अदा बेगम - भाग ४
अदा बेगम - भाग ४
------------------------
महाराष्ट्रात बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. राजांच्या कारवाया चालूच होत्या . शांतता कशी ती नव्हती . शेवटी स्वराज्याचा यज्ञ जो मांडला होता.
शाहिस्तेखानाचा पराभव, जसवंतसिंहाचा पराभव, सुरत आणि अहमदनगरची लूट यामुळे औरंजेबाचा भडका उडाला होता. शिवाजीचा बंदोबस्त केला नाही तर दख्खन ताब्यातून जाईल हे जाणण्याइतका तो धूर्त होता.
महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने दरबारातला मोठा अनुभवी सरदार निवडला - मिर्झाराजे जयसिंग !