दुखावणे हा विषय कवितेचा नसल्याने विषयातंर असेल तर वेगळा धागा काढून व्यवस्थित व्यक्त होणे अधिक प्रशस्त असावे किंवा कसे? आता या कवितेनेच नास्तिकांची भावना दुखावल्याची भावना असेल (या विवेकनिष्ठ कवितेबद्दल नास्तिकांना तसे कारण असू नये ) तरीही आस्तीकांची माफी हवी असेल तर ती कवितेच्या शेवट्च्या ओळींचे सौजन्यशील आस्तिकांच्या सौजन्यातील आस्तिकतेचे आपले वाचन सुटलेले दिसते आपल्या माहिती साठी शेवटच्या ओळी पुन्हा एकदा:
....कठोर बोल्ली आसन तर आडाण्यास्नी माफी असावी समजून घ्याल याची आशा ठेवणारी आपलीच अडाणी आशा देवाळु

In reply to by माहितगार

गॉडजिला Fri, 04/30/2021 - 10:38
बरखूरदार, कविता श्रद्धेची वैचारीकपणे सकारात्मक बाजू मांडते पण कवितेत नसलेले 'भावना दुखावल्याचे हत्यार' आपण कुठून शोधले ?
श्रध्दा व भावना या एका नाण्याच्या दोन बाजु आहेत. अर्थात भावना तर आस्तिकांच्या दुखावल्या जाउ शकतात असाच आप्लाही समज असल्याने तठ्स्त विषद केलेले वास्तव 'भावना दुखावल्याचे हत्यार' वाटले तर आश्चर्य कोणते म्हणा...
कवितेत नास्तिकांवर टिका आहेच, सश्रद्धांप्रमाणे नास्तिकांची भावना दुखावत असेल तर त्याची नास्तिकता संपून तो / ती कशात तरी विवेक सोडून सश्रद्ध झाला समजावे का ?
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची नास्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ?
आता या कवितेनेच नास्तिकांची भावना दुखावल्याची भावना असेल (या विवेकनिष्ठ कवितेबद्दल नास्तिकांना तसे कारण असू नये ) तरीही आस्तीकांची माफी हवी असेल तर ती कवितेच्या शेवट्च्या ओळींचे सौजन्यशील आस्तिकांच्या सौजन्यातील आस्तिकतेचे आपले वाचन सुटलेले दिसते
माफी कसली मागता, जाण जरी ठेवलीत कि एक आस्तिक माणुस त्याच्या आस्तिकतेच्या सार्वजनीक प्रदर्शनाने नास्तिकाच्या जितक्या वेळा आणि प्रमाणात भावना दुखवतो तितक्या प्रमाणात (काही बिंडोक प्राडॉदाता वगळता) कोणताही नास्तिक आस्तिकाच्या भावना दुखावतो ना आस्तिकाच्या वागण्याने दुखावला जातो. बाकि ते रेसीपी टाकणे वगैरेबाबत आपल्याशी तिव्र सहमत आहे मुद्दाम असे करणे चुक आहे त्याचा त्यांच्या संस्थळावर तुम्ही समाचार घ्यायलाच हवा.

In reply to by गॉडजिला

गॉडजिला Fri, 04/30/2021 - 10:58
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची नास्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ?
आस्तिकाची भावना दुखावल्याने त्याची आस्तिकता संपून तो / ती विवेक जोपासुन अश्रध्द झाला समजावे का ? असे वाचावे. आणि हो माझ्या वैयक्तीक अनुभवानुसार नास्तिक लोकांची समग्र चर्चेत उतरायची कधीही तयारी नसते असे मत बनले आहे.

माहितगार Fri, 04/30/2021 - 08:44
@ रंगीला रतन ; Bhakti; चित्रगुप्त; मूकवाचक; कुमार१; यश राज सकारात्मक पावती मिळत काव्य धागा अचानक वर आल्याचे पाहून श्रमांचे चीज झाल्यासारखे वाटले. आपणा सर्व प्रतिसाद कर्त्यांचे मनःपुर्वक आभार
प्रा.= प्राध्यापक डॉ. = डॉक्टर दा.= दादा ता. = ताई उंटावरल्या प्रा.डॉ.

जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा

माहितगार ·

In reply to by श्वेता२४

माहितगार Wed, 12/18/2019 - 11:21
सुप्रभात आणि नमस्कार खरय वृत्ते छन्द चाल इत्यादी अस्मादिकांचा प्रांत नव्हे, :( मी केवळ मतितार्थाची काळजी घेउ शकतो इतर कुणास यात सुयोग्य सुधारणा करता आल्यास स्वागतच असेल. मनमोकळ्या अभिप्रायासाठी अनेक आभार. __/\__

In reply to by श्वेता२४

माहितगार Wed, 12/18/2019 - 11:21
सुप्रभात आणि नमस्कार खरय वृत्ते छन्द चाल इत्यादी अस्मादिकांचा प्रांत नव्हे, :( मी केवळ मतितार्थाची काळजी घेउ शकतो इतर कुणास यात सुयोग्य सुधारणा करता आल्यास स्वागतच असेल. मनमोकळ्या अभिप्रायासाठी अनेक आभार. __/\__
लेखनविषय:
कवि एका जनार्दनी श्री गुरुदत्ताचा भक्त जाणा । श्री गणपती देवी पार्वती महादेव वीष्णू ब्रह्मा आदी देवतांचे नमन म्हणा। सर्वांना आपलेसेकरी हिंदूधर्माच्या सकारत्मक भगव्या उत्क्रांती कळसाचा उद्घोषम्हणा। जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।। विवीधगुणात्मक ख्रिसमसट्री देव हा जाणा। सगुणी अवतार वनस्पतीलोकीचा राणा। राम भेटी मुग्ध म्हणे जये हनुमाना । गुरुवर्य येशुयोगीबोले त्रिमुर्तीअनेकदेवाद्वैत सर्वाठायी जाणा। जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।। सबाह्याअभ्यंतरी तु एक वटवृक्षदेव। अभाग्यासी कैची कळेल ही मात।

काल धरण बांधिले

अनन्त्_यात्री ·

बरोबर आहे. भारताच्या राजकारणाला लागलेला हा खेकडारोग (कर्करोग) नागरिकांच्या कराला आणि इतर संसाधनांना भगदाडे पाडत असतो. तो समूळ नष्ट झाला पाहिजे, तरच उज्वल भवितव्याची आशा ठेवता येईल !

खिलजि Fri, 07/12/2019 - 19:57
खेकड्याची औलाद म्हणता म्हणता बापालाच आरोपी केलं हर्रामी राहिले असेच मोकळे गाव वाहून गेलं कुणी बांधलं , कसं बांधलं बसेल समिती आता तोपर्यंत साले हादडून घेतील मग निवांत खातील लाथा

बरोबर आहे. भारताच्या राजकारणाला लागलेला हा खेकडारोग (कर्करोग) नागरिकांच्या कराला आणि इतर संसाधनांना भगदाडे पाडत असतो. तो समूळ नष्ट झाला पाहिजे, तरच उज्वल भवितव्याची आशा ठेवता येईल !

खिलजि Fri, 07/12/2019 - 19:57
खेकड्याची औलाद म्हणता म्हणता बापालाच आरोपी केलं हर्रामी राहिले असेच मोकळे गाव वाहून गेलं कुणी बांधलं , कसं बांधलं बसेल समिती आता तोपर्यंत साले हादडून घेतील मग निवांत खातील लाथा
लेखनविषय:
काव्यरस
काल धरण बांधिले खेकड्यांनी हो तोडिले येरू म्हणे बघा नीट विठू चरणीची वीट सृष्टीचा जो तोले भार त्यासी विटेचा आधार युगे अठ्ठावीस ठेला विठू विटेवरी भला वीट अजूनी अभंग बघणारे होती दंग मूळ माल जर नीट (जशी विठ्ठलाची वीट) तर फिजूल बोभाट नको खेकडी खटपट

माझे मन पाही

पाषाणभेद ·
लेखनविषय:
माझे मन पाही विठ्ठल मुर्ती सावळां विठ्ठल उभा पंढरीसी ||१|| नाही मज वेळ जाण्या राऊळा नच पूजा केली कधी काळां ||२|| रमलो संसारी विना विचार भाव भक्तीचा केवळ उपचार ||३|| नमस्कार केला दोन्ही कर जोडूनी पाषाण भेटला उराउरी दुरूनी ||४|| ०९/०५/२०१९

कितीसा पुरोगामी आहेस ?

माहितगार ·
(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी) कमिटेड टू हूम कमिटेड टू व्हॉट पुरोगामी पुरोगामी कितीसा पुरोगामी आहेस ? तुझ्यासाठी आपले कुणीच नाही तूला तू त्यांचा आहेस असे वाटते तेही फसवे नसते का ? आपल्यातल्या आपल्यांचा होऊ शकला नाहीस त्यांचाही होऊन रहाणे खरेच जमेल का तूला ? आणि तूही कुणाचाच नाहीस हेच खरे नसते का ? त्यागी आहेस हे बरे आहे एका अर्थाने आपल्या अंगच्या वस्त्रांचाही त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे जंगलात जाऊन कायमचा एकांतवास अनुभवून पहाशील का ? पूरोगामीत्व निवांतपणे अनुभवण्याचा आणि अनुभवू देण्याचा तो सर्वोत्कृष्ट पुरोगामी मार्ग आहे ना स्वतःस पुरोगामी सिद्ध करण्याचा तोच

#एकादशी #

सतिश गावडे ·

नाखु Tue, 11/14/2017 - 13:44
भक्ती भाव उतरले आहेत घरकोंबडा वारकरी नाखु

नाखु Tue, 11/14/2017 - 13:44
भक्ती भाव उतरले आहेत घरकोंबडा वारकरी नाखु
लेखनविषय:
काव्यरस
तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला तारी भवसागरी करी मज मोकळा देई तुझ्या रे चरणी तू ठाव मला झालो चिंब भक्तीत मीपणा नुरला माझा देह हा चंदनाचा रे झाला नामाचा गोडवा माझ्या ओठी आला पामर रे तुझा हा भक्ती रस प्याला पाहूनी राधेसी तुझिया रे अंकावरी होई रुकमाई रे कावरी बावरी झाले सहन न तिला आली दिंडीरवनाला देवा आला तू पाठी समजूत घालण्याला पाहूनी झोपडी रे चंद्रभागेतीरी देवा क्षण दोन क्षण तू थबकला देवा क्षण दोन क्षण तू थबकला आतून वीट फेकली पुंडलीक बोलला तू थांब मातापित्याची सेवा करु दे

भेटी लागी जीवा . .

माम्लेदारचा पन्खा ·

पिशी अबोली Tue, 07/04/2017 - 23:28
सुरेख!! पावसाच्या स्वामी स्वरूपानंदांची एक सुंदर रचना आहे-'उदारा जगदाधारा' ने सुरू होणारी. लहानपणी म्हणत असू, ते आठवलं एकदम हे वाचून..

पिशी अबोली Tue, 07/04/2017 - 23:28
सुरेख!! पावसाच्या स्वामी स्वरूपानंदांची एक सुंदर रचना आहे-'उदारा जगदाधारा' ने सुरू होणारी. लहानपणी म्हणत असू, ते आठवलं एकदम हे वाचून..
लेखनविषय:
परब्रम्ह उभे ठाकले समोर साक्षात कैसे मी मग सावरावे आता देहभान दाटलेला कंठ,डोळा पाणी आर्त हरपली केव्हाच अवघी भूक तहान मागणे भौतिक सुखे हे मूर्खलक्षण अशाश्वत गोष्टींचे काय करु कळेना तूच निर्मीलेल्या जगी कंठतो जीवन तरीही का तुझा परीसस्पर्श होईना सद्य परिस्थिती देवा तुझिया समोरी काय तुला मी वेगळे असे आळवावे दाता आहेस तू, एवढेच द्यावे मला तुझ्या चरणाची मी फक्त धूळ व्हावे !

वारी हो वारी

माम्लेदारचा पन्खा ·
लेखनविषय:
होता आषाढी कृष्णमेघांची दाटी मन केवळ विठूसाठी आक्रंदे । चालती पाऊले दिशा पंढरीची वारकरी आम्ही नाहू आनंदे । घोष एक गजर एक एक नाम जीव पिसावला या मधुर नादे । ना जुमानू आता ऊन पावसासी मार्ग क्रमु पांडुरंगाच्या आशिर्वादे । पडता दिठीस चरण ते सावळे जैसे भ्रमर प्राशी तो मकरंदे । वारीस न जाताही मनाने वारीमय हळवा अवघा महाराष्ट्र विठ्ठल छंदे ।

माऊली उत्सव

कवि मनाचा ·
लेखनविषय:
|| माऊली उत्सव || विठु तुझ्या नामानं, 'मी'पणं गळलं बासुरीगत झालं मनं, रितं न् पोकळं तुझ्या फुंकरेनं केले, स्वर हे मधाळं भक्तीरस झालं सारं, जीवन सकळं जगी नश्वरी नाही, इथे माझा राम देहभान बनले माझे, फक्त तुझा धाम तुझ्या दर्शनाची असे, आज मला आस मनमंदिरात माझ्या, फक्त तुझा वास देवा तुझ्या नामाची, चढलीया धुंदी कृतार्थाला सेवेची, दे रे एक संधी मनामधी वाहीला, तुझाच भक्तीझरा मनं माझं आतुरलेलं, मिळाया सागरा सोडूनी खेळ पाठी, हा उनसावल्यांचा चालतो मैलोन् मैल, जयघोष हरीनामाचा नाचतो मनडोलारा, नाद टाळमृदंगाचा वाहतो परमानंद डोही, वारकरी पंढरीचा मन होई रे प्रसन्न, कारणभाव सर्वसिद्धींचा तुका म्हणे तेथे

फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ?

माहितगार ·

एस गुरुवार, 05/05/2016 - 11:19
कविता आवडली. कै. फिरोज गांधी हे कमालीचे तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच त्यांच्या व त्यांच्या बायको, सासर्‍यांमध्ये वितुष्ट आले.

In reply to by एस

माहितगार गुरुवार, 05/05/2016 - 13:19
प्रतिसादासाठी धन्यवाद. आंतरजालावर आत्ताच एक बरेच जूने रोचक व्यंगचित्र पहाण्यात आले, फिरोजनी या व्यंगचित्राला सद्यस्थितीत दाद दिली असती असे वाटून गेले. vyangachitra (सौजन्य :विकिमिडीया कॉमन्स दुवा) थॉमस नास्ट या व्यंगचित्रकाराचे इस.१८७१ मध्ये न्युयॉर्क टाईम्स मध्ये आलेले व्यंगचित्रात तो विचारतोय ' सांगा, जनतेचा पैसा कुणी चोरला ?' तर व्यंगचित्रातील पात्रे चक्राकार उभे राहून प्रत्येकजण दुसर्‍याकडे बोट दाखवत 'त्याने' असे म्हणतोय.

In reply to by पथिक

माहितगार गुरुवार, 05/05/2016 - 13:40
देशप्रेम आणि भ्रष्ट्राचार विरोध या विषयातला हा अध्वर्यू,- प्रकरणे स्वतः शोधून संसदेत मांडत असे, हा पत्रकारांकडून नव्ह पत्रकार याच्याकडून माहिती घेत, भूमिका बांधताना-टिका करताना त्याने ना त्याच्या स्वधर्मीयांची गय केली ना स्व कुटूंबीयांची- त्याच्या स्वकुटूंबीयांना आणि स्वपक्षीयांना त्याचा वारसा सांगण्याची हिंमत होताना कधी दिसत नाही, कदाचित आठवण दिली कौतुक केले तर त्याचे कुटूंबीय आणि पक्ष वारसा सांगतील या भितीने किंवा इतर कारणाने विरोधी पक्ष अथवा तथाकथित चळवळे या माणसाची आठवण काढताना फारसे दिसत नाहीत.

पैसा गुरुवार, 05/05/2016 - 13:51
नंतरच्या पिढीतल्या जावयांचे प्रताप बघून या जावयाने जरा जास्त अधिकार का गाजवला नाही असे वाटते.

हकु गुरुवार, 05/05/2016 - 14:42
नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र चालवण्यामध्ये फिरोज गांधी यांचा मोलाचा वाटा होता. अर्थात सध्या समोर आलेला घोटाळा हा त्या नंतरचा. पण काँग्रेस पैकी कोणीही त्यांचे नाव घेऊ इच्छित नाही.

माहितगार Mon, 08/27/2018 - 16:08
फिरोज गांधींच्या भावी पिढ्यातील जैविक गुणसुत्रे सत्ता परिवारत राखण्यासाठी अद्यपही नाट्यमय साठमारीत गुंतलेली आहेत. सप्टेंबरात फिरोज गांधींची जयंती १२ सप्टे, आणि पुण्यतिथी ८ सप्टें आहे . त्यांचा जैव गुणसूत्रीय आणि राजकीय परिवार त्यांची आठवण ठेवणार नाही हे एका परीने या माणसाचा अपमान टळण्यासाठी बरेच आहे. फिरोज गांधींची आठवण सामान्य भारतीयांनीच करावी. सप्टेंबर जवळ येतोय, फिरोज गांधीं ची आठवण येण्यास निमीत्तही झाले तेव्हा हा धागा वर काढतोय.

एस गुरुवार, 05/05/2016 - 11:19
कविता आवडली. कै. फिरोज गांधी हे कमालीचे तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच त्यांच्या व त्यांच्या बायको, सासर्‍यांमध्ये वितुष्ट आले.

In reply to by एस

माहितगार गुरुवार, 05/05/2016 - 13:19
प्रतिसादासाठी धन्यवाद. आंतरजालावर आत्ताच एक बरेच जूने रोचक व्यंगचित्र पहाण्यात आले, फिरोजनी या व्यंगचित्राला सद्यस्थितीत दाद दिली असती असे वाटून गेले. vyangachitra (सौजन्य :विकिमिडीया कॉमन्स दुवा) थॉमस नास्ट या व्यंगचित्रकाराचे इस.१८७१ मध्ये न्युयॉर्क टाईम्स मध्ये आलेले व्यंगचित्रात तो विचारतोय ' सांगा, जनतेचा पैसा कुणी चोरला ?' तर व्यंगचित्रातील पात्रे चक्राकार उभे राहून प्रत्येकजण दुसर्‍याकडे बोट दाखवत 'त्याने' असे म्हणतोय.

In reply to by पथिक

माहितगार गुरुवार, 05/05/2016 - 13:40
देशप्रेम आणि भ्रष्ट्राचार विरोध या विषयातला हा अध्वर्यू,- प्रकरणे स्वतः शोधून संसदेत मांडत असे, हा पत्रकारांकडून नव्ह पत्रकार याच्याकडून माहिती घेत, भूमिका बांधताना-टिका करताना त्याने ना त्याच्या स्वधर्मीयांची गय केली ना स्व कुटूंबीयांची- त्याच्या स्वकुटूंबीयांना आणि स्वपक्षीयांना त्याचा वारसा सांगण्याची हिंमत होताना कधी दिसत नाही, कदाचित आठवण दिली कौतुक केले तर त्याचे कुटूंबीय आणि पक्ष वारसा सांगतील या भितीने किंवा इतर कारणाने विरोधी पक्ष अथवा तथाकथित चळवळे या माणसाची आठवण काढताना फारसे दिसत नाहीत.

पैसा गुरुवार, 05/05/2016 - 13:51
नंतरच्या पिढीतल्या जावयांचे प्रताप बघून या जावयाने जरा जास्त अधिकार का गाजवला नाही असे वाटते.

हकु गुरुवार, 05/05/2016 - 14:42
नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र चालवण्यामध्ये फिरोज गांधी यांचा मोलाचा वाटा होता. अर्थात सध्या समोर आलेला घोटाळा हा त्या नंतरचा. पण काँग्रेस पैकी कोणीही त्यांचे नाव घेऊ इच्छित नाही.

माहितगार Mon, 08/27/2018 - 16:08
फिरोज गांधींच्या भावी पिढ्यातील जैविक गुणसुत्रे सत्ता परिवारत राखण्यासाठी अद्यपही नाट्यमय साठमारीत गुंतलेली आहेत. सप्टेंबरात फिरोज गांधींची जयंती १२ सप्टे, आणि पुण्यतिथी ८ सप्टें आहे . त्यांचा जैव गुणसूत्रीय आणि राजकीय परिवार त्यांची आठवण ठेवणार नाही हे एका परीने या माणसाचा अपमान टळण्यासाठी बरेच आहे. फिरोज गांधींची आठवण सामान्य भारतीयांनीच करावी. सप्टेंबर जवळ येतोय, फिरोज गांधीं ची आठवण येण्यास निमीत्तही झाले तेव्हा हा धागा वर काढतोय.
लेखनविषय:
फिरोज, आज तुझीच का आठवण व्हावी ? पण तुझी नव्हे तर अजून कुणाची व्हावी ? याक्षणी तुझ्या सारखा राजर्षी स्वर्गात ऐषफर्मावत असेल असेही शक्य नाही तू ज्या कुंपणावर थांबून रयतेसाठी देशाची राखण केलीस तेच कुंपण शेत खाते आहे पाहून तू अस्वस्थ होत असशील कुठेतरी धडपडतही असशील, काळाने अभिप्रेत नसलेले गूण उधळत ठोके चुकवताना तुझ्या जैवीक गुणसूत्रांचीही आब नाही राखली त्याला तू तरी काय करशील? नैतीकता दूकानातून विकत आणून का कुणाला देता येते ?