समाज

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ११: मानव हाच प्रश्न आणि मानव हेच उत्तर

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
4 Jul 2016 - 12:58 pm
संस्कृतीधर्मसमाजजीवनमानतंत्रविचारलेख

शेती ह्या विषयासाठी वेगळा विभाग असावा....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
4 Jul 2016 - 10:40 am

नमस्कार,

गेली २०-२२ वर्षे मी शेती ह्या विषयावर माहिती गोळा करत होतो आणि अजूनही माहिती गोळा करत आहेच.

मिपावर पण ह्या विषयावर बरेच लेख असावेत.पण "शेती" ह्या विषयासाठी स्वतंत्र विभाग नसल्याने, ह्या विषयावरील माहिती शोधतांना खूपच वेळ वाया जातो.

सुरंगी, नाखू ह्यांनी ह्या विषयावर बरेच लिखाण पण केले आहे. (किंबहूना मला माझ्या शेतीचे आर्थिक नियोजन करतांना ह्यांच्या लेखांचा खूप फायदा झाला आणि पुढे पण होईलच.)

ह्या माहितीमुळेच, मी शेतकरी होवू शकलो.

समाजजीवनमानतंत्रराहणीप्रकटनविचार

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

बोका-ए-आझम's picture
बोका-ए-आझम in जनातलं, मनातलं
3 Jul 2016 - 11:42 pm

दिलखेचक! रापचिक! धमाल!
हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा!

हे ठिकाणवावरसमाजराहणीमौजमजाप्रकटनविचारबातमीअनुभव

बांग्लादेशची सुरक्षास्थिती आणि भारता समोरचे आव्हान

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
3 Jul 2016 - 8:01 am

बांग्लादेशात असुरक्षीतता नवीन नसावी, कडवे लोक हिंसेच्या माध्यमातून व्यवस्था हातात घेण्यास आतूर होताना दिसतात. गेल्या दोन दिवसा पुर्वी ढाक्यातील परदेशी दूतावास क्षेत्रातील परदेशी लोकांचा वावर असलेल्या बेकरीवरील दहशतवादी हल्ला, बांग्लादेशातील सुरक्षा व्यवस्थेची समस्या हाताच्या बाहेर जात नाहीए ना अशी साशंकता निर्माण करतो.

समाजराजकारणविचारबातमी

मी बाई होते म्हणुनी .. भाग -११

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
2 Jul 2016 - 2:07 am

राजसभेतुन बाहेर पडल्यापासुन माझ्या दालनात येईपर्यंत माझ्या कानांत काकांचं शेवटचं वाक्य घुमत होतं ‘ तुम्हांला तिघींना तुमचा निर्णय घेण्यासाठी उद्या सुर्यास्तापर्यंतची वेळ आहे, उद्या सुर्यास्तानंतर आपण सर्वजण इथं जमु आणि तुमचा निर्णय ऐकु. त्यानंतरच्या दिवशी चवथ्या प्रहरी राजा दशरथांना भेटायला आपणा सर्वांना जायचं आहे, तुमचा निर्णय काहीही असला तरी..’

समाजजीवनमान

एक संघ मैदानातला - भाग १५

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
1 Jul 2016 - 6:10 pm

काही अपरिहार्य कारणांमुळे हा भाग टाकायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व..

--------------x--------------x----------

बाकीचे संघ हळूहळू येऊन बसत होते. स्पर्धेचा दुसरा दिवस असल्यामुळे सगळ्या टीम्स हजार होत्या. आमचा टाइमपास चालूच होता पण आम्हाला सगळ्यांना खर तर कोल्हापूर वि. वसई ह्या मॅचची उत्सुकता होती. सामने सुरू होत होते संपत होते. काही अपेक्षित तर काही अनपेक्षित निकाल लागत होते. एकूणच माहोल संथ ही नव्हता आणि फार धसमुसळाही नव्हता. जे जे जिथे जिथे हवं तसं तसं ते ते होतं... पण काही तरी मिसिंग होतं.

समाजविरंगुळा

निसर्ग, पर्यावरण आणि आपण १०: काही कटु प्रश्न आणि काही कटु उत्तरे

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
28 Jun 2016 - 1:34 pm
संस्कृतीधर्मसमाजजीवनमानतंत्रविचारलेख

मी बाई होते म्हणुनी - भाग -१०

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
27 Jun 2016 - 6:15 am

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964

समाजजीवनमान

शेवटी बाप हाय म्या-3

आनंद कांबीकर's picture
आनंद कांबीकर in जनातलं, मनातलं
25 Jun 2016 - 12:44 am

तुला बुलट घिवुन द्यायची आपली ऐपत नवती अण एवढंच काय हे बी कबुल हई म्या तुला कधी खेळायची मोटर बी नै घिउ शकलो. पर तु आठीव अतापोस्तवर तुला कदी बी शाळाची वाट सोडुन रानाची वाट धरा लावली नाय. दोन घास कमी खाल्लं पर तोहया पुस्तकाची सोय लावली.
तु बारवी झालास तवापासुण त्याट छाती काडुन गावात फिरायचु. आपुण लावलेलं झाड़ आता गार गार सावली देणार म्हणायचु.

मांडणीसमाज

स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण?

स्वीट टॉकरीणबाई's picture
स्वीट टॉकरीणबाई in जनातलं, मनातलं
24 Jun 2016 - 9:56 am

स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण?

अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी स्वतः पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर ! पण इतकं सरळ नाही ते.

कारण ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्‍यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. प्रत्येक जणच म्हणतो की "या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्‍यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत." वगैरे. वगैरे.

संस्कृतीकथासमाजजीवनमानराहणीविचारलेखमत