हं ! ते तुला कधी जमणारच नाही
प्रस्तावना: कविता आजकाल सुचत नसली तरी परम मित्र वल्ली यामुळे काही तरी लिहिले आहे.. नविन काव्य असे होत नसते म्हणुन काल आवडलेल्या कवितेला (धानजीरावांच्या) कवितेतुन उत्तर देत आहे
मुळ कविता : तू ये...
अरे द्यायचेच असेल तर दे
आभाळालाही कवेत घेवु पाहणारे ते हात
हं ! ते तुला कधी जमणारच नाही
तोडलेल्या पाशावरती, कशास कुंपण अन भिंती
शब्दांच्याच वादळांची कसली आहे कोणास भिती
अरे गायचेच असेल तर गा
ते स्वर बंदिशी मिलनाचे...
हं ! ते तुला कधी जमणारच नाही